श्री स्वामी समर्थ तारक मंत्र..मनन १

Sep 19, 2021 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

खरं तर तारक मंत्र म्हणजे प्रत्येक स्वामीं भक्ता साठी स्वामीं च कवच आहे..प्रत्येक शब्द हा स्वामीं अनुभूती आहे..खरंतर ज्यांनी हा तारक मंत्र शब्द रुपात गुंफला..त्यांची भक्ती ची अवस्था ही खूपच वरच्या पात्रते ची असणार..आणि त्यामुळेच स्वामींनी आपल्या सर्वांसाठी तारक मंत्र त्यांच्या कडून करून घेतला..ज्यांनी हा तारक मंत्र शब्द रुपात उतरवला त्यांचे उपकार तर आपण कधीच फेडू शकत नाही..उलट त्यांना प्रार्थना करू या ..आमच्या अल्प बुद्धी ला त्याचा अर्थ उलगडू द्या..जशी भक्ती.. सेवा तुमच्या मार्फत झाली त्यातील काही तर सेवा करण्याची संधी आम्हाला प्राप्त व्हावी..आणि आमचे जीवन स्वामीं मय बनावे हीच प्रार्थना!
निःशंक हो निर्भय हो मन रे !
सुरवातीलाच स्वामीं आपल्या मनाला सांगत आहेत…हे मना..मनात कोणतीही शंका आणू नकोस..कोणतीच भीती मनात ठेवू नकोस…पहा सुरवातीलाच स्वामीं सांगत आहेत आपल्या स्वतःच्या मनावर कार्य करण्यास..कारण आपले मन हे सर्व गोष्टीचे कारक आहे..आपण मनात शंका उपस्थित केली की..आपले होणारे काम ही होत नाही..आपण मनाला सांगायच आहे..हे मना कोणतीच शंका भीती मनात आणू नकोस मनाला सांगायचं आहे..तू जी नकारात्मक बडबड करत आहेस..त्यापेक्षा स्वामीं नाम घे..मना एक गोष्ट लक्षात ठेव सर्व नकारात्मक विचारावर जे राम बाण औषध मला मिळालं आहे..ते म्हणजे “श्री स्वामीं समर्थ” हे नाम अंतर्मनात इतके रुजवा की आपले मन पण म्हणेल..अभी सिर्फ और सिर्फ श्री स्वामी समर्थ”
प्रचंड स्वामीं बळ पाठीशी रे- इथे स्वामीं महाराज आपल्या मनाला सांगण्यास सांगत आहेत ब्रम्हांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांची शक्ती माझ्या पाठीशी आहे..आता इथे आपले मन शंका कुशंका निर्माण करते स्वामीं बळ पाठीशी आहे तरी पण आपले मन आपल्या मनात शंका निर्माण करते..या शंकेचे रूपांतर ..नकारात्मकते मध्ये होते..आणि आपल्यासोबत असणारी स्वामीं ची शक्ती जी कार्य करणार होती तिला अडथळा निर्माण होतो..आज आपण हाथ धुतो.. मास्क लावतो का ? कारण आपल्या मनावर हे खोल पर्यंत रुजले आहे की यानी आपण होणाऱ्या रोगाचा अटकाव करू शकतो अगदी तसेच नकारात्मक विचारांना हे माहीत आहे जर आपल्या मनावर नकारात्मक गोष्टी निर्माण झाल्या तर हा नक्कीच यांच्या पासून स्वामीं ची शक्ती बळ यांना प्राप्त होणार आहे यात अडथळा निर्माण होणार आहे..म्हणून मनाला सतत सांगा स्वामीं महाराजांची शक्ती माझ्या सतत सोबत आहे
अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी…स्वामीं महाराज हे आपल्या सामान्य बुद्धी च्या पली कडे आहेत
.याचे आपणस सतत स्मरण ठेवायचे आहे..काय होतं आपल्या मनात स्वामीं विषयी एक विशिष्ट अशी कल्पना रुपी आकृती तयार आहे..आणि त्यानुसार आपण विचार करतो व मन ही यालाच सत्य मानते…आता आपण म्हणाल की मग आम्ही जी मूर्ती ..फोटो पाहतो ते स्वामीं नाहीत का ? असे नाही ते स्वामीच आहेत.. पण फक्त तसेच स्वामींचे स्वरूप जाणतो..पण स्वामीं हे चरा चरात आहेत..पण आपल्या मनावर आपण आज पर्यंत जे काही संस्कार केले आहेत..करत आहोत त्यामुळे… आपण त्यांना ओळखू शकत नाही…त्यामुळं स्वामीं या ठिकाणी सांगत आहेत..की मी सतत तुझ्या सोबत आहे पण तू कोणतेही तर्क.. वितर्क लावत बसू नकोस..कारण तू त्यातच अडकशील.
अशक्य ही शक्य करतील स्वामीं..हा तर आपल्या सर्वांसाठी स्वामींनी दिलेला आशीर्वाद आहे..जर हा आशिर्वाद रुपी मंत्र आपल्या अंतर्मनात कोरला गेला तर या सारखा सुवर्ण योग असूच शकत नाही..कारण ही खूपच उच्चतम स्वामीं कृपा असेल कारण कोणत्याही परिस्थिती मध्ये ह्रदयातून एकच हाक येईल…अशक्य ही शक्य करतील स्वामीं त्याच क्षणी आपली इच्छा पूर्ण झालेली असेल.


Share
और पढिये !!

देव फक्त देव्हाऱ्यात नाही, तर आपल्या अंतःकरणात आहे.- देवघर

देव फक्त देव्हाऱ्यात नाही, तर आपल्या अंतःकरणात आहे.देवघर असं बनवा की तिथे बसल्यावर मन प्रसन्न होईल आणि घरात सकारात्मकता निर्माण होईल. देवघर म्हणजे आपल्या घराचं आध्यात्मिक हृदय.कुठे असावं? देव कोणते असावेत? देवघर - आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न देवघर कुठे असावे...

साडेसाती – आत्मशुद्धीचा काळ

साडेसाती म्हणजे शनीचा आपल्यावर कृपेचा काळ — जो आपल्याला थांबवतो, विचार करायला लावतो आणि आत्मशुद्धीची संधी देतो.हा काळ संकटाचा नाही, तर जागृतीचा आहे.शनिदेव शिक्षा देत नाहीत, ते आपले कर्म दाखवतात आणि सुधारण्याची संधी देतात.म्हणून साडेसातीमध्ये घाबरू नका, श्रद्धा ठेवा...

अहंभाव दूर कर – श्री गणेश पुराण कथा ४

श्री वेदव्यासांनी वेदांचे चार विभाग केले. खरंतर आपल्यावर त्यांचे खूप मोठे ऋण आहे...सर्वप्रथम त्यांना वंदन करून या कथेला सुरवात करूया..त्यांनी अनेक ग्रंथांची निर्मिती केली पण कुठेतरी त्यांच्यात अहंभाव निर्माण झाला असावा — हळूहळू त्यांची बुद्धी भ्रमित होऊ लागली,...

कर्माचे फळ भोगावेच लागते…श्री गणेश पुराण कथा ३

राजा सोमकान्त हा सौराष्ट्रातील न्यायी, विद्वान आणि प्रजेवर प्रेम करणारा राजा होता. पण वृद्धापकाळात त्याला कुष्ठरोग झाला. प्रजेची जबाबदारी मुलगा हेमकान्तावर सोपवून तो राणी सुधर्मेसह वनवासाला गेला. तिथे महर्षी भृगुपुत्र च्यवन यांच्या आश्रमात पोहोचला. महर्षींनी सांगितले...

श्री गणेशला पूजेचा प्रथम मान कसा मिळाला गणेश पुराण कथा २

कथा २ – प्रथमपूजेचा मान गणेशांना कसा मिळाला एकदा सर्व देवगणांनी शिवजींना विचारले –“प्रभो! आमच्यापैकी प्रथमपूजेचा अधिकारी कोण?” शिवजी म्हणाले –“जो संपूर्ण विश्वाची परिक्रमा करून सर्वांत आधी येईल, तोच मानकरी.” सर्व देवगण भव्य वाहनांवर बसून निघाले. पण गणेशजींचे वाहन होते...

गणेशजन्म: विघ्नहर्त्याची कथा 1

कथा  १ - गणेशजन्म: विघ्नहर्त्याची कथा ही कथा आहे पवित्र नैमिषारण्यातील. तिथे अनेक ऋषी-मुनी एकत्र येऊन ज्ञानयज्ञ करीत होते. त्या सभेत महान सूतजी विराजमान होते. शौनक ऋषींनी त्यांना वंदन करून विनंती केली — हे सूतजी! आम्हाला असे ज्ञान द्या, जे भक्ती, वैराग्य आणि विवेक...

मन निर्भय कसे बनवावे

स्वामी भक्त हो तारक मंत्रातील दुसरा मंत्र आहे.. निर्भय हो.. पहा तारक मंत्रातील प्रत्येक शब्द आहे आपल्याला निर्भयता हा गुण धारण करण्याचे शिकवतो.. आता आपल्या मनात येते कि आम्ही तर निर्भय आहोत.. आता आपण खरंच निर्भय आहोत का ? हा प्रश्न आपण आपल्याला स्वतः ला विचारायचा...

निःशंक तारक मंत्र काय सांगतो आपणस

स्वामी भक्त हो...आपण तारक मंत्र म्हणतो त्यातील पहिला मंत्र आपणास सांगतो...निःशंक..स्वामी भक्तीत मन कसे झाले पाहिजे निःशंक...म्हणजे मनात शंका नको...पहा..आपले मन शंका निर्माण करतेच...माझे अमूक काम होईल का? नाही होणार...होईल...मन म्हणते होईल...मध्येच म्हणते नाही...

श्री शिवमहापुराण १

श्री शिवमहापुराण १ - आज आपण प्रत्येक जण ऐकतो कि शिव महा पुराण श्रवण केले पाहिजे पण काळा नुसार आपणास ते शक्य होत नाही. पण मग आपण एक छोटासा पर्यन्त करत आहोत.. थोडक्यात कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करूया.. यात सर्व काही येईल असे नाही पण आपली भक्ती नक्कीच वाढेल अशी...