श्री गजानन महाराज दर्शन लीला 6 – मराठी

Jan 16, 2022 | मराठी, संत गजानन महाराज

Share

खूप सारे लोक श्री गोविंद बुवांचे किर्तन ऐकण्यासाठी आले होते त्यामध्ये श्री गजानन महाराज पण कडू लिंबाच्या निंबाच्या झाडा जवळ बसून किर्तन ऐकत होते श्री गोविंद बुवांनी किर्तनासाठी श्री  भागवतातील एकादश स्कंध मधील हंस गीता याचा श्लोक किर्तन सेवेसाठी घेतला होता… बुवांनी किर्तनाचा पुर्वार्ध सांगितला किर्तनाचा उत्तरार्ध सांगताना त्यांना अडचण येत होती … श्री गजानन महाराजांनी किर्तनाचा उरलेला भाग सांगितला त्यांचे कीर्तन ऐकून सगळे तृप्त झाले तेव्हा श्री गोविंद बुवा तेथील उपस्थित लोकांना म्हणाले कि श्री महाराजांना येथे येण्याची विनंती करा तेव्हा बंकटलाल आणि बाकीचे लोक श्री महाराजांच्या जवळ जातात व त्याना येण्याची विनंती करतात… परंतु श्री महाराज येत नाहीत… तेव्हा श्री गोविंद बुवा स्वतः श्री महाराजांच्या जवळ जातात आणि त्यांना मंदिरात येण्याची विनंती करतात… आपण स्वतः शिव स्वरूप आहात… कृपया आपण मंदिरात चलावे… तुमच्या शिवाय मंदिर सुने सुने आहे… माझ्या पूर्व जन्माचे काही तरी पुण्य कर्म असावे त्यामुळेच मला तुमचे दर्शन झाले… आणि तुमच्या मुखातून कीर्तनाचा उत्तरार्ध ऐकण्यास मिळाला… तेव्हा श्री महाराज त्यांच्याकडे पाहून बोलतात… लोकांना सांगतात ईश्वर सर्वत्र आहे… आत बाहेर असे काहीच नाही… आणि स्वतः त्या कीर्तन कथेच्या विरुद्ध वर्तन करता… लोकांना एक गोष्ट सांगता व स्वतः त्याच्या नुसार आचरण करत नाही… इतरांसारखे व्यवहारिक कीर्तनकार बनू नका … जा कीर्तन सेवा रुजू करा… मी इथे बसून कीर्तन ऐकतो… श्री गोविंद बुवा व्यास पीठावर आले आणि त्यांनी सर्वांना सांगितले कि आपण सर्व खूप नशीबवान आहोत… आपल्या गावात प्रत्यक्ष परब्रह्म आले आहेत… त्याची सेवा करा… आपल्या सर्वांचे कल्याण होईल… सगळयांनी एका स्वरात श्री गजानन महाराजांचा जय जयकार केला .
बोला – श्री गजानन महाराजांचा जय जयकार असो .

बोध – वरील लीलेतून  बोध समजण्याची समज आमहाला द्या… वरील लीलेत श्री गोविंद बुवांनी कीर्तन सुरु केले ते खूप मोठे कीर्तनकार होते… त्यानी पूर्वार्ध तर सांगितला परुंतु उत्तरार्ध सांगताना त्यांना काय सांगावे हे सुचले नाही त्या वेळी श्री गजानन महाराजांनी कीर्तनाचा उत्तरार्ध पूर्ण केला… असेच आपल्या जीवनात सुद्धा खूप वेळेस होत असते… आपण कोणत्या तरी अडचणीत असतो आणि आपण ईश्वराला प्रार्थना करतो… त्याच वेळी कुणीतरी येऊन आपली मदत करते… त्यांना ईश्वरानेच आपल्या मदती साठी पाठवले असते आणि आपण म्हणतो देवा सारखे धावून आलात आणि माझी मदत केलीत… परंतु काही दिवसांनी ते आपण विसरून जातो… श्री गोविंद बुवा श्री महाराजांना म्हणतात कि आपण शिव स्वरूप आहात.. कृपया मंदिरात चला… तेव्हा श्री महाराज त्यांना बोलतात कि तुम्ही कीर्तनात लोकांना सांगता… कि ईश्वर सर्वत्र आहे आणि आपणच हि गोष्ट विसरलात.. आपण व्यवहारिक बनू नका… इथे श्री महाराज आपल्याला सांगतात कि मी सर्वत्र आहे… कोणत्याही ऐका ठिकाणी गेलात तरच मी भेटले असे नाही.. इथे श्री महाराज हा सुद्धा आपणस बोध देतात कि चांगल्या गोष्टी फक्त लोकांना सांगण्यासाठी नसतात तर प्रथम आपण त्याचे अनुकरण करणे गरजेचे आहे… त्यावर आपण अधिक चिंतन मनन केले तर त्याचा जास्त खोलवर बोध श्री महाराज आपणस देतील… चला आपण श्री महाराजांना प्रार्थना करूयात – श्री गजानन महाराज… तुम्ही आमच्या प्रत्येक प्रार्थनेची पूर्तता करतात… जेव्हा तुम्ही आमच्या इच्छे ची पूर्ती करता त्यावेळी आमची श्रद्धा भाव उच्चतम असतो… परंतु काही दिवसांनी ती परत कमी होते… जसे श्री गोविंद बुवा यांना समज दिलीत… तशीच समज आमहाला द्या… आमच्या मध्ये अध्यात्मिकते मध्ये जो व्यवहारिकपणा आहे ती दूर करा आणि आम्हाला चांगली समज द्या…जेणेकरून आपली प्रामाणिक भक्ती आमहाला समजेल… धन्यवाद महाराज… कोटी कोटी धन्यवाद !!


