क्षमा म्हणजे काय ?

Jan 31, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

💐 *स्वामी वाणी पुष्प ५७४(पर्व ४ थे भाग ७८)*

*आजचे चिंतन-मनन*

जया अंगी क्षमा भाव करुणेचा !
ऐसा भक्त सदैव प्रिय स्वामींचा !!
म्हणोनि चुकलेल्या माफ करावे !
चूक झाली तर नम्र भावें माफी मागावे !!

www.SwamiVaani.co.in

स्वामीं भक्तहो.. क्षमा म्हणजे काय? इंग्रजीत आपण सॉरी म्हणतो..कुणी सॉरी म्हंटलं की..इंग्रजीत आपण It’s ok किंवा अजून काही म्हणतो..इतकाच अर्थ आहे का क्षमा या शब्दाचा..यांवर आपण चिंतन मनन करणे खूप आवश्यक आहे..जो पर्यंत आपण क्षमा या शब्दाचा अर्थ समजून घेत नाही तो पर्यंत क्षमा हा गुण आपण आपल्यात धारण करू शकत नाही..जो पर्यंत हा गुण धारण करत नाही..तो पर्यंत स्वामीं च्या जवळ आपण पोहचू शकत नाही..पहा आपण आपल्याकडून काही चुकी झाली तर आपण।ह्रदयातून माफी मागतो का ? हा प्रश्न आज स्वतः ला विचारायचा आहे? उत्तर हो आले तर खूपच छान..नाही आले तर..यांवर चिंतन करा असे का होत आहे.. आता काही म्हणेल मी सर्वांची माफी मागू शकतो..सर्वांना माफ ही करू शकतो पण एका व्यक्तीला कधीच माफ करू शकत नाही..याचाच अर्थ आपल्यात क्षमा हा गुण अजून अवगत झाला नाही..पहा जर आपण यात व्यक्ती नुसार बदल केला तर आपण कधीच कुणालाच माफ करू शकणार नाही.. पहा आज पर्यंत आपण ही अनेक चुका केल्या असतील..करत ही असतो..आपल्याला आपल्या आई वडिलांनी माफ केले की नाही.. आपण आपल्या मुलांना माफ करतो की नाही..मग आपण सर्वांना माफ का नाही करू शकत..आपले चुकत असेल..आपले चुकले असेल तर आपण माफी का नाही मागत..कारण आपल्यातील अहंकार जागृत आहे.. जर आपल्यात अहंकार असेल तर आपण स्वामींच्या जवळ कसे जाणार..जाऊच शकत नाही..म्हणून आज या क्षणापासून हा गुण धारण करा..त्यावर काम करा..पहा कसे छान वाटते..इथे आणखी एक महत्वाची गोष्ट स्वतःला ही माफ करा..कारण अनेकजण स्वतःला माफ करत नाहीत..मनातल्या मनात कुढत राहतात..तुमच्याकडून चुकी झाली.. झालेली चुकी ची माफी मागा..नाही मागू शकत स्वामीं समोर मागा.. पहा किती मोकळे।मोकळे वाटते..क्षमा करणे व क्षमा मागणे हे स्वामींच्या जवळ जाण्याचा मार्ग आहे..या मार्गाचा जो अवलंब करतो तो स्वामीं चा सदैव प्रिया भक्त होतो…आपल्या सर्वांना स्वामीं चा प्रिय भक्त व्हायचे आहे ना! मग एकच उपाय..क्षमा करा..क्षमा मागा..चला।आजपासूनच या सेवेला सुरवात करूया..स्वामींच्या जवळ रोज क्षमा प्रार्थना करूया..हे समर्था मला माफ..आज पर्यंत क्षमा मागितली नाही त्याबद्दल माफ कर…आमच्यात क्षमा हा गुण वाढव..आम्हाला सर्वांना माफ करण्याची शक्ती दे..समज दे..आम्हाला स्वतःला माफ करण्याची समज दे..आज पर्यंत आमच्याकडून जाणते..अजाणतेपणी कुणाचेही मन दुखावले गेले असले तर आम्हाला माफ कर..आमच्या मनातून त्या व्यक्तीबद्दल आदर भाव..प्रेम निर्माण कर..हे तुझ्या कृपे शिवाय शकय नाही..कृपा कर.. ही समज दिल्याबद्दल धन्यवाद.. ही प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद.. बोला श्री स्वामीं समर्थ महाराज की जय..!


Share
और पढिये !!

वेळ

भगवंताने सर्वांना एक गोष्ट सारखीच दिली आहे ती म्हणजे दिवसाचे २४ तास त्यामुळे आपण असे कधीच म्हणू शकत नाही कि माझ्या कडे वेळ नाही. वॉरन बफे म्हणतात - श्रीमंत लोक वेळेत गुंतवणूक करतात गरीब लोक पैशाची गुंतवणूक करतात मायकल आल्थसूलर - वेळ उडतो आपण त्याचे पायलट आहोत प्रत्येक...

