श्री दासबोध दशक १२ समास १

Jul 9, 2022 | मराठी

Share

श्री दासबोध दशक १२ समास १

दासबोधातील दशक १२ मधील समास १ मध्ये श्री समर्थ रामदास स्वामी विमल लक्षण सांगत आहेत
प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालावी हा उपदेश देत आहेत… प्रपंच करण्यात आळस करू नये.. अनेक लोक म्हणतात प्रपंच आणि परमार्थ एकत्र होऊ शकत नाही… रामदास स्वामी अश्या लोकांसाठी सांगतात कि आधी प्रपंच व्यवस्थित करा आणि मग परमार्थ कडे वळावे इथे आळस करू नये… जर आपण
प्रपंच सोडून परमार्थ कराल तर आपणस कष्ट.. दुःख.. यातना भोगाव्या लागतील म्हणजेच दोन्ही व्यवस्थित होणार नाही… म्हणून समर्थ म्हणतात कि जर आपण प्रपंच आणि परमार्थ याची सांगड घालाल तर आपण विवेकी आहोत… अनेक जण प्रपंच सोडून परमार्थ करतात मंग त्या माणसाला प्रथम अन्न खाण्यास मिळत नाही म्हणजेच अन्न मिळत नाही.. जर आपले पोटच भरले नसेल तर आपले लक्ष प्रपंच आणि परमार्थात कसे लागेल ? यावर खरे आहे कि नाही म्हणून प्रपंच सोडू नये… काही जण म्हणतात आम्ही फक्त प्रपंच करणार.. मग काय होते अनेक अडचणी येतात… मग आपणस काय करावे हेच समजत नाही म्हणजेच अनेक कष्ट यातना होतात .. म्हणजेच प्रपंच आणि परमार्थ याची आपणस सांगड घालायची आहे… एखादा मनुष्य आहे तो जर काम धंदा सोडून घरीच बसला तर त्याचे घर कसे चालेल सांगा त्याचा परिणाम काय होईल घरात आहे नाही ते सर्व संपेल व एक दिवस उपाशी राहण्याची वेळ येईल.. अशीच अवस्था प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड नाही घातली तर होते… थोडक्यात आपणस प्रपंच आणि परमार्थ या दोन्हीची अनुभूती घ्याची आहे… आपण फक्त पारमार्थिक माणसाचं योगी म्हणतो पण रामदास स्वामी खरा योगी जो परमार्थ आणि प्रपंच यांची सांगड घालतो त्यास म्हणतात.. इथे रामदास स्वामी सांगत आहे कि आपणस सांगत आहेत आपणस प्रपंच सावधपणे करायचा आहे जेणेकरून प्रपंच आणि परमार्थ याची सांगड बसेल… रामदास स्वामी म्हणतात कि जो प्रपंच व्यवस्थित करत नाही तो परमार्थ हि खोटेपणाने करतो…प्राणी, पक्षी कीटक सुद्धा विचारपूर्वक जीवन जगतात आपण तर मनुष्य आहोत मग आपण सुद्धा सारासार विचार करून प्रपंच करावा थोडक्यात आपले वागणे विवेक रुपी असावे… आपणात दूरदृष्टी असावी… आपणास सुखी व्हायचे आहे तर आपणस नेहमी सावध असणे आवश्यक आहे… थोडकयात प्रत्येक समस्येत चारही बाजूनी विचार करून आपण निर्णय घेतला तर प्रपंचातील सर्व गोष्टी छानच होतील.. आपण सारासार विचार ना करता निर्णय घेतला व तो निर्णय चुकला कि नंतर रडून काय उपयोग त्यासाठी आधीच आपण शहाणपण शिकावे इतरांकडून हि शिकावे.. तसेच आपले स्वतःचे आत्मपरीक्षण करावे आपल्यात काय अवगुण आहेत याची एक यादी बनवावी आणि एक एक अवगुण काढून टाकावेत जेणेकरून चित्त शुद्धी होईल.. भलेही आपण बाहेरून विचित्र दिसत असू आतून मात्र आपण शुद्ध असणे आवश्यक आहे हीच आध्यात्माची सुरवात आहे.. लोकांच्या अवगुणांकडे दुर्लक्ष करावे मात्र त्यांच्यात कोणते चांगले गुण आहेत ते वेचून घ्यावेत जेणेकरून आपले शरीर मन सत्व गुणांची खाण बनेल … अनेकदा आपण लोकांचे मन दुखावतो हे टाळावे कारण यातून राग द्वेष निर्माण होतो जो आपल्या परमार्थात बाधा निर्माण करतो… थोडकयात प्रपंचात राहून चित्त शुद्ध करून परमार्थ मार्गावर अग्रेसर होण्यास समर्थ आपणस सांगत आहेत.

चला आपण समर्थाना प्रार्थना करूया – हे समर्था आज तू जो दासबोधातून बोध देत आहेस त्यावर काम करण्याची प्रेरणा आम्हाला दे… आज पर्यंत आम्हाला वाटत होते.. प्रपंच सोडूनच परमार्थ होतो पण आजच्या दासबोधातून आम्हाला तू सांगितलंस कि.. जो प्रपंच नीट करतो तोच परमार्थ व्यवस्थित करू शकतो.. आम्हाला आमच्यातील अवगुण दाखव… इतरांमधील फक्त गुणच दिसू दे.. चांगले ते घेण्याची वृत्ती आमच्यात विकसित कर.. आम्हाला शुद्ध कर.. कारण जो पर्यंत आम्ही शुद्ध होत नाही तो पर्यंत आम्ही प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालू शकत नाही… प्रपंच आणि परमार्थाची सांगड घालण्याची प्रेरणा आम्हाला दिल्याबद्दल धन्यवाद.. आमच्यकडून हि प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद !! WWW.CHETNAKESWAR.COM


Share
और पढिये !!

