नृसिंह जयंती – नृसिंह जन्म कथा

May 14, 2022 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

आज नृसिंह जयंती निमित्त चला आपण नृसिंह जन्म कथा पाहूया

हिरण्यकश्यपू राजा ह्यांनी भगवंताची भक्ती करून त्याला प्रसन्न करून घेतले होते व असा वर मागितला कि मला कोणत्याही माणसाकडून वा प्राण्याकडून मृत्य येऊ नये, दिवसा किंवा रात्री मृत्य येऊ नये , घरात नाही किंवा बाहेर सुद्धा मृत्यू येऊ नये ,  असा वर त्याने प्राप्त करून घेतला. हा वर प्राप्त झाल्यामुळे तो स्वतःला अजरामर समजू लागला त्याला वाटू लागले कि मीच देव आहे मीच सर्व शक्तिमान आहे  हिरण्यकश्यपू राजाला प्रल्हाद नावाचा मुलगा होता मुलगा नेहमी  नामस्मरणात तल्लीन असत.  हे पाहून हिरण्यकश्यपू राजा ला फार राग येई त्याने आपल्या मुलाला खूप समजून सांगितले कि तू माझा जप कर मीच देव आहे.  पण प्रल्हाद मात्र भगवान विष्णूच्या नाम सेवेत तल्लीन असे हे सर्व पाहून हिरण्यकश्यपू  ला फार चीड येऊ लागली आणि त्याने  त्याला समजून सांगण्यासाठी त्याला शिक्षा केली पण तरी देखील प्रल्हाद विष्णूची नाम रुपी सेवा करणे सोडत नाही .मग मात्र हिरण्यकश्यपू  चा राग वाढला आणि त्याने शिपायांना प्रल्हादाला डोंगरावरून खाली ढकलून देण्यास सांगितले तरी देखील प्रल्हादाला काहीच इजा पोहचली नाही हे पाहून हिरण्यकश्यपूला खूपच राग आला आणि त्याने शिपायांना उकळत्या तेलात टाकण्याची आज्ञा दिली शिपायांनी प्रल्हादाला तेलात टाकले तर शिपायांना भाजले पण प्रल्हादाला काहीच झाले नाही. उलट प्रल्हाद नाम रुपी सेवेत तल्लीन होता .हे सर्व पाहून हिरण्यकश्यपू ने प्रल्हादला विचारला कि कुठे आहे तुझा ” नारायण नारायण ” दाखव मला कुठे आहे .तुझा भगवान विष्णू  बोलव त्याला तेव्हा प्रल्हाद म्हणाला माझा देव सर्वत्र आहे. तुम्ही जिथे पाहाल तिथे माझा देव आहे .आपण फक्त हाक मारा मग रागाच्या भरात  हिरण्यकश्यपूने विचारले कि या खांबात तुझा देव आहे का ? तेव्हा प्रल्हाद म्हणाला हो या खांबात माझा देव आहे. तेव्हा हिरण्यकश्यपू ने रागाच्या भरात लाकडी खांबाला लाथ मारली तेव्हा त्या खांबातून भगवान विष्णूंचा नृसिंह रूपात खांबातून बाहेर आले.  नृसिंह रूप पाहून हिरण्यकश्यपू खूप घाबरला .भगवान विष्णूं नृसिंह यांनी  हिरण्यकश्यपू ला मांडीवर घेतले व दाराच्या उंबऱ्यावर बसले ती वेळ होती सायंकाळची म्हणजे दिवस हि नव्हता रात्र हि नव्हती उंबरा म्हणजे घर हि नाही व घराच्या बाहेर हि नाही न कोणते शस्त्र न काही अस्त्र भगवान नृसिंह यांनी घराच्या उंबऱ्यावर नखांनी हिरण्यकश्यपूचे पोट फाडून मुक्त केल अश्या प्रकारे भगवान विष्णूचा  नृसिंह अवतार झाला सर्वांनी एक घोषात ” नारायण नारायण ” ओम नमो भगवते वासुदेवाय ” नामाचा जय घोष केला

 

