आपले मंदिर स्वच्छ ठेवूया..भक्ती वाढवूया..!
श्रावण मासी हर्ष मानसी…आपल्या मनात भक्ती भाव वाढवण्याचा मास…आपण।अनेक संकल्प करतो..अनेक मंदिरात जातो..विशेषतः श्री शिव मंदिरात आपण जातो..आपण अनेक गोष्टी भगवान श्री शिव यांना अर्पण करतो..मग आपण अनेक गोष्टी पिंडीवर वाहतो..मग आपल्या भक्ती मुळे तिथे अनेक माश्या होतात..मुंग्या होतात..पहा आपणच मंदिराची स्वच्छता राखली नाही तर ती कोण राखणार..आपणस आपले घर स्वच्छ ठेवतो..तसे मंदिर ही स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपली आहे…मग आपण म्हणाल आम्ही ईश्वराला काही अर्पण करायचे नाही का? करायचे त्यासाठी मंदिरात..४- ५ डबे ठेवा… त्यात साखर, दूध, जवस, तीळ, दही, तूप,तेल अजून काही असेल ते त्या डब्यात ठेवा.. आपण मंदिरात अर्पण करत आहोत..ते असे अर्पण केले तर मंदिर स्वच्छ राहतील…हार फुले घ्या ती आपल्या घरी घेऊन आपली घरच्या देवाला वाह…श्री फळ ( नारळ) एक तर देवाला अर्पण करा किंवा प्रसाद म्हणून आपल्या घरी घेऊन जा..घरी जाऊन फोडा..आता प्रश्न निर्माण होईल..मंदिरात असे डबे नाहीत..अहो..आपणच आपल्या परीसरातील मंदिरात ही व्यवस्था करावी..पहा खूप छान सेवा होईल..वाहायचे असेल तर श्री महादेवाच्या चरणी फक्त पाणी अर्पण करूया.. मात्र त्याच बरोबर आपल्यातील षड्ररिपू अर्पण करणे अति महत्वाचे आहे..आपण सर्व ज्ञानी आहात.. नक्कीच आपल्या भक्ती मुळे आपले मंदिर आपण स्वच्छ ठेवाल…धन्यवाद स्वामीं..👍
www.chetnakeswar. com
श्री गजानन चरित्र दर्शन 14 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4
उन्हाळ्याचे दिवस होते... श्री गजानन महाराज अनेक भक्त मंडळी सोबत बसले होते...त्या भक्त मंडळी मध्ये श्री चंदूमुकीम नावाचा एक भक्त होता... तो भक्ती भावाने सेवा रुजू करत होता... आंब्याचे दिवस होते... त्यामुळे महाराजांसाठी श्री चंदूमुकीम आंबे आणले होते... महाराजांनी एक दोन...