Share
और पढिये !!

आपले स्वामी बोलतात.. “ अरे..!! मी संन्यासी आहे… माझ्याकडे पैसे वगैरे काही नाही… ! माझ्या अंगावर फक्त लंगोटी आहे…! तुला जर काही हवे असेल तर हि माती घे आणि निघ येथून… !! ”

स्वामी वाणी भाग २५ आपले स्वामी बोलतात.. “ अरे..!! मी संन्यासी आहे... माझ्याकडे पैसे वगैरे काही नाही... ! माझ्या अंगावर फक्त लंगोटी आहे...! तुला जर काही हवे असेल तर हि माती घे आणि निघ येथून... !! ” एक तेलंग जातीचा ब्राह्मण, कर्जबाजारी होऊन आणि पूर्वजन्मीच्या पातकांचे...

देव फक्त देव्हाऱ्यात नाही, तर आपल्या अंतःकरणात आहे.- देवघर

देव फक्त देव्हाऱ्यात नाही, तर आपल्या अंतःकरणात आहे.देवघर असं बनवा की तिथे बसल्यावर मन प्रसन्न होईल आणि घरात सकारात्मकता निर्माण होईल. देवघर म्हणजे आपल्या घराचं आध्यात्मिक हृदय.कुठे असावं? देव कोणते असावेत? देवघर - आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न देवघर कुठे असावे...

साडेसाती – आत्मशुद्धीचा काळ

साडेसाती म्हणजे शनीचा आपल्यावर कृपेचा काळ — जो आपल्याला थांबवतो, विचार करायला लावतो आणि आत्मशुद्धीची संधी देतो.हा काळ संकटाचा नाही, तर जागृतीचा आहे.शनिदेव शिक्षा देत नाहीत, ते आपले कर्म दाखवतात आणि सुधारण्याची संधी देतात.म्हणून साडेसातीमध्ये घाबरू नका, श्रद्धा ठेवा...

अहंभाव दूर कर – श्री गणेश पुराण कथा ४

श्री वेदव्यासांनी वेदांचे चार विभाग केले. खरंतर आपल्यावर त्यांचे खूप मोठे ऋण आहे...सर्वप्रथम त्यांना वंदन करून या कथेला सुरवात करूया..त्यांनी अनेक ग्रंथांची निर्मिती केली पण कुठेतरी त्यांच्यात अहंभाव निर्माण झाला असावा — हळूहळू त्यांची बुद्धी भ्रमित होऊ लागली,...

कर्माचे फळ भोगावेच लागते…श्री गणेश पुराण कथा ३

राजा सोमकान्त हा सौराष्ट्रातील न्यायी, विद्वान आणि प्रजेवर प्रेम करणारा राजा होता. पण वृद्धापकाळात त्याला कुष्ठरोग झाला. प्रजेची जबाबदारी मुलगा हेमकान्तावर सोपवून तो राणी सुधर्मेसह वनवासाला गेला. तिथे महर्षी भृगुपुत्र च्यवन यांच्या आश्रमात पोहोचला. महर्षींनी सांगितले...

श्री गणेशला पूजेचा प्रथम मान कसा मिळाला गणेश पुराण कथा २

कथा २ – प्रथमपूजेचा मान गणेशांना कसा मिळाला एकदा सर्व देवगणांनी शिवजींना विचारले –“प्रभो! आमच्यापैकी प्रथमपूजेचा अधिकारी कोण?” शिवजी म्हणाले –“जो संपूर्ण विश्वाची परिक्रमा करून सर्वांत आधी येईल, तोच मानकरी.” सर्व देवगण भव्य वाहनांवर बसून निघाले. पण गणेशजींचे वाहन होते...

गणेशजन्म: विघ्नहर्त्याची कथा 1

कथा  १ - गणेशजन्म: विघ्नहर्त्याची कथा ही कथा आहे पवित्र नैमिषारण्यातील. तिथे अनेक ऋषी-मुनी एकत्र येऊन ज्ञानयज्ञ करीत होते. त्या सभेत महान सूतजी विराजमान होते. शौनक ऋषींनी त्यांना वंदन करून विनंती केली — हे सूतजी! आम्हाला असे ज्ञान द्या, जे भक्ती, वैराग्य आणि विवेक...

मन निर्भय कसे बनवावे

स्वामी भक्त हो तारक मंत्रातील दुसरा मंत्र आहे.. निर्भय हो.. पहा तारक मंत्रातील प्रत्येक शब्द आहे आपल्याला निर्भयता हा गुण धारण करण्याचे शिकवतो.. आता आपल्या मनात येते कि आम्ही तर निर्भय आहोत.. आता आपण खरंच निर्भय आहोत का ? हा प्रश्न आपण आपल्याला स्वतः ला विचारायचा...

निःशंक तारक मंत्र काय सांगतो आपणस

स्वामी भक्त हो...आपण तारक मंत्र म्हणतो त्यातील पहिला मंत्र आपणास सांगतो...निःशंक..स्वामी भक्तीत मन कसे झाले पाहिजे निःशंक...म्हणजे मनात शंका नको...पहा..आपले मन शंका निर्माण करतेच...माझे अमूक काम होईल का? नाही होणार...होईल...मन म्हणते होईल...मध्येच म्हणते नाही...