शिव पुराण कथा ३

Oct 5, 2023 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

शिव पुराण कथा 3

आपण शिव पुराण च्या दुसऱ्या कथेत पाहिले की चंचुला हिला।शिव लोक प्राप्ती झाली..म्हणजेच ती मुक्त झाली..मुक्त झाल्यानंतर सुद्धा तिची शिव भक्ती सुरूच होती..ती शिव पार्वती यांच्या समोर विनम्र भावनेने उभी राहिली..तिच्या डोळ्यात आनंद अश्रू येत होते…पार्वती माता ने तर तिला आपल्या सखी चे स्थान दिले…एके दिवशी ती पार्वती माते जवळ जाते आणि विनम्र भावनेने प्रार्थना करू लागली..तिच्या प्रार्थनेतील भाव इतका खोल होता की पार्वती माता..तिला म्हणाल्या की अग सखे तुला काय हवे आहे..जे हवे ते माग… तेव्हा ती म्हणाली की माझी तर मुक्ती झाली पण माझे पती कुठे आहेत..त्यांच्या कडून अनेक चुका झाल्या आहेत…तेव्हा पार्वती माता सांगतात..तुझा पती..विंध्य पर्वतावर..पिशाच्च योनीत दुःख भोगत आहे…चंचुला हिला फार वाईट वाटले आणि तिने आपल्या पतीच्या उद्धार होण्यासाठी काय मार्ग आहे तो सांगण्याची विनंती केली…पार्वती माता सांगतात की जर त्याने शिव पुराण कथा श्रवण केली तर तो मुक्त होईल..चंचुला विचारते हे कसे शक्य आहे…हे तर आपणच करू शकता..तेव्हा पार्वती माता..शिव कीर्ती गाणारे जे गंधर्वराज तुंबूर होते त्यांना बोलावले…व सांगितले की तुम्ही या चंचुला बरोबर…विंध्य पर्वतावर जा…आणि तिथे एक पिशाच्च आहे त्याला प्रयत्न पूर्वक  शिव पुराण ची कथा ऐकवा…जेणेकरून त्याचे ह्रदय शुद्ध होईल…आणि तो पिशाच्च योनीतुन मुक्त होईल…गंधर्व तुंबूर पार्वती मातेची आज्ञा घेऊन..चंचुला बरोबर विंध्य पर्वतावर जातात..तिथे त्या पिशाच्च दिसतो.. त्याच्या समोर शिव पुराण कथा सुरू करतात…शिव कथा ऐकून त्याचे चित्त शुद्ध झाले आणि तो पिशाच्च योनीतुन मुक्त झाला..दोघे पती पत्नी शिव भक्तीत तल्लीन झाले. बोला श्री उमा महेश्वर देवता कि जय..’ॐ नमः शिवाय’ !

बोध – पहा उपरोक्त लीलेत माता पार्वती यांनी चंचुला यांना सखी चे स्थान दिले.. पहा आपले आणि ईश्वराचे नाते हि मित्रत्वाचे झाले पाहिजे.. पहा त्यासाठी आपल्याला आपल्यातील दोष दूर करणे आवश्यक आहे.. पहा चंचुला हिने काय फक्त श्री शिव महा पुराण कथा श्रवण केली का ? नाही तिने आपल्यात जे काही दोष आहेत ते आधी घालवले त्यावर कार्य केले.. आपणास हि तसेच करायचे आहे.. आपले दोष आपल्याला दिसत नाही ते दिसले पाहिजे.. जेणेकरून आपण ईश्वराच्या जवळ जाऊ आणि आपले आणि त्याचे नाते  मित्रत्वाचे होईल.. आता प्रत्येक मनुष्य हा कुटुंब वत्सल असतो.. ज्या प्रमाणे चंचुला हिने आपल्या पतीचा उद्धार व्हावा या साठी प्रयत्न केले.. इथे आपणस आपल्या कुटूंबासाठी करायचे आहेत.. आता ते कसे पहा सर्वप्रथम आपल्या स्वतःवर कार्य करा आता आपली अडचण काय मी जसे वागतो तसे घरच्यांनी वागावे.. पण हे शक्य नसते कारण आपणच तसे करत नाही..मग याला उपाय काय तर आपण घरात सकारात्मक वातावरण तयार करा.. कोणतीही गोष्ट असो.. ती सकारात्मक पणे हाताळा    पहा नक्कीच आपल्या घरच्यांवर हि त्याचा परिणाम झाल्या शिवाय राहणार नाही.. कारण शिव महा पुराण कथा असो वा कोणताही ग्रंथ हा आपल्या व्यक्तिमत्व विकासाचे साधन आहे.. पण आपण त्यावर कार्य करत नाही.. बोला श्री उमा महेश्वर देवता कि जय..’ॐ नमः शिवाय’ !

चला आपण सर्व श्री महादेवाला प्रार्थना करूया.. हे महादेवा ज्या प्रमाणे श्री पार्वती माता यांनी  चंचुला हिला सखी चे स्थान दिले.. त्याच प्रमाणे आम्हाला त्या पात्रतेचे बनव.. आम्हाला आमच्या स्वतःवर कार्य करण्याची प्रेरणा दे.. परिस्थिती कोणतीही असुदे आमच्या कडून सकारात्मक प्रतिसाद येऊ दे.. धन्यवाद महादेवा.. हि प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद बोला श्री उमा महेश्वर देवता कि जय..’ॐ नमः शिवाय’ !


Share
और पढिये !!

