शिव पुराण कथा २

Oct 1, 2023 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

 

समुद्राच्या जवळ एक बाष्कळ नावाचे गाव होते…तिथे धर्माचे आचरण सोडून वागणारे दोघेजण राहत होते….ते खूपच वाईट होते…त्यांचे मन दूषित होते…कायम विषयासक्त होते..ईश्वरावर त्यांचा विश्वास नव्हता..तिथे राहणारे लोक सुद्धा तसेच होते…त्या गावात एक बिंदुग नावाचा व्यक्ती राहत होता…तो फारच कुमार्गी होता…त्याची पत्नीचे नाव चंचुला होते…ती धार्मिक वृत्ती ची होती…पण पती मात्र दुराचारी होता..तरीही तीने तो त्रास सहन केला..त्यामुळे तिला अनेक यातना सहन कराव्या लागल्या..इतका की ती आपल्या पतीसोबत ती सुद्धा अधार्मिक बनली…अशीच अनेक वर्ष झाले..काही काळा नंतर बिंदुग मरण पावला…अनेक यातना झाल्या..त्याला पिशाच्च योनी मिळाली…पती च्या मृत्यू नंतर त्याची पत्नी आपल्या मुलांच्या सोबत रहात होती…एक दिवस काही कारणास्तव गोकर्ण इथे गेली…फिरता फिरता ती एका शिव मंदिरात गेली…तिथे..शिव कथा सुरू होती…ती कथा ऐकत असताना त्यात आपल्या कर्माचे फळ कसे मिळते याची समज तिला मिळाली… हे सर्व ऐकून तिच्या मनात भीती निर्माण झाली…कथा पूर्ण झाल्यानंतर ती जे कथाकार होते त्यांच्या कडे जाते…आणि आज पर्यंत ज्या काही चुका झाल्या त्या कथाकार आहेत त्यांना सांगते..तिचा तो भाव पाहून तिला समजावून सांगतात की  शिव कथा श्रवण करून तुला तुझी चूक लक्षात आली ही खूप मोठी  शिव कृपा आहे…हा निर्भय पण आहे..कारण सत्य स्वीकारणे खूप मोठी गोष्ट आहे…कारण चित्त शुद्ध असल्या शिवाय शिव पार्वती यांचा वास आपल्या ह्रदयात होऊ शकत नाही…कारण चित्त शुद्धी झाली की आपल्या ह्रदयात भगवान शिव जी यांच्या भक्ति चे दोन पुत्र म्हणजे.. ज्ञान आणि वैराग्य प्रगट होते…यात काही संशय नाही..यासाठी तू शिव भक्ती कर..शिव चरित्र वाच.. त्यावर चिंतन मनन कर नक्कीच..तुझी चित्त शुद्ध होईल आणि शिव कृपेस पात्र होशील…हे सर्व ऐकून चंचुला तिथेच राहते..शिव कथा श्रवण करते…तिला स्वानुभव प्राप्त झाला आणि ती विनाकष्ट शिवलोक प्राप्त झाले  .. बोला उमा महेश्वर देवता कि जय

बोध – शिव पुराण ची हि कथा आपणस मनावर कार्य करण्याची प्रेरणा देत आहे.. बिंदुग बरोबर राहून त्याची धार्मिक पत्नी चंचूला सुद्धा अधार्मिक झाली म्हणजेच या ठिकाणी आपणस बोध होतो कि.. आपली संगत कशी असावी.. कारण आपण ज्या संगतीत राहतो त्या नुसार आपले आचार विचार आणि विहार होतो.. त्या मुले आपणस सत्संगाची कास धरायची आहे.. इथे जी चंचुला ती आपल्या सर्वांमध्ये आहे.. पहा आपले मन कायम चंचल असते.. आता  इथे तर थोड्या वेळात दुसरी कडे जाते अश्या चंचल मनावर आपणस कार्य करायचे आहे.. म्हणजे चंचल मन अचल करायचे आहे..शिव पुराण कथा श्रवण केल्या नंतर चंचुला हिला आपल्या सर्व चुका लक्षात आल्या.. पहा अनेकदा असेच ईश्वर आपणस आपल्या चुका दाखवत असतो पण आपले चंचल मन त्या चुका दुर्लक्षित करतो आणि आहे ते चुकीचे वर्तन सुरु ठेवतो.. जो पर्यंत आपणस आपल्या चुका दिसत नाहीत आणि चुकीच्या वर्तनाच्या परिणामांची जाणीव आपणस होत नाही तो पर्यंत.. आपली चित्त शुद्धी होऊ शकत नाही.. पहा चंचुला हिला आपल्या चुका लक्षात आल्या.. मग तिने फक्त शिव पुराण ऐकले का ? नाही तिने शिव पुराणात सांगितल्या प्रमाणे आपल्या चित्तातील चुकीचे आचार विचार दूर केले.. हे करणे इतके सोपे नाही त्यासाठी आपल्यात निर्भयता हा गुण विकसित झाला पाहिजे तरच हे शक्य आहे.. आपणस शिव कृपेचा अनुभव हा तेव्हाच येईल जेव्हा आपले चित्त शुद्ध होईल.. यासाठी आपणस आजची लीला आपले चित्त शुद्ध करण्याची प्रेरणा देत आहे.. धन्यवाद समर्था.. बोला श्री उमा महेश्वर देवता कि जय..!

प्रार्थना – हे महादेवा – ज्या प्रमाणे चंचूला हिला शिव पुराण कथेस  निमित्त करून तिचे चित्त शुद्ध केलेस तसेच आमचे चित्त सुद्धा शुद्ध कर.. आमच्या ह्रदयात ज्ञान आणि वैराग्य प्रगट कर.. तुझ्या कृपेशिवाय हे शकय नाही.. धन्यवाद उमा महेश्वर देवता कि जय..

www.chetanakeswar.com

 


Share
और पढिये !!

