Share

विधवेश्वर संहिता १०.हजार श्लोक, रुद्र संहिता ,विनायक संहिता,उमासंहिता,मातृसंहिता यात प्रत्येकी 8 .हजार श्लोक एकादशरुद्रसंहिता 13 .हजार श्लोक ,कैलाससंहिता 6 हजार श्लोक,कोटी रुद्र संहिता 9.हजार श्लोक, सहस्त्र-कोटी रुद्र संहिता ११ हजार श्लोक,वायवीयसंहिता 4 .हजार श्लोक, तसेच धर्म संहिता 12 हजार श्लोक अश्या प्रकारे शिव महा पुराण कथा १ लाख श्लोकांची आहे…व्यासांनी आपल्या साठी २४ हजार श्लोकांची संक्षिप्त महा पुराण कथा लिहिली…शिव पुरणाचे स्थान ४ क्रमांकावर येते…यात सात संहिता आहेत..यातील पहिला संहिता विधवेश्वर संहिता आहे…दुसरी रुद्र संहिता, तिसरी शत रुद्र संहिता,चौथी कोटी रुद्र संहिता, पाचवी उमा संहिता,सहावी कैलास संहिता, सातवी वायवीय संहिता.. याला शैव शिरोमणी भगवान व्यास यांनी संक्षिप्त शिव पुराण निर्माण केले..याचे सर्वांनी श्रवण पठण करावे.. शिव पुराणात काय आहे…भक्ती , घ्यान आणि वैराग्य यांचा उल्लेख शिव पुराणात येतो…जेव्हा सृष्टी ची उत्पत्ती सुरू होती..जे सहा महर्षी होते त्यांच्यात वाद निर्माण झाला।की अमुक एक।गोष्ट श्रेष्ठ…त्यांच्यातील।हा वाद इतका विकोपाला।गेला की ते सर्व ब्रम्हाजी यांच्याकडे गेले…आणि त्याना विचारले की सम्पूर्ण तत्व पेक्षा वेगळा पुराण पुरुष कोण आहे??तेव्हा ते म्हणतात देवाधिदेव महादेव..यांना प्राप्त करायचे असेल तर भक्ती करावी..सर्व देव यांचीच पूजा करतात…भव सागर पार करण्याची शक्ती शिव उपासनेत आहे..शिव भक्ती कशी करावी..कानाने श्रवण..मनाने मनन.. आणि मुखाने कीर्तन हे श्रुतीचे वाक्य आपणस प्रमाण भूत आहे..पराशर मुनी यांचे पुत्र..व्यास देवजी सरस्वती..नदी काठी साधना करत होते..एके दिवशी तिथे सनतकुमार येतात..त्यावेळेस व्यास देवजी ध्यानस्थ होते..काही वेळाने ध्यानातून बाहेर आल्यावर त्यांनी..सनतकुमार यांना पाहिले…ते तात्काळ उठले.. त्यांचे आदर पूर्वक पुजन केले…आता व्यासजी.. सनतकुमार यांना सांगतात..तुम्ही शिव भक्ती करा..यात श्रवण मनन आणि कीर्तन करा..पूर्वी मी अनेक साधनांचा अवलंब केला आणि त्यात अडकलो..हाती मात्र काहीच आले नाही..पण जेव्हा मी भटकलो आणि मंदराचल पर्वतावर गेलो..तिथे मला शिव कृपेने..भगवान नंदिकेश्वर भेटले आणि त्यानी मार्गदर्शन केले..त्यांनीच मला मुक्ती चे साधन सांगितले…आपण ही सर्वांनी या तिन्ही साधनांचा अवलंब करा बोला उमा महेश्वर भगवान कि जय.. ॐ नमः शिवाय ॐ

