देवाचे द्वार कुठे आहे..चिंतन मनन

Feb 22, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

श्री स्वामी समर्थ
देवाचिये द्वारी उभा क्षणभरी ।
तेणे मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥

हरिपाठ ओवी चिंतन मनन

स्वामीं भक्तहो..संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली..हरिपाठच्या पहिल्या ओवीतून आपणस मुक्तीचा मार्ग सांगत आहेत..देवाच्या द्वारात क्षणभर जरी आपण विसावलो तरी आपणस मुक्ती ची अनुभूती येते..खरंतर देवाचं द्वार म्हणजे काय हे आधी समजून घेणे आवश्यक आहे.. देवाचे द्वार म्हणजे इथे माऊली आपणस कोणत्या मंदिरता जाण्यास सांगत आहेत का ? हो आपणस माऊली मंदिरात जाण्यास सांगत आहेत.. पण मग प्रश्न निर्माण होतो..कोणत्या मंदिरात ? माऊली सांगत आहेत ते मंदिर म्हणजे जे आपल्या सर्वांना मिळाले आहे..हे मंदिर नसेल तर आपले आस्तित्व संपते..हे मंदिर म्हणजे आपले शरीर..आपले शरीर मंदिरच आहे..पहा आपण थोडा वेळ श्वास रोखला तर काय होते..या मंदिरातून नाद होतो..श्वास घे ..नाहीतर माझे आस्तित्व संपेल..म्हणजेच आपणस प्राप्त शरीर हेच मंदिर आहे..आता हे मंदिर कसे आहे? आपण कधी आत डोकावतो का? आपण म्हणाला सिटी स्कॅन केले की संपूर्ण शरीर दिसते.. अहो पण आपल्यातील..चांगलेपणा किंवा वाईटपणा त्यात दिसतो का ? नाही..आपण स्वतःच आपले अंतर्मुख दर्शन घेऊ शकतो का उघड्या डोळ्यांनी? नाही..मग या मंदिरातील स्व चे दर्शन होणार कसे.. माऊली सांगतात क्षणभर जरी आपण आपल्या आत डोकावण्याचा प्रयत्न केला तरी आपणस मुक्ती चा अनुभव येईल..आता आपण म्हणाला हे लगेचच झाले पाहिजे..ते शक्य नाही.. त्या साठी आपणस स्वामीं नाम घ्यावे लागेल..श्री स्वामी समर्थ म्हणा , राम कृष्ण हरी म्हणा, किंवा आणखी कोणतेही नाम घ्या..यात सातत्य ठेवा.. नाम घेता घेता..नामात दंग व्हा..पहा.. हळुहळु आपले मन नामावर स्थिर होईत..अनेक स्व अनुभव येतील, व्यक्तिमत्व विकास होईल..अजूनही बरेच काही होईल..फक्त गरज आहे..आपल्याला जे शरीर रुपी मंदिर मिळाले आहे..त्याचा खरा अर्थ समजून उपयोग करण्याचा.. बाकी सर्व होईल..फक्त सेवेत सातत्य ठेवा.. धन्यवाद समर्था..कोटी कोटी धन्यवाद.. बोला श्री स्वामीं समर्थ महाराज की जय..!


Share
और पढिये !!

वेळ

भगवंताने सर्वांना एक गोष्ट सारखीच दिली आहे ती म्हणजे दिवसाचे २४ तास त्यामुळे आपण असे कधीच म्हणू शकत नाही कि माझ्या कडे वेळ नाही. वॉरन बफे म्हणतात - श्रीमंत लोक वेळेत गुंतवणूक करतात गरीब लोक पैशाची गुंतवणूक करतात मायकल आल्थसूलर - वेळ उडतो आपण त्याचे पायलट आहोत प्रत्येक...

राखी पौर्णिमा

राखी पौणिमा म्हणजे नात्याला घट्ट करण्याचा उत्सव..आपण वयाने मोठे झालो की काही कारणास्तव या नात्यात दुरावा येतो..या मागे कारण असते वडिलोपार्जित संपत्ती..जी खरं तर नात्यात दुरावा निर्माण करते..खरंतर या साठी कष्ट करणारा मरून जातो..आणि मेल्यावर विचार करतो यासाठीच केले होते...

