ध्यान म्हणजे काय?

Sep 21, 2022 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

 

 

ध्यान..ध्यान म्हणजे काय? खरंच ध्यान म्हणजे काय..आपण अनेकदा ऐकतो ध्यान केले पाहिजे..पण ध्यान म्हणजे काय..आपण याचे अनेक फायदे ऐकतो..मग आपणासही वाटते ध्यान करावे..मग प्रत्येक जण म्हणतो की अमुक अमुक ध्यानाची पद्धती श्रेष्ठ आहे..आणि मग ध्यान ध्यान न राहता एक तांत्रिक पद्धत बनते..खरंतर ध्यान म्हणजे सृष्टीची अशी व्यवस्था ज्यात आपण..आपल्या स्व अवस्थेवर जाण्यासाठी केलेला प्रयत्न..म्हणजेच काय ज्या अवस्थेत आपण आपल्या स्वतःशी संवाद साधू शकतो अशी पद्धती म्हणजे ध्यान..असो..जशी व्यक्ती तितक्या प्रकृती तसेच प्रत्येकाची ध्यान करण्याची वेगळी वेगळी पद्धती असणार..आणि ती चुकीची असू शकत नाही..म्हणून सर्वप्रथम आपणस अमुक एक पद्धतीच योग्य असा जर आपल्या मनात असेल तर आपणस सर्वप्रथम काढून टाकायचा आहे..कारण ध्यानाची सुरवातच विना अट होते..
ध्यानात सुरवातच मुळात मनावर होते..आपण ध्यान करण्यास सुरुवात करतो..आपले मन पहिल्या दिवशी विरोध करत नाही..पण एक दोन दिवसात आपणस नको नको वाटते..आपले मन आज नको उद्या करू असा प्रतिसाद देते..म्हणुन सर्वप्रथम आपणस मन नाही म्हंटले तरी ध्यान करण्यासाठी बसायचे आहे..ध्यान करण्यास बसले की मनात विचारांचा काहूर सुरू होईल..जसे विचार येतील तसे जातील ही..पण आपले काय होते..मी आज ध्यान केले म्हणजे लगेचच माझे मन निर्विचार झाले पाहिजे..खरंतर असे एका दिवसात होऊ शकत नाही..या साठी अनेक वर्षे आपणस दयावे लागतील..काही जण ध्यान या मुळे करत नाहीत कारण मनातील विचार थांबत नाहीत..खरंतर आपण कधीच निर्विचार होणार नाही मग आपण कधीच ध्यान करणार नाही का..सर्वप्रथम हा विचार मनातून काढून टाका की..ध्यान करताना विचारच मनात आले नाही पाहिजे..जसे विचार येतील तसे ते निघूनही जातात..फक्त गरज आहे आपण बसण्याची..आता मनात प्रश्न येतो की ध्यान किती वेळ करावे.. दिवसातील किमान २० मिनिटे आपण ध्यान करावे…सुरवातीला ही वेळ खूप मोठी वाटेल..पण सराव केल्यानंतर ही वेळ फार कमी वाटेल..म्हणून आज पासून किमान २० मिनिटे स्वतः साठी देऊया…ध्यान करताना अनेकांच्या मनात प्रश्न असतो की कुठे बसून ध्यान करावे.. कसे बसावे..खरंतर ज्या ठिकाणी २० मिनिट आपण बसू शकतो..ज्या आसनात आपणस त्रास होत नाही..अश्या ठिकाणी..आसनात बसून ध्यान करावे…मग खुर्चीवर बसूनही आपण ध्यान करू शकतो…
आता ध्यान कोणते करावा हा प्रश्न आपल्या मनात निर्माण होतो..खरंतर वर सांगितल्याप्रमाणे आपणस जे योग्य वाटेल..त्या पासून सुरवात करा..सुरवात महत्वाची..इथे पद्धती सांगत आहोंत..
१)श्वासावर ध्यान- यात आपण केवळ आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करतो..म्हणजे आपणस डोळे मिटून बसायचे.. मोबाईल।मध्ये २० मिनिटांचा टाईमर लावा.. हळूहळू डोळे बंद करा..आपले लक्ष श्वासावर केंद्रित करा..आपणस लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करायचा आहे..अनेकदा आपले लक्ष विचलित होते..परत आपणस त्याला श्वासावर केंद्रित करायचे आहे..ही पद्धत आपण वापरू शकता..!
2) दुसरी पद्धत प्रत्येकाची कोणत्या तरी देवावर श्रद्धा..विश्वास असतो..आपण त्या देवतेचा मंत्राचा जप करत असतो..जसे श्री स्वामी समर्थ..इथे आपणस आपल्या इष्ट देवतेचा मंत्र जप श्वासावर करायचा आहे..इथे जप।मोजायचा नाही..फक्त प्रत्येक श्वासावर जप करण्याचा प्रयत्न करायचा आहे..प्रत्येक नामावर आपणस अधिकाधिक नामावर ध्यान करायचे आहे…ही खूपच छान अशी ध्यानाची पद्धती आहे..!
आपण आपणस जी योग्य वाटेल.. ती पद्धत आपण निवडू शकता..गरज आहे फक्त ध्याना साठी बसण्याची.. बाकी सर्व समर्थ करून घेतात..!
चला आपण समर्थांना ध्यानासाठी प्रार्थना करूया…!
हे समर्था..आज ध्यानवर चिंतन.. मनन करून घेतले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद..ह्रदयात तुझा वास आहेस..परंतु दिसत नाहीस..त्या दर्शनासाठीचं तर ध्यानाची सुविधा तू निर्माण करून दिली आहेस..माझ्या मनाला ध्यानासाठी तयार कर..आम्हाला ध्यानावर स्थिर कर…आमचा प्रत्येक श्वास स्वामीमय बनव..ही समज दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.. ही प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद..!


