खचू नकोस..पुन्हा नव्याने सुरुवात कर..!!

Feb 14, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

स्वामी वाणी पुष्प ५८८(पर्व ४ थे भाग ९२)*

*प्रेरणादायी बोल*

जर तुला फळाची अपेक्षा असेल तर सर्वप्रथम त्यासाठी तू किती कष्ट केले.. किती प्रयत्न केले.. किती सेवा केली ह्याचे आत्मपरीक्षण कर.. तुझे उत्तर तुलाच भेटेल.. उत्तर नकारात्मक असेल तर खचू नकोस..पुन्हा नव्याने सुरुवात कर..!!

www.SwamiVaani.co.in

स्वामीं भक्तहो.. जर फळे हवी असतील तर पेरले पाहिजे.. पेरणी करण्यापूर्वी जामिनीची मशागत केली पाहिजे..नको असणारा कचरा काढावा लागेल…वेळोवेळी आवश्यक प्रमाणात पाणी द्यावे लागेल..आवश्यकते नुसार खते द्यावी लागतील.. योग्य वेळी पीक काढावे लागेल..हेच स्वामीं आजच्या स्वामीं वाणीतून स्वामीं सांगत आहेत..आपल्या सर्वांना यश रुपी फळ हवे आहे..स्वामीं विचारत आहेत..सर्वप्रथम कष्ट कर…आधी आपल्या मनात जे विचार आहेत त्यांची मशागत कर..नको असलेल्या विचारांचा कचरा दूर कर..तो दूर कसा होईल तर चांगले वाचन, श्रवण केल्याने…नंतर बीज टाका..बीज कशाचे तुम्हाला काय करायचे आहे हे मनात निश्चित करा..त्याचा लिखित आराखडा बनवा..जसे मला पुढील एक वर्षात नवीन भाषा शिकायची आहे..मग त्या साठी आवश्यक ती माहिती तयार करा..कसे कसे नियोजन आवश्यक आहे..हे लिहून काढा..आता पेरणी सुरू करा..रोज संध्याकाळी चिंतन मनन करा..मी किती कष्ट घेतले..पाणी किंवा खते म्हणजे आपणस कोण कोण यात मार्गदर्शन करू शकतो ते शोधा..त्यांच्या कडून जे जे चांगले आहे..त्याचा वापर पाणी व कीटक नाशक म्हणून करा..म्हणजे आपले ज्ञान वाढेल..अज्ञान दूर होईल..वेळोवेळी आपण जे काही प्रयत्न करत आहोत त्याचे आत्म परीक्षण करा…कुठे कुठे कमतरता वाटते ती दूर करा..मनात विचार येईल थकलो।आता नको..खरंतर जेव्हा मन नको म्हणते..तो क्षण फार महत्वाचा कारण तेव्हा जर आपण थांबलो तर आपण यशापासून दूर जातो..मन नको म्हणत असेल तर अजून कष्ट करा..पहा..काही दिवसांत आपणस आपणस हवे असणारे यश आपल्या हातात येईल..तेव्हा हेच भाव ह्रदयातून प्रगट होतील.. धन्यवाद समर्था..कोटी धन्यवाद..बोला श्री स्वामीं समर्थ महाराज की जय..!


Share
और पढिये !!

श्री गजानन चरित्र दर्शन 14 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

उन्हाळ्याचे दिवस होते... श्री गजानन महाराज अनेक भक्त मंडळी सोबत बसले होते...त्या भक्त मंडळी मध्ये श्री चंदूमुकीम नावाचा एक भक्त होता... तो भक्ती भावाने सेवा रुजू करत होता... आंब्याचे दिवस होते... त्यामुळे महाराजांसाठी श्री चंदूमुकीम आंबे आणले होते... महाराजांनी एक दोन...

श्री गजानन चरित्र दर्शन 13 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

आपण श्री गजानन चरित्र दर्शन १२ मध्ये पहिले कि श्री महाराजांनी वीणा अग्नी चिलीम प्रज्वलित केली.... खरंतर चिलीम पेटवण्यासाठी श्री जानकी राम यांच्या कडे मुले अग्नी आणण्यासाठी गेली होती... परंतु श्री जानकी राम यांनी अग्नी तर दिला नाहीच... पण उलट श्री महाराजां बद्दल...

श्री गजानन महाराज दर्शन लीला 6 – मराठी

खूप सारे लोक श्री गोविंद बुवांचे किर्तन ऐकण्यासाठी आले होते त्यामध्ये श्री गजानन महाराज पण कडू लिंबाच्या निंबाच्या झाडा जवळ बसून किर्तन ऐकत होते श्री गोविंद बुवांनी किर्तनासाठी श्री  भागवतातील एकादश स्कंध मधील हंस गीता याचा श्लोक किर्तन सेवेसाठी घेतला होता... बुवांनी...

यत्न शिकवण – श्री समर्थ रामदास स्वामी – श्री दासबोध दशक १२ समास ९

यत्न शिकवण - श्री समर्थ रामदास स्वामी - श्री दासबोध दशक १२ समास ९ प्रत्येक संतांनी कर्माला महत्व दिले... असा कोणतेही संत नाहीत कि त्यांनी कर्म सोडून...दे रे हरी पलंगावरी... असे कोणत्याच संतांनी सांगितले नाही... कारण प्रत्येक संत हे कर्म प्रधानच होते... कर्म न करणारे...

श्री गजानन चरित्र दर्शन 12 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

श्री गजानन महाराज बंकटलाल यांच्या घरी राहत होते.. एकेदिवशी एक प्रकार घडला तो दिवस होता... वैशाख शुद्ध तृतीयेचा दिवस होता... म्हणजेच अक्षय तृतीया चा दिवस होता... म्हणजेच या दिवशी आपण पितृ पूजन करतो तो दिवस... साडेतीन मुहूर्ता पैकी एक मुहूर्त..त्या दिवशी श्री...

मी डॉक्टर सिंधुताई सपकाळ बोलतेय – एक प्रेरणा

बाळांनो... मी डॉक्टर सिंधुताई सपकाळ बोलतेय... हो तुमची माई बोलतेय... बेटा दचकू नकोस...मी तर अनंतात विलीन झाले... हि बातमी जेव्हा सोशल मीडिया मार्फत तुझ्या पर्यंत पोहोचली तेव्हा... सोशल मीडिया द्वारे तू जी श्रद्धांजली... भावांजली वाहिलीस त्या बद्दल खूप खूप धन्यवाद......

जसे कर्म तसे फळ आज नाही तर उद्या नक्की मिळतेच- श्री गजानन चरित्र दर्शन 11 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ३

जसे कर्म तसे फळ आज नाही तर उद्या नक्की मिळतेच श्री विठोबा घाटोळ यांना पूर्व पुण्याई ने श्री गजानन महाराजांच्या सेवेची संधी त्यांना मिळाली होती पण म्हणतात ना पुण्य करण्यासाठी पुण्य गाठी असावे लागते... श्री विठोबा घाटोळ यांना श्री महाराजांच्या सेवेची खूप छान अशी संधी...

श्री गजानन चरित्र दर्शन 10 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ३

https://youtu.be/56bS3EN9F-w   श्री गजानन चरित्र दर्शन 10 - संदर्भ - श्री गजानन विजय अध्याय ३ भक्ती रुपी चरणतीर्थचा महिमा श्री जानराव देशमुख हे शेगांव मध्ये राहत होते...ते शेगाव मध्ये प्रसिद्ध व्यक्ती होते... घरात संपत्तीची काहीच कमतरता नव्हती..अचानकपणे त्यांची...

नामस्मरण भक्ति – नवविधा भक्ति – श्री समर्थ रामदास स्वामी

नवविधा भक्ती चा तिसरा प्रकार नामस्मरण भक्ति या भक्ती विषयी श्रीमत दासबोध ग्रंथात सांगतात ” स्मरण देवाचे करावें | अखंड नाम जपत जावें | नामस्मरणें पावावें | समाधान | नित्य नेम प्रातः काळी | माध्यानकाळी सायंकाळी | नामस्मरण सर्वकाळी करत जावें | नामस्मरण भक्ति हि खूपच...

पादसेवन भक्ती -नवविधा भक्ति श्री समर्थ रामदास स्वामी

पादसेवन भक्ती - श्री समर्थ रामदास स्वामी या भक्ती बाबत सांगतात कि - पादसेवन ते जाणावे । कायावाचा मनोभावे । सद्गुरूंचे पाय सेवावे । सद्गती कारणे । सेवावें सद्गुरुचरण । या नाव पादसेवन । श्री समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोध ग्रंथात याचे यतार्थ वर्णन केले आहे -...