आपण स्व आदर करतो का

आपण स्वतः ला काय समजतो - खरंतर हा प्रश्न आज पर्यंत आपण आपल्या स्वतःला विचारला आहे का ? विचारला असेल तर आपले आपल्या स्वतः बद्दल मत काय आहे? आपण स्वतः स्वतःचा आदर करता का ? याचे उत्तर काहींचे हो असेल काहींचे नाही असे असेल.. खरंतर जो पर्यंत आपण स्वतः आपला आदर करत नाही तो...

श्री दासबोध दशक १२ समास १

श्री दासबोध दशक १२ समास १ दासबोधातील दशक १२ मधील समास १ मध्ये श्री समर्थ रामदास स्वामी विमल लक्षण सांगत आहेत प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालावी हा उपदेश देत आहेत... प्रपंच करण्यात आळस करू नये.. अनेक लोक म्हणतात प्रपंच आणि परमार्थ एकत्र होऊ शकत नाही... रामदास स्वामी...

नृसिंह जयंती – नृसिंह जन्म कथा

आज नृसिंह जयंती निमित्त चला आपण नृसिंह जन्म कथा पाहूया हिरण्यकश्यपू राजा ह्यांनी भगवंताची भक्ती करून त्याला प्रसन्न करून घेतले होते व असा वर मागितला कि मला कोणत्याही माणसाकडून वा प्राण्याकडून मृत्य येऊ नये, दिवसा किंवा रात्री मृत्य येऊ नये , घरात नाही किंवा बाहेर...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 19 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज काही दिवस शेगांव मध्ये राहिले... परब्रम्ह जिथे आवश्यकता असते तिथे संचार करत असते. कुणीही त्यांना एका ठिकाणी अडकवून ठेवू शकत नाही. वऱ्हाड प्रांतात अडगाव नावाचे गाव आहे तिथे गजानन महाराज जाण्यासाठी निघाले . तो महिना होता वैशाख. वैशाख महिना...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 18 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

लीला क्रमांक १७ मध्ये आपण पहिले कि महाराज पिपंळगावात आले. समाधी अवस्थे मधून महाराज बाहेर यावेत व आपल्याशी बोलावेत यासाठी गावकर्यांनी कसा प्रयत्न केला आणि त्यांच्या श्रद्धेचे फलस्वरूप महाराज समाधी अवस्थेतून बाहेर आले तो दिवस होता सोमवारचा. पुढे दुसऱ्या दिवशी मंगळवारी...

श्री गजानन चरित्र दर्शन 17 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

श्री गजानन महाराज शेगांव मध्ये होते..महाराजांच्या लीला ची प्रचित अनेक भक्तांना येत होती..त्यामुळे दिवसेंदिवस.. भक्तांची गर्दी वाढतच होती..अचानक एक दिवस महाराजांच्या काय मनात आले माहित नाही... महाराज अचानक शेगांव सोडून... शेगांव जवळ असणाऱ्या पिंपळगाव गावात निघून...

श्री गजानन चरित्र दर्शन 16 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

ऐके दिवशी सर्व सेवेकरी मंडळी महाराजांच्या चरणी सेवा रुजू करत होते.. अचानक महाराजांनी सर्वांना बोलवले व म्हणाले... वसंत पंचमी च्या दिवशी घनपाठी ब्राम्हण बोलवा.. मंत्र जागर करूया.. तसेच सर्वांनी एक एक रुपया दक्षिणा देण्यासाठी काढावा... महाराजांची हि वाणी ऐकून सर्व...

श्री गजानन चरित्र दर्शन 15 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

शेगांवच्या दक्षिण दिशेला चिंचोली नावाचे गाव आहे. त्या गावात माधव नावाचे एक ब्राम्हण राहत होते. त्यांचे वय साधारण ६० पेक्षा जास्त होते. त्यांनी आपलें संपूर्ण आयुष्य हे संसार म्हणजे सर्वस्व या साठी खर्ची केले होते. आपल्या भविष्यात काय लिहून ठेवले आहे हे कुणासच माहित...