श्री गजानन चरित्र दर्शन 14 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

उन्हाळ्याचे दिवस होते... श्री गजानन महाराज अनेक भक्त मंडळी सोबत बसले होते...त्या भक्त मंडळी मध्ये श्री चंदूमुकीम नावाचा एक भक्त होता... तो भक्ती भावाने सेवा रुजू करत होता... आंब्याचे दिवस होते... त्यामुळे महाराजांसाठी श्री चंदूमुकीम आंबे आणले होते... महाराजांनी एक दोन...

श्री गजानन चरित्र दर्शन 13 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

आपण श्री गजानन चरित्र दर्शन १२ मध्ये पहिले कि श्री महाराजांनी वीणा अग्नी चिलीम प्रज्वलित केली.... खरंतर चिलीम पेटवण्यासाठी श्री जानकी राम यांच्या कडे मुले अग्नी आणण्यासाठी गेली होती... परंतु श्री जानकी राम यांनी अग्नी तर दिला नाहीच... पण उलट श्री महाराजां बद्दल...

श्री गजानन महाराज दर्शन लीला 6 – मराठी

खूप सारे लोक श्री गोविंद बुवांचे किर्तन ऐकण्यासाठी आले होते त्यामध्ये श्री गजानन महाराज पण कडू लिंबाच्या निंबाच्या झाडा जवळ बसून किर्तन ऐकत होते श्री गोविंद बुवांनी किर्तनासाठी श्री  भागवतातील एकादश स्कंध मधील हंस गीता याचा श्लोक किर्तन सेवेसाठी घेतला होता... बुवांनी...

यत्न शिकवण – श्री समर्थ रामदास स्वामी – श्री दासबोध दशक १२ समास ९

यत्न शिकवण - श्री समर्थ रामदास स्वामी - श्री दासबोध दशक १२ समास ९ प्रत्येक संतांनी कर्माला महत्व दिले... असा कोणतेही संत नाहीत कि त्यांनी कर्म सोडून...दे रे हरी पलंगावरी... असे कोणत्याच संतांनी सांगितले नाही... कारण प्रत्येक संत हे कर्म प्रधानच होते... कर्म न करणारे...

श्री गजानन चरित्र दर्शन 12 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

श्री गजानन महाराज बंकटलाल यांच्या घरी राहत होते.. एकेदिवशी एक प्रकार घडला तो दिवस होता... वैशाख शुद्ध तृतीयेचा दिवस होता... म्हणजेच अक्षय तृतीया चा दिवस होता... म्हणजेच या दिवशी आपण पितृ पूजन करतो तो दिवस... साडेतीन मुहूर्ता पैकी एक मुहूर्त..त्या दिवशी श्री...

मी डॉक्टर सिंधुताई सपकाळ बोलतेय – एक प्रेरणा

बाळांनो... मी डॉक्टर सिंधुताई सपकाळ बोलतेय... हो तुमची माई बोलतेय... बेटा दचकू नकोस...मी तर अनंतात विलीन झाले... हि बातमी जेव्हा सोशल मीडिया मार्फत तुझ्या पर्यंत पोहोचली तेव्हा... सोशल मीडिया द्वारे तू जी श्रद्धांजली... भावांजली वाहिलीस त्या बद्दल खूप खूप धन्यवाद......

जसे कर्म तसे फळ आज नाही तर उद्या नक्की मिळतेच- श्री गजानन चरित्र दर्शन 11 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ३

जसे कर्म तसे फळ आज नाही तर उद्या नक्की मिळतेच श्री विठोबा घाटोळ यांना पूर्व पुण्याई ने श्री गजानन महाराजांच्या सेवेची संधी त्यांना मिळाली होती पण म्हणतात ना पुण्य करण्यासाठी पुण्य गाठी असावे लागते... श्री विठोबा घाटोळ यांना श्री महाराजांच्या सेवेची खूप छान अशी संधी...

श्री गजानन चरित्र दर्शन 10 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ३

https://youtu.be/56bS3EN9F-w   श्री गजानन चरित्र दर्शन 10 - संदर्भ - श्री गजानन विजय अध्याय ३ भक्ती रुपी चरणतीर्थचा महिमा श्री जानराव देशमुख हे शेगांव मध्ये राहत होते...ते शेगाव मध्ये प्रसिद्ध व्यक्ती होते... घरात संपत्तीची काहीच कमतरता नव्हती..अचानकपणे त्यांची...

नामस्मरण भक्ति – नवविधा भक्ति – श्री समर्थ रामदास स्वामी

नवविधा भक्ती चा तिसरा प्रकार नामस्मरण भक्ति या भक्ती विषयी श्रीमत दासबोध ग्रंथात सांगतात ” स्मरण देवाचे करावें | अखंड नाम जपत जावें | नामस्मरणें पावावें | समाधान | नित्य नेम प्रातः काळी | माध्यानकाळी सायंकाळी | नामस्मरण सर्वकाळी करत जावें | नामस्मरण भक्ति हि खूपच...

पादसेवन भक्ती -नवविधा भक्ति श्री समर्थ रामदास स्वामी

पादसेवन भक्ती - श्री समर्थ रामदास स्वामी या भक्ती बाबत सांगतात कि - पादसेवन ते जाणावे । कायावाचा मनोभावे । सद्गुरूंचे पाय सेवावे । सद्गती कारणे । सेवावें सद्गुरुचरण । या नाव पादसेवन । श्री समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोध ग्रंथात याचे यतार्थ वर्णन केले आहे -...