अहंभाव दूर कर – श्री गणेश पुराण कथा ४

Sep 17, 2025 | मराठी

Share

श्री वेदव्यासांनी वेदांचे चार विभाग केले. खरंतर आपल्यावर त्यांचे खूप मोठे ऋण आहे…सर्वप्रथम त्यांना वंदन करून या कथेला सुरवात करूया..त्यांनी अनेक ग्रंथांची निर्मिती केली पण कुठेतरी त्यांच्यात अहंभाव निर्माण झाला असावा — हळूहळू त्यांची बुद्धी भ्रमित होऊ लागली, स्मरणशक्ती कमी झाली, महत्त्वाच्या गोष्टी विसरल्या जाऊ लागल्या. …गोंधळून व्यासजी ब्रह्माजींकडे गेले आणि विचारले — “हे पितामह! माझे ज्ञान का हरवत आहे? काहीच सुचत नाही. याचे कारण काय?”ब्रह्माजींनी ध्यान करून सांगितले —“व्यासजी! आपण विद्वत्तेच्या गर्वात आहात..कुठेतरी अहंभाव आला आहे…त्यामुळे हे विस्मरण होत आहे..आपण गणेशस्मरण करा.. ते बुद्धिदाता आहेत..विघ्नहर्ता आहेत…व्यासजी नम्रतेने म्हणाले —“पण प्रभो! मला गणेशांचे स्वरूप माहीत नाही. मार्गदर्शन करा.” ब्रह्माजींनी सांगितले —
“गणेशजी हे परात्पर ब्रह्म आहेत. ‘ॐ गं गणपतये नमः’ हा मंत्र सर्वांत सोपा आणि फलदायी आहे. सकाळी स्नान करून, स्वच्छ आसनावर बसून, प्राणायाम करून या मंत्राचा जप करा. व्यासजींनी भक्तिभावाने जप सुरू केला. थोड्याच वेळात त्यांचे विस्मरण नाहीसे झाले. ज्ञान पुन्हा प्रकट झाले. आणि पुराणरचनेचे महान कार्य अखंड सुरू झाले.बोला गणपती बाप्पा मोरया..!

बोध खरंतर अध्यात्म म्हणजे… चालती बोलती..पाठशाळा…यातील अनेक कथा या आपल्या जीवनात लागू करण्यासाठी असतात..पण आपण कथा वाचून सोडून देतो..पहा या कथेत व्यासजी यांनी जे काही लिखाण कार्य केलं आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे..पण कुठेतरी त्यांच्यात अहंभाव निर्माण झाला आणि त्यांना अडथळा येऊ लागला…पहा आपल्या जीवनात ही आपण ही अनेक कार्य करत असतो…काही दिवसांनी आपल्याला असे वाटते की मी करतो म्हणून होत आहे..खरतर आज आपण जे काही कार्य करत आहोत..ते आपण नाही केलं तरी दुसरे कुणी तरी करणार आहे…उलट जर आपण जर कार्य करत आहोत त्याला एक संधी …मानले… त्या कार्या करायला मिळाले याबद्दल धन्यवाद भाव ठेवला तर..कोणतेही काम कार्य…काम न राहता ती सेवा बनेल..आणि आपल्यातील अहंभाव दूर होऊन आपण उत्कृष्ट असे कार्य करू…कारण अहंभाव आपल्यातील विचार करण्याची शक्ती कमी करतो..सेवाभाव आपली शक्ती वाढवतो…म्हणून प्रत्येक कार्य सेवा भाव ठेवून करूया…धन्यवाद बाप्पा..चला आपण गणपती बाप्पा ला प्रार्थना करूया..

प्रार्थना हे गजानना…अनेकदा आम्ही कार्य करत असताना.. आमच्यात अहंभाव निर्माण होतो..हा अहंभाव ते कार्य करताना जे लक्ष देऊन कार्य करण्याऐवजी..आमचे लक्ष…आमच्यातील अहंभाव यावर केंद्रित होते…कृपा कर..आमच्यातील अहंभाव दूर कर…कारण जे कार्य आम्ही करत आहोत..त्या साठी बुद्धिदाता तूच आहेस..विघ्नहर्ता तूच आहेस..मग मी तर फक्त निमित्त मात्र आहे..कृपा कर… हे तुझ्या कृपेशिवाय शक्य नाही…ही समज दिल्याबद्दल धन्यवाद…ही प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद…बोला गणपती बाप्पा मोरया..!


Share
और पढिये !!

वेळ

भगवंताने सर्वांना एक गोष्ट सारखीच दिली आहे ती म्हणजे दिवसाचे २४ तास त्यामुळे आपण असे कधीच म्हणू शकत नाही कि माझ्या कडे वेळ नाही. वॉरन बफे म्हणतात - श्रीमंत लोक वेळेत गुंतवणूक करतात गरीब लोक पैशाची गुंतवणूक करतात मायकल आल्थसूलर - वेळ उडतो आपण त्याचे पायलट आहोत प्रत्येक...

