स्वामीं नाम आणि आपले जीवन

Feb 3, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

💐 *स्वामी वाणी पुष्प ५७७(पर्व ४ थे भाग ८१)*

*आजचे चिंतन-मनन*

नाम घ्यावे,नाम द्यावे !
नाम सांगावे, नाम ऐकावे !
नाम पुजावे,नाम भजावे !
अवघे जीवन करावे नाममय !!

www.SwamiVaani.co.in

स्वामीं भक्त हो..नामाचा महिमा काय वर्णन करावा..नामाचा महिमा हा जेव्हा आपण नाम घेतो..त्यात सातत्य ठेवतो..तेव्हा नामाचा महिमा अनुभवास येतो..जर आपणस नामाची अनुभूती हवी असेल तर नाम घ्या..कोणतेही नाम घ्या…असे नाही की अमुकच नाम घ्यावे..कोणतेही नाम घ्यावे..नामावर मनाल स्थिर करा…नाम द्यावे..इथे आपणस वाटते की इतरांना नाम दयाचे आहे..असे नाही तर आपल्या मनाला, विचारांना खाद्य द्यावे कशाचे तर नामाचे.. रोज जेवतो..तसे मनाला ही खाद्य हवे आहे कोणते..नामाचे..मनाला नाम रुपी सेवेचे खाद्य द्या..नाम सांगावे.. इथे आपणस वाटते की इतरांना नाम घेण्यास सांगायचे आहे..असे नाहीये..आपल्या मनाला सांगा आता बाकी काही आवश्यकता नाही..स्वामीं नामच सर्व काही आहे..आता किती दिवस ही सेवा करू की ती करू..नको नको आता फक्त मनाला एकच ध्यास लागावा..यासाठी स्वामीं नाम घ्यावे..नाम ऐकावे..काय ऐकावे हे सुद्धा आपणस इथे स्वामीं समज देत आहेत.. स्वामीं नाम ऐका.. स्वामीं चरित्र ऐका.. स्वामीं महिमा ऐका.. आपण दिवसाची सुरुवात कशाने करतो..सकाळी उठले की काय ऐकतो..सकारात्मक विचार ऐकणे हे सुद्धा स्वामीं नामच..म्हणजेच असे ऐका ज्याने आपली चेतना उंचावेल..बाकी काही नाही ऐकता आले तर..स्वतः स्वामी नाम घ्या आपल्याला ऐकू येईल त्या आवाजात..तेच श्रवण करा…नाम पुजावे.. इथे आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो..नामाची पुजा करायची म्हणजे काय..आता एक उदाहरण पहा आपण काय जपतो, कशाची पुजा करतो..दिवस रात्र आपण कष्ट करतो..पैसे कमवण्यासाठी..म्हणजेच एक प्रकारे पूजा करतो..पैसे आवश्यक आहेतच..आता मग स्वामी नामाची पुजा कशी करावी..ज्याप्रमाणे आपण नेहमी पैसे कमी होऊ नये या साठी प्रयत्न करतो..त्याचप्रमाणे ” स्वामी नामाची पुजा करा” स्वामी नामाचा विसर होणार नाही, जसा पैसे महत्वाचे तसे आपल्या जीवनात नामाला महत्व द्या..जसा पैसे वाढतात तसे आपल्या जीवनात नामाचे महत्त्व वाढावे..ही एकच अशी गोष्ट आहे जी आपल्या जीवनातून कमी करू शकत नाही..नाम असे जपा की शेवटचा श्वास हा स्वामी नामाचाच असेल..या साठी रोज स्वामीं नाम घ्या..नाम भजावे.. नाम भजावे म्हणजे आपल्या मुखाने स्वामीं नाम घ्या..बाकी वायफळ बडवड करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा आपल्या जिभेला स्वामीं नामाची गोडी द्या..पहा जेव्हा जिभेला ही सवय लागेल तेव्हा प्रत्येक परिस्थितीत स्वामीं नामच येईल..आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण हा स्वामीं नाममय बनवू..इथे आपल्या मनात येते असे कसे.. अहो जेव्हा आपल्या मनात हा भाव निर्माण होईल स्वामीं नाम सेवा ( इतर कोणतेही नाम) ही सेवा स्वयंपूर्ण सेवा आहे..आता बाकी कोणती सेवेची आवश्यकता नाही..हे जेव्हा आपल्या अंतर्मनात कोरले जाईल…स्वामीं नामच आपल्या।मुखातून येईल..स्वामीं भजन होईल..प्रत्येक कर्म स्वामीं सेवा वाटेल तेव्हाच आपले जीवन स्वामीं मय होणार आहे..या साठी आपणस रोज स्वामीं नाम सेवा करायची आहे..स्वामीं ना प्रार्थना करायची आहे..नक्कीच स्वामीं कृपा होत आहे..आपले जीवन स्वामीं मय होत आहे..धन्यवाद स्वामीं.. कोटी कोटी धन्यवाद.. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय..!


Share
और पढिये !!

