आपण सर्व एकाच ईश्वराची लेकरं आहोत

Feb 18, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

स्वामी वाणी पुष्प ५९२(पर्व ४ थे भाग ९६)

प्रेरणादायी बोल
आपण सर्व एकाच ईश्वराची लेकरं आहोत..तो आपला पालनकर्ता आहे.. हा विश्वास ठेवा.. जग सूंदर दिसू लागेल..!!
www.SwamiVaani.co.in

स्वामी भक्तहो आजच्या स्वामी वाणी चा बोध घेण्यासाठी स्वामींची लीलाच पाहूया…अक्कलकोट गावात स्वामी प्रथम गावा बाहेरील खंडोबाच्या मंदिरात आले. तीन दिवस हे परब्रम्ह उपाशी होते. अहमद अलीखान ह्या रिसालदार ने स्वामींना एक वेडा व्यक्ती समजून मजाक मध्ये रिकामी चिलीम देऊन ” हुक्का पीता का?” असे विचारले…तेव्हा स्वामीनी ‘ हो मी हुक्का पितो !!’ असे म्हणून रिकामी चिलीम हातात घेतली आणि ओढण्यास सुरुवात केली तर चमत्कार असा घडला कि त्या चिलीम मधून धूर यायला लागला… हा चमत्कार बघून रिसालदार आश्चर्य चकित झाला आणि महाराज कोणीतरी अवलिया असावेत ह्याची त्याला खात्री झाली ..ह्या नंतर स्वामी तीन दिवस उपाशीच आहे हे समजल्या नंतर चोळप्पाच्या घरी स्वामींना जेवणासाठी नेले …
चोळप्पाच्या घरी जेवणास गेल्या नंतर स्वामीनी सर्वप्रथम रीसालदारास ताटाला हात लावण्यास सांगितले ..पण मी मुसलमान ताटाला हात कसा लावू म्हणून त्याचे धाडस झाले नाही ..पुन्हा स्वामीनी पुन्हा आज्ञा केली अरे! रिसालदार माझ्या ताटाला हात लाव !! तूझ्या हाताने जेवणाला चव येईल !! मग मात्र रिसालदाराने ताटाला हात लावला.. आणि त्या नंतर स्वामींनी जेवण केले .


बोध

स्वामी तर परब्रम्ह आहे..खोल महासागराच्या तळाशी असलेल्या छोट्याश्या मासोळीच्या अन्नाची सोय स्वामीनी केली आहे मग त्यांना तीन दिवस उपाशी राहण्याची गरज काय ? हा प्रश्न सहाजिकच आहे .. खरे तर..स्वामीच्या मनातील आपण काय ओळखणार? पण भक्तीयुक्त अंत:करणाने स्वामिनीच जे मनन करवून घेतले त्यातून असे समजते कि , ह्या आगळ्या वेगळ्या अवतारात स्वामीनी अक्कलकोट हे स्थान पुढील कार्या साठी निश्चित केले होते.. ह्यातूनच अहमद अलीखान च्या हाताने एका हिंदू घरात स्वामीनी जेवण करून “ईश्वरा समोर कुणी हिंदू नाही अथवा कुणी मुसलमान नाही तो फक्त भक्ती भावनेचा भुकेला आहे ” हा स्पष्ट संकेत दिला आणि विशेष म्हणजे अशा काळात कि ज्या काळात हे स्पृश्य अस्पृश्य असे कर्मकांड स्तोम जास्त माजलेले होते..


Share
और पढिये !!

वेळ

भगवंताने सर्वांना एक गोष्ट सारखीच दिली आहे ती म्हणजे दिवसाचे २४ तास त्यामुळे आपण असे कधीच म्हणू शकत नाही कि माझ्या कडे वेळ नाही. वॉरन बफे म्हणतात - श्रीमंत लोक वेळेत गुंतवणूक करतात गरीब लोक पैशाची गुंतवणूक करतात मायकल आल्थसूलर - वेळ उडतो आपण त्याचे पायलट आहोत प्रत्येक...

राखी पौर्णिमा

राखी पौणिमा म्हणजे नात्याला घट्ट करण्याचा उत्सव..आपण वयाने मोठे झालो की काही कारणास्तव या नात्यात दुरावा येतो..या मागे कारण असते वडिलोपार्जित संपत्ती..जी खरं तर नात्यात दुरावा निर्माण करते..खरंतर या साठी कष्ट करणारा मरून जातो..आणि मेल्यावर विचार करतो यासाठीच केले होते...

