स्वामीं भक्तहो..या लीलेत स्वामीं भक्ती भाव जागृत करण्यास सांगत आहेत..पण भक्ती कशी वाढेल..ती दृढ कशी होईल..कारण नुसते भक्ती भाव म्हणून तो जागृत होईल का? आपल्याला भुक लागली आहे..समोर पंचपक्वांन्न आहेत..ते पाहून आपली भुक भागेल का? त्या साठी आपणस ते अन्न खावे लागेल..स्वामीं भक्ती सुद्धा अशीच आहे..आपली भक्तीची भुक तेव्हाच वाढेल जेव्हा आपण सेवा करू..सेवा म्हणजे स्वामीं नाम घेणे असेल..स्वामीं च्या लीला वाचून त्यातून स्वामीं काय सांगत आहेत यावर..चिंतन मनन करणे…हे रोज करावे लागेल…यात एक अडचण येते..आपले मन म्हणते..की या लीलेत अमुक व्यक्ती आहेत त्यांनी असे का केले..असे करायला नको होते..खरंतर त्यानी असे या साठी केले की..स्वामीं नी त्यांना बुद्धी दिली की ..पुढच्या पिढीने ही चूक करू नये..म्हणजेच प्रत्येक लीला ही आपली भक्ती वाढण्यासाठी आहे..पण आपण नको ते विचार करून आपले नुकसान करतो..असो आपणस आपली भक्ती वाढवण्यासाठी कार्य करायचे आहे…चला स्वामीं नाम+ चरित्र वाचन+श्रवण+चिंतन मनन करून भक्ती दृढ करूया…! धन्यवाद समर्था..!
आपणही चिंतन मनन करा..ते लिहून काढा..इतरांशी share करा
वेळ
भगवंताने सर्वांना एक गोष्ट सारखीच दिली आहे ती म्हणजे दिवसाचे २४ तास त्यामुळे आपण असे कधीच म्हणू शकत नाही कि माझ्या कडे वेळ नाही. वॉरन बफे म्हणतात - श्रीमंत लोक वेळेत गुंतवणूक करतात गरीब लोक पैशाची गुंतवणूक करतात मायकल आल्थसूलर - वेळ उडतो आपण त्याचे पायलट आहोत प्रत्येक...