पादसेवन भक्ती -नवविधा भक्ति श्री समर्थ रामदास स्वामी

Dec 12, 2021 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

पादसेवन भक्ती – श्री समर्थ रामदास स्वामी या भक्ती बाबत सांगतात कि –

पादसेवन ते जाणावे । कायावाचा मनोभावे । सद्गुरूंचे पाय सेवावे । सद्गती कारणे । सेवावें सद्गुरुचरण । या नाव पादसेवन ।
श्री समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोध ग्रंथात याचे यतार्थ वर्णन केले आहे –
भगवंताच्या प्राप्ती साठी काया, वाचा, मनाने आणि आपलेपणाने सद्गुरूंची चरण सेवा करावी. सद्गुरूंच्या चरणांची सेवा करणे म्हणजे पादसेवन भक्ती !
नवविधा भक्ती मधील चौथा प्रकार आहे पादसेवन भक्ती । पादसेवन भक्ती चे रामदास स्वामींनी खूप विस्तार पूरक वर्णन दासबोध मध्ये केले आहे… वरील श्लोकातून महाराज  सोप्या भाषेत पादसेवन भक्ती चे वर्णन करत आहेत… सद्गुरूंचे पाय सेवावे… सद्गुरू आपल्या प्रत्येकाचे वेगवेगळे सद्गुरू असणार… श्री स्वामी समर्थ महाराज , श्री गजानन महाराज, संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर माऊली वा अन्य कोणते आपले सद्गुरू असतील… त्यांची काया… वाचा… मनोभावे सद्गुरूंची पाद्य सेवा करावी… काया म्हणजे शरीराने सेवा करायची … शरीराने सेवा म्हणजे आपणस काय शरीराला त्रास द्यायचा आहे का? नाही आपणस शरीर साक्षात परमेश्वर या भावनेने आपणस सेवा करायची आहे… कारण आपले शरीर जर तंदुरुस्त असेल तरच आपण सद्गुरूंची सेवा करू शकतो… कारण शरीर जर व्यवस्थित नसेल तर आपण कशी सेवा करणार… त्यामुळे आपणस सर्वप्रथम आपले शरीर सद्गुरु सेवेसाठी निरोगी ठेवणे आवश्यक आहे.. जेणेकरून आपण सद्गुरूंची जी सेवा असेल ती करू शकू… आता या ठिकाणी आपली जी वाचा आहे तिने सद्गुरु ची सेवा करायचा उपदेश इथे समर्थ करत आहेत… पहा हि वाचा आपणस उच्च स्थान पण देऊ शकते व नीच स्थान पण देऊ शकते… आपण तिचा कसा वापर करतो यावर ते अवलंबून आहे… आता वाचेने सदगुरूंची सेवा म्हणजे आपणस जी काही ग्रंथ संपदा उपलब्ध आहे त्याचे आपणस वाचन करायचे आहे… जसे तुकाराम गाथा असेल , दासबोध असेल , ज्ञानेश्वरी असेल यांचे आपणस मनसोक्त वाचन करायचे आहे… जेणेकरून आपणस सद्गुरू आपणस जो बोध देऊ इच्छितात तो आपणस समजेल…तोच बोध आपण आपल्या वाचे द्वारे इतरांना सांगू शकता हि देखील सद्गुरूंची सेवा होणार आहे …हि सर्व सेवा झाली कि एक अवस्था अशी येईल कि आपण आपल्या मनाद्वारे… सद्गुरूची मानस पूजा करू… पण हि अवस्था येण्यासाठी आपणस खूप सेवेची भक्ती ची अवस्था प्राप्त करून घेणे आवश्यक आहे… त्या साठी आपण सदगुरूंच्या प्रत्येक आज्ञा चे पालन करणे आवश्यक आहे… त्यावर आपणस चिंतन मनन करणे आवश्यक आहे…तेव्हाच आपल्याकडून परिपूर्ण अशी पादसेवन भक्ती होईल.
चला आपण सद्गुरू श्री रामदास स्वामींनाच या साठी प्रार्थना करूया

हे समर्था… आज तु आम्हाला पादसेवन भक्ती म्हणजे काय याची ओळख करून दिलीस… खरे तर हे तुम्ही जे काही सांगितले हे वाचन करताना… आम्हाला असे वाटते कि आम्हाला हे समजले आहे… परंतु रोजच्या कर्मात आम्ही आपली हि शिकवण विसरून जातो…पादसेवन भक्ती करायची असेल… त्या भक्ती मध्ये स्थिर होण्यासाठी आपलीच कृपा आवश्यक आहे… हे आई… तुला हीच प्रार्थना आहे कि आमची भक्ती वाढव…आम्हाला आपली पादसेवन भक्ती प्राप्त व्हावी हीच प्रार्थना… धन्यवाद समर्था !!


Share
और पढिये !!

