श्री गणेशला पूजेचा प्रथम मान कसा मिळाला गणेश पुराण कथा २

Sep 14, 2025 | मराठी

Share

कथा २ – प्रथमपूजेचा मान गणेशांना कसा मिळाला
एकदा सर्व देवगणांनी शिवजींना विचारले –“प्रभो! आमच्यापैकी प्रथमपूजेचा अधिकारी कोण?”
शिवजी म्हणाले –“जो संपूर्ण विश्वाची परिक्रमा करून सर्वांत आधी येईल, तोच मानकरी.”
सर्व देवगण भव्य वाहनांवर बसून निघाले. पण गणेशजींचे वाहन होते लहान मूषक.गणेशजींनी मनाशी विचार केला –“विश्व म्हणजेच आईवडील. त्यांच्या प्रदक्षिणेनेच संपूर्ण परिक्रमा पूर्ण होते.”आणि त्यांनी आई-पित्याची प्रदक्षिणा केली.बोला गणपती बाप्पा मोरया..!
बोध:वरील कथा ही खरंतर आपल्यासाठी आहे पहा..जसे गणपती बाप्पा चे वाहन मूषक आहे..वाहन छोटे पण महत्त्वाचे आहे..आपल्या जीवनात ही अनेकदा अनेक लहान लहान गोष्टी आपल्याकडे असतात पण आपण आपल्या कडे जे आहे ते न पहाता..म्हणतो माझ्याकडे एवढेच आहे…जसे माझ्या कडे सायकल आहे…गाडी नाही..पण आपण आपण आपल्या कडे जे आहे त्यातून खूप काही करू शकतो..फक्त आपला दृष्टिकोन बदलणे आवश्यक आहे…बाप्पा नी आपल्या आई वडिलांना प्रदक्षिणा घातली…म्हणजेच काय आपले आद्य कर्तव्य या ठिकाणी बाप्पा सांगत आहेत..आधी आपली आई..वडिलांची सेवा करा..तोच धर्म आहे..तोच कल्याणाचा मार्ग आहे…इतरांपेक्षा वेगळा विचार करण्याची क्षमता असेल तरच आपण खऱ्या अर्थाने यशस्वी होऊ शकतो…प्रत्येक निर्णय घेण्यापूर्वी केवळ बाह्य परिस्थितीकडे पाहू नये; योग्य विचार महत्त्वाचा आहे….बोला गणपती बाप्पा मोरया…चला बाप्पा ला प्रार्थना करूया…
प्रार्थना..हे गणपती बाप्पा..तू माता पिता यांना प्रदक्षिणा घालून विश्व प्रदक्षिणा करून आम्हाला आई वडिलांच्या सेवेचे महत्व पटवून दिले आहेस..मात्र आम्ही इतर सर्व करतो…पण आई वडिलांची सेवाच विसरतो… आमच्या वर कृपा कर..आणि आमच्याकडून आई वडिलांची सेवा घडू दे… आमच्या मुळे त्यांच्या डोळ्यात कधी अश्रू येऊ नयेत…आमच्यातील सेवा भाव इतका दृढ कर की..आमची मातृ पितृ सेवा पाहून…इतरांनाही प्रेरणा मिळेल…कोणतेच आई वडील वृद्धाश्रमात नसतील…ही बुद्धी सर्वांना दे..कारण तुझ्या कृपेने हे शक्य आहे…ही प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद..! बोला गणपती बाप्पा मोरया..!
www.chetnakeswar.com


Share
और पढिये !!

वेळ

भगवंताने सर्वांना एक गोष्ट सारखीच दिली आहे ती म्हणजे दिवसाचे २४ तास त्यामुळे आपण असे कधीच म्हणू शकत नाही कि माझ्या कडे वेळ नाही. वॉरन बफे म्हणतात - श्रीमंत लोक वेळेत गुंतवणूक करतात गरीब लोक पैशाची गुंतवणूक करतात मायकल आल्थसूलर - वेळ उडतो आपण त्याचे पायलट आहोत प्रत्येक...

राखी पौर्णिमा

राखी पौणिमा म्हणजे नात्याला घट्ट करण्याचा उत्सव..आपण वयाने मोठे झालो की काही कारणास्तव या नात्यात दुरावा येतो..या मागे कारण असते वडिलोपार्जित संपत्ती..जी खरं तर नात्यात दुरावा निर्माण करते..खरंतर या साठी कष्ट करणारा मरून जातो..आणि मेल्यावर विचार करतो यासाठीच केले होते...

आपण स्व आदर करतो का

आपण स्वतः ला काय समजतो - खरंतर हा प्रश्न आज पर्यंत आपण आपल्या स्वतःला विचारला आहे का ? विचारला असेल तर आपले आपल्या स्वतः बद्दल मत काय आहे? आपण स्वतः स्वतःचा आदर करता का ? याचे उत्तर काहींचे हो असेल काहींचे नाही असे असेल.. खरंतर जो पर्यंत आपण स्वतः आपला आदर करत नाही तो...

श्री दासबोध दशक १२ समास १

श्री दासबोध दशक १२ समास १ दासबोधातील दशक १२ मधील समास १ मध्ये श्री समर्थ रामदास स्वामी विमल लक्षण सांगत आहेत प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालावी हा उपदेश देत आहेत... प्रपंच करण्यात आळस करू नये.. अनेक लोक म्हणतात प्रपंच आणि परमार्थ एकत्र होऊ शकत नाही... रामदास स्वामी...

नृसिंह जयंती – नृसिंह जन्म कथा

आज नृसिंह जयंती निमित्त चला आपण नृसिंह जन्म कथा पाहूया हिरण्यकश्यपू राजा ह्यांनी भगवंताची भक्ती करून त्याला प्रसन्न करून घेतले होते व असा वर मागितला कि मला कोणत्याही माणसाकडून वा प्राण्याकडून मृत्य येऊ नये, दिवसा किंवा रात्री मृत्य येऊ नये , घरात नाही किंवा बाहेर...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 19 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज काही दिवस शेगांव मध्ये राहिले... परब्रम्ह जिथे आवश्यकता असते तिथे संचार करत असते. कुणीही त्यांना एका ठिकाणी अडकवून ठेवू शकत नाही. वऱ्हाड प्रांतात अडगाव नावाचे गाव आहे तिथे गजानन महाराज जाण्यासाठी निघाले . तो महिना होता वैशाख. वैशाख महिना...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 18 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

लीला क्रमांक १७ मध्ये आपण पहिले कि महाराज पिपंळगावात आले. समाधी अवस्थे मधून महाराज बाहेर यावेत व आपल्याशी बोलावेत यासाठी गावकर्यांनी कसा प्रयत्न केला आणि त्यांच्या श्रद्धेचे फलस्वरूप महाराज समाधी अवस्थेतून बाहेर आले तो दिवस होता सोमवारचा. पुढे दुसऱ्या दिवशी मंगळवारी...

श्री गजानन चरित्र दर्शन 17 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

श्री गजानन महाराज शेगांव मध्ये होते..महाराजांच्या लीला ची प्रचित अनेक भक्तांना येत होती..त्यामुळे दिवसेंदिवस.. भक्तांची गर्दी वाढतच होती..अचानक एक दिवस महाराजांच्या काय मनात आले माहित नाही... महाराज अचानक शेगांव सोडून... शेगांव जवळ असणाऱ्या पिंपळगाव गावात निघून...

श्री गजानन चरित्र दर्शन 16 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

ऐके दिवशी सर्व सेवेकरी मंडळी महाराजांच्या चरणी सेवा रुजू करत होते.. अचानक महाराजांनी सर्वांना बोलवले व म्हणाले... वसंत पंचमी च्या दिवशी घनपाठी ब्राम्हण बोलवा.. मंत्र जागर करूया.. तसेच सर्वांनी एक एक रुपया दक्षिणा देण्यासाठी काढावा... महाराजांची हि वाणी ऐकून सर्व...

श्री गजानन चरित्र दर्शन 15 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

शेगांवच्या दक्षिण दिशेला चिंचोली नावाचे गाव आहे. त्या गावात माधव नावाचे एक ब्राम्हण राहत होते. त्यांचे वय साधारण ६० पेक्षा जास्त होते. त्यांनी आपलें संपूर्ण आयुष्य हे संसार म्हणजे सर्वस्व या साठी खर्ची केले होते. आपल्या भविष्यात काय लिहून ठेवले आहे हे कुणासच माहित...