जिथे सर्व शास्त्र अपूर्ण ! तिथे स्वामी भक्ती पूर्ण !!

Feb 5, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

स्वामी वाणी पुष्प ५३३(पर्व ४ थे भाग ३७)

आजचे चिंतन-मनन

सर्व शास्त्र हुनी थोर !!
असे माझा स्वामीराव !!
जिथे सर्व शास्त्र अपूर्ण !
तिथे स्वामी भक्ती पूर्ण !!

www.SwamiVaani.com

स्वामी भक्तहो.. वाचताना असे वाटते कि आपण अर्थ समजला.. पण अर्थ इतका खोल आहे कि… आपणस लगेचच त्याचा विसर पडतो.. सर्व शास्त्रांहून थोर.. इथे आपली गल्लत होऊ शकते ती अशी कि आपण तुलना करत आहोत.. पण असे नाही.. प्रत्येक गोष्ट हि त्या ठिकाणी योग्य असते मग ते शास्त्र असो वा आणि काही.. सर्व शास्त्राची निर्मिती हि स्वामीच तर करतात… म्हणजेच इथे जर आपण विचार केला तर आपणस तुलना न करता स्वामींवर विश्वास दृढ करायचा आहे.. म्हणजेच क्षणिक गोष्टीत न अडकता स्वामी नामावर मनाला स्थिर कार्याचा आहे..जिथे सर्व शास्त्र अपूर्ण ! इथे आपल्यातील चुकीच्या मान्यतेवर प्रहार केला आहे.. पहा आपल्या जीवनात समस्या आहे.. समस्येतून मार्ग काढण्यासाठी आपण आध्यत्मिक सेवा करतो.. मग ती स्वामी सेवा असो वा आणखी काही.. पण स्वामी सेवा करतानाही आपण फक्त स्वामी सेवा करतो का नाही मग आपले मन म्हणते वा आणखी कुणी सांगते कि.. अमुक अमुक सेवा कर.. हे नाही ते कर… इथे एक गोष्ट परत सांगावीशी वाटते आपण कश्यावर टीका करत नाही आहोत पण जर आपली स्वामींवर श्रद्धा आहे.. विश्वास आहे मग का ? स्वामी सेवे व्यतिरिक्त आणखी सेवा करावी लागते.. का आपले मन अजूनही इतर सेवांकडे वळते.. का स्वामी नामावर स्थिर होत नाही.. कारण आपण स्वामींना आई म्हणून हाक मारत नाही.. आपली भक्ती अजून स्वामी चरणी दृढ नाही… आपणस हि भक्ती दृढ करायची आहे.. कोणतीही परिस्थिती येऊ मुखातून स्वामी नामच यावे.. म्हणजेच अंतर्मनात हा विचार कोरला गेला पाहिजे आता फक्त आणि फक्त स्वामी भक्ती.. स्वामी प्रेम..अशी स्वामी भक्ती प्रेम आपल्या जीवनात यावे हीच स्वामी चरणी प्रार्थना.. धन्यवाद समर्था.. !!

 


Share
और पढिये !!

वेळ

भगवंताने सर्वांना एक गोष्ट सारखीच दिली आहे ती म्हणजे दिवसाचे २४ तास त्यामुळे आपण असे कधीच म्हणू शकत नाही कि माझ्या कडे वेळ नाही. वॉरन बफे म्हणतात - श्रीमंत लोक वेळेत गुंतवणूक करतात गरीब लोक पैशाची गुंतवणूक करतात मायकल आल्थसूलर - वेळ उडतो आपण त्याचे पायलट आहोत प्रत्येक...

राखी पौर्णिमा

राखी पौणिमा म्हणजे नात्याला घट्ट करण्याचा उत्सव..आपण वयाने मोठे झालो की काही कारणास्तव या नात्यात दुरावा येतो..या मागे कारण असते वडिलोपार्जित संपत्ती..जी खरं तर नात्यात दुरावा निर्माण करते..खरंतर या साठी कष्ट करणारा मरून जातो..आणि मेल्यावर विचार करतो यासाठीच केले होते...