बोध – नृसिंह अवतार हा आपल्या सर्वांना प्रेरणा देणारा अवतार आहे. खरे तर हा अवतार म्हणजे आपणस आपला बोध करण्यास प्रेरणा देणार अवतार .चला आपण यावर चिंतन मनंन करूया, हिरण्यकश्यपू राजा होता .तो देखील देवाची सेवा करत होता व त्याने सेवा करून वर प्राप्त केला कि मला कधीच मरण येऊ नये खरे तर इथे आपणस आपल्यातील हिरण्यकश्यपू शोधायचा आहे कारण अनेकदा आपणस देखील विस्मरण होते कि आपण या पृथ्वी वर पाहुणे आहोत आपण अशा अविर्भावात जगतो कि मी अमर आहे. आजच्या लीलेतून आपणस बोध घ्यायचा आहे , कि मी देखील पाहुणा आहे .जे काही आयुष्य मला प्राप्त झाले आहे त्याचा मी सदुपयोग करेल जेणेकरून माझ्यातील हिरण्यकश्यपू मरून जाईल .भक्त प्रल्हाद हा विष्णू भक्त होता इथे आपणस भक्त प्रल्हाद यांच्या कडून नाम रुपी सेवेचे महत्व समजत आहे .समस्या कोणतीही असो आपणस नाम रुपी सेवा सुरु ठेवायची आहे. जसे भक्त प्रल्हाद यांना नृसिह यांनी तारले तसेच आपणास देखील आपली जी कोणती इष्ट देवता आहे ती तारणार आहे .आवश्यकता आहे केवळ अखंड नाम सेवेची इथे आपणस वाटते कि   हिरण्यकश्यपू हे वाईट होते खरे तर ते सुद्धा देव भक्त होते पण त्यांच्यात अहंकार निर्माण झाला होता व तो दूर करण्यासाठी  नृसिंह  अवतार झाला म्हणजेच आपल्यातील हिरण्यकश्यपू चा नाश व्हावा यासाठी अवतार झाला आहे .आपणस त्यावर काम करायचे आहे आणि खरी नृसिंह  जयंती साजरी करायची आहे व आपल्या जन्माचे सार्थक करायचे आहे.

चला आपण सर्व जण भगवान नृसिंह यांना प्रार्थना करूया – हे नृसिंहा तुझा नृसिंह अवतार म्हणजे आम्हाला आमच्या तील विकारांवर काम करण्यास प्रेरणा देणारा अवतार.. आमच्यातील हिरण्यकश्यपू चा नाश कर.. कारण खरा हिरण्यकश्यपू आमच्यात आहे… पण आम्ही तो फक्त तुझ्या गोष्टीत शोधतो.. खरेतर आमच्यातील हिरण्यकश्यपू नाश होणे गरजेचे आहे… आणि तो तुझ्या कृपेशिवाय शक्य नाही… आम्हाला भक्त प्रल्हादा सारखी भक्ती दे… आमच्या कडून तुझी नाम रुपी सेवा करून घे… आम्हाला तुझ्या नामात स्थिर कर… आणि आमचे आयुष्य रोजच नृसिंह जयंती मय बनव… हि प्रार्थना करून घेतल्या बद्दल धन्यवाद…  सर्वांना नृसिंह जयंती च्या खूप खूप शुभेच्छा

 


Share
और पढिये !!

आपण सर्व एकाच ईश्वराची लेकरं आहोत

स्वामी वाणी पुष्प ५९२(पर्व ४ थे भाग ९६) प्रेरणादायी बोल आपण सर्व एकाच ईश्वराची लेकरं आहोत..तो आपला पालनकर्ता आहे.. हा विश्वास ठेवा.. जग सूंदर दिसू लागेल..!! www.SwamiVaani.co.in स्वामी भक्तहो आजच्या स्वामी वाणी चा बोध घेण्यासाठी स्वामींची लीलाच पाहूया...अक्कलकोट गावात...

हे मना !! अशाच व्यक्तीच्या पावलावर पाऊल टाक.. ज्याच्या प्रवासाची दिशा आणि तुझ्या धेय्याची दिशा एकच आहे..!!

स्वामी वाणी पुष्प ५९०(पर्व ४ थे भाग ९४)* *प्रेरणादायी बोल* हे मना !! अशाच व्यक्तीच्या पावलावर पाऊल टाक.. ज्याच्या प्रवासाची दिशा आणि तुझ्या धेय्याची दिशा एकच आहे..!! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो.. आजची स्वामीं वाणी खूप खोल आहे..कारण आपल्या विचारानुसार आपण अर्थ...

