Share

शिव भक्तहो.. शिव पुराण कथा सांगते.. महादेवाची पूजा श्रवण, कीर्तन आणि मनन याने करावी आता काही जण म्हणतील आम्हाला हे शक्य नाही..तर मग आम्ही काय करावे..श्री शिव पुराण कथा सांगते..लिंग अथवा शिव मूर्तीचे पूजन करावे…आता इथे आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो की शिव लिंग किंवा शिव मूर्ती मध्ये काय फरक…शिव पुराण कथा सांगते…भगवान शिव हे ब्रह्मरूप आहेत..त्यामुळे त्यांना निष्कल म्हणजे निराकार आहेत..म्हणून शिव लिंग हे निराकार स्वरूपाचे प्रतीक आहे..तसेच शिव हे साकार ही आहेत म्हणून आपण मूर्ती पुजा ही करू शकतो…आता आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो की साधारण मूर्ती किंवा पिंड कशी असावी याबाबत..शिव महापुरान कथा सांगते आपल्या आर्थिक पात्रते नुसार आपण ही घ्यावी…आता पुजा कशी करावी..याबाबत ही वर्णन शिव पुराण कथेत येते..त्यात महत्वाचे भक्ती भाव ठेवून पुजन करावें यांचा उल्लेख येतो…बोला श्री उमा महेश्वर भगवान कि जय .. ॐ नमः शिवाय ॐ

बोध – खरंतर शिव पुराण आपणस शिव भक्ती कशी करावी याचे मार्गदर्शन करते.. पहा अनेकदा आपल्या मनात आज पर्यंत प्रश्न निर्माण झाला असेल कि शिव पिंड किंवा मूर्ती यात फरक काय याचे उत्तर आपणास आजची शिव पुराण कथा देत आहे.. महादेव कसे आहेत.. निर्गुण निराकार आहेत.. म्हणून पिंडीची पूजा केली जाते.. आपण कुठेही असाल तरी सहज मातीची पिंड तयार करू शकता.. म्हणजेच सेवा करताना अडचण नसते फक्त आपली तयारी असावी.. आता आपल्या मनात देवा विषयी एक चित्र तयार असते.. आणि आपले मन देवाचे हि चित्र निर्माण करते.. महादेव म्हणजे असे दिसतात.. मग त्या साठी आपण मूर्ती पूजा करू शकतो असे शिव महा पुराण सांगते.. थोडक्यात सेवेचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत.. फक्त आपली सेवा करण्याची तयारी हवी बोला श्री उमा महेश्वर भगवान कि जय .. ॐ नमः शिवाय ॐ

चला आपण महादेवाला प्रार्थना करूया.. हे महादेवा आजच्या लीलेस निमित्त करून तू आम्हाला तुझ्या साकार आणि निराकार रूपा बद्दल समज दिलीस त्याबद्दल धन्यवाद.. आमच्या तुझ्या निराकार स्वरूपाची सेवा करून घे.. आमच्या मनातील सर्व किंतु परंतु दूर कर.. धन्यवाद समर्था… हि प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद बोला श्री उमा महेश्वर भगवान कि जय .. ॐ नमः शिवाय ॐ

 

 


Share
और पढिये !!

वेळ

भगवंताने सर्वांना एक गोष्ट सारखीच दिली आहे ती म्हणजे दिवसाचे २४ तास त्यामुळे आपण असे कधीच म्हणू शकत नाही कि माझ्या कडे वेळ नाही. वॉरन बफे म्हणतात - श्रीमंत लोक वेळेत गुंतवणूक करतात गरीब लोक पैशाची गुंतवणूक करतात मायकल आल्थसूलर - वेळ उडतो आपण त्याचे पायलट आहोत प्रत्येक...

राखी पौर्णिमा

राखी पौणिमा म्हणजे नात्याला घट्ट करण्याचा उत्सव..आपण वयाने मोठे झालो की काही कारणास्तव या नात्यात दुरावा येतो..या मागे कारण असते वडिलोपार्जित संपत्ती..जी खरं तर नात्यात दुरावा निर्माण करते..खरंतर या साठी कष्ट करणारा मरून जातो..आणि मेल्यावर विचार करतो यासाठीच केले होते...

