श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 18 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

Mar 27, 2022 | चरित्र, मराठी, संत गजानन महाराज

Share

लीला क्रमांक १७ मध्ये आपण पहिले कि महाराज पिपंळगावात आले. समाधी अवस्थे मधून महाराज बाहेर यावेत व आपल्याशी बोलावेत यासाठी गावकर्यांनी कसा प्रयत्न केला आणि त्यांच्या श्रद्धेचे फलस्वरूप महाराज समाधी अवस्थेतून बाहेर आले तो दिवस होता सोमवारचा. पुढे दुसऱ्या दिवशी मंगळवारी शेगांव चा बाजाराचा दिवस होता. त्या बाजारात अनेक पिंपळगावातील मंडळी गेली होती. त्याच बाजारात श्री बंकटलाल देखील आले होते. त्या दिवशी बाजारात अनेक लोकांच्या बोलण्यात येत होते कि आमच्या पिंपळगावात एक अवलिया आले आहेत. हा हा म्हणता हि बातमी संपूर्ण बाजारात पसरली. बंकटलाल यांच्या कानी हि गोष्ट पडताच त्यांना मनातून खात्री वाटली कि नक्कीच ते आपले श्री गजानन महाराजच असणार. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या पत्नी सहित पिंपळगाव गाठले. पाहतो तर काय साक्षात परब्रह्म श्री गजानन महाराजच होते. मग काय त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू येऊ लागले. त्यांनी महाराजांना वंदन केले. महाराज आपण आता येतो म्हणून गेलात.. आज पंधरा दिवस झाले महाराज… आमचे काही चुकले काय .. महाराज तुमच्या विना शेगांव भणभणीत दिसत आहे.. सर्व सेवेकरी आपली वाट पहात आहेत.. बैल गाडी आणली आहे.. आपणस विनंती आहे.. आपण शेगांवास चलावे… माय लेकांची ताटातूट होणे बरे नव्हें… अनेक भक्त आपली वाट पहात आहेत… आपणस विनंती आहे आपण शेगांवी चलावे… बंकटलाल यांची प्रार्थना महाराजांनी स्वीकार केली आणि ते बैलगाडीत बसले. पिंपळगावतील लोकांना अश्रू अनावर झाले. बंकटलाल यांनी सर्व गावकर्यांना म्हणाले आपणस विनंती आहे. महाराजांना भेटण्यास आपण शेगांवी येत जावे तरी आपण आम्हाला निरोप द्यावा. काही अंतर गेल्या नंतर श्री गजानन महाराज बंकटलाल यांना म्हणाले. हि सावकाराची रीत असते का ? दुसऱ्याचा माल बळजबरीने न्यावा मला तर तुझ्या घरी येण्यास भीती वाटते. महालक्ष्मी जी जगद्जननी आहे जिची सर्वत्र सत्ता तिला सुद्धा तू कोंडून ठेवले आहे. तिथें माझे काय ? म्हणून मी निघून गेलो होतो. महाराजांची हि वाणी ऐकून बंकटलाल खूपच विनय पूर्वक महाराजांना म्हणाले महाराज. महाराज माझ्या कुलुपाला ती जगन्माता भ्याली नाही तर तुमचा वास तिथे आहे म्हणून ती माझ्याकडे स्थिर ( चिरकाल ) आहे. ज्या ठिकाणी आई असते तिथेच बाळ असते. महाराज आपल्या चरण कमला पुढे माझ्या साठी काहीच मौल्यवान नाही. आता माझे असे काहीच नाही. जे काही आहे ते सर्व तुमचे आहे. माझी आपणस इतकीच विनंती आहे आपण शेगांवात रहावे. अशा रीतीने श्री गजानन महाराज पुन्हा शेगांवात आले. सर्व गावकरी खूप आनंदित झाले आणि सर्वांनी एक घोषात महाराजांचा जयजय कार केला . बोला श्री गजानन महाराज कि जय !

