दत्त येऊनिया ऊभा ठाकला

Feb 5, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

स्वामी वाणी पुष्प ५२५(पर्व ४ थे भाग २९)

दत्त येऊनिया ऊभा ठाकला ,
सदभावे साष्टांगेसी प्रणिपात केला |
प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला ,
जन्ममरणाचा फेरा चुकवीला ||

– श्री दत्त महाराजांची आरती
www.SwamiVaani.com

स्वामीं भक्तहो..वरील ओवी वर आपण चिंतन मनन केले असेलच.. लहानपणा पासून श्री दत्त प्रभूंच्या आरती चे कडवे मी म्हणत आहे..आपण ही म्हणत।असाल..पण जेव्हा यावर चिंतन मनन करण्याची आज वेळ आली.. काहीच चिंतन झाले नाही..मग स्वामीं मार्ग दाखवतात.. आणि एका क्षणात स्वामीं नी एका स्वामीं भक्ता मार्फत उत्तर दिले..सर्व प्रथम त्यांना धन्यवाद..ही आरती श्री समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिली असे म्हंटले जाते..या बाबत आपणस माहिती असेल तर आपण सांगावे..भाव इतका खोल आहे की..तो शब्दांत नाही..हे आरतीचे कडवे म्हणजे अनुभव.. दत्त येऊनिया उभा ठाकला..इथे दत्त म्हणजे..परमेश्वराची अनुभीत…आपण म्हणतो संकटात कुणी मदत केली की..दत्ता सारखा उभा राहिलास..म्हणजेच आपल्या ध्यानी मनी नसताना कुणी तरी मदत करते..स्वामीं अनुभूती सुद्धा अशीच आहे..कोणतीच अपेक्षा न करता आपण जेव्हा स्वामीं सेवा करतो..नाम घेतो..नामातून आपण सहज ध्यानात प्रवेश करतो..ध्यानात कधी आपणस स्वामीं अनुभव येतो..आपणस ही कळत नाही..या अनुभूती मध्ये.. फक्त स्वामीं आणि आपणच असतो..या अवस्थेत जेव्हा आपण असतो..ती अवस्था म्हणजे स्वामीं च्या प्रसन्न मुद्रेची अवस्था..स्वामीं यात आशीर्वाद देतात..ही अवस्था म्हणजे.. जन्म आणि मृत्यू च्या पली कडची अवस्था..स्वामीं महाराज आपल्या प्रत्येक भक्ताला ही अवस्था मिळावी असे स्वामीं आईचे नियोजन आहे..फक्त गरज आहे..अखंड स्वामीं नाम सेवेची..स्वामीं भक्तहो..चला आपण सर्व मिळून स्वामींना प्रार्थना करूया..हे समर्था..आज या आरतीतील भावाला निमित्त करून आमच्यात जो भक्ती भाव जागृत केलास त्याबद्दल धन्यवाद.. तुझी तर इच्छा आहे की प्रत्येकाला स्वामीं तत्वाची अनुभूती द्यावी..परंतु माझे मन त्यात बाधा निर्माण करते..कृपा।कर माझ्या मनाची चावी तुझ्याकडे घे.. आमच्याकडून अखंड स्वामीं नाम सेवा..अखंड ध्यान सेवा करून घे…कारण तुझ्या इच्छे शिवाय हे होऊ शकत नाही..धन्यवाद समर्था..धन्यवाद चिंतन मनन करून घेतल्याबद्दल.. धन्यवाद प्रार्थना करून घेतल्याबद्दल..!


Share
और पढिये !!

वेळ

भगवंताने सर्वांना एक गोष्ट सारखीच दिली आहे ती म्हणजे दिवसाचे २४ तास त्यामुळे आपण असे कधीच म्हणू शकत नाही कि माझ्या कडे वेळ नाही. वॉरन बफे म्हणतात - श्रीमंत लोक वेळेत गुंतवणूक करतात गरीब लोक पैशाची गुंतवणूक करतात मायकल आल्थसूलर - वेळ उडतो आपण त्याचे पायलट आहोत प्रत्येक...