आपण स्व आदर करतो का

आपण स्वतः ला काय समजतो - खरंतर हा प्रश्न आज पर्यंत आपण आपल्या स्वतःला विचारला आहे का ? विचारला असेल तर आपले आपल्या स्वतः बद्दल मत काय आहे? आपण स्वतः स्वतःचा आदर करता का ? याचे उत्तर काहींचे हो असेल काहींचे नाही असे असेल.. खरंतर जो पर्यंत आपण स्वतः आपला आदर करत नाही तो...

श्री दासबोध दशक १२ समास १

श्री दासबोध दशक १२ समास १ दासबोधातील दशक १२ मधील समास १ मध्ये श्री समर्थ रामदास स्वामी विमल लक्षण सांगत आहेत प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालावी हा उपदेश देत आहेत... प्रपंच करण्यात आळस करू नये.. अनेक लोक म्हणतात प्रपंच आणि परमार्थ एकत्र होऊ शकत नाही... रामदास स्वामी...

नृसिंह जयंती – नृसिंह जन्म कथा

आज नृसिंह जयंती निमित्त चला आपण नृसिंह जन्म कथा पाहूया हिरण्यकश्यपू राजा ह्यांनी भगवंताची भक्ती करून त्याला प्रसन्न करून घेतले होते व असा वर मागितला कि मला कोणत्याही माणसाकडून वा प्राण्याकडून मृत्य येऊ नये, दिवसा किंवा रात्री मृत्य येऊ नये , घरात नाही किंवा बाहेर...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 19 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज काही दिवस शेगांव मध्ये राहिले... परब्रम्ह जिथे आवश्यकता असते तिथे संचार करत असते. कुणीही त्यांना एका ठिकाणी अडकवून ठेवू शकत नाही. वऱ्हाड प्रांतात अडगाव नावाचे गाव आहे तिथे गजानन महाराज जाण्यासाठी निघाले . तो महिना होता वैशाख. वैशाख महिना...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 18 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

लीला क्रमांक १७ मध्ये आपण पहिले कि महाराज पिपंळगावात आले. समाधी अवस्थे मधून महाराज बाहेर यावेत व आपल्याशी बोलावेत यासाठी गावकर्यांनी कसा प्रयत्न केला आणि त्यांच्या श्रद्धेचे फलस्वरूप महाराज समाधी अवस्थेतून बाहेर आले तो दिवस होता सोमवारचा. पुढे दुसऱ्या दिवशी मंगळवारी...

श्री गजानन चरित्र दर्शन 17 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

श्री गजानन महाराज शेगांव मध्ये होते..महाराजांच्या लीला ची प्रचित अनेक भक्तांना येत होती..त्यामुळे दिवसेंदिवस.. भक्तांची गर्दी वाढतच होती..अचानक एक दिवस महाराजांच्या काय मनात आले माहित नाही... महाराज अचानक शेगांव सोडून... शेगांव जवळ असणाऱ्या पिंपळगाव गावात निघून...

श्री गजानन चरित्र दर्शन 16 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

ऐके दिवशी सर्व सेवेकरी मंडळी महाराजांच्या चरणी सेवा रुजू करत होते.. अचानक महाराजांनी सर्वांना बोलवले व म्हणाले... वसंत पंचमी च्या दिवशी घनपाठी ब्राम्हण बोलवा.. मंत्र जागर करूया.. तसेच सर्वांनी एक एक रुपया दक्षिणा देण्यासाठी काढावा... महाराजांची हि वाणी ऐकून सर्व...

श्री गजानन चरित्र दर्शन 15 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

शेगांवच्या दक्षिण दिशेला चिंचोली नावाचे गाव आहे. त्या गावात माधव नावाचे एक ब्राम्हण राहत होते. त्यांचे वय साधारण ६० पेक्षा जास्त होते. त्यांनी आपलें संपूर्ण आयुष्य हे संसार म्हणजे सर्वस्व या साठी खर्ची केले होते. आपल्या भविष्यात काय लिहून ठेवले आहे हे कुणासच माहित...