आपले स्वामी बोलतात.. “ अरे..!! मी संन्यासी आहे… माझ्याकडे पैसे वगैरे काही नाही… ! माझ्या अंगावर फक्त लंगोटी आहे…! तुला जर काही हवे असेल तर हि माती घे आणि निघ येथून… !! ”

स्वामी वाणी भाग २५ आपले स्वामी बोलतात.. “ अरे..!! मी संन्यासी आहे... माझ्याकडे पैसे वगैरे काही नाही... ! माझ्या अंगावर फक्त लंगोटी आहे...! तुला जर काही हवे असेल तर हि माती घे आणि निघ येथून... !! ” एक तेलंग जातीचा ब्राह्मण, कर्जबाजारी होऊन आणि पूर्वजन्मीच्या पातकांचे...

देव फक्त देव्हाऱ्यात नाही, तर आपल्या अंतःकरणात आहे.- देवघर

देव फक्त देव्हाऱ्यात नाही, तर आपल्या अंतःकरणात आहे.देवघर असं बनवा की तिथे बसल्यावर मन प्रसन्न होईल आणि घरात सकारात्मकता निर्माण होईल. देवघर म्हणजे आपल्या घराचं आध्यात्मिक हृदय.कुठे असावं? देव कोणते असावेत? देवघर - आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न देवघर कुठे असावे...

साडेसाती – आत्मशुद्धीचा काळ

साडेसाती म्हणजे शनीचा आपल्यावर कृपेचा काळ — जो आपल्याला थांबवतो, विचार करायला लावतो आणि आत्मशुद्धीची संधी देतो.हा काळ संकटाचा नाही, तर जागृतीचा आहे.शनिदेव शिक्षा देत नाहीत, ते आपले कर्म दाखवतात आणि सुधारण्याची संधी देतात.म्हणून साडेसातीमध्ये घाबरू नका, श्रद्धा ठेवा...

अहंभाव दूर कर – श्री गणेश पुराण कथा ४

श्री वेदव्यासांनी वेदांचे चार विभाग केले. खरंतर आपल्यावर त्यांचे खूप मोठे ऋण आहे...सर्वप्रथम त्यांना वंदन करून या कथेला सुरवात करूया..त्यांनी अनेक ग्रंथांची निर्मिती केली पण कुठेतरी त्यांच्यात अहंभाव निर्माण झाला असावा — हळूहळू त्यांची बुद्धी भ्रमित होऊ लागली,...

कर्माचे फळ भोगावेच लागते…श्री गणेश पुराण कथा ३

राजा सोमकान्त हा सौराष्ट्रातील न्यायी, विद्वान आणि प्रजेवर प्रेम करणारा राजा होता. पण वृद्धापकाळात त्याला कुष्ठरोग झाला. प्रजेची जबाबदारी मुलगा हेमकान्तावर सोपवून तो राणी सुधर्मेसह वनवासाला गेला. तिथे महर्षी भृगुपुत्र च्यवन यांच्या आश्रमात पोहोचला. महर्षींनी सांगितले...

श्री गणेशला पूजेचा प्रथम मान कसा मिळाला गणेश पुराण कथा २

कथा २ – प्रथमपूजेचा मान गणेशांना कसा मिळाला एकदा सर्व देवगणांनी शिवजींना विचारले –“प्रभो! आमच्यापैकी प्रथमपूजेचा अधिकारी कोण?” शिवजी म्हणाले –“जो संपूर्ण विश्वाची परिक्रमा करून सर्वांत आधी येईल, तोच मानकरी.” सर्व देवगण भव्य वाहनांवर बसून निघाले. पण गणेशजींचे वाहन होते...

गणेशजन्म: विघ्नहर्त्याची कथा 1

कथा  १ - गणेशजन्म: विघ्नहर्त्याची कथा ही कथा आहे पवित्र नैमिषारण्यातील. तिथे अनेक ऋषी-मुनी एकत्र येऊन ज्ञानयज्ञ करीत होते. त्या सभेत महान सूतजी विराजमान होते. शौनक ऋषींनी त्यांना वंदन करून विनंती केली — हे सूतजी! आम्हाला असे ज्ञान द्या, जे भक्ती, वैराग्य आणि विवेक...

मन निर्भय कसे बनवावे

स्वामी भक्त हो तारक मंत्रातील दुसरा मंत्र आहे.. निर्भय हो.. पहा तारक मंत्रातील प्रत्येक शब्द आहे आपल्याला निर्भयता हा गुण धारण करण्याचे शिकवतो.. आता आपल्या मनात येते कि आम्ही तर निर्भय आहोत.. आता आपण खरंच निर्भय आहोत का ? हा प्रश्न आपण आपल्याला स्वतः ला विचारायचा...

निःशंक तारक मंत्र काय सांगतो आपणस

स्वामी भक्त हो...आपण तारक मंत्र म्हणतो त्यातील पहिला मंत्र आपणास सांगतो...निःशंक..स्वामी भक्तीत मन कसे झाले पाहिजे निःशंक...म्हणजे मनात शंका नको...पहा..आपले मन शंका निर्माण करतेच...माझे अमूक काम होईल का? नाही होणार...होईल...मन म्हणते होईल...मध्येच म्हणते नाही...