बोध – खरंतर आजची लीला म्हणजे आपणस भक्ती कशी असावी हे आपणस समजण्यासाठी केलेली हि लीला आहे हाच बोध आपणास मिळत आहे. पहा ना बाजारात केवळ चर्चा झाली कि कुणीतरी अवलिया पिंपळगावात आले आहेत यावरून बंकटलाल यांच्या मनात लगेचच सकारात्मक विचार आला कि नक्कीच ते श्री गजानन महाराजच असणार. किती तो विश्वास आणि श्रद्धा आणि त्याचे फलस्वरूप खरोखर ते श्री महाराजच होते. आपणासही आपली भक्ती वाढवायची आहे. श्री बंकटलाल यांनी महाराजांना विनंती केली महाराज आपण शेगांवी चलावे.. यावरून आपल्या लक्षात येते कि श्री बंकटलाल यांची महाराजांच्या चरणी जी काही श्रद्धा… भक्ती होती किती उच्च असेल. कारण परब्रम्हाला आपल्या सोबत नेणें म्हणजे तितकेच त्यांचे सुद्धा आपल्यावर प्रेम असणे आवश्यक आहे. यावरून आपणस आपले व महाराजांचे नाते कसे निर्माण झाले पाहिजे याची समज प्राप्त होते. काही अंतर गेल्या नंतर महाराज श्री बंकटलाल यांना म्हणतात मला तुझी भीती वाटते कारण तू लक्ष्मी मातेस बंदिस्त केले आहे… यावर श्री बंकटलाल म्हणतात महाराज जे कि आहे ते तुमचे आहे. तुम्ही आहात म्हणून जगद्जननी माझ्याकडे वास करत आहे. मला आपले चरण कमल सोडून काहीच नको. इथे खूप खोल असा संदेश महाराज देत आहेत. लक्ष्मी हि कमवलीच पाहिजे पण लक्ष्मी माता प्रसन्न झाल्यानंतर आपले मन लगेचच त्याच गोष्टीला सर्वस्व मानते आणि इथेच गडबड होते. असे होऊ नये यासाठी बंकटलाल यांचे वाक्य आपणस नेहमी लक्षात ठेवायचे आहे. जी काही जगद्जननी लक्ष्मी मातेची कृपा आहे ती सर्व आपल्या महाराजांची कृपा आहे. कुठेच मला अहं भाव ठेवण्याची चूक करायची नाही.पहा हा भाव आपल्या आयुष्यात भरभरून लक्ष्मी मातेचा वास असेल आणि आपल्या ह्रदयातून फक्त धन्यवाद चे भाव येतील… धन्यवाद महाराज कोटी कोटी धन्यवाद . चला आपण श्री गजानन महाराजांना प्रार्थना करूया

हे समर्था आजची तुझी लीला म्हणजे भक्तीच्या उच्च अवस्था प्राप्त करून घेण्याचा आमच्या साठी प्रसादच आहे.. हा प्रसाद आम्हाला दिलास त्या बद्दल खूप खूप धन्यवाद… जशी श्री बंकटलाल यांना भक्ती प्राप्त झाली.. अशी भक्ती आमच्या ह्रदयात जागृत कर.. कारण हे सर्व तुझ्या कृपेशिवाय शकय नाही… तुझ्याच कृपेने आमच्या जीवनातं.. जगद्जननी श्री लक्ष्मी मातेचा वास आहे.. हि समज दिलीस त्या बद्दल धन्यवाद… हि जी समज आज प्राप्त झाली आहे ती आमच्या अंतर्मनात रुजव कारण आमचे मन कायम स्व चा नारा लावते आणि इथेच मी अडकतो.. कृपा कर मला या पासून वाचवं… आणि प्राप्त लक्ष्मीचा वापर योग्य पध्द्तीने करण्याची समज मला दे.. कारण तू भरपूर देतोस.. धन्यवाद समर्था हि प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद !


Share
और पढिये !!

आपण सर्व एकाच ईश्वराची लेकरं आहोत

स्वामी वाणी पुष्प ५९२(पर्व ४ थे भाग ९६) प्रेरणादायी बोल आपण सर्व एकाच ईश्वराची लेकरं आहोत..तो आपला पालनकर्ता आहे.. हा विश्वास ठेवा.. जग सूंदर दिसू लागेल..!! www.SwamiVaani.co.in स्वामी भक्तहो आजच्या स्वामी वाणी चा बोध घेण्यासाठी स्वामींची लीलाच पाहूया...अक्कलकोट गावात...

हे मना !! अशाच व्यक्तीच्या पावलावर पाऊल टाक.. ज्याच्या प्रवासाची दिशा आणि तुझ्या धेय्याची दिशा एकच आहे..!!

स्वामी वाणी पुष्प ५९०(पर्व ४ थे भाग ९४)* *प्रेरणादायी बोल* हे मना !! अशाच व्यक्तीच्या पावलावर पाऊल टाक.. ज्याच्या प्रवासाची दिशा आणि तुझ्या धेय्याची दिशा एकच आहे..!! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो.. आजची स्वामीं वाणी खूप खोल आहे..कारण आपल्या विचारानुसार आपण अर्थ...

