बोले तैसा चाले , त्याची वंदावी पाऊले
आपण जे आचरण करतो.. तेच उपदेश लोकांना द्यायचे.
स्वामी भक्त हो आजच्या स्वामी वाणी तुन स्वामी सांगत आहेत.. आपल्या वाणी तुन आपण जे बोलतो तसेच आपले आचारण असले पाहिजे.. म्हणजे समजा आपण म्हणत असू कि अमुक गोष्ट करू नका वाईट असते.. पण सर्व प्रथम आपण त्या गोष्टीचे आचरण करणे आवश्यक आहे कारण कोणतीही चांगली गोष्ट हि प्रथम आचरणांत आणावी.. मग त्या गोष्टी चे महत्व आपणस इतरांना सांगण्याची गरज नाही.. कारण आपल्या आचरणातून ती दिसते.. जसे आपण नेहमी खरे बोलत असू तर.. आपली मुले हि नेहमी खरेच बोलणार यात काही शंका नाही.. पण आपले काय होते आपण इतरांना मार्गदर्शन करतो पण आपण स्वतः त्याचे आचरण करत नाही.. स्वामी नाम आपण घेत नाही आणि इतरांना म्हणू कि स्वामी नाम घ्या.. स्वामी सेवा करा तर कसे चालेले.. म्हणजेच सर्वप्रथम आपल्यात बदल करा.. बाकी आपल्या भोवती सर्व चांगलेच होईल.. धन्यवाद स्वामी.. कोटी कोटी धन्यवाद.. !
वेळ
भगवंताने सर्वांना एक गोष्ट सारखीच दिली आहे ती म्हणजे दिवसाचे २४ तास त्यामुळे आपण असे कधीच म्हणू शकत नाही कि माझ्या कडे वेळ नाही. वॉरन बफे म्हणतात - श्रीमंत लोक वेळेत गुंतवणूक करतात गरीब लोक पैशाची गुंतवणूक करतात मायकल आल्थसूलर - वेळ उडतो आपण त्याचे पायलट आहोत प्रत्येक...