श्री गजानन चरित्र दर्शन 14 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

उन्हाळ्याचे दिवस होते... श्री गजानन महाराज अनेक भक्त मंडळी सोबत बसले होते...त्या भक्त मंडळी मध्ये श्री चंदूमुकीम नावाचा एक भक्त होता... तो भक्ती भावाने सेवा रुजू करत होता... आंब्याचे दिवस होते... त्यामुळे महाराजांसाठी श्री चंदूमुकीम आंबे आणले होते... महाराजांनी एक दोन...

श्री गजानन चरित्र दर्शन 13 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

आपण श्री गजानन चरित्र दर्शन १२ मध्ये पहिले कि श्री महाराजांनी वीणा अग्नी चिलीम प्रज्वलित केली.... खरंतर चिलीम पेटवण्यासाठी श्री जानकी राम यांच्या कडे मुले अग्नी आणण्यासाठी गेली होती... परंतु श्री जानकी राम यांनी अग्नी तर दिला नाहीच... पण उलट श्री महाराजां बद्दल...

श्री गजानन महाराज दर्शन लीला 6 – मराठी

खूप सारे लोक श्री गोविंद बुवांचे किर्तन ऐकण्यासाठी आले होते त्यामध्ये श्री गजानन महाराज पण कडू लिंबाच्या निंबाच्या झाडा जवळ बसून किर्तन ऐकत होते श्री गोविंद बुवांनी किर्तनासाठी श्री  भागवतातील एकादश स्कंध मधील हंस गीता याचा श्लोक किर्तन सेवेसाठी घेतला होता... बुवांनी...

यत्न शिकवण – श्री समर्थ रामदास स्वामी – श्री दासबोध दशक १२ समास ९

यत्न शिकवण - श्री समर्थ रामदास स्वामी - श्री दासबोध दशक १२ समास ९ प्रत्येक संतांनी कर्माला महत्व दिले... असा कोणतेही संत नाहीत कि त्यांनी कर्म सोडून...दे रे हरी पलंगावरी... असे कोणत्याच संतांनी सांगितले नाही... कारण प्रत्येक संत हे कर्म प्रधानच होते... कर्म न करणारे...

श्री गजानन चरित्र दर्शन 12 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

श्री गजानन महाराज बंकटलाल यांच्या घरी राहत होते.. एकेदिवशी एक प्रकार घडला तो दिवस होता... वैशाख शुद्ध तृतीयेचा दिवस होता... म्हणजेच अक्षय तृतीया चा दिवस होता... म्हणजेच या दिवशी आपण पितृ पूजन करतो तो दिवस... साडेतीन मुहूर्ता पैकी एक मुहूर्त..त्या दिवशी श्री...

मी डॉक्टर सिंधुताई सपकाळ बोलतेय – एक प्रेरणा

बाळांनो... मी डॉक्टर सिंधुताई सपकाळ बोलतेय... हो तुमची माई बोलतेय... बेटा दचकू नकोस...मी तर अनंतात विलीन झाले... हि बातमी जेव्हा सोशल मीडिया मार्फत तुझ्या पर्यंत पोहोचली तेव्हा... सोशल मीडिया द्वारे तू जी श्रद्धांजली... भावांजली वाहिलीस त्या बद्दल खूप खूप धन्यवाद......

जसे कर्म तसे फळ आज नाही तर उद्या नक्की मिळतेच- श्री गजानन चरित्र दर्शन 11 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ३

जसे कर्म तसे फळ आज नाही तर उद्या नक्की मिळतेच श्री विठोबा घाटोळ यांना पूर्व पुण्याई ने श्री गजानन महाराजांच्या सेवेची संधी त्यांना मिळाली होती पण म्हणतात ना पुण्य करण्यासाठी पुण्य गाठी असावे लागते... श्री विठोबा घाटोळ यांना श्री महाराजांच्या सेवेची खूप छान अशी संधी...

श्री गजानन चरित्र दर्शन 10 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ३

https://youtu.be/56bS3EN9F-w   श्री गजानन चरित्र दर्शन 10 - संदर्भ - श्री गजानन विजय अध्याय ३ भक्ती रुपी चरणतीर्थचा महिमा श्री जानराव देशमुख हे शेगांव मध्ये राहत होते...ते शेगाव मध्ये प्रसिद्ध व्यक्ती होते... घरात संपत्तीची काहीच कमतरता नव्हती..अचानकपणे त्यांची...

नामस्मरण भक्ति – नवविधा भक्ति – श्री समर्थ रामदास स्वामी

नवविधा भक्ती चा तिसरा प्रकार नामस्मरण भक्ति या भक्ती विषयी श्रीमत दासबोध ग्रंथात सांगतात ” स्मरण देवाचे करावें | अखंड नाम जपत जावें | नामस्मरणें पावावें | समाधान | नित्य नेम प्रातः काळी | माध्यानकाळी सायंकाळी | नामस्मरण सर्वकाळी करत जावें | नामस्मरण भक्ति हि खूपच...

पादसेवन भक्ती -नवविधा भक्ति श्री समर्थ रामदास स्वामी

पादसेवन भक्ती - श्री समर्थ रामदास स्वामी या भक्ती बाबत सांगतात कि - पादसेवन ते जाणावे । कायावाचा मनोभावे । सद्गुरूंचे पाय सेवावे । सद्गती कारणे । सेवावें सद्गुरुचरण । या नाव पादसेवन । श्री समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोध ग्रंथात याचे यतार्थ वर्णन केले आहे -...