स्वामी भक्तहो सर्वांना विनंती आहे प्रत्येकाने रोज थोडी तरी स्वामी नाम सेवा आणि किमान एकदा तरी तारक मंत्र सेवा करा.. आपण दिवस भरात किती तरी वेळ वाया घालवतो ते आपणस जाणवतही नाही.. आणि जेव्हा स्वामी नाम सेवा येते तेव्हा आपले मन कारणे देते.. हि सामूहिक सेवा आहे.. या मध्ये प्रत्येकाचा वाटा हा महत्वपूर्ण आहे.. जर खरंच वेळ नसेल तर किमान १ वेळेस स्वामी नाम घ्या १ वेळेस तारक मंत्र म्हणा आणि ती सेवा लिंक वर पाठवा.. आपण किती सेवा करता या पेक्षा महत्वाचे सेवा करणे.. आणि सेवेत सातत्य येणे महत्वाचे आहे… आपणस फक्त नाम सेवा करण्याची इथे विनंती करत आहोत.. कारण स्वामी नाम मुखात येण्यासाठी सुद्धा… स्वामीं आईची कृपा लागते.. ती कृपा आपल्या सर्वांवर आहे.. पण आपले मन कारणे देत आहे.. थोडे मनावर कार्य करा.. मन नाही म्हणेल तरी किमान रोज एक वेळेस तरी स्वामी नाम घ्या…लवकरच स्वामी १ माळ जप सेवा करून घेतील.. आणी एक दिवस येईल कि रोजची ११ माळी , २१ माळी , ५१ माळी सेवा होईल.. फक्त गरज आहे.. आपल्या मनावर विजय प्राप्त करण्याची आवश्यकता आहे.. चला तर मग ज्यांनी अजून सेवा सुरु केली नाही.. त्यांनी आज , या क्षणापासून सुरवात करावी हि विनंती..स्वामींना प्रार्थना करा.. स्वामी राया सेवा करून घे.. कारण तुझे नाम मुखात येण्यासाठी..तुझी कृपाच आवश्यक आहे.. समर्था कृपा कर..आमच्या प्रत्येकाकडून स्वामी नाम सेवा करून घे.. समर्था कृपा कर.. धन्यवाद समर्था.. हि समज दिल्याबद्दल धन्यवाद..!!
वेळ
भगवंताने सर्वांना एक गोष्ट सारखीच दिली आहे ती म्हणजे दिवसाचे २४ तास त्यामुळे आपण असे कधीच म्हणू शकत नाही कि माझ्या कडे वेळ नाही. वॉरन बफे म्हणतात - श्रीमंत लोक वेळेत गुंतवणूक करतात गरीब लोक पैशाची गुंतवणूक करतात मायकल आल्थसूलर - वेळ उडतो आपण त्याचे पायलट आहोत प्रत्येक...