लोक काय म्हणतील ह्या पेक्षा स्वामी काय म्हणतील ह्याचा विचार करा..

स्वामी वाणी पुष्प ५८९(पर्व ४ थे भाग ९३)* *प्रेरणादायी बोल* एखादे कर्म करताना.. लोक काय म्हणतील ह्या पेक्षा स्वामी काय म्हणतील ह्याचा विचार करा..आपल्याला स्वामींना भूषणावह होईल असे कर्म करायचे आहे..!! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो..आजची स्वामीं वाणी सांगत आहे..उठ...

खचू नकोस..पुन्हा नव्याने सुरुवात कर..!!

स्वामी वाणी पुष्प ५८८(पर्व ४ थे भाग ९२)* *प्रेरणादायी बोल* जर तुला फळाची अपेक्षा असेल तर सर्वप्रथम त्यासाठी तू किती कष्ट केले.. किती प्रयत्न केले.. किती सेवा केली ह्याचे आत्मपरीक्षण कर.. तुझे उत्तर तुलाच भेटेल.. उत्तर नकारात्मक असेल तर खचू नकोस..पुन्हा नव्याने सुरुवात...

हे मना !! प्रत्येक पाऊल टाकत असतांना.. चुकीचे पाऊल पडणार नाही ह्याची काळजी घे..

स्वामी वाणी पुष्प ५८७(पर्व ४ थे भाग ९१)* *प्रेरणादायी बोल* हे मना !! प्रत्येक पाऊल टाकत असतांना.. चुकीचे पाऊल पडणार नाही ह्याची काळजी घे.. लोकांना जरी समजत नसेल पण स्वामीना सर्व समजत आहे ह्याची जाणीव ठेव..!! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो आजच्या स्वामीं वाणी तुन...

हे मना !! अपेक्षा ठेवायचीच असेल तर थेट स्वामींकडून ठेव.

स्वामी वाणी पुष्प ५८४(पर्व ४ थे भाग ८८) प्रेरणादायी बोल हे मना !! अपेक्षा ठेवायचीच असेल तर थेट स्वामींकडून ठेव.. बघ !! तुझा कधीच अपेक्षा भंग होणार नाही..!! www.SwamiVaani.co.in स्वामी भक्तहो.. आजच्या स्वामी वाणी तुन आपणस समज प्राप्त होते कि अपेक्षा ठेवायचीच असेल तर...

हृदयाचा आवाज ओळख

स्वामी वाणी पुष्प ५८३(पर्व ४ थे भाग ८७) अमृत वचन हृदयाचा आवाज ओळख.. तो आवाज ऐक.. त्या मागील भाव ओळख.. त्याच प्रमाणे बुद्धी वापर आणि कृती कर.. बघा !! यश निश्चित आहे..!! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो... आजच्या स्वामीं वाणीतून आपणस.. सर्व प्रश्नांची उत्तरे दिली...

विश्वसनीय बनूया

हे मना !! जे कार्य तुला शक्य नाही.. त्या कार्याला उगीच भावनिक होऊन 'होकार' देऊ नको.. त्या कार्याला ठामपणे "नाही" बोल..कदाचित समोरील व्यक्तीला थोडं वाईट वाटेल पण तु विश्वसनीय बनशील !! www.SwamiVaani.co.in स्वामी भक्तहो.. आजच्या स्वामी वाणीतून स्वामी आपणास विश्वसनीयता...

स्वामीं ना काय मागावे ?

स्वामी वाणी पुष्प ५८२(पर्व ४ थे भाग ८६)* *आजचे चिंतन-मनन* स्मरण तुझे मज नित्य असावे ! तव गुण भावे गावे !! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो.. आजची स्वामीं वाणी म्हणजे स्वामीं ना केलेली प्रार्थना आहे...स्मरण तुझे मज नित्य असावे !तव गुण भावे गावे !! आपण स्वामीं कडे...

भोळी भक्ती म्हणजे काय?

स्वामी वाणी पुष्प ५८१(पर्व ४ थे भाग ८५)* *आजचे चिंतन-मनन* स्वामी स्वामी जप करता, स्वामी भेटे भोळ्या भक्ता ! ऐसा माझा देव भोळा, मात्र नाम घेता,घेतो धावा !! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो.. वरील ओवीतून स्वामीं नक्की काय सांगत आहेत..स्वामीं तुम्हीच चिंतन मनन करून...