लोक काय म्हणतील ह्या पेक्षा स्वामी काय म्हणतील ह्याचा विचार करा..

स्वामी वाणी पुष्प ५८९(पर्व ४ थे भाग ९३)* *प्रेरणादायी बोल* एखादे कर्म करताना.. लोक काय म्हणतील ह्या पेक्षा स्वामी काय म्हणतील ह्याचा विचार करा..आपल्याला स्वामींना भूषणावह होईल असे कर्म करायचे आहे..!! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो..आजची स्वामीं वाणी सांगत आहे..उठ...

खचू नकोस..पुन्हा नव्याने सुरुवात कर..!!

स्वामी वाणी पुष्प ५८८(पर्व ४ थे भाग ९२)* *प्रेरणादायी बोल* जर तुला फळाची अपेक्षा असेल तर सर्वप्रथम त्यासाठी तू किती कष्ट केले.. किती प्रयत्न केले.. किती सेवा केली ह्याचे आत्मपरीक्षण कर.. तुझे उत्तर तुलाच भेटेल.. उत्तर नकारात्मक असेल तर खचू नकोस..पुन्हा नव्याने सुरुवात...

हे मना !! प्रत्येक पाऊल टाकत असतांना.. चुकीचे पाऊल पडणार नाही ह्याची काळजी घे..

स्वामी वाणी पुष्प ५८७(पर्व ४ थे भाग ९१)* *प्रेरणादायी बोल* हे मना !! प्रत्येक पाऊल टाकत असतांना.. चुकीचे पाऊल पडणार नाही ह्याची काळजी घे.. लोकांना जरी समजत नसेल पण स्वामीना सर्व समजत आहे ह्याची जाणीव ठेव..!! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो आजच्या स्वामीं वाणी तुन...

हे मना !! अपेक्षा ठेवायचीच असेल तर थेट स्वामींकडून ठेव.

स्वामी वाणी पुष्प ५८४(पर्व ४ थे भाग ८८) प्रेरणादायी बोल हे मना !! अपेक्षा ठेवायचीच असेल तर थेट स्वामींकडून ठेव.. बघ !! तुझा कधीच अपेक्षा भंग होणार नाही..!! www.SwamiVaani.co.in स्वामी भक्तहो.. आजच्या स्वामी वाणी तुन आपणस समज प्राप्त होते कि अपेक्षा ठेवायचीच असेल तर...

हृदयाचा आवाज ओळख

स्वामी वाणी पुष्प ५८३(पर्व ४ थे भाग ८७) अमृत वचन हृदयाचा आवाज ओळख.. तो आवाज ऐक.. त्या मागील भाव ओळख.. त्याच प्रमाणे बुद्धी वापर आणि कृती कर.. बघा !! यश निश्चित आहे..!! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो... आजच्या स्वामीं वाणीतून आपणस.. सर्व प्रश्नांची उत्तरे दिली...

विश्वसनीय बनूया

हे मना !! जे कार्य तुला शक्य नाही.. त्या कार्याला उगीच भावनिक होऊन 'होकार' देऊ नको.. त्या कार्याला ठामपणे "नाही" बोल..कदाचित समोरील व्यक्तीला थोडं वाईट वाटेल पण तु विश्वसनीय बनशील !! www.SwamiVaani.co.in स्वामी भक्तहो.. आजच्या स्वामी वाणीतून स्वामी आपणास विश्वसनीयता...

स्वामीं ना काय मागावे ?

स्वामी वाणी पुष्प ५८२(पर्व ४ थे भाग ८६)* *आजचे चिंतन-मनन* स्मरण तुझे मज नित्य असावे ! तव गुण भावे गावे !! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो.. आजची स्वामीं वाणी म्हणजे स्वामीं ना केलेली प्रार्थना आहे...स्मरण तुझे मज नित्य असावे !तव गुण भावे गावे !! आपण स्वामीं कडे...

भोळी भक्ती म्हणजे काय?

स्वामी वाणी पुष्प ५८१(पर्व ४ थे भाग ८५)* *आजचे चिंतन-मनन* स्वामी स्वामी जप करता, स्वामी भेटे भोळ्या भक्ता ! ऐसा माझा देव भोळा, मात्र नाम घेता,घेतो धावा !! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो.. वरील ओवीतून स्वामीं नक्की काय सांगत आहेत..स्वामीं तुम्हीच चिंतन मनन करून...