बोध – शिव भक्तहो पहा श्री शिव महा पुराण हा ग्रंथ किती मोठा आहे.. व्यासांना त्याच वेळेस जाणवले असेल कि कल युगात लोकांना सोपे असे साधन निर्माण व्हावे त्यांना शिव तत्त्व काय आहे हे समजावे या साठी त्यांनी श्री शिव महा पुराण संक्षिप्त श्लोकात निर्माण केले.. तत्यांच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही.. या लीलेस निमित्त करून आपण त्यांना धन्यवाद देऊयात आणि त्यांना प्रार्थना करूया कि आमच्या कडून शिव महा पुराण कथा श्रवण मनन करून घ्या… पहा वरील लीलेत येते कि सृष्टी ची निर्मिती झाली तेव्हा महर्षी मध्ये वाद निर्माण झाला कि श्रेष्ठ कोण.. खरंतर हा वाद तर आपल्या दैनंदिन जीवनात रोज घालत असतो.. जसे मी जे म्हणतो किंवा करतो ते किती श्रेष्ठ आहे खरंतर अनेकदा हा आपले खूप मोठे नुकसान करत असतो कारण आपण करतो तेव्हा आपणस प्रेरणा देणारी कोणती तरी एक शक्ती असते पण आपण मात्र ते विसरून जातो आणि खोटा अहंकार बाळगतो.. थोडक्यात आपणास आपल्यातील खोटा अहंकार दूर करायचा आहे.. श्री शिव महा पुराण कथा आपणस श्रवण, पठण आणि कीर्तन हि सेवा करण्याची प्रेरणा देत आहे.. व्यास देव स्वतः सांगतात कि ते आधी अनेक सेवा करत होते पण त्यांना मुक्तीची मार्ग म्हणा किंवा सत्य मार्ग मिळत नव्हता पण जेव्हा शिव भक्ती करू लागले तेव्हा त्यांना समजले कि श्रवण मनन आणि कीर्तन हाच मुक्तीचा मार्ग आहे.. आपणस हि मार्गाचा अवलंब करायचा आहे.. पहा रोज थोडा बदल आपले आयुष्य बदलून टाकेल.. तरी सर्वानी या वर कार्य करावे हि विनंती… बोला उमा महेश्वर भगवान कि जय.. ॐ नमः शिवाय ॐ

चला आपण सर्व मिळून महादेवांना प्रार्थना करूया.. हे महादेवा तुझी भक्ती कशी करावी हे आम्ही जाणत नाही.. त्या मुळे नको त्या अनेक मार्गात आम्ही अडकतो.. आजच्या लीलेत सांगितल्या प्रमाणे आमच्या कडून श्रवण,, मनन आणि कीर्तन सेवा करून घे हीच प्रार्थना.. हि प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद बोला उमा महेश्वर भगवान कि जय.. ॐ नमः शिवाय ॐ


Share
और पढिये !!

श्री गजानन चरित्र दर्शन 14 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

उन्हाळ्याचे दिवस होते... श्री गजानन महाराज अनेक भक्त मंडळी सोबत बसले होते...त्या भक्त मंडळी मध्ये श्री चंदूमुकीम नावाचा एक भक्त होता... तो भक्ती भावाने सेवा रुजू करत होता... आंब्याचे दिवस होते... त्यामुळे महाराजांसाठी श्री चंदूमुकीम आंबे आणले होते... महाराजांनी एक दोन...

श्री गजानन चरित्र दर्शन 13 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

आपण श्री गजानन चरित्र दर्शन १२ मध्ये पहिले कि श्री महाराजांनी वीणा अग्नी चिलीम प्रज्वलित केली.... खरंतर चिलीम पेटवण्यासाठी श्री जानकी राम यांच्या कडे मुले अग्नी आणण्यासाठी गेली होती... परंतु श्री जानकी राम यांनी अग्नी तर दिला नाहीच... पण उलट श्री महाराजां बद्दल...

श्री गजानन महाराज दर्शन लीला 6 – मराठी

खूप सारे लोक श्री गोविंद बुवांचे किर्तन ऐकण्यासाठी आले होते त्यामध्ये श्री गजानन महाराज पण कडू लिंबाच्या निंबाच्या झाडा जवळ बसून किर्तन ऐकत होते श्री गोविंद बुवांनी किर्तनासाठी श्री  भागवतातील एकादश स्कंध मधील हंस गीता याचा श्लोक किर्तन सेवेसाठी घेतला होता... बुवांनी...

