तुज चरणापासून नको दूर लोटू ! तुझ्या नामाचाच आहे मज आसरू !!

Feb 5, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

स्वामी वाणी पुष्प ५३७(पर्व ४ थे भाग ४१)

आजचे चिंतन-मनन

तुज चरणापासून नको दूर लोटू !
तुझ्या नामाचाच आहे मज आसरू !!
दृढ संकल्पाने तुझी सेवा करू !!
दास राहीन सदैव !!

www.SwamiVaani.com

स्वामीं भक्तहो…भगवंताकडे काय मागावे.. याची उत्तम प्रार्थना म्हणजे वरील शब्द…खरच समर्था खूप खूप धन्यवाद असे भाव, विचार वाणी आमच्या पर्यंत पोहचवतोस त्याबद्दल.. हीच तर तुझी कृपा आहे..समर्था काहीही होऊ दे पण आम्हाला तुझ्या चरणापासून दूर करू नकोस..इथे आपली गल्लत होऊ शकते स्वामीं चरण फक्त स्वामीं च्या मंदिरात आहेत का ? नाही तर सर्वत्र स्वामीं चरण आहेत..प्रत्येकाच्या हृदयात स्वामीं चा वास आहे..पण आपणस याचा विसर पडला आहे.. आपण इतरत्र स्वामीं ना शोधतो…आता ती वेळ आली आहे..स्वामींना प्रार्थना करूया समर्था तुझे जे स्थान ..चरण..हृदयात आहेत..त्या पासून मला दूर करू नकोस…आता आपणस स्वामीं च्या चरणांशी स्थान मिळाले..पण ते टिकवता आले पाहिजे..त्याला पर्याय काय.. स्वामीं नाम “”श्री स्वामीं समर्थ”” नामाचा जप..पण आपण सोपे साधन सोडून नको त्या मार्गाने स्वामींना शोधतो..म्हणून आज पुन्हा सर्वांना विनंती आहे..स्वामीं नाम घ्या..थोडे घ्या पण..माझे स्वामीं आईचे नाम घ्या..स्वामीं नामाची सवय कशी लागू शकते..दृढ संकल्पाने..जसे मी सामूहिक ११ कोटी स्वामीं नाम जप सेवेत एक वर्षात किमान ६,६६,६६६ स्वामीं नाम सेवा रुजू करेल..कुणी म्हणेल मी २१,००० सेवा रुजू करेल..हा झाला दृढ संकल्प… सामूहिक स्वामी नाम सेवा हे निमित्त आहे स्वामीं सेवेचे..पहा आजरी पडल्यावर आपण औषध घेतो.. पण आजारी पडू नये याचीच काळजी आपण घेतली तर..आपले मन आजारी पडते..मग आम्ही हताश होतो.. इकडे तिकडे भरकटत बसतो .जर आपण आजपासून मनाला स्वामीं नाम सेवेचे काम दिले तर..नक्कीच ते भरकटणार नाही..ते इतरांना देखील प्रेरणा देईल..इथे म्हंटले आहे..दास राहीन..इथे थोडक्यात आपणस आपल्या मनाचे दास न बनता.. आपल्या मनाला स्वामी चरणाचे.. स्वामीं नामाचे दास बनवायचे आहे..म्हणजेच आपल्या हृदयातील स्वामीं चरणी आपणस एकरूप व्हायचे आहे..यावर आपण स्वतः चिंतन मनन करा..खूप छान मार्गदर्शन स्वामीं करतील..स्वामीं नाम घ्या..धन्यवाद स्वामीं ही समज दिल्याबद्दल.. हे चिंतन करून घेतल्याबद्दल…!


Share
और पढिये !!

वेळ

भगवंताने सर्वांना एक गोष्ट सारखीच दिली आहे ती म्हणजे दिवसाचे २४ तास त्यामुळे आपण असे कधीच म्हणू शकत नाही कि माझ्या कडे वेळ नाही. वॉरन बफे म्हणतात - श्रीमंत लोक वेळेत गुंतवणूक करतात गरीब लोक पैशाची गुंतवणूक करतात मायकल आल्थसूलर - वेळ उडतो आपण त्याचे पायलट आहोत प्रत्येक...

