श्री गजानन चरित्र दर्शन 16 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

Mar 19, 2022 | चरित्र, मराठी, संत गजानन महाराज

Share

ऐके दिवशी सर्व सेवेकरी मंडळी महाराजांच्या चरणी सेवा रुजू करत होते.. अचानक महाराजांनी सर्वांना बोलवले व म्हणाले… वसंत पंचमी च्या दिवशी घनपाठी ब्राम्हण बोलवा.. मंत्र जागर करूया.. तसेच सर्वांनी एक एक रुपया दक्षिणा देण्यासाठी काढावा… महाराजांची हि वाणी ऐकून सर्व सेवेकरी म्हणाले … महाराज आपण सांगत आहात ती सर्व सेवा आम्ही करू पण.. आपल्या गावात घनपाठी ब्राम्हण नाहीत… महाराज म्हणाले अरे तुम्ही तयारी करा… परमेश्वर स्वतः साह्य करतील .. नक्कीच ब्राम्हण मिळतील… सेवेकरी मंडळींनी सर्व तयारी केली… वर्गणी च्या माध्यमातून साधारण १०० रुपये जमा झाले.. वसंत पंचमी च्या पूजेची तयारी झाली… आता सर्व जण पुरोहितांची वाट पाहू लागले… इतक्यात अचानक काही घनपाठी ब्राम्हण महाराजांकडे आले.. त्यांनी महाराजांना काय सेवा करावी विचारले… तर महाराजांनी आपला मनोदय सांगितला… महाराजांची वाणी ऐकून ते पुरोहित खूप आनंदित झाले आणि त्यांनी वसंत पंचमी ची पूजा वेद घोषात सुरु केली… अश्या रीतीने महाराजांच्या वाणी नुसार पूजा संपन्न झाली… अजूनही बंकटलाल यांचे पूर्वज हि सेवा रुजू करतात… सर्वांनी एक घोषात महाराजांचा जयघोष केला !!

बोध – वरील लीला आपणस खूप छोटी वाटते पण बोधाचा खजाना आहे… गुरु आज्ञाचे पालन कसे करावे याचा आपणस बोध होत आहे.. पहा वरील लीलेत श्री महाराजांनी आपला मनोदय सर्व सेवेकरी मंडळींना सांगितला… सेवेकरी मंडळी म्हणाले महाराज आपण सांगाल ती सेवा करण्यास आम्ही तयार आहोत… या ठिकाणी आपणस आपला सेवा भाव कसा असावा याचे दर्शन होते… महाराजांच्या वाणी नुसार सर्व सेवेकरी सेवा करण्यास तयार झाले… आणि साधारण १०० रुपये जमा झाले… त्या काळात १०० रुपये म्हणजे खूप मोठी रक्कम होय… सर्व सेवेकऱ्यांच्या मनात महाराजांच्या प्रति अतूट श्रद्धा व विश्वास भाव होता… महाराजांनी सांगितले आहे म्हणजे… घनपाठी ब्राम्हण येणारच… त्यासाठी सर्व लोकांनी देखील प्रार्थना केल्या असतील… त्या प्रार्थनेतील भाव देखील शुद्ध होता… त्या मुळेच अचानकपणे वेद पठण करण्यासाठी ब्राम्हण तेथे आले… या ठिकाणी महाराज देखील संदेश देत आहेत कि… पुरोहित म्हणजे जो दुसऱ्याचे हित इच्छितो तो… पुरोहित ( ब्राम्हण) आपणस देखील वरील लीलेचा बोध घेऊन गुरु आज्ञेचे पालन करायचे आहे… आणि महाराजांना अपेक्षित जीवनाची अभिव्यक्ती करायची आहे …!!

चला आपण श्री गजानन महाराजांना प्रार्थना करूया … हे समर्था आजची लीला म्हणजे आमच्या साठी गुरु आज्ञेचे पालन कसे करावे याची शिकवण दिलीत… त्या बद्दल धन्यवाद… अनेकदा आमचे मन आमच्या मना प्रमाणे वागण्याचा आग्रह करते… त्यात अनेकदा आमचे हित नसते… आम्हाला तुझ्या आज्ञेचे पालन करण्याची बुद्धी दे… तसेच स्व हिता पेक्षा… सर्वांचे हित होईल असे कर्म करण्याची बुद्धी आम्हाला दे… हे आई हि प्रार्थना करून घेल्याबद्दल धन्यवाद… कोटी कोटी धन्यवाद


Share
और पढिये !!