आपण स्व आदर करतो का

आपण स्वतः ला काय समजतो - खरंतर हा प्रश्न आज पर्यंत आपण आपल्या स्वतःला विचारला आहे का ? विचारला असेल तर आपले आपल्या स्वतः बद्दल मत काय आहे? आपण स्वतः स्वतःचा आदर करता का ? याचे उत्तर काहींचे हो असेल काहींचे नाही असे असेल.. खरंतर जो पर्यंत आपण स्वतः आपला आदर करत नाही तो...

श्री दासबोध दशक १२ समास १

श्री दासबोध दशक १२ समास १ दासबोधातील दशक १२ मधील समास १ मध्ये श्री समर्थ रामदास स्वामी विमल लक्षण सांगत आहेत प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालावी हा उपदेश देत आहेत... प्रपंच करण्यात आळस करू नये.. अनेक लोक म्हणतात प्रपंच आणि परमार्थ एकत्र होऊ शकत नाही... रामदास स्वामी...

नृसिंह जयंती – नृसिंह जन्म कथा

आज नृसिंह जयंती निमित्त चला आपण नृसिंह जन्म कथा पाहूया हिरण्यकश्यपू राजा ह्यांनी भगवंताची भक्ती करून त्याला प्रसन्न करून घेतले होते व असा वर मागितला कि मला कोणत्याही माणसाकडून वा प्राण्याकडून मृत्य येऊ नये, दिवसा किंवा रात्री मृत्य येऊ नये , घरात नाही किंवा बाहेर...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 19 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज काही दिवस शेगांव मध्ये राहिले... परब्रम्ह जिथे आवश्यकता असते तिथे संचार करत असते. कुणीही त्यांना एका ठिकाणी अडकवून ठेवू शकत नाही. वऱ्हाड प्रांतात अडगाव नावाचे गाव आहे तिथे गजानन महाराज जाण्यासाठी निघाले . तो महिना होता वैशाख. वैशाख महिना...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 18 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

लीला क्रमांक १७ मध्ये आपण पहिले कि महाराज पिपंळगावात आले. समाधी अवस्थे मधून महाराज बाहेर यावेत व आपल्याशी बोलावेत यासाठी गावकर्यांनी कसा प्रयत्न केला आणि त्यांच्या श्रद्धेचे फलस्वरूप महाराज समाधी अवस्थेतून बाहेर आले तो दिवस होता सोमवारचा. पुढे दुसऱ्या दिवशी मंगळवारी...

श्री गजानन चरित्र दर्शन 17 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

श्री गजानन महाराज शेगांव मध्ये होते..महाराजांच्या लीला ची प्रचित अनेक भक्तांना येत होती..त्यामुळे दिवसेंदिवस.. भक्तांची गर्दी वाढतच होती..अचानक एक दिवस महाराजांच्या काय मनात आले माहित नाही... महाराज अचानक शेगांव सोडून... शेगांव जवळ असणाऱ्या पिंपळगाव गावात निघून...

श्री गजानन चरित्र दर्शन 16 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

ऐके दिवशी सर्व सेवेकरी मंडळी महाराजांच्या चरणी सेवा रुजू करत होते.. अचानक महाराजांनी सर्वांना बोलवले व म्हणाले... वसंत पंचमी च्या दिवशी घनपाठी ब्राम्हण बोलवा.. मंत्र जागर करूया.. तसेच सर्वांनी एक एक रुपया दक्षिणा देण्यासाठी काढावा... महाराजांची हि वाणी ऐकून सर्व...

श्री गजानन चरित्र दर्शन 15 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

शेगांवच्या दक्षिण दिशेला चिंचोली नावाचे गाव आहे. त्या गावात माधव नावाचे एक ब्राम्हण राहत होते. त्यांचे वय साधारण ६० पेक्षा जास्त होते. त्यांनी आपलें संपूर्ण आयुष्य हे संसार म्हणजे सर्वस्व या साठी खर्ची केले होते. आपल्या भविष्यात काय लिहून ठेवले आहे हे कुणासच माहित...