निःशंक तारक मंत्र काय सांगतो आपणस

May 4, 2025 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

स्वामी भक्त हो…आपण तारक मंत्र म्हणतो त्यातील पहिला मंत्र आपणास सांगतो…निःशंक..स्वामी भक्तीत मन कसे झाले पाहिजे निःशंक…म्हणजे मनात शंका नको…पहा..आपले मन शंका निर्माण करतेच…माझे अमूक काम होईल का? नाही होणार…होईल…मन म्हणते होईल…मध्येच म्हणते नाही होणार…मग आता इथे आपल्याला…पहिले काम करावे लागेल ते आपल्या मनावर..मग आता मनावर कार्य कसे करणार…आता या बाबत आपण अनेक उपाय वापरू शकतो…पहा आपल्या घरात भांडी असतात…जी भांडी आपण वापरतो ती रोज आपण धुतो…जी वापरत नाही ती आपण धूत नाही त्या भांड्यावर घाण..धूळ जमा होते…म्हणजेच काय आपणास भांडे जसे स्वच्छ करतो..तसेच आपल्या मनाची स्वच्छता करणे आवश्यक आहे…आता आपल्याला मन स्वच्छ करायचे आहे…याला उपाय आहे स्वामी नाम..रोज स्वामी नाम घ्यावे…आता..मनात येईल की आपण इतक्या काळा पासून स्वामी नाम घेत आहोत…पण मन निःशंक होत नाही…पहा आपणास हे कार्य अखंड चालू ठेवणे आवश्यक आहे…आता स्वामी नाम तर घेतले…दुसरे कार्य आपणास कार्य करायचे आहे…प्रार्थना..स्वामीना प्रार्थना करायची आहे…स्वामी आमचे मन निःशंक करा…हे आम्ही करू शकता नाही. हे आपल्या कृपेनेच शक्य आहे…तिसरे कार्य आपणास करणे आवश्यक आहे…रोज आपणास स्वामी लीला असतील किंवा जे काही सकारात्मक असेल त्याचे वाचन करायचे आहे…आता नुसते वाचन करुन आपणास थांबायचे नाही तर…नेमके आपण आपल्या जीवनात कसे लागू करू शकतो यावर आपणास कार्य करायचे आहे… यावर आपणास स्वतः चिंतन मनन करावे लागेल…हे जेव्हा आपण अखंड करू तेव्हा नक्कीच आपले मन निःशंक होईल आणि स्वामी कृपेने स्वामी चरणी निःशंक होईल…धन्यवाद स्वामी..कोटी कोटी धन्यवाद…!
www.chetnakeswar.com


Share
और पढिये !!

वेळ

भगवंताने सर्वांना एक गोष्ट सारखीच दिली आहे ती म्हणजे दिवसाचे २४ तास त्यामुळे आपण असे कधीच म्हणू शकत नाही कि माझ्या कडे वेळ नाही. वॉरन बफे म्हणतात - श्रीमंत लोक वेळेत गुंतवणूक करतात गरीब लोक पैशाची गुंतवणूक करतात मायकल आल्थसूलर - वेळ उडतो आपण त्याचे पायलट आहोत प्रत्येक...

राखी पौर्णिमा

राखी पौणिमा म्हणजे नात्याला घट्ट करण्याचा उत्सव..आपण वयाने मोठे झालो की काही कारणास्तव या नात्यात दुरावा येतो..या मागे कारण असते वडिलोपार्जित संपत्ती..जी खरं तर नात्यात दुरावा निर्माण करते..खरंतर या साठी कष्ट करणारा मरून जातो..आणि मेल्यावर विचार करतो यासाठीच केले होते...

आपण स्व आदर करतो का

आपण स्वतः ला काय समजतो - खरंतर हा प्रश्न आज पर्यंत आपण आपल्या स्वतःला विचारला आहे का ? विचारला असेल तर आपले आपल्या स्वतः बद्दल मत काय आहे? आपण स्वतः स्वतःचा आदर करता का ? याचे उत्तर काहींचे हो असेल काहींचे नाही असे असेल.. खरंतर जो पर्यंत आपण स्वतः आपला आदर करत नाही तो...

श्री दासबोध दशक १२ समास १

श्री दासबोध दशक १२ समास १ दासबोधातील दशक १२ मधील समास १ मध्ये श्री समर्थ रामदास स्वामी विमल लक्षण सांगत आहेत प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालावी हा उपदेश देत आहेत... प्रपंच करण्यात आळस करू नये.. अनेक लोक म्हणतात प्रपंच आणि परमार्थ एकत्र होऊ शकत नाही... रामदास स्वामी...

नृसिंह जयंती – नृसिंह जन्म कथा

आज नृसिंह जयंती निमित्त चला आपण नृसिंह जन्म कथा पाहूया हिरण्यकश्यपू राजा ह्यांनी भगवंताची भक्ती करून त्याला प्रसन्न करून घेतले होते व असा वर मागितला कि मला कोणत्याही माणसाकडून वा प्राण्याकडून मृत्य येऊ नये, दिवसा किंवा रात्री मृत्य येऊ नये , घरात नाही किंवा बाहेर...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 19 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज काही दिवस शेगांव मध्ये राहिले... परब्रम्ह जिथे आवश्यकता असते तिथे संचार करत असते. कुणीही त्यांना एका ठिकाणी अडकवून ठेवू शकत नाही. वऱ्हाड प्रांतात अडगाव नावाचे गाव आहे तिथे गजानन महाराज जाण्यासाठी निघाले . तो महिना होता वैशाख. वैशाख महिना...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 18 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

लीला क्रमांक १७ मध्ये आपण पहिले कि महाराज पिपंळगावात आले. समाधी अवस्थे मधून महाराज बाहेर यावेत व आपल्याशी बोलावेत यासाठी गावकर्यांनी कसा प्रयत्न केला आणि त्यांच्या श्रद्धेचे फलस्वरूप महाराज समाधी अवस्थेतून बाहेर आले तो दिवस होता सोमवारचा. पुढे दुसऱ्या दिवशी मंगळवारी...

श्री गजानन चरित्र दर्शन 17 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

श्री गजानन महाराज शेगांव मध्ये होते..महाराजांच्या लीला ची प्रचित अनेक भक्तांना येत होती..त्यामुळे दिवसेंदिवस.. भक्तांची गर्दी वाढतच होती..अचानक एक दिवस महाराजांच्या काय मनात आले माहित नाही... महाराज अचानक शेगांव सोडून... शेगांव जवळ असणाऱ्या पिंपळगाव गावात निघून...

श्री गजानन चरित्र दर्शन 16 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

ऐके दिवशी सर्व सेवेकरी मंडळी महाराजांच्या चरणी सेवा रुजू करत होते.. अचानक महाराजांनी सर्वांना बोलवले व म्हणाले... वसंत पंचमी च्या दिवशी घनपाठी ब्राम्हण बोलवा.. मंत्र जागर करूया.. तसेच सर्वांनी एक एक रुपया दक्षिणा देण्यासाठी काढावा... महाराजांची हि वाणी ऐकून सर्व...

श्री गजानन चरित्र दर्शन 15 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

शेगांवच्या दक्षिण दिशेला चिंचोली नावाचे गाव आहे. त्या गावात माधव नावाचे एक ब्राम्हण राहत होते. त्यांचे वय साधारण ६० पेक्षा जास्त होते. त्यांनी आपलें संपूर्ण आयुष्य हे संसार म्हणजे सर्वस्व या साठी खर्ची केले होते. आपल्या भविष्यात काय लिहून ठेवले आहे हे कुणासच माहित...