राखी पौर्णिमा

राखी पौणिमा म्हणजे नात्याला घट्ट करण्याचा उत्सव..आपण वयाने मोठे झालो की काही कारणास्तव या नात्यात दुरावा येतो..या मागे कारण असते वडिलोपार्जित संपत्ती..जी खरं तर नात्यात दुरावा निर्माण करते..खरंतर या साठी कष्ट करणारा मरून जातो..आणि मेल्यावर विचार करतो यासाठीच केले होते...

आपण स्व आदर करतो का

आपण स्वतः ला काय समजतो - खरंतर हा प्रश्न आज पर्यंत आपण आपल्या स्वतःला विचारला आहे का ? विचारला असेल तर आपले आपल्या स्वतः बद्दल मत काय आहे? आपण स्वतः स्वतःचा आदर करता का ? याचे उत्तर काहींचे हो असेल काहींचे नाही असे असेल.. खरंतर जो पर्यंत आपण स्वतः आपला आदर करत नाही तो...

श्री दासबोध दशक १२ समास १

श्री दासबोध दशक १२ समास १ दासबोधातील दशक १२ मधील समास १ मध्ये श्री समर्थ रामदास स्वामी विमल लक्षण सांगत आहेत प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालावी हा उपदेश देत आहेत... प्रपंच करण्यात आळस करू नये.. अनेक लोक म्हणतात प्रपंच आणि परमार्थ एकत्र होऊ शकत नाही... रामदास स्वामी...

नृसिंह जयंती – नृसिंह जन्म कथा

आज नृसिंह जयंती निमित्त चला आपण नृसिंह जन्म कथा पाहूया हिरण्यकश्यपू राजा ह्यांनी भगवंताची भक्ती करून त्याला प्रसन्न करून घेतले होते व असा वर मागितला कि मला कोणत्याही माणसाकडून वा प्राण्याकडून मृत्य येऊ नये, दिवसा किंवा रात्री मृत्य येऊ नये , घरात नाही किंवा बाहेर...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 19 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज काही दिवस शेगांव मध्ये राहिले... परब्रम्ह जिथे आवश्यकता असते तिथे संचार करत असते. कुणीही त्यांना एका ठिकाणी अडकवून ठेवू शकत नाही. वऱ्हाड प्रांतात अडगाव नावाचे गाव आहे तिथे गजानन महाराज जाण्यासाठी निघाले . तो महिना होता वैशाख. वैशाख महिना...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 18 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

लीला क्रमांक १७ मध्ये आपण पहिले कि महाराज पिपंळगावात आले. समाधी अवस्थे मधून महाराज बाहेर यावेत व आपल्याशी बोलावेत यासाठी गावकर्यांनी कसा प्रयत्न केला आणि त्यांच्या श्रद्धेचे फलस्वरूप महाराज समाधी अवस्थेतून बाहेर आले तो दिवस होता सोमवारचा. पुढे दुसऱ्या दिवशी मंगळवारी...

श्री गजानन चरित्र दर्शन 17 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

श्री गजानन महाराज शेगांव मध्ये होते..महाराजांच्या लीला ची प्रचित अनेक भक्तांना येत होती..त्यामुळे दिवसेंदिवस.. भक्तांची गर्दी वाढतच होती..अचानक एक दिवस महाराजांच्या काय मनात आले माहित नाही... महाराज अचानक शेगांव सोडून... शेगांव जवळ असणाऱ्या पिंपळगाव गावात निघून...

श्री गजानन चरित्र दर्शन 16 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

ऐके दिवशी सर्व सेवेकरी मंडळी महाराजांच्या चरणी सेवा रुजू करत होते.. अचानक महाराजांनी सर्वांना बोलवले व म्हणाले... वसंत पंचमी च्या दिवशी घनपाठी ब्राम्हण बोलवा.. मंत्र जागर करूया.. तसेच सर्वांनी एक एक रुपया दक्षिणा देण्यासाठी काढावा... महाराजांची हि वाणी ऐकून सर्व...

श्री गजानन चरित्र दर्शन 15 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

शेगांवच्या दक्षिण दिशेला चिंचोली नावाचे गाव आहे. त्या गावात माधव नावाचे एक ब्राम्हण राहत होते. त्यांचे वय साधारण ६० पेक्षा जास्त होते. त्यांनी आपलें संपूर्ण आयुष्य हे संसार म्हणजे सर्वस्व या साठी खर्ची केले होते. आपल्या भविष्यात काय लिहून ठेवले आहे हे कुणासच माहित...