श्री गजानन चरित्र दर्शन 15 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

Mar 13, 2022 | चरित्र, मराठी, संत गजानन महाराज

Share

शेगांवच्या दक्षिण दिशेला चिंचोली नावाचे गाव आहे. त्या गावात माधव नावाचे एक ब्राम्हण राहत होते. त्यांचे वय साधारण ६० पेक्षा जास्त होते. त्यांनी आपलें संपूर्ण आयुष्य हे संसार म्हणजे सर्वस्व या साठी खर्ची केले होते. आपल्या भविष्यात काय लिहून ठेवले आहे हे कुणासच माहित नसते. हीच स्थिती माधव यांची झाली .अचानकपणे त्याच्या आयुष्यात दुःखद घटना घडू लागल्या. अचानकपणे त्यांच्या पत्नीचे व मुलाचे निधन झाले . अचानकपणे घडलेल्या या गोष्टीमुळे त्यांच्या समोर दुःखाचा डोंगर उभा राहिला. ते पूर्णपणे एकाकी झाले. त्यांना एकदमच विरक्ती आली. आता ते देवाचा धावा करू लागले. त्यांच्या ह्रद्यातून प्रार्थना निघू लागल्या. हे परमेश्वरा हि माझी काय अवस्था झाली आहे. मी तर आयुष्यभर संसारच केला.कधी तुझे नाव घेतले नाही. आज तो संसार पूर्णपणे विस्कटला आहे. आता मला कुणीच नाही. आता माझा सांभाळ कोण करणार. हे परमेश्वरा तूच मला तारू शकतोस. अश्या प्रार्थना करता करता. कुणाच्या तरी सांगण्यावरून ते शेगांवी येतात. श्री गजानन महाराजांच्या सानिध्यात आल्या नंतर त्यांनी उपोषण सुरु केले. अन्न पाण्याचा त्याग करून त्यांनी हरी नाम सेवा सुरु केली. श्री गजानन महाराजांनी त्यांना सांगितले बाळा असे करू नकोस.अरे आज जी नाम सेवा करत आहेस ती आयुष्यभर का नाही केली ? ज्या पत्नी व मुलांसाठी तू आयुष्यभर संसार केलास ते तर तुला सोडून गेले. आता तुला परमार्थ आठवत आहे. आपण जे कर्म करतो त्याचे फळ आपणस भोगावेच लागते. महाराज त्याला म्हणाले हट्ट करू नकोस भोजन करून घे. तिथे उपस्थित लोक होते त्यांनी देखील भोजन करण्यासाठी विनंती केली परंतु त्याने कुणाचेच ऐकले नाही. अन्न त्याग करून तो तसाच समर्थांच्या सानिध्यात हरी नाम घेत बसून राहिला. आता रात्रीची वेळ झाली सर्वजण झोपले होते. माधव हि तिथेच झोपला होता. महाराजांनी यम स्वरूपात माधव यांस स्वप्नात दृष्टांत दिला. यमाचे ते महा भयंकर रूप पाहून माधव घाबरले. त्यांना धडकी भरली. छाती धडधडु लागली. त्याच्या तोंडातून शब्दच फुटेना. हे सर्व पाहून समर्थांनी सौम्य रूप धारण केले व माधवास म्हणाले अरे स्वतःला धीट म्हणतोस आणि काळाला घाबरतोस. असाच एक दिवस काळ येईल आणि तुला घेऊन जाईल. तुला त्याचे दर्शन घडवले आहे.महाराजांची हि वाणी ऐकताच.. माधव विनंती पूर्वक महाराजांना म्हणाला. यमलोक नको. तेवढी यात्रा टाळा. वैकुंठ प्राप्ती व्हावी हीच प्रार्थना. माधवाची प्रार्थना ऐकून श्री महाराज हसू लागले व म्हणाले अरे मृत्यू समोर येताच हरी नाम घेत आहेस . जर अजून तुझी जगण्याची इच्छा असेल तर आयुष्य वाढेल. तेव्हा श्री माधव म्हणाले महाराज आता आयुष्य नको इतकीच इच्छा आहे कि उर्वरित आयुष्य आपल्या चरणकमलात जावे व शेवटचा श्वास आपली सेवा करता करता व्हावा. महाराजांनी श्री माधव यांची इच्छा पूर्ण केली व महाराज तथास्तु म्हणाले. अश्या रीतीने श्री माधव यांचे देहावसन श्री महाराजांच्या सानिध्यात झाले.
बोला श्री गजानन महाराज कि जय ! 