यत्न शिकवण – श्री समर्थ रामदास स्वामी – श्री दासबोध दशक १२ समास ९

यत्न शिकवण - श्री समर्थ रामदास स्वामी - श्री दासबोध दशक १२ समास ९ प्रत्येक संतांनी कर्माला महत्व दिले... असा कोणतेही संत नाहीत कि त्यांनी कर्म सोडून...दे रे हरी पलंगावरी... असे कोणत्याच संतांनी सांगितले नाही... कारण प्रत्येक संत हे कर्म प्रधानच होते... कर्म न करणारे...

श्री गजानन चरित्र दर्शन 12 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

श्री गजानन महाराज बंकटलाल यांच्या घरी राहत होते.. एकेदिवशी एक प्रकार घडला तो दिवस होता... वैशाख शुद्ध तृतीयेचा दिवस होता... म्हणजेच अक्षय तृतीया चा दिवस होता... म्हणजेच या दिवशी आपण पितृ पूजन करतो तो दिवस... साडेतीन मुहूर्ता पैकी एक मुहूर्त..त्या दिवशी श्री...

मी डॉक्टर सिंधुताई सपकाळ बोलतेय – एक प्रेरणा

बाळांनो... मी डॉक्टर सिंधुताई सपकाळ बोलतेय... हो तुमची माई बोलतेय... बेटा दचकू नकोस...मी तर अनंतात विलीन झाले... हि बातमी जेव्हा सोशल मीडिया मार्फत तुझ्या पर्यंत पोहोचली तेव्हा... सोशल मीडिया द्वारे तू जी श्रद्धांजली... भावांजली वाहिलीस त्या बद्दल खूप खूप धन्यवाद......

जसे कर्म तसे फळ आज नाही तर उद्या नक्की मिळतेच- श्री गजानन चरित्र दर्शन 11 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ३

जसे कर्म तसे फळ आज नाही तर उद्या नक्की मिळतेच श्री विठोबा घाटोळ यांना पूर्व पुण्याई ने श्री गजानन महाराजांच्या सेवेची संधी त्यांना मिळाली होती पण म्हणतात ना पुण्य करण्यासाठी पुण्य गाठी असावे लागते... श्री विठोबा घाटोळ यांना श्री महाराजांच्या सेवेची खूप छान अशी संधी...

श्री गजानन चरित्र दर्शन 10 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ३

https://youtu.be/56bS3EN9F-w   श्री गजानन चरित्र दर्शन 10 - संदर्भ - श्री गजानन विजय अध्याय ३ भक्ती रुपी चरणतीर्थचा महिमा श्री जानराव देशमुख हे शेगांव मध्ये राहत होते...ते शेगाव मध्ये प्रसिद्ध व्यक्ती होते... घरात संपत्तीची काहीच कमतरता नव्हती..अचानकपणे त्यांची...

नामस्मरण भक्ति – नवविधा भक्ति – श्री समर्थ रामदास स्वामी

नवविधा भक्ती चा तिसरा प्रकार नामस्मरण भक्ति या भक्ती विषयी श्रीमत दासबोध ग्रंथात सांगतात ” स्मरण देवाचे करावें | अखंड नाम जपत जावें | नामस्मरणें पावावें | समाधान | नित्य नेम प्रातः काळी | माध्यानकाळी सायंकाळी | नामस्मरण सर्वकाळी करत जावें | नामस्मरण भक्ति हि खूपच...

पादसेवन भक्ती -नवविधा भक्ति श्री समर्थ रामदास स्वामी

पादसेवन भक्ती - श्री समर्थ रामदास स्वामी या भक्ती बाबत सांगतात कि - पादसेवन ते जाणावे । कायावाचा मनोभावे । सद्गुरूंचे पाय सेवावे । सद्गती कारणे । सेवावें सद्गुरुचरण । या नाव पादसेवन । श्री समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोध ग्रंथात याचे यतार्थ वर्णन केले आहे -...