देव फक्त देव्हाऱ्यात नाही, तर आपल्या अंतःकरणात आहे.- देवघर

देव फक्त देव्हाऱ्यात नाही, तर आपल्या अंतःकरणात आहे.देवघर असं बनवा की तिथे बसल्यावर मन प्रसन्न होईल आणि घरात सकारात्मकता निर्माण होईल. देवघर म्हणजे आपल्या घराचं आध्यात्मिक हृदय.कुठे असावं? देव कोणते असावेत? देवघर - आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न देवघर कुठे असावे...

साडेसाती – आत्मशुद्धीचा काळ

साडेसाती म्हणजे शनीचा आपल्यावर कृपेचा काळ — जो आपल्याला थांबवतो, विचार करायला लावतो आणि आत्मशुद्धीची संधी देतो.हा काळ संकटाचा नाही, तर जागृतीचा आहे.शनिदेव शिक्षा देत नाहीत, ते आपले कर्म दाखवतात आणि सुधारण्याची संधी देतात.म्हणून साडेसातीमध्ये घाबरू नका, श्रद्धा ठेवा...

अहंभाव दूर कर – श्री गणेश पुराण कथा ४

श्री वेदव्यासांनी वेदांचे चार विभाग केले. खरंतर आपल्यावर त्यांचे खूप मोठे ऋण आहे...सर्वप्रथम त्यांना वंदन करून या कथेला सुरवात करूया..त्यांनी अनेक ग्रंथांची निर्मिती केली पण कुठेतरी त्यांच्यात अहंभाव निर्माण झाला असावा — हळूहळू त्यांची बुद्धी भ्रमित होऊ लागली,...

कर्माचे फळ भोगावेच लागते…श्री गणेश पुराण कथा ३

राजा सोमकान्त हा सौराष्ट्रातील न्यायी, विद्वान आणि प्रजेवर प्रेम करणारा राजा होता. पण वृद्धापकाळात त्याला कुष्ठरोग झाला. प्रजेची जबाबदारी मुलगा हेमकान्तावर सोपवून तो राणी सुधर्मेसह वनवासाला गेला. तिथे महर्षी भृगुपुत्र च्यवन यांच्या आश्रमात पोहोचला. महर्षींनी सांगितले...

श्री गणेशला पूजेचा प्रथम मान कसा मिळाला गणेश पुराण कथा २

कथा २ – प्रथमपूजेचा मान गणेशांना कसा मिळाला एकदा सर्व देवगणांनी शिवजींना विचारले –“प्रभो! आमच्यापैकी प्रथमपूजेचा अधिकारी कोण?” शिवजी म्हणाले –“जो संपूर्ण विश्वाची परिक्रमा करून सर्वांत आधी येईल, तोच मानकरी.” सर्व देवगण भव्य वाहनांवर बसून निघाले. पण गणेशजींचे वाहन होते...

गणेशजन्म: विघ्नहर्त्याची कथा 1

कथा  १ - गणेशजन्म: विघ्नहर्त्याची कथा ही कथा आहे पवित्र नैमिषारण्यातील. तिथे अनेक ऋषी-मुनी एकत्र येऊन ज्ञानयज्ञ करीत होते. त्या सभेत महान सूतजी विराजमान होते. शौनक ऋषींनी त्यांना वंदन करून विनंती केली — हे सूतजी! आम्हाला असे ज्ञान द्या, जे भक्ती, वैराग्य आणि विवेक...

मन निर्भय कसे बनवावे

स्वामी भक्त हो तारक मंत्रातील दुसरा मंत्र आहे.. निर्भय हो.. पहा तारक मंत्रातील प्रत्येक शब्द आहे आपल्याला निर्भयता हा गुण धारण करण्याचे शिकवतो.. आता आपल्या मनात येते कि आम्ही तर निर्भय आहोत.. आता आपण खरंच निर्भय आहोत का ? हा प्रश्न आपण आपल्याला स्वतः ला विचारायचा...

निःशंक तारक मंत्र काय सांगतो आपणस

स्वामी भक्त हो...आपण तारक मंत्र म्हणतो त्यातील पहिला मंत्र आपणास सांगतो...निःशंक..स्वामी भक्तीत मन कसे झाले पाहिजे निःशंक...म्हणजे मनात शंका नको...पहा..आपले मन शंका निर्माण करतेच...माझे अमूक काम होईल का? नाही होणार...होईल...मन म्हणते होईल...मध्येच म्हणते नाही...

श्री शिवमहापुराण १

श्री शिवमहापुराण १ - आज आपण प्रत्येक जण ऐकतो कि शिव महा पुराण श्रवण केले पाहिजे पण काळा नुसार आपणास ते शक्य होत नाही. पण मग आपण एक छोटासा पर्यन्त करत आहोत.. थोडक्यात कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करूया.. यात सर्व काही येईल असे नाही पण आपली भक्ती नक्कीच वाढेल अशी...