Share
और पढिये !!

श्री गजानन चरित्र दर्शन 14 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

उन्हाळ्याचे दिवस होते... श्री गजानन महाराज अनेक भक्त मंडळी सोबत बसले होते...त्या भक्त मंडळी मध्ये श्री चंदूमुकीम नावाचा एक भक्त होता... तो भक्ती भावाने सेवा रुजू करत होता... आंब्याचे दिवस होते... त्यामुळे महाराजांसाठी श्री चंदूमुकीम आंबे आणले होते... महाराजांनी एक दोन...

श्री गजानन चरित्र दर्शन 13 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

आपण श्री गजानन चरित्र दर्शन १२ मध्ये पहिले कि श्री महाराजांनी वीणा अग्नी चिलीम प्रज्वलित केली.... खरंतर चिलीम पेटवण्यासाठी श्री जानकी राम यांच्या कडे मुले अग्नी आणण्यासाठी गेली होती... परंतु श्री जानकी राम यांनी अग्नी तर दिला नाहीच... पण उलट श्री महाराजां बद्दल...

श्री गजानन महाराज दर्शन लीला 6 – मराठी

खूप सारे लोक श्री गोविंद बुवांचे किर्तन ऐकण्यासाठी आले होते त्यामध्ये श्री गजानन महाराज पण कडू लिंबाच्या निंबाच्या झाडा जवळ बसून किर्तन ऐकत होते श्री गोविंद बुवांनी किर्तनासाठी श्री  भागवतातील एकादश स्कंध मधील हंस गीता याचा श्लोक किर्तन सेवेसाठी घेतला होता... बुवांनी...

यत्न शिकवण – श्री समर्थ रामदास स्वामी – श्री दासबोध दशक १२ समास ९

यत्न शिकवण - श्री समर्थ रामदास स्वामी - श्री दासबोध दशक १२ समास ९ प्रत्येक संतांनी कर्माला महत्व दिले... असा कोणतेही संत नाहीत कि त्यांनी कर्म सोडून...दे रे हरी पलंगावरी... असे कोणत्याच संतांनी सांगितले नाही... कारण प्रत्येक संत हे कर्म प्रधानच होते... कर्म न करणारे...

श्री गजानन चरित्र दर्शन 12 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

श्री गजानन महाराज बंकटलाल यांच्या घरी राहत होते.. एकेदिवशी एक प्रकार घडला तो दिवस होता... वैशाख शुद्ध तृतीयेचा दिवस होता... म्हणजेच अक्षय तृतीया चा दिवस होता... म्हणजेच या दिवशी आपण पितृ पूजन करतो तो दिवस... साडेतीन मुहूर्ता पैकी एक मुहूर्त..त्या दिवशी श्री...

मी डॉक्टर सिंधुताई सपकाळ बोलतेय – एक प्रेरणा

बाळांनो... मी डॉक्टर सिंधुताई सपकाळ बोलतेय... हो तुमची माई बोलतेय... बेटा दचकू नकोस...मी तर अनंतात विलीन झाले... हि बातमी जेव्हा सोशल मीडिया मार्फत तुझ्या पर्यंत पोहोचली तेव्हा... सोशल मीडिया द्वारे तू जी श्रद्धांजली... भावांजली वाहिलीस त्या बद्दल खूप खूप धन्यवाद......

जसे कर्म तसे फळ आज नाही तर उद्या नक्की मिळतेच- श्री गजानन चरित्र दर्शन 11 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ३

जसे कर्म तसे फळ आज नाही तर उद्या नक्की मिळतेच श्री विठोबा घाटोळ यांना पूर्व पुण्याई ने श्री गजानन महाराजांच्या सेवेची संधी त्यांना मिळाली होती पण म्हणतात ना पुण्य करण्यासाठी पुण्य गाठी असावे लागते... श्री विठोबा घाटोळ यांना श्री महाराजांच्या सेवेची खूप छान अशी संधी...

श्री गजानन चरित्र दर्शन 10 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ३

https://youtu.be/56bS3EN9F-w   श्री गजानन चरित्र दर्शन 10 - संदर्भ - श्री गजानन विजय अध्याय ३ भक्ती रुपी चरणतीर्थचा महिमा श्री जानराव देशमुख हे शेगांव मध्ये राहत होते...ते शेगाव मध्ये प्रसिद्ध व्यक्ती होते... घरात संपत्तीची काहीच कमतरता नव्हती..अचानकपणे त्यांची...

नामस्मरण भक्ति – नवविधा भक्ति – श्री समर्थ रामदास स्वामी

नवविधा भक्ती चा तिसरा प्रकार नामस्मरण भक्ति या भक्ती विषयी श्रीमत दासबोध ग्रंथात सांगतात ” स्मरण देवाचे करावें | अखंड नाम जपत जावें | नामस्मरणें पावावें | समाधान | नित्य नेम प्रातः काळी | माध्यानकाळी सायंकाळी | नामस्मरण सर्वकाळी करत जावें | नामस्मरण भक्ति हि खूपच...

पादसेवन भक्ती -नवविधा भक्ति श्री समर्थ रामदास स्वामी

पादसेवन भक्ती - श्री समर्थ रामदास स्वामी या भक्ती बाबत सांगतात कि - पादसेवन ते जाणावे । कायावाचा मनोभावे । सद्गुरूंचे पाय सेवावे । सद्गती कारणे । सेवावें सद्गुरुचरण । या नाव पादसेवन । श्री समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोध ग्रंथात याचे यतार्थ वर्णन केले आहे -...