अक्कलकोटी आलो देवा

Feb 5, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

स्वामी वाणी पुष्प ५४३(पर्व ४ थे भाग ४७)

आजचे चिंतन-मनन

अक्कलकोटी आलो देवा ,
तुझ्या दर्शने तृप्त झालो देवा !
अनन्य भक्तीचा अनमोल ठेवा ,
प्रसादरूपे दिलासी !

www.SwamiVaani.com

आजचे चिंतन-मनन

अक्कलकोटी आलो देवा ,
तुझ्या दर्शने तृप्त झालो देवा !
अनन्य भक्तीचा अनमोल ठेवा ,
प्रसादरूपे दिलासी !

स्वामी भक्तहो.. आजची स्वामी वाणी म्हणजे प्रार्थना आहे.. आपण सर्वजण अक्कलकोट ला जातो स्वामींचे दर्शन घेण्यासाठी.. खरंतर हि स्वामी कृपाच आहे.. समर्था तुझ्या कृपेनेच तुझ्या द्वारी येण्याचे भाग्य आम्हाला लाभले आहे.. खूप खूप धन्यवाद.. तुझे दर्शन आज मनाला खूप खूप आनंद झाला.. इथे कधी कधी आपली चूक होते आपण कुठल्याही स्थळी जातो तिथे स्वामी दर्शन घेण्यापूर्वी फोटोच काढत बसतो.. सरश्री नेहमी सांगतात जेव्हा आपण जिथे कुठे जाल तिथला अनुभव जो आहे त्याचा आनंद घ्या पण आपण काय करतो फोटो काढत बसतो..असे न करता आपण जिथे जाल तिथला अनुभव अनुभवा.. स्वामी च्या दर्शना ला गेलात तर स्वामी नाम घ्या.. थोडा वेळ स्वामी नामाचे ध्यान करा.. आपण जेवण केले कि कसे म्हणतो पोटभर जेवण करून तृप्त झालो.. पण हि तृप्ती दुसऱ्यादिवशी परत निर्माण होते.. स्वामी दर्शन घेताना.. सेवा करताना अशी करा कि हि दर्शनाची तृप्ती आपली.. कायम असावी.. स्वामी आपणास अनन्य भक्तीचा अनमोल ठेवा प्रसादरूपे देत आहेत आपणस तो जतन करायचा आहे.. तो आपण जतन कसा करू शकतो तर त्यासाठी आपणस सेवेत सातत्य असणे आवश्यक आहे.. आपण जसे रोज जेवण करतो.. रोज झोपतो.. तसेच असा एकही दिवस जाऊ नये ज्या दिवशी आपली स्वामी नाम सेवा होणार नाही..स्वामी भक्तहो स्वामी नाम सेवा करा.. रोज स्वामींना प्रार्थना करा स्वामी आमच्याकडून सेवा करून घ्या.. स्वामी सेवेचा विशिष्ट असा संकल्प घ्या.. स्वामी सेवेत सातत्य ठेवा.. नक्कीच स्वामी सेवा करून घेतील.. धन्यवाद स्वामी.. हि समज दिल्याबद्दल धन्यवाद.. हि प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद


Share
और पढिये !!

वेळ

भगवंताने सर्वांना एक गोष्ट सारखीच दिली आहे ती म्हणजे दिवसाचे २४ तास त्यामुळे आपण असे कधीच म्हणू शकत नाही कि माझ्या कडे वेळ नाही. वॉरन बफे म्हणतात - श्रीमंत लोक वेळेत गुंतवणूक करतात गरीब लोक पैशाची गुंतवणूक करतात मायकल आल्थसूलर - वेळ उडतो आपण त्याचे पायलट आहोत प्रत्येक...

राखी पौर्णिमा

राखी पौणिमा म्हणजे नात्याला घट्ट करण्याचा उत्सव..आपण वयाने मोठे झालो की काही कारणास्तव या नात्यात दुरावा येतो..या मागे कारण असते वडिलोपार्जित संपत्ती..जी खरं तर नात्यात दुरावा निर्माण करते..खरंतर या साठी कष्ट करणारा मरून जातो..आणि मेल्यावर विचार करतो यासाठीच केले होते...

आपण स्व आदर करतो का

आपण स्वतः ला काय समजतो - खरंतर हा प्रश्न आज पर्यंत आपण आपल्या स्वतःला विचारला आहे का ? विचारला असेल तर आपले आपल्या स्वतः बद्दल मत काय आहे? आपण स्वतः स्वतःचा आदर करता का ? याचे उत्तर काहींचे हो असेल काहींचे नाही असे असेल.. खरंतर जो पर्यंत आपण स्वतः आपला आदर करत नाही तो...

श्री दासबोध दशक १२ समास १

श्री दासबोध दशक १२ समास १ दासबोधातील दशक १२ मधील समास १ मध्ये श्री समर्थ रामदास स्वामी विमल लक्षण सांगत आहेत प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालावी हा उपदेश देत आहेत... प्रपंच करण्यात आळस करू नये.. अनेक लोक म्हणतात प्रपंच आणि परमार्थ एकत्र होऊ शकत नाही... रामदास स्वामी...

नृसिंह जयंती – नृसिंह जन्म कथा

आज नृसिंह जयंती निमित्त चला आपण नृसिंह जन्म कथा पाहूया हिरण्यकश्यपू राजा ह्यांनी भगवंताची भक्ती करून त्याला प्रसन्न करून घेतले होते व असा वर मागितला कि मला कोणत्याही माणसाकडून वा प्राण्याकडून मृत्य येऊ नये, दिवसा किंवा रात्री मृत्य येऊ नये , घरात नाही किंवा बाहेर...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 19 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज काही दिवस शेगांव मध्ये राहिले... परब्रम्ह जिथे आवश्यकता असते तिथे संचार करत असते. कुणीही त्यांना एका ठिकाणी अडकवून ठेवू शकत नाही. वऱ्हाड प्रांतात अडगाव नावाचे गाव आहे तिथे गजानन महाराज जाण्यासाठी निघाले . तो महिना होता वैशाख. वैशाख महिना...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 18 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

लीला क्रमांक १७ मध्ये आपण पहिले कि महाराज पिपंळगावात आले. समाधी अवस्थे मधून महाराज बाहेर यावेत व आपल्याशी बोलावेत यासाठी गावकर्यांनी कसा प्रयत्न केला आणि त्यांच्या श्रद्धेचे फलस्वरूप महाराज समाधी अवस्थेतून बाहेर आले तो दिवस होता सोमवारचा. पुढे दुसऱ्या दिवशी मंगळवारी...

श्री गजानन चरित्र दर्शन 17 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

श्री गजानन महाराज शेगांव मध्ये होते..महाराजांच्या लीला ची प्रचित अनेक भक्तांना येत होती..त्यामुळे दिवसेंदिवस.. भक्तांची गर्दी वाढतच होती..अचानक एक दिवस महाराजांच्या काय मनात आले माहित नाही... महाराज अचानक शेगांव सोडून... शेगांव जवळ असणाऱ्या पिंपळगाव गावात निघून...

श्री गजानन चरित्र दर्शन 16 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

ऐके दिवशी सर्व सेवेकरी मंडळी महाराजांच्या चरणी सेवा रुजू करत होते.. अचानक महाराजांनी सर्वांना बोलवले व म्हणाले... वसंत पंचमी च्या दिवशी घनपाठी ब्राम्हण बोलवा.. मंत्र जागर करूया.. तसेच सर्वांनी एक एक रुपया दक्षिणा देण्यासाठी काढावा... महाराजांची हि वाणी ऐकून सर्व...

श्री गजानन चरित्र दर्शन 15 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

शेगांवच्या दक्षिण दिशेला चिंचोली नावाचे गाव आहे. त्या गावात माधव नावाचे एक ब्राम्हण राहत होते. त्यांचे वय साधारण ६० पेक्षा जास्त होते. त्यांनी आपलें संपूर्ण आयुष्य हे संसार म्हणजे सर्वस्व या साठी खर्ची केले होते. आपल्या भविष्यात काय लिहून ठेवले आहे हे कुणासच माहित...