बोध – खरंतर वरील लीला हि आपल्या सर्वांच्या डोळयातील अंजन अशी आहे. बोध वर मनन करण्यापूर्वी श्री माधवराव यांना नमन करूया कारण त्यांना माध्यम करून समर्थ आपणस बोध देत आहेत. वरील लीलेत श्री माधवराव हे आयुष्यभर संसारात गर्क होते. संसार करत असताना त्यांना केवळ संसारात लक्ष होते. त्यांच्या मुखात कधीच हरी नाम आले नाही. संसार करता करता त्याच्या वयाची ६० वर्षे गेले. अचानकपणे त्यांच्या संसारात दुःख आले त्यांची पत्नी व मुलगा यांचे निधन झाले. आकस्मिकपणे झालेल्या घटने मुळे त्यांना एकदम संसारातून विरक्ती आली आणि ते हरी नामाकडे वळाले. खरंतर आयुष्य संसारात गेले होते. अचानकपणे हरी नाम घेणे सुद्धा त्यांना जड जात होते. पण काही तरी पुण्याई असावी त्यांना श्री गजानन महाराज भेटले. महाराज भेटले तरी त्याचा अट्टाहास सुरूच होता. कारण श्री महाराजांना ओळखण्याची दृष्टी नव्हती. आपले देखील असेच होते. आपण संसार करत असताना आपल्या मुखात हरी नाम येत नाही. तसेच आपले मन देखील सबब देते कि नाम घेण्यासाठी वेळ नाही. असे करत करत आपल्या संसाराचा गाडा सुरु असतो. काही समस्या आली कि आपण तेवढ्यापुर्ती हरी नाम सेवा करतो. समस्या सुटली कि परत संसारात गर्क होतो. खरंतर आपल्या जीवनात एखादी समस्या व संकट येते ते या साठी असते आपल्याला हरी नामावर स्थिर करण्यासाठी. संकट आपल्याला घडवत असते पण आपले मन नेहमी संकटापासून दूर पळण्याचा प्रयत्न करते. श्री माधवराव यांची पुण्याई होती म्हणून त्यांना वार्धक्यात देखील हरी नाम घेता आले. आणि आपली काहीतरी पुण्याई म्हणून आपणस श्री महाराजांच्या कृपेने त्या लीलेस माध्यम करून श्री महाराज आता पासून हरी नाम घेण्यास सांगत आहेत. श्री माधवराव यांना यम स्वरूपात दर्शन देऊन त्यांच्या मनातील सर्व प्रश्नाचे उत्तर श्री महाराजांनी दिले .या यम स्वरूप दर्शनातून महाराज आपणस सांगत आहेत . बाळांनो प्रत्येक क्षणी काळ जवळ येत आहे परंतु आपणस त्याचा विसर पडला आहे. काळ कधी येईल व घेऊन जाईल हे सांगता येणार नाही. काळ येण्याआधी आपणस हरी नामात दंग व्हायचे आहे. म्हणजेच आपल्या ह्रदयातील नामावर स्थिर व्हायचे आहे. या साठी सातत्य हा गुण आवश्यक आहे . श्री माधव राव यमलोक नको तर वैकुंठ हवा आहे असे म्हणत आहेत म्हणजे काय तर प्रत्येक श्वास हा हरी नामात जावा हि प्रार्थना ते करत आहेत म्हणजेच आपणस ते समज देत आहेत कि प्रत्येक श्वास हा हरी नाममय व्हावा !
चला तर मग आपण सर्व जण श्री गजानन महाराजांना प्रार्थना करूया – हे समर्था तुझी प्रत्येक लीला तर बोधच आहे.. परंतु आमचे मन तिला फक्त लीला वा गोष्ट म्हणून घेते.. आजच्या लीलेस माध्यम करून आम्हाला संसार व अध्यात्म यांची सांगड कशी घालावी याची शिकवण दिलीत त्या बद्दल धन्यवाद… आमचे मन संकट व दुःख आले तरच तुझे नाम घेते… आमच्या वर कृपा कर व आमच्या मनाला सदैव तुझ्या नामात दंग कर… आमचा प्रत्येक श्वास हा तुझ्या नामाचा दास असावा.. नामरूपी वैकुंठात आम्हाला स्थिर कर… कारण तुझे नामच सत्य आहे.. हि समज दिल्याबद्दल धन्यवाद… कोटी कोटी धन्यवाद !!

 


Share
और पढिये !!

आपण सर्व एकाच ईश्वराची लेकरं आहोत

स्वामी वाणी पुष्प ५९२(पर्व ४ थे भाग ९६) प्रेरणादायी बोल आपण सर्व एकाच ईश्वराची लेकरं आहोत..तो आपला पालनकर्ता आहे.. हा विश्वास ठेवा.. जग सूंदर दिसू लागेल..!! www.SwamiVaani.co.in स्वामी भक्तहो आजच्या स्वामी वाणी चा बोध घेण्यासाठी स्वामींची लीलाच पाहूया...अक्कलकोट गावात...

हे मना !! अशाच व्यक्तीच्या पावलावर पाऊल टाक.. ज्याच्या प्रवासाची दिशा आणि तुझ्या धेय्याची दिशा एकच आहे..!!