देव फक्त देव्हाऱ्यात नाही, तर आपल्या अंतःकरणात आहे.- देवघर

देव फक्त देव्हाऱ्यात नाही, तर आपल्या अंतःकरणात आहे.देवघर असं बनवा की तिथे बसल्यावर मन प्रसन्न होईल आणि घरात सकारात्मकता निर्माण होईल. देवघर म्हणजे आपल्या घराचं आध्यात्मिक हृदय.कुठे असावं? देव कोणते असावेत? देवघर - आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न देवघर कुठे असावे...

साडेसाती – आत्मशुद्धीचा काळ

साडेसाती म्हणजे शनीचा आपल्यावर कृपेचा काळ — जो आपल्याला थांबवतो, विचार करायला लावतो आणि आत्मशुद्धीची संधी देतो.हा काळ संकटाचा नाही, तर जागृतीचा आहे.शनिदेव शिक्षा देत नाहीत, ते आपले कर्म दाखवतात आणि सुधारण्याची संधी देतात.म्हणून साडेसातीमध्ये घाबरू नका, श्रद्धा ठेवा...

अहंभाव दूर कर – श्री गणेश पुराण कथा ४

श्री वेदव्यासांनी वेदांचे चार विभाग केले. खरंतर आपल्यावर त्यांचे खूप मोठे ऋण आहे...सर्वप्रथम त्यांना वंदन करून या कथेला सुरवात करूया..त्यांनी अनेक ग्रंथांची निर्मिती केली पण कुठेतरी त्यांच्यात अहंभाव निर्माण झाला असावा — हळूहळू त्यांची बुद्धी भ्रमित होऊ लागली,...

कर्माचे फळ भोगावेच लागते…श्री गणेश पुराण कथा ३

राजा सोमकान्त हा सौराष्ट्रातील न्यायी, विद्वान आणि प्रजेवर प्रेम करणारा राजा होता. पण वृद्धापकाळात त्याला कुष्ठरोग झाला. प्रजेची जबाबदारी मुलगा हेमकान्तावर सोपवून तो राणी सुधर्मेसह वनवासाला गेला. तिथे महर्षी भृगुपुत्र च्यवन यांच्या आश्रमात पोहोचला. महर्षींनी सांगितले...

श्री गणेशला पूजेचा प्रथम मान कसा मिळाला गणेश पुराण कथा २

कथा २ – प्रथमपूजेचा मान गणेशांना कसा मिळाला एकदा सर्व देवगणांनी शिवजींना विचारले –“प्रभो! आमच्यापैकी प्रथमपूजेचा अधिकारी कोण?” शिवजी म्हणाले –“जो संपूर्ण विश्वाची परिक्रमा करून सर्वांत आधी येईल, तोच मानकरी.” सर्व देवगण भव्य वाहनांवर बसून निघाले. पण गणेशजींचे वाहन होते...

गणेशजन्म: विघ्नहर्त्याची कथा 1

कथा  १ - गणेशजन्म: विघ्नहर्त्याची कथा ही कथा आहे पवित्र नैमिषारण्यातील. तिथे अनेक ऋषी-मुनी एकत्र येऊन ज्ञानयज्ञ करीत होते. त्या सभेत महान सूतजी विराजमान होते. शौनक ऋषींनी त्यांना वंदन करून विनंती केली — हे सूतजी! आम्हाला असे ज्ञान द्या, जे भक्ती, वैराग्य आणि विवेक...

मन निर्भय कसे बनवावे

स्वामी भक्त हो तारक मंत्रातील दुसरा मंत्र आहे.. निर्भय हो.. पहा तारक मंत्रातील प्रत्येक शब्द आहे आपल्याला निर्भयता हा गुण धारण करण्याचे शिकवतो.. आता आपल्या मनात येते कि आम्ही तर निर्भय आहोत.. आता आपण खरंच निर्भय आहोत का ? हा प्रश्न आपण आपल्याला स्वतः ला विचारायचा...

निःशंक तारक मंत्र काय सांगतो आपणस

स्वामी भक्त हो...आपण तारक मंत्र म्हणतो त्यातील पहिला मंत्र आपणास सांगतो...निःशंक..स्वामी भक्तीत मन कसे झाले पाहिजे निःशंक...म्हणजे मनात शंका नको...पहा..आपले मन शंका निर्माण करतेच...माझे अमूक काम होईल का? नाही होणार...होईल...मन म्हणते होईल...मध्येच म्हणते नाही...

श्री शिवमहापुराण १

श्री शिवमहापुराण १ - आज आपण प्रत्येक जण ऐकतो कि शिव महा पुराण श्रवण केले पाहिजे पण काळा नुसार आपणास ते शक्य होत नाही. पण मग आपण एक छोटासा पर्यन्त करत आहोत.. थोडक्यात कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करूया.. यात सर्व काही येईल असे नाही पण आपली भक्ती नक्कीच वाढेल अशी...