आपण स्व आदर करतो का

आपण स्वतः ला काय समजतो - खरंतर हा प्रश्न आज पर्यंत आपण आपल्या स्वतःला विचारला आहे का ? विचारला असेल तर आपले आपल्या स्वतः बद्दल मत काय आहे? आपण स्वतः स्वतःचा आदर करता का ? याचे उत्तर काहींचे हो असेल काहींचे नाही असे असेल.. खरंतर जो पर्यंत आपण स्वतः आपला आदर करत नाही तो...

श्री दासबोध दशक १२ समास १

श्री दासबोध दशक १२ समास १ दासबोधातील दशक १२ मधील समास १ मध्ये श्री समर्थ रामदास स्वामी विमल लक्षण सांगत आहेत प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालावी हा उपदेश देत आहेत... प्रपंच करण्यात आळस करू नये.. अनेक लोक म्हणतात प्रपंच आणि परमार्थ एकत्र होऊ शकत नाही... रामदास स्वामी...

नृसिंह जयंती – नृसिंह जन्म कथा

आज नृसिंह जयंती निमित्त चला आपण नृसिंह जन्म कथा पाहूया हिरण्यकश्यपू राजा ह्यांनी भगवंताची भक्ती करून त्याला प्रसन्न करून घेतले होते व असा वर मागितला कि मला कोणत्याही माणसाकडून वा प्राण्याकडून मृत्य येऊ नये, दिवसा किंवा रात्री मृत्य येऊ नये , घरात नाही किंवा बाहेर...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 19 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज काही दिवस शेगांव मध्ये राहिले... परब्रम्ह जिथे आवश्यकता असते तिथे संचार करत असते. कुणीही त्यांना एका ठिकाणी अडकवून ठेवू शकत नाही. वऱ्हाड प्रांतात अडगाव नावाचे गाव आहे तिथे गजानन महाराज जाण्यासाठी निघाले . तो महिना होता वैशाख. वैशाख महिना...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 18 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

लीला क्रमांक १७ मध्ये आपण पहिले कि महाराज पिपंळगावात आले. समाधी अवस्थे मधून महाराज बाहेर यावेत व आपल्याशी बोलावेत यासाठी गावकर्यांनी कसा प्रयत्न केला आणि त्यांच्या श्रद्धेचे फलस्वरूप महाराज समाधी अवस्थेतून बाहेर आले तो दिवस होता सोमवारचा. पुढे दुसऱ्या दिवशी मंगळवारी...

श्री गजानन चरित्र दर्शन 17 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

श्री गजानन महाराज शेगांव मध्ये होते..महाराजांच्या लीला ची प्रचित अनेक भक्तांना येत होती..त्यामुळे दिवसेंदिवस.. भक्तांची गर्दी वाढतच होती..अचानक एक दिवस महाराजांच्या काय मनात आले माहित नाही... महाराज अचानक शेगांव सोडून... शेगांव जवळ असणाऱ्या पिंपळगाव गावात निघून...

श्री गजानन चरित्र दर्शन 16 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

ऐके दिवशी सर्व सेवेकरी मंडळी महाराजांच्या चरणी सेवा रुजू करत होते.. अचानक महाराजांनी सर्वांना बोलवले व म्हणाले... वसंत पंचमी च्या दिवशी घनपाठी ब्राम्हण बोलवा.. मंत्र जागर करूया.. तसेच सर्वांनी एक एक रुपया दक्षिणा देण्यासाठी काढावा... महाराजांची हि वाणी ऐकून सर्व...

श्री गजानन चरित्र दर्शन 15 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

शेगांवच्या दक्षिण दिशेला चिंचोली नावाचे गाव आहे. त्या गावात माधव नावाचे एक ब्राम्हण राहत होते. त्यांचे वय साधारण ६० पेक्षा जास्त होते. त्यांनी आपलें संपूर्ण आयुष्य हे संसार म्हणजे सर्वस्व या साठी खर्ची केले होते. आपल्या भविष्यात काय लिहून ठेवले आहे हे कुणासच माहित...