देवघर कसे असावे

Nov 8, 2021 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

देवघर कसे असावे – खरंतर देवघर कसे असावे.. यावर अनेकांची अनेक मते आहेत… यावर खरंतर प्रत्येकाने चिंतन केले तर प्रत्येक जण स्वतःला प्रामाणिक उत्तर देऊ शकतो कि… देव घर कसे असावे… ज्या ठिकाणी आपले चित्त स्थिर होते.. मन शुद्ध होते…आंतरिक आनंद प्राप्त होईल असे देव घर असावे..आता आपण म्हणाल नक्की देवघर कसे असावे… देव घर हे आपणस आर्थिक दृष्टया जसे परवडेल असे असावे… नक्कीच बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत… त्यातील आपणास आवडणारा… परवडणारा पर्याय आपण निवडावा… देवघरात नेहमी स्वच्छ असे कापडी आसन असावे.. शक्यतो रोज धुतलेले आसन असावे… आता महत्वाचा मुद्दा… देवघरात देव कोणते असावेत.. शास्त्रानुसार पंचायतन असावे… थोडक्यात पाच देव असावेत… जसे गणेश, विष्णू, शंकर, सूर्य, देवी… हि पाच देव असावेत… शंख.. घंटा असावी… आता काय होते… आपण देवघरात देवांची इतकी गर्दी करतो कि काही दिवसानी आपणस देव घर छोटे वाटू लागते… या मागचे मुख्य कारण म्हणजे आपण… कुठे गेलात किंवा कुणी सांगितले कि आणखीन एक देवाची मूर्ती अथवा फोटो घेऊन येतो व आपणस हि कळत नाही आणि मग देव घर लहान पडू लागते… त्या मुळे आज पासून ठरवा कि मी आहे त्याच देवांची व्यस्थित पूजा करेल उगाचच आणखीन देवांच्या मूर्ती अथवा फोटो वाढवत बसणार नाही.. अनेकदा काय होते मूर्ती किंवा फोटो खराब होतात आणि मग काही लोकांच्या सांगण्यावरून त्या मूर्ती अथवा फोटो मंदिरात नेवून ठेवले जातात… आता यावर तुम्ही स्वतः चिंतन मनन करा आणि ठरवा कि हे योग्य आहे कि आयोग्य… नक्की आपण भक्ती करतो कि वेडेपणा… कृपया हि गोष्ट प्रथम बंद करा… आठ दिवस… किंवा महिन्यातून एकदा सर्व देवांना हळद… लिंबू… किंवा दही… किंवा बाजारात अनेक पावडर मिळतात त्याचा वापर करून देवांना स्वच्छ करावे… कारण काय होते वातावरणामुळे किंवा केमिकल युक्त गंधाने मूर्ती खराब होतात त्यामुळे आपण अश्या प्रकारे महिण्यातून एकदा सर्व मूर्ती स्वच्छ करावेत… बघा नक्कीच आपली प्रसन्नता वाढण्यास मदत होईल… आता देवपूजा झाली… रोज देवाला काहीतरी नैवैद्य अर्पण करावा… आपण देवांना अनेक फुले वाहतो… दुसऱ्या दिवशी ते निर्माल्य नदीत वा पाण्यात टाकण्याची चुकीची पद्धत आपण करतो… बघा एकीकडे आपण गंगेच्या पाण्याची पूजा करतो आणि दुसरी कडे त्याच गंगा मातेचे पाण्यात घाण टाकतो… अशी कशी आपली श्रद्धा जी आपल्या पर्यावरणाचे नुकसान करत असेल तर… देव कसा प्रसन्न होईल… त्यामुळे आज पासून संकलप करा कि निर्माल्य पाण्यात टाकणार नाही म्हणजे नाहीच.. इथेच आपली निम्मी भगवंताची सेवा रुजू होते व ईश्वर सुद्धा खुश होऊन आशीर्वादच देतो… केवळ देवाला स्नान घातले कि देव पूजा संपते का नाही तर ईश्वराच्या जवळ जाण्याचा सोपा मार्ग म्हणजे नामस्मरण रुपी भक्ती… पूजा झाली कि रोज किमान ५ मिनिटे कोणत्याही देवाचे नामस्मरण करा … जप करा… बघा आपणस… आपल्या स्वतः मध्ये आमूलाग्र बदल झालेले दिसेल… आज आपण इथेच थांबू… पुढील भागात यावर अजून चिंतन मनन करूया… चला तर मग राम कृष्ण हरी.. आपणास माहिती आवडल्यास नककीच आपले चॅनेल subscribe करा इतरांनाही सांगा… धन्यवाद


Share
और पढिये !!

आपण सर्व एकाच ईश्वराची लेकरं आहोत

स्वामी वाणी पुष्प ५९२(पर्व ४ थे भाग ९६) प्रेरणादायी बोल आपण सर्व एकाच ईश्वराची लेकरं आहोत..तो आपला पालनकर्ता आहे.. हा विश्वास ठेवा.. जग सूंदर दिसू लागेल..!! www.SwamiVaani.co.in स्वामी भक्तहो आजच्या स्वामी वाणी चा बोध घेण्यासाठी स्वामींची लीलाच पाहूया...अक्कलकोट गावात...

हे मना !! अशाच व्यक्तीच्या पावलावर पाऊल टाक.. ज्याच्या प्रवासाची दिशा आणि तुझ्या धेय्याची दिशा एकच आहे..!!

स्वामी वाणी पुष्प ५९०(पर्व ४ थे भाग ९४)* *प्रेरणादायी बोल* हे मना !! अशाच व्यक्तीच्या पावलावर पाऊल टाक.. ज्याच्या प्रवासाची दिशा आणि तुझ्या धेय्याची दिशा एकच आहे..!! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो.. आजची स्वामीं वाणी खूप खोल आहे..कारण आपल्या विचारानुसार आपण अर्थ...

लोक काय म्हणतील ह्या पेक्षा स्वामी काय म्हणतील ह्याचा विचार करा..

स्वामी वाणी पुष्प ५८९(पर्व ४ थे भाग ९३)* *प्रेरणादायी बोल* एखादे कर्म करताना.. लोक काय म्हणतील ह्या पेक्षा स्वामी काय म्हणतील ह्याचा विचार करा..आपल्याला स्वामींना भूषणावह होईल असे कर्म करायचे आहे..!! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो..आजची स्वामीं वाणी सांगत आहे..उठ...

खचू नकोस..पुन्हा नव्याने सुरुवात कर..!!

स्वामी वाणी पुष्प ५८८(पर्व ४ थे भाग ९२)* *प्रेरणादायी बोल* जर तुला फळाची अपेक्षा असेल तर सर्वप्रथम त्यासाठी तू किती कष्ट केले.. किती प्रयत्न केले.. किती सेवा केली ह्याचे आत्मपरीक्षण कर.. तुझे उत्तर तुलाच भेटेल.. उत्तर नकारात्मक असेल तर खचू नकोस..पुन्हा नव्याने सुरुवात...

हे मना !! प्रत्येक पाऊल टाकत असतांना.. चुकीचे पाऊल पडणार नाही ह्याची काळजी घे..

स्वामी वाणी पुष्प ५८७(पर्व ४ थे भाग ९१)* *प्रेरणादायी बोल* हे मना !! प्रत्येक पाऊल टाकत असतांना.. चुकीचे पाऊल पडणार नाही ह्याची काळजी घे.. लोकांना जरी समजत नसेल पण स्वामीना सर्व समजत आहे ह्याची जाणीव ठेव..!! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो आजच्या स्वामीं वाणी तुन...

हे मना !! अपेक्षा ठेवायचीच असेल तर थेट स्वामींकडून ठेव.

स्वामी वाणी पुष्प ५८४(पर्व ४ थे भाग ८८) प्रेरणादायी बोल हे मना !! अपेक्षा ठेवायचीच असेल तर थेट स्वामींकडून ठेव.. बघ !! तुझा कधीच अपेक्षा भंग होणार नाही..!! www.SwamiVaani.co.in स्वामी भक्तहो.. आजच्या स्वामी वाणी तुन आपणस समज प्राप्त होते कि अपेक्षा ठेवायचीच असेल तर...

हृदयाचा आवाज ओळख

स्वामी वाणी पुष्प ५८३(पर्व ४ थे भाग ८७) अमृत वचन हृदयाचा आवाज ओळख.. तो आवाज ऐक.. त्या मागील भाव ओळख.. त्याच प्रमाणे बुद्धी वापर आणि कृती कर.. बघा !! यश निश्चित आहे..!! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो... आजच्या स्वामीं वाणीतून आपणस.. सर्व प्रश्नांची उत्तरे दिली...

विश्वसनीय बनूया

हे मना !! जे कार्य तुला शक्य नाही.. त्या कार्याला उगीच भावनिक होऊन 'होकार' देऊ नको.. त्या कार्याला ठामपणे "नाही" बोल..कदाचित समोरील व्यक्तीला थोडं वाईट वाटेल पण तु विश्वसनीय बनशील !! www.SwamiVaani.co.in स्वामी भक्तहो.. आजच्या स्वामी वाणीतून स्वामी आपणास विश्वसनीयता...

स्वामीं ना काय मागावे ?

स्वामी वाणी पुष्प ५८२(पर्व ४ थे भाग ८६)* *आजचे चिंतन-मनन* स्मरण तुझे मज नित्य असावे ! तव गुण भावे गावे !! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो.. आजची स्वामीं वाणी म्हणजे स्वामीं ना केलेली प्रार्थना आहे...स्मरण तुझे मज नित्य असावे !तव गुण भावे गावे !! आपण स्वामीं कडे...

भोळी भक्ती म्हणजे काय?

स्वामी वाणी पुष्प ५८१(पर्व ४ थे भाग ८५)* *आजचे चिंतन-मनन* स्वामी स्वामी जप करता, स्वामी भेटे भोळ्या भक्ता ! ऐसा माझा देव भोळा, मात्र नाम घेता,घेतो धावा !! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो.. वरील ओवीतून स्वामीं नक्की काय सांगत आहेत..स्वामीं तुम्हीच चिंतन मनन करून...