वेळ

भगवंताने सर्वांना एक गोष्ट सारखीच दिली आहे ती म्हणजे दिवसाचे २४ तास त्यामुळे आपण असे कधीच म्हणू शकत नाही कि माझ्या कडे वेळ नाही. वॉरन बफे म्हणतात - श्रीमंत लोक वेळेत गुंतवणूक करतात गरीब लोक पैशाची गुंतवणूक करतात मायकल आल्थसूलर - वेळ उडतो आपण त्याचे पायलट आहोत प्रत्येक...

राखी पौर्णिमा

राखी पौणिमा म्हणजे नात्याला घट्ट करण्याचा उत्सव..आपण वयाने मोठे झालो की काही कारणास्तव या नात्यात दुरावा येतो..या मागे कारण असते वडिलोपार्जित संपत्ती..जी खरं तर नात्यात दुरावा निर्माण करते..खरंतर या साठी कष्ट करणारा मरून जातो..आणि मेल्यावर विचार करतो यासाठीच केले होते...

आपण स्व आदर करतो का

आपण स्वतः ला काय समजतो - खरंतर हा प्रश्न आज पर्यंत आपण आपल्या स्वतःला विचारला आहे का ? विचारला असेल तर आपले आपल्या स्वतः बद्दल मत काय आहे? आपण स्वतः स्वतःचा आदर करता का ? याचे उत्तर काहींचे हो असेल काहींचे नाही असे असेल.. खरंतर जो पर्यंत आपण स्वतः आपला आदर करत नाही तो...

श्री दासबोध दशक १२ समास १

श्री दासबोध दशक १२ समास १ दासबोधातील दशक १२ मधील समास १ मध्ये श्री समर्थ रामदास स्वामी विमल लक्षण सांगत आहेत प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालावी हा उपदेश देत आहेत... प्रपंच करण्यात आळस करू नये.. अनेक लोक म्हणतात प्रपंच आणि परमार्थ एकत्र होऊ शकत नाही... रामदास स्वामी...

नृसिंह जयंती – नृसिंह जन्म कथा

आज नृसिंह जयंती निमित्त चला आपण नृसिंह जन्म कथा पाहूया हिरण्यकश्यपू राजा ह्यांनी भगवंताची भक्ती करून त्याला प्रसन्न करून घेतले होते व असा वर मागितला कि मला कोणत्याही माणसाकडून वा प्राण्याकडून मृत्य येऊ नये, दिवसा किंवा रात्री मृत्य येऊ नये , घरात नाही किंवा बाहेर...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 19 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज काही दिवस शेगांव मध्ये राहिले... परब्रम्ह जिथे आवश्यकता असते तिथे संचार करत असते. कुणीही त्यांना एका ठिकाणी अडकवून ठेवू शकत नाही. वऱ्हाड प्रांतात अडगाव नावाचे गाव आहे तिथे गजानन महाराज जाण्यासाठी निघाले . तो महिना होता वैशाख. वैशाख महिना...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 18 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

लीला क्रमांक १७ मध्ये आपण पहिले कि महाराज पिपंळगावात आले. समाधी अवस्थे मधून महाराज बाहेर यावेत व आपल्याशी बोलावेत यासाठी गावकर्यांनी कसा प्रयत्न केला आणि त्यांच्या श्रद्धेचे फलस्वरूप महाराज समाधी अवस्थेतून बाहेर आले तो दिवस होता सोमवारचा. पुढे दुसऱ्या दिवशी मंगळवारी...

श्री गजानन चरित्र दर्शन 17 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

श्री गजानन महाराज शेगांव मध्ये होते..महाराजांच्या लीला ची प्रचित अनेक भक्तांना येत होती..त्यामुळे दिवसेंदिवस.. भक्तांची गर्दी वाढतच होती..अचानक एक दिवस महाराजांच्या काय मनात आले माहित नाही... महाराज अचानक शेगांव सोडून... शेगांव जवळ असणाऱ्या पिंपळगाव गावात निघून...

श्री गजानन चरित्र दर्शन 16 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

ऐके दिवशी सर्व सेवेकरी मंडळी महाराजांच्या चरणी सेवा रुजू करत होते.. अचानक महाराजांनी सर्वांना बोलवले व म्हणाले... वसंत पंचमी च्या दिवशी घनपाठी ब्राम्हण बोलवा.. मंत्र जागर करूया.. तसेच सर्वांनी एक एक रुपया दक्षिणा देण्यासाठी काढावा... महाराजांची हि वाणी ऐकून सर्व...

श्री गजानन चरित्र दर्शन 15 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

शेगांवच्या दक्षिण दिशेला चिंचोली नावाचे गाव आहे. त्या गावात माधव नावाचे एक ब्राम्हण राहत होते. त्यांचे वय साधारण ६० पेक्षा जास्त होते. त्यांनी आपलें संपूर्ण आयुष्य हे संसार म्हणजे सर्वस्व या साठी खर्ची केले होते. आपल्या भविष्यात काय लिहून ठेवले आहे हे कुणासच माहित...