जेव्हा व्रत घेतले तेव्हा विचार नाही केला.. आता व्रताच्या पूर्तीची वेळ आली तेव्हा का विचार करत आहेस… !

Sep 18, 2022 | मराठी, संत गजानन महाराज

Share

श्री गजानन महाराज म्हणत आहेत… जेव्हा व्रत घेतले तेव्हा विचार नाही केला.. आता व्रताच्या पूर्तीची वेळ आली तेव्हा का विचार करत आहेस… !

लीला -श्री गजानन महाराज बंकटलाल यांच्या घरी शेगांव येथेच रहात होते.. ते काशी चे गोसावी होते.. त्यांनी श्री गजानन महाराज यांची महिमा ऐकून एक व्रत घेण्याचा निर्णय घेतला.. त्यांनी असे व्रत घेतले कि जर माझे अमुक अमुक काम झाले तर अमुक अमुक वस्तू श्री महाराजांना अर्पण करेल.. त्यांनी अमुक अशी वस्तू अर्पण करण