राखी पौर्णिमा

राखी पौणिमा म्हणजे नात्याला घट्ट करण्याचा उत्सव..आपण वयाने मोठे झालो की काही कारणास्तव या नात्यात दुरावा येतो..या मागे कारण असते वडिलोपार्जित संपत्ती..जी खरं तर नात्यात दुरावा निर्माण करते..खरंतर या साठी कष्ट करणारा मरून जातो..आणि मेल्यावर विचार करतो यासाठीच केले होते...

आपण स्व आदर करतो का

आपण स्वतः ला काय समजतो - खरंतर हा प्रश्न आज पर्यंत आपण आपल्या स्वतःला विचारला आहे का ? विचारला असेल तर आपले आपल्या स्वतः बद्दल मत काय आहे? आपण स्वतः स्वतःचा आदर करता का ? याचे उत्तर काहींचे हो असेल काहींचे नाही असे असेल.. खरंतर जो पर्यंत आपण स्वतः आपला आदर करत नाही तो...

श्री दासबोध दशक १२ समास १

श्री दासबोध दशक १२ समास १ दासबोधातील दशक १२ मधील समास १ मध्ये श्री समर्थ रामदास स्वामी विमल लक्षण सांगत आहेत प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालावी हा उपदेश देत आहेत... प्रपंच करण्यात आळस करू नये.. अनेक लोक म्हणतात प्रपंच आणि परमार्थ एकत्र होऊ शकत नाही... रामदास स्वामी...

नृसिंह जयंती – नृसिंह जन्म कथा

आज नृसिंह जयंती निमित्त चला आपण नृसिंह जन्म कथा पाहूया हिरण्यकश्यपू राजा ह्यांनी भगवंताची भक्ती करून त्याला प्रसन्न करून घेतले होते व असा वर मागितला कि मला कोणत्याही माणसाकडून वा प्राण्याकडून मृत्य येऊ नये, दिवसा किंवा रात्री मृत्य येऊ नये , घरात नाही किंवा बाहेर...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 19 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज काही दिवस शेगांव मध्ये राहिले... परब्रम्ह जिथे आवश्यकता असते तिथे संचार करत असते. कुणीही त्यांना एका ठिकाणी अडकवून ठेवू शकत नाही. वऱ्हाड प्रांतात अडगाव नावाचे गाव आहे तिथे गजानन महाराज जाण्यासाठी निघाले . तो महिना होता वैशाख. वैशाख महिना...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 18 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

लीला क्रमांक १७ मध्ये आपण पहिले कि महाराज पिपंळगावात आले. समाधी अवस्थे मधून महाराज बाहेर यावेत व आपल्याशी बोलावेत यासाठी गावकर्यांनी कसा प्रयत्न केला आणि त्यांच्या श्रद्धेचे फलस्वरूप महाराज समाधी अवस्थेतून बाहेर आले तो दिवस होता सोमवारचा. पुढे दुसऱ्या दिवशी मंगळवारी...

श्री गजानन चरित्र दर्शन 17 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

श्री गजानन महाराज शेगांव मध्ये होते..महाराजांच्या लीला ची प्रचित अनेक भक्तांना येत होती..त्यामुळे दिवसेंदिवस.. भक्तांची गर्दी वाढतच होती..अचानक एक दिवस महाराजांच्या काय मनात आले माहित नाही... महाराज अचानक शेगांव सोडून... शेगांव जवळ असणाऱ्या पिंपळगाव गावात निघून...

श्री गजानन चरित्र दर्शन 16 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

ऐके दिवशी सर्व सेवेकरी मंडळी महाराजांच्या चरणी सेवा रुजू करत होते.. अचानक महाराजांनी सर्वांना बोलवले व म्हणाले... वसंत पंचमी च्या दिवशी घनपाठी ब्राम्हण बोलवा.. मंत्र जागर करूया.. तसेच सर्वांनी एक एक रुपया दक्षिणा देण्यासाठी काढावा... महाराजांची हि वाणी ऐकून सर्व...

श्री गजानन चरित्र दर्शन 15 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

शेगांवच्या दक्षिण दिशेला चिंचोली नावाचे गाव आहे. त्या गावात माधव नावाचे एक ब्राम्हण राहत होते. त्यांचे वय साधारण ६० पेक्षा जास्त होते. त्यांनी आपलें संपूर्ण आयुष्य हे संसार म्हणजे सर्वस्व या साठी खर्ची केले होते. आपल्या भविष्यात काय लिहून ठेवले आहे हे कुणासच माहित...