स्वामी वाणी पुष्प ५२६(पर्व ४ थे भाग ३०)
आजचे चिंतन-मनन
अशक्य ही शक्य करतील स्वामी
जगी जन्म मृत्यु असे खेळ ज्यांचा ,
नको घाबरू तू असे बाळ त्यांचा |
www.SwamiVaani.com
स्वामीं भक्तहो..वरील ओवी वर चिंतन मनन काय करणार..कारण तारक मंत्रातील प्रत्येक शब्द हा..तारणहार आहे..स्वामीं भक्त आणि तारक मंत्र.. हे स्वामीं आणि स्वामीं भक्ताच्या नात्याला घट्ट करणारा दोर म्हणा साखळी म्हणा..काय ते भाव आहेत.. मनाला टॉनिक..बुडत्याला आधार..तारक मंत्र म्हणजे..जो स्वामीं भक्ताला तारतो.. भक्ती भाव ह्रदयात उत्पन्न करतो..या विषयी किती ही लिहिले तरी शब्द भांडार कमी पडेल..असो..आपण रोज तारक मंत्र सेवा करत असालच..करत नसाल तर सुरू करा..जगी.. म्हणजे केवळ भारतातच नाही तर संपूर्ण सृष्टीत..प्रत्येक जीवाच्या जन्म आणि मृत्यू ही स्वामीं ची लीला आहे..आणि अश्या या ब्रम्हांड नायकाचे आपण बालक आहोत..इथे बालक म्हणजे आपण त्यांचे बाळ आहोत..पहा आपण आपल्या बाळाची कशी काळजी घेतो..हातावरच्या फोडा पेक्षा अधिक..आपण आपल्या बाळाची काळजी घेतो..मग विचार करा आपण स्वामीं आईचे बाळ आहोत..स्वामीं आपली किती काळजी घेतात…हा अनुभव आहे..जो सूक्ष्म असतो..जो अनुभवता आला पाहिजे..कारण आपले मन चांगले झाले की कधी म्हणते का? स्वामीं मुळे झाले ? जेव्हा आपण छोट्या छोट्या गोष्टीत शोधू तेव्हा आपणस याचा अनुभव येतो..आपल्याला मनाला सांगता आले पाहिजे..घाबरू नकोस तू स्वामीं चा बाळ आहेस..हा पण इथे ही गोष्ट लक्षात असावी आपले कर्म स्वामीं ना भूषणावह असावे…एखादी गोष्ट आपणस अशक्य वाटत असेल तर..मनाला सांगा अशक्य असे काहीच नाही..कारण अशक्य हा शब्दच मुळात स्वामीं भक्ताला लागू होत नाही..मी फक्त १००% प्रयत्न करणार..आणि जो पर्यंत यश मिळत नाही..तो पर्यंत थांबणार नाही..कारण.. प्रत्येक वेळेस स्वामीं सांगतात की तू या पेक्षा चांगले करू शकतोस.. थांबू नकोस..पहा..सर्व काही शक्य होताना आपणस दिसेल.. धन्यवाद समर्था..! चला स्वामीं ना प्रार्थना करूया..हे समर्था..मी जाणतो की संपूर्ण ब्रम्हांड चा तूच तर चालक आहे..पण माझे मन।हे विसरते.. हे विसरल्या मुळे.. घाबरते..या मनाचा हा विसराळू पणा कायमचा दूर कर..अशक्य हा शब्द आमच्या मनातून..विचारातून काढून टाक.. कारण मी तुझे बालक आहे..आणि तू कधीच आम्हाला भरकटू देत नाहीस..ही समज दिल्याबद्दल धन्यवाद.. ही प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद…!