शिव पुराण कथा २

Oct 1, 2023 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

 

समुद्राच्या जवळ एक बाष्कळ नावाचे गाव होते…तिथे धर्माचे आचरण सोडून वागणारे दोघेजण राहत होते….ते खूपच वाईट होते…त्यांचे मन दूषित होते…कायम विषयासक्त होते..ईश्वरावर त्यांचा विश्वास नव्हता..तिथे राहणारे लोक सुद्धा तसेच होते…त्या गावात एक बिंदुग नावाचा व्यक्ती राहत होता…तो फारच कुमार्गी होता…त्याची पत्नीचे नाव चंचुला होते…ती धार्मिक वृत्ती ची होती…पण पती मात्र दुराचारी होता..तरीही तीने तो त्रास सहन केला..त्यामुळे तिला अनेक यातना सहन कराव्या लागल्या..इतका की ती आपल्या पतीसोबत ती सुद्धा अधार्मिक बनली…अशीच अनेक वर्ष झाले..काही काळा नंतर बिंदुग मरण पावला…अनेक यातना झाल्या..त्याला पिशाच्च योनी मिळाली…पती च्या मृत्यू नंतर त्याची पत्नी आपल्या मुलांच्या सोबत रहात होती…एक दिवस काही कारणास्तव गोकर्ण इथे गेली…फिरता फिरता ती एका शिव मंदिरात गेली…तिथे..शिव कथा सुरू होती…ती कथा ऐकत असताना त्यात आपल्या कर्माचे फळ कसे मिळते याची समज तिला मिळाली… हे सर्व ऐकून तिच्या मनात भीती निर्माण झाली…कथा पूर्ण झाल्यानंतर ती जे कथाकार होते त्यांच्या कडे जाते…आणि आज पर्यंत ज्या काही चुका झाल्या त्या कथाकार आहेत त्यांना सांगते..तिचा तो भाव पाहून तिला समजावून सांगतात की  शिव कथा श्रवण करून तुला तुझी चूक लक्षात आली ही खूप मोठी  शिव कृपा आहे…हा निर्भय पण आहे..कारण सत्य स्वीकारणे खूप मोठी गोष्ट आहे…कारण चित्त शुद्ध असल्या शिवाय शिव पार्वती यांचा वास आपल्या ह्रदयात होऊ शकत नाही…कारण चित्त शुद्धी झाली की आपल्या ह्रदयात भगवान शिव जी यांच्या भक्ति चे दोन पुत्र म्हणजे.. ज्ञान आणि वैराग्य प्रगट होते…यात काही संशय नाही..यासाठी तू शिव भक्ती कर..शिव चरित्र वाच.. त्यावर चिंतन मनन कर नक्कीच..तुझी चित्त शुद्ध होईल आणि शिव कृपेस पात्र होशील…हे सर्व ऐकून चंचुला तिथेच राहते..शिव कथा श्रवण करते…तिला स्वानुभव प्राप्त झाला आणि ती विनाकष्ट शिवलोक प्राप्त झाले  .. बोला उमा महेश्वर देवता कि जय

बोध – शिव पुराण ची हि कथा आपणस मनावर कार्य करण्याची प्रेरणा देत आहे.. बिंदुग बरोबर राहून त्याची धार्मिक पत्नी चंचूला सुद्धा अधार्मिक झाली म्हणजेच या ठिकाणी आपणस बोध होतो कि.. आपली संगत कशी असावी.. कारण आपण ज्या संगतीत राहतो त्या नुसार आपले आचार विचार आणि विहार होतो.. त्या मुले आपणस सत्संगाची कास धरायची आहे.. इथे जी चंचुला ती आपल्या सर्वांमध्ये आहे.. पहा आपले मन कायम चंचल असते.. आता  इथे तर थोड्या वेळात दुसरी कडे जाते अश्या चंचल मनावर आपणस कार्य करायचे आहे.. म्हणजे चंचल मन अचल करायचे आहे..शिव पुराण कथा श्रवण केल्या नंतर चंचुला हिला आपल्या सर्व चुका लक्षात आल्या.. पहा अनेकदा असेच ईश्वर आपणस आपल्या चुका दाखवत असतो पण आपले चंचल मन त्या चुका दुर्लक्षित करतो आणि आहे ते चुकीचे वर्तन सुरु ठेवतो.. जो पर्यंत आपणस आपल्या चुका दिसत नाहीत आणि चुकीच्या वर्तनाच्या परिणामांची जाणीव आपणस होत नाही तो पर्यंत.. आपली चित्त शुद्धी होऊ शकत नाही.. पहा चंचुला हिला आपल्या चुका लक्षात आल्या.. मग तिने फक्त शिव पुराण ऐकले का ? नाही तिने शिव पुराणात सांगितल्या प्रमाणे आपल्या चित्तातील चुकीचे आचार विचार दूर केले.. हे करणे इतके सोपे नाही त्यासाठी आपल्यात निर्भयता हा गुण विकसित झाला पाहिजे तरच हे शक्य आहे.. आपणस शिव कृपेचा अनुभव हा तेव्हाच येईल जेव्हा आपले चित्त शुद्ध होईल.. यासाठी आपणस आजची लीला आपले चित्त शुद्ध करण्याची प्रेरणा देत आहे.. धन्यवाद समर्था.. बोला श्री उमा महेश्वर देवता कि जय..!

प्रार्थना – हे महादेवा – ज्या प्रमाणे चंचूला हिला शिव पुराण कथेस  निमित्त करून तिचे चित्त शुद्ध केलेस तसेच आमचे चित्त सुद्धा शुद्ध कर.. आमच्या ह्रदयात ज्ञान आणि वैराग्य प्रगट कर.. तुझ्या कृपेशिवाय हे शकय नाही.. धन्यवाद उमा महेश्वर देवता कि जय..

www.chetanakeswar.com

 


Share
और पढिये !!

वेळ

भगवंताने सर्वांना एक गोष्ट सारखीच दिली आहे ती म्हणजे दिवसाचे २४ तास त्यामुळे आपण असे कधीच म्हणू शकत नाही कि माझ्या कडे वेळ नाही. वॉरन बफे म्हणतात - श्रीमंत लोक वेळेत गुंतवणूक करतात गरीब लोक पैशाची गुंतवणूक करतात मायकल आल्थसूलर - वेळ उडतो आपण त्याचे पायलट आहोत प्रत्येक...

राखी पौर्णिमा

राखी पौणिमा म्हणजे नात्याला घट्ट करण्याचा उत्सव..आपण वयाने मोठे झालो की काही कारणास्तव या नात्यात दुरावा येतो..या मागे कारण असते वडिलोपार्जित संपत्ती..जी खरं तर नात्यात दुरावा निर्माण करते..खरंतर या साठी कष्ट करणारा मरून जातो..आणि मेल्यावर विचार करतो यासाठीच केले होते...

आपण स्व आदर करतो का

आपण स्वतः ला काय समजतो - खरंतर हा प्रश्न आज पर्यंत आपण आपल्या स्वतःला विचारला आहे का ? विचारला असेल तर आपले आपल्या स्वतः बद्दल मत काय आहे? आपण स्वतः स्वतःचा आदर करता का ? याचे उत्तर काहींचे हो असेल काहींचे नाही असे असेल.. खरंतर जो पर्यंत आपण स्वतः आपला आदर करत नाही तो...

श्री दासबोध दशक १२ समास १

श्री दासबोध दशक १२ समास १ दासबोधातील दशक १२ मधील समास १ मध्ये श्री समर्थ रामदास स्वामी विमल लक्षण सांगत आहेत प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालावी हा उपदेश देत आहेत... प्रपंच करण्यात आळस करू नये.. अनेक लोक म्हणतात प्रपंच आणि परमार्थ एकत्र होऊ शकत नाही... रामदास स्वामी...

नृसिंह जयंती – नृसिंह जन्म कथा

आज नृसिंह जयंती निमित्त चला आपण नृसिंह जन्म कथा पाहूया हिरण्यकश्यपू राजा ह्यांनी भगवंताची भक्ती करून त्याला प्रसन्न करून घेतले होते व असा वर मागितला कि मला कोणत्याही माणसाकडून वा प्राण्याकडून मृत्य येऊ नये, दिवसा किंवा रात्री मृत्य येऊ नये , घरात नाही किंवा बाहेर...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 19 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज काही दिवस शेगांव मध्ये राहिले... परब्रम्ह जिथे आवश्यकता असते तिथे संचार करत असते. कुणीही त्यांना एका ठिकाणी अडकवून ठेवू शकत नाही. वऱ्हाड प्रांतात अडगाव नावाचे गाव आहे तिथे गजानन महाराज जाण्यासाठी निघाले . तो महिना होता वैशाख. वैशाख महिना...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 18 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

लीला क्रमांक १७ मध्ये आपण पहिले कि महाराज पिपंळगावात आले. समाधी अवस्थे मधून महाराज बाहेर यावेत व आपल्याशी बोलावेत यासाठी गावकर्यांनी कसा प्रयत्न केला आणि त्यांच्या श्रद्धेचे फलस्वरूप महाराज समाधी अवस्थेतून बाहेर आले तो दिवस होता सोमवारचा. पुढे दुसऱ्या दिवशी मंगळवारी...

श्री गजानन चरित्र दर्शन 17 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

श्री गजानन महाराज शेगांव मध्ये होते..महाराजांच्या लीला ची प्रचित अनेक भक्तांना येत होती..त्यामुळे दिवसेंदिवस.. भक्तांची गर्दी वाढतच होती..अचानक एक दिवस महाराजांच्या काय मनात आले माहित नाही... महाराज अचानक शेगांव सोडून... शेगांव जवळ असणाऱ्या पिंपळगाव गावात निघून...

श्री गजानन चरित्र दर्शन 16 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

ऐके दिवशी सर्व सेवेकरी मंडळी महाराजांच्या चरणी सेवा रुजू करत होते.. अचानक महाराजांनी सर्वांना बोलवले व म्हणाले... वसंत पंचमी च्या दिवशी घनपाठी ब्राम्हण बोलवा.. मंत्र जागर करूया.. तसेच सर्वांनी एक एक रुपया दक्षिणा देण्यासाठी काढावा... महाराजांची हि वाणी ऐकून सर्व...

श्री गजानन चरित्र दर्शन 15 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

शेगांवच्या दक्षिण दिशेला चिंचोली नावाचे गाव आहे. त्या गावात माधव नावाचे एक ब्राम्हण राहत होते. त्यांचे वय साधारण ६० पेक्षा जास्त होते. त्यांनी आपलें संपूर्ण आयुष्य हे संसार म्हणजे सर्वस्व या साठी खर्ची केले होते. आपल्या भविष्यात काय लिहून ठेवले आहे हे कुणासच माहित...