स्वामी वाणी पुष्प ५९०(पर्व ४ थे भाग ९४)* *प्रेरणादायी बोल* हे मना !! अशाच व्यक्तीच्या पावलावर पाऊल टाक.. ज्याच्या प्रवासाची दिशा आणि तुझ्या धेय्याची दिशा एकच आहे..!! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो.. आजची स्वामीं वाणी खूप खोल आहे..कारण आपल्या विचारानुसार आपण अर्थ...

लोक काय म्हणतील ह्या पेक्षा स्वामी काय म्हणतील ह्याचा विचार करा..

स्वामी वाणी पुष्प ५८९(पर्व ४ थे भाग ९३)* *प्रेरणादायी बोल* एखादे कर्म करताना.. लोक काय म्हणतील ह्या पेक्षा स्वामी काय म्हणतील ह्याचा विचार करा..आपल्याला स्वामींना भूषणावह होईल असे कर्म करायचे आहे..!! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो..आजची स्वामीं वाणी सांगत आहे..उठ...

खचू नकोस..पुन्हा नव्याने सुरुवात कर..!!

स्वामी वाणी पुष्प ५८८(पर्व ४ थे भाग ९२)* *प्रेरणादायी बोल* जर तुला फळाची अपेक्षा असेल तर सर्वप्रथम त्यासाठी तू किती कष्ट केले.. किती प्रयत्न केले.. किती सेवा केली ह्याचे आत्मपरीक्षण कर.. तुझे उत्तर तुलाच भेटेल.. उत्तर नकारात्मक असेल तर खचू नकोस..पुन्हा नव्याने सुरुवात...

हे मना !! प्रत्येक पाऊल टाकत असतांना.. चुकीचे पाऊल पडणार नाही ह्याची काळजी घे..

स्वामी वाणी पुष्प ५८७(पर्व ४ थे भाग ९१)* *प्रेरणादायी बोल* हे मना !! प्रत्येक पाऊल टाकत असतांना.. चुकीचे पाऊल पडणार नाही ह्याची काळजी घे.. लोकांना जरी समजत नसेल पण स्वामीना सर्व समजत आहे ह्याची जाणीव ठेव..!! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो आजच्या स्वामीं वाणी तुन...

हे मना !! अपेक्षा ठेवायचीच असेल तर थेट स्वामींकडून ठेव.

स्वामी वाणी पुष्प ५८४(पर्व ४ थे भाग ८८) प्रेरणादायी बोल हे मना !! अपेक्षा ठेवायचीच असेल तर थेट स्वामींकडून ठेव.. बघ !! तुझा कधीच अपेक्षा भंग होणार नाही..!! www.SwamiVaani.co.in स्वामी भक्तहो.. आजच्या स्वामी वाणी तुन आपणस समज प्राप्त होते कि अपेक्षा ठेवायचीच असेल तर...

हृदयाचा आवाज ओळख

स्वामी वाणी पुष्प ५८३(पर्व ४ थे भाग ८७) अमृत वचन हृदयाचा आवाज ओळख.. तो आवाज ऐक.. त्या मागील भाव ओळख.. त्याच प्रमाणे बुद्धी वापर आणि कृती कर.. बघा !! यश निश्चित आहे..!! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो... आजच्या स्वामीं वाणीतून आपणस.. सर्व प्रश्नांची उत्तरे दिली...

विश्वसनीय बनूया

हे मना !! जे कार्य तुला शक्य नाही.. त्या कार्याला उगीच भावनिक होऊन 'होकार' देऊ नको.. त्या कार्याला ठामपणे "नाही" बोल..कदाचित समोरील व्यक्तीला थोडं वाईट वाटेल पण तु विश्वसनीय बनशील !! www.SwamiVaani.co.in स्वामी भक्तहो.. आजच्या स्वामी वाणीतून स्वामी आपणास विश्वसनीयता...

स्वामीं ना काय मागावे ?

स्वामी वाणी पुष्प ५८२(पर्व ४ थे भाग ८६)* *आजचे चिंतन-मनन* स्मरण तुझे मज नित्य असावे ! तव गुण भावे गावे !! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो.. आजची स्वामीं वाणी म्हणजे स्वामीं ना केलेली प्रार्थना आहे...स्मरण तुझे मज नित्य असावे !तव गुण भावे गावे !! आपण स्वामीं कडे...

भोळी भक्ती म्हणजे काय?

स्वामी वाणी पुष्प ५८१(पर्व ४ थे भाग ८५)* *आजचे चिंतन-मनन* स्वामी स्वामी जप करता, स्वामी भेटे भोळ्या भक्ता ! ऐसा माझा देव भोळा, मात्र नाम घेता,घेतो धावा !! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो.. वरील ओवीतून स्वामीं नक्की काय सांगत आहेत..स्वामीं तुम्हीच चिंतन मनन करून...