!!श्री स्वामी समर्थ!!
चहूं वेदीं जाण साहीशास्त्रीं कारण । अठराही पुराणें हरिसी गाती ॥५॥ हरिपाठ
पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..रोज किमान रोज १ माळ..,!
www.chetnakeswar.comस्वामीं भक्तहो.. माऊली सांगत आहेत.. चारही वेद, सहा शास्त्र व अठरा पुराणे ही सुद्धा हरीचे वर्णन करतात..पहा आपण अनेक ग्रंथ वाचतो…त्याची पारायणे करतो..पण त्यावर विचार करत नाही..आपण फक्त कथा किंवा गोष्टी यातच अडकतो..किंवा त्यावर चर्चा करतो..पण ते ग्रँथ हे आपले गुरू असतात..ते आपल्याशी बोलतात पण आपण त्यावर विचार करत नाही..त्यामुळे ते फक्त वाचन होते..जर आपण यातून सार काढला व त्या नुसार कार्य केले तर.. नक्कीच यशस्वी जीवन होईल..आपण किती वाचतो.. या पेक्षा आपणस काय बोध होतो..हे महत्वाचे… वरील ओवीतून माऊली स्पष्टपणे सांगत आहेत..काहीही जरी आपण वाचले तरी त्यात..हरी चे वर्णन आहे..म्हणजेच नामाची महती आहे..पण आपण नाम सेवा सोडून इतर सेवेत अडकतो..म्हणून माउली पुन्हा सांगत आहेत…नाम घ्या…नाम..कोणतंही घ्या.. फक्त रोज न चुकता घ्या..पहा अनुभूती घेऊन..चला रोज किमान १ माळ स्वामीं नाम घेऊया…धन्यवाद स्वामीं.. कोटी कोटी धन्यवाद.. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय..!
वेळ
भगवंताने सर्वांना एक गोष्ट सारखीच दिली आहे ती म्हणजे दिवसाचे २४ तास त्यामुळे आपण असे कधीच म्हणू शकत नाही कि माझ्या कडे वेळ नाही. वॉरन बफे म्हणतात - श्रीमंत लोक वेळेत गुंतवणूक करतात गरीब लोक पैशाची गुंतवणूक करतात मायकल आल्थसूलर - वेळ उडतो आपण त्याचे पायलट आहोत प्रत्येक...