राखी पौर्णिमा

राखी पौणिमा म्हणजे नात्याला घट्ट करण्याचा उत्सव..आपण वयाने मोठे झालो की काही कारणास्तव या नात्यात दुरावा येतो..या मागे कारण असते वडिलोपार्जित संपत्ती..जी खरं तर नात्यात दुरावा निर्माण करते..खरंतर या साठी कष्ट करणारा मरून जातो..आणि मेल्यावर विचार करतो यासाठीच केले होते...

आपण स्व आदर करतो का

आपण स्वतः ला काय समजतो - खरंतर हा प्रश्न आज पर्यंत आपण आपल्या स्वतःला विचारला आहे का ? विचारला असेल तर आपले आपल्या स्वतः बद्दल मत काय आहे? आपण स्वतः स्वतःचा आदर करता का ? याचे उत्तर काहींचे हो असेल काहींचे नाही असे असेल.. खरंतर जो पर्यंत आपण स्वतः आपला आदर करत नाही तो...

श्री दासबोध दशक १२ समास १

श्री दासबोध दशक १२ समास १ दासबोधातील दशक १२ मधील समास १ मध्ये श्री समर्थ रामदास स्वामी विमल लक्षण सांगत आहेत प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालावी हा उपदेश देत आहेत... प्रपंच करण्यात आळस करू नये.. अनेक लोक म्हणतात प्रपंच आणि परमार्थ एकत्र होऊ शकत नाही... रामदास स्वामी...

नृसिंह जयंती – नृसिंह जन्म कथा

आज नृसिंह जयंती निमित्त चला आपण नृसिंह जन्म कथा पाहूया हिरण्यकश्यपू राजा ह्यांनी भगवंताची भक्ती करून त्याला प्रसन्न करून घेतले होते व असा वर मागितला कि मला कोणत्याही माणसाकडून वा प्राण्याकडून मृत्य येऊ नये, दिवसा किंवा रात्री मृत्य येऊ नये , घरात नाही किंवा बाहेर...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 19 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज काही दिवस शेगांव मध्ये राहिले... परब्रम्ह जिथे आवश्यकता असते तिथे संचार करत असते. कुणीही त्यांना एका ठिकाणी अडकवून ठेवू शकत नाही. वऱ्हाड प्रांतात अडगाव नावाचे गाव आहे तिथे गजानन महाराज जाण्यासाठी निघाले . तो महिना होता वैशाख. वैशाख महिना...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 18 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

लीला क्रमांक १७ मध्ये आपण पहिले कि महाराज पिपंळगावात आले. समाधी अवस्थे मधून महाराज बाहेर यावेत व आपल्याशी बोलावेत यासाठी गावकर्यांनी कसा प्रयत्न केला आणि त्यांच्या श्रद्धेचे फलस्वरूप महाराज समाधी अवस्थेतून बाहेर आले तो दिवस होता सोमवारचा. पुढे दुसऱ्या दिवशी मंगळवारी...

श्री गजानन चरित्र दर्शन 17 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

श्री गजानन महाराज शेगांव मध्ये होते..महाराजांच्या लीला ची प्रचित अनेक भक्तांना येत होती..त्यामुळे दिवसेंदिवस.. भक्तांची गर्दी वाढतच होती..अचानक एक दिवस महाराजांच्या काय मनात आले माहित नाही... महाराज अचानक शेगांव सोडून... शेगांव जवळ असणाऱ्या पिंपळगाव गावात निघून...

श्री गजानन चरित्र दर्शन 16 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

ऐके दिवशी सर्व सेवेकरी मंडळी महाराजांच्या चरणी सेवा रुजू करत होते.. अचानक महाराजांनी सर्वांना बोलवले व म्हणाले... वसंत पंचमी च्या दिवशी घनपाठी ब्राम्हण बोलवा.. मंत्र जागर करूया.. तसेच सर्वांनी एक एक रुपया दक्षिणा देण्यासाठी काढावा... महाराजांची हि वाणी ऐकून सर्व...

श्री गजानन चरित्र दर्शन 15 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

शेगांवच्या दक्षिण दिशेला चिंचोली नावाचे गाव आहे. त्या गावात माधव नावाचे एक ब्राम्हण राहत होते. त्यांचे वय साधारण ६० पेक्षा जास्त होते. त्यांनी आपलें संपूर्ण आयुष्य हे संसार म्हणजे सर्वस्व या साठी खर्ची केले होते. आपल्या भविष्यात काय लिहून ठेवले आहे हे कुणासच माहित...