यत्न शिकवण – श्री समर्थ रामदास स्वामी – श्री दासबोध दशक १२ समास ९

Jan 16, 2022 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

यत्न शिकवण – श्री समर्थ रामदास स्वामी – श्री दासबोध दशक १२ समास ९
प्रत्येक संतांनी कर्माला महत्व दिले… असा कोणतेही संत नाहीत कि त्यांनी कर्म सोडून…दे रे हरी पलंगावरी… असे कोणत्याच संतांनी सांगितले नाही… कारण प्रत्येक संत हे कर्म प्रधानच होते… कर्म न करणारे मनुष्य श्री रामदास स्वामींना करंटे वाटतात…श्री रामदास स्वामी आपणस कर्म कसे असावं याची शिकवण देत आहेत… समर्थ सांगत आहेत… सर्वप्रथम आपणास आपल्या मनाला शिकवण देणे आवश्यक आहे… म्हणजेच आपल्याला आपल्या मनावर कार्य करणे आवश्यक आहे…कारण मन हे सर्व गोष्टीचे कारक असते त्यामुळे आपणस मनावर कार्य करणे आवश्यक आहे… कार्य कोणतेही असो लहान असो व मोठे असो आपणस कर्म करणे आवश्यक आहे… मग ते कर्म करत असताना काही गोष्टी आवश्यक असतात… माणसाने सदैव तत्पर असणे आवश्यक आहे… काम कोणतेही असो आपण ते सुरु केल्या पासून ते पूर्ण होई पर्यंत न थांबता प्रयत्न करत राहणे खूप महत्वाचे असे आहे..  त्या शिवाय कामात यश प्राप्त होऊ शकत नाही… आळस पूर्णपणे सोडून देणे आवश्यक आहे.. अनेकदा आपले मन निराश होते कारण आपणस यश येत नाही… तरी देखील आपणस न थांबता न थकता प्रयत्न सुरु ठेवणे आवश्यक आहे… त्यानंतर आपणस आपल्या जीवनात काही बदल करणे आवश्यक आहे… रोज सकाळी लवकर उठावे… उठल्या नंतर प्रथम भगवंताचे नामस्मरण करावे… प्रातः कर्मे प्रथम पूर्ण करावेत… रोज काही तरी नवीन पाठ करावे… नवीन शिकावे… रोज त्याची उजळणी करावी.. असे होऊ नये पुढचे पाठ मागचे सपाट… नंतर थोडासा फलाहार घ्यावा… त्यानंतर आपण जे काही नोकरी.. व्यवसाय करत असाल त्यास सुरवात करावी… महाराज सांगतात… आपले अक्षर सुंदर असावे… वाचन सुद्धा स्पष्ट असावे… शुद्ध असावे… आपणस एखाद्या विषयाची काही अडचण असेल तर त्या बाबत आपण तज्ञ् व्यक्तींना विनासंकोच विचारावे… असे नाही कि मी कसे विचारू…आपले अज्ञान लपवू नका… त्याच प्रमाणे आपल्या कडे कुणी आले तर त्याचे समाधान देखील पण करावे.. पण त्याला चुकीचे मार्गदर्शन करू नये…रोज काही तरी आध्यात्मिक ग्रंथाचे वा चांगले साहित्य वाचावे… नुसते साहित्य वाचू नये तर त्यावर स्व चिंतन करावे… स्व चिंतन करून समजले नाही तर त्यातील तज्ञ् व्यक्तींना विचारावे… शक्य असेल तर आपण आपले आध्यत्मिक ज्ञान वा चांगले ज्ञान इतरांना द्यावे परंतु ते सत्य असावे खोटे नसावे… आपले आचरण हे सत्य असावे… म्हणजेच आपण जसे बोलतो तसेच आपले कर्म असावे… म्हणजेच बोले तैसे वागे.. त्याची वंदावी पाऊले । आपले आचरण असे असावे कि ज्याचा इतरांना त्रास होऊ नये.. या सर्व गोष्टी बरोबर महाराज महत्वाची गोष्ट सांगत आहेत…आपल्या ह्रदयात जो भगवंत आहे त्याचे नेहमी ध्यान… चिंतन करण्याचा अभ्यास करावा… अश्या पद्धतीने जर आपले कर्म असेल तर नक्कीच एक दिवस आपणस यश प्राप्त होते यात कोणतीच शंका नसावी.
नक्कीच आपण श्री दासबोध ग्रंथाचा अभ्यास करावा… जय जय रघुवीर समर्थ !
चला आपण समर्थांना प्रार्थना करूया – हे समर्था आज जी आपण आम्हाला यत्नशिकवण दिलीत त्या बद्दल धन्यवाद… आज पर्यंत आम्ही दैववादी होतो… परंतु आज तुम्ही आम्हाला प्रयत्न वादाची… कर्माची शिकवण दिलीत त्याबद्दल धन्यवाद.. आमच्या मनाला सदैव हि शिकवण स्मरणात रहावी… जो पर्यंत यशाची प्राप्ती होत नाही तो पर्यंत न थांबता.. न थकता.. प्रयत्न करत राहण्याची प्रेरणा आम्हाला दे… आणि तू जो ह्रदयात स्थित आहेस… त्यावर माझे चित्त स्थिर कर… धन्यवाद समर्था… हि प्रार्थना करून घेतल्या बद्दल धन्यवाद ! जय जय रघुवीर समर्थ


Share
और पढिये !!

आपले स्वामी बोलतात.. “ अरे..!! मी संन्यासी आहे… माझ्याकडे पैसे वगैरे काही नाही… ! माझ्या अंगावर फक्त लंगोटी आहे…! तुला जर काही हवे असेल तर हि माती घे आणि निघ येथून… !! ”

स्वामी वाणी भाग २५ आपले स्वामी बोलतात.. “ अरे..!! मी संन्यासी आहे... माझ्याकडे पैसे वगैरे काही नाही... ! माझ्या अंगावर फक्त लंगोटी आहे...! तुला जर काही हवे असेल तर हि माती घे आणि निघ येथून... !! ” एक तेलंग जातीचा ब्राह्मण, कर्जबाजारी होऊन आणि पूर्वजन्मीच्या पातकांचे...

देव फक्त देव्हाऱ्यात नाही, तर आपल्या अंतःकरणात आहे.- देवघर

देव फक्त देव्हाऱ्यात नाही, तर आपल्या अंतःकरणात आहे.देवघर असं बनवा की तिथे बसल्यावर मन प्रसन्न होईल आणि घरात सकारात्मकता निर्माण होईल. देवघर म्हणजे आपल्या घराचं आध्यात्मिक हृदय.कुठे असावं? देव कोणते असावेत? देवघर - आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न देवघर कुठे असावे...

साडेसाती – आत्मशुद्धीचा काळ

साडेसाती म्हणजे शनीचा आपल्यावर कृपेचा काळ — जो आपल्याला थांबवतो, विचार करायला लावतो आणि आत्मशुद्धीची संधी देतो.हा काळ संकटाचा नाही, तर जागृतीचा आहे.शनिदेव शिक्षा देत नाहीत, ते आपले कर्म दाखवतात आणि सुधारण्याची संधी देतात.म्हणून साडेसातीमध्ये घाबरू नका, श्रद्धा ठेवा...

अहंभाव दूर कर – श्री गणेश पुराण कथा ४

श्री वेदव्यासांनी वेदांचे चार विभाग केले. खरंतर आपल्यावर त्यांचे खूप मोठे ऋण आहे...सर्वप्रथम त्यांना वंदन करून या कथेला सुरवात करूया..त्यांनी अनेक ग्रंथांची निर्मिती केली पण कुठेतरी त्यांच्यात अहंभाव निर्माण झाला असावा — हळूहळू त्यांची बुद्धी भ्रमित होऊ लागली,...

कर्माचे फळ भोगावेच लागते…श्री गणेश पुराण कथा ३

राजा सोमकान्त हा सौराष्ट्रातील न्यायी, विद्वान आणि प्रजेवर प्रेम करणारा राजा होता. पण वृद्धापकाळात त्याला कुष्ठरोग झाला. प्रजेची जबाबदारी मुलगा हेमकान्तावर सोपवून तो राणी सुधर्मेसह वनवासाला गेला. तिथे महर्षी भृगुपुत्र च्यवन यांच्या आश्रमात पोहोचला. महर्षींनी सांगितले...

श्री गणेशला पूजेचा प्रथम मान कसा मिळाला गणेश पुराण कथा २

कथा २ – प्रथमपूजेचा मान गणेशांना कसा मिळाला एकदा सर्व देवगणांनी शिवजींना विचारले –“प्रभो! आमच्यापैकी प्रथमपूजेचा अधिकारी कोण?” शिवजी म्हणाले –“जो संपूर्ण विश्वाची परिक्रमा करून सर्वांत आधी येईल, तोच मानकरी.” सर्व देवगण भव्य वाहनांवर बसून निघाले. पण गणेशजींचे वाहन होते...

गणेशजन्म: विघ्नहर्त्याची कथा 1

कथा  १ - गणेशजन्म: विघ्नहर्त्याची कथा ही कथा आहे पवित्र नैमिषारण्यातील. तिथे अनेक ऋषी-मुनी एकत्र येऊन ज्ञानयज्ञ करीत होते. त्या सभेत महान सूतजी विराजमान होते. शौनक ऋषींनी त्यांना वंदन करून विनंती केली — हे सूतजी! आम्हाला असे ज्ञान द्या, जे भक्ती, वैराग्य आणि विवेक...

मन निर्भय कसे बनवावे

स्वामी भक्त हो तारक मंत्रातील दुसरा मंत्र आहे.. निर्भय हो.. पहा तारक मंत्रातील प्रत्येक शब्द आहे आपल्याला निर्भयता हा गुण धारण करण्याचे शिकवतो.. आता आपल्या मनात येते कि आम्ही तर निर्भय आहोत.. आता आपण खरंच निर्भय आहोत का ? हा प्रश्न आपण आपल्याला स्वतः ला विचारायचा...

निःशंक तारक मंत्र काय सांगतो आपणस

स्वामी भक्त हो...आपण तारक मंत्र म्हणतो त्यातील पहिला मंत्र आपणास सांगतो...निःशंक..स्वामी भक्तीत मन कसे झाले पाहिजे निःशंक...म्हणजे मनात शंका नको...पहा..आपले मन शंका निर्माण करतेच...माझे अमूक काम होईल का? नाही होणार...होईल...मन म्हणते होईल...मध्येच म्हणते नाही...