राखी पौर्णिमा

राखी पौणिमा म्हणजे नात्याला घट्ट करण्याचा उत्सव..आपण वयाने मोठे झालो की काही कारणास्तव या नात्यात दुरावा येतो..या मागे कारण असते वडिलोपार्जित संपत्ती..जी खरं तर नात्यात दुरावा निर्माण करते..खरंतर या साठी कष्ट करणारा मरून जातो..आणि मेल्यावर विचार करतो यासाठीच केले होते...

आपण स्व आदर करतो का

आपण स्वतः ला काय समजतो - खरंतर हा प्रश्न आज पर्यंत आपण आपल्या स्वतःला विचारला आहे का ? विचारला असेल तर आपले आपल्या स्वतः बद्दल मत काय आहे? आपण स्वतः स्वतःचा आदर करता का ? याचे उत्तर काहींचे हो असेल काहींचे नाही असे असेल.. खरंतर जो पर्यंत आपण स्वतः आपला आदर करत नाही तो...

श्री दासबोध दशक १२ समास १

श्री दासबोध दशक १२ समास १ दासबोधातील दशक १२ मधील समास १ मध्ये श्री समर्थ रामदास स्वामी विमल लक्षण सांगत आहेत प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालावी हा उपदेश देत आहेत... प्रपंच करण्यात आळस करू नये.. अनेक लोक म्हणतात प्रपंच आणि परमार्थ एकत्र होऊ शकत नाही... रामदास स्वामी...

नृसिंह जयंती – नृसिंह जन्म कथा

आज नृसिंह जयंती निमित्त चला आपण नृसिंह जन्म कथा पाहूया हिरण्यकश्यपू राजा ह्यांनी भगवंताची भक्ती करून त्याला प्रसन्न करून घेतले होते व असा वर मागितला कि मला कोणत्याही माणसाकडून वा प्राण्याकडून मृत्य येऊ नये, दिवसा किंवा रात्री मृत्य येऊ नये , घरात नाही किंवा बाहेर...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 19 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज काही दिवस शेगांव मध्ये राहिले... परब्रम्ह जिथे आवश्यकता असते तिथे संचार करत असते. कुणीही त्यांना एका ठिकाणी अडकवून ठेवू शकत नाही. वऱ्हाड प्रांतात अडगाव नावाचे गाव आहे तिथे गजानन महाराज जाण्यासाठी निघाले . तो महिना होता वैशाख. वैशाख महिना...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 18 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

लीला क्रमांक १७ मध्ये आपण पहिले कि महाराज पिपंळगावात आले. समाधी अवस्थे मधून महाराज बाहेर यावेत व आपल्याशी बोलावेत यासाठी गावकर्यांनी कसा प्रयत्न केला आणि त्यांच्या श्रद्धेचे फलस्वरूप महाराज समाधी अवस्थेतून बाहेर आले तो दिवस होता सोमवारचा. पुढे दुसऱ्या दिवशी मंगळवारी...

श्री गजानन चरित्र दर्शन 17 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

श्री गजानन महाराज शेगांव मध्ये होते..महाराजांच्या लीला ची प्रचित अनेक भक्तांना येत होती..त्यामुळे दिवसेंदिवस.. भक्तांची गर्दी वाढतच होती..अचानक एक दिवस महाराजांच्या काय मनात आले माहित नाही... महाराज अचानक शेगांव सोडून... शेगांव जवळ असणाऱ्या पिंपळगाव गावात निघून...

श्री गजानन चरित्र दर्शन 16 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

ऐके दिवशी सर्व सेवेकरी मंडळी महाराजांच्या चरणी सेवा रुजू करत होते.. अचानक महाराजांनी सर्वांना बोलवले व म्हणाले... वसंत पंचमी च्या दिवशी घनपाठी ब्राम्हण बोलवा.. मंत्र जागर करूया.. तसेच सर्वांनी एक एक रुपया दक्षिणा देण्यासाठी काढावा... महाराजांची हि वाणी ऐकून सर्व...

श्री गजानन चरित्र दर्शन 15 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

शेगांवच्या दक्षिण दिशेला चिंचोली नावाचे गाव आहे. त्या गावात माधव नावाचे एक ब्राम्हण राहत होते. त्यांचे वय साधारण ६० पेक्षा जास्त होते. त्यांनी आपलें संपूर्ण आयुष्य हे संसार म्हणजे सर्वस्व या साठी खर्ची केले होते. आपल्या भविष्यात काय लिहून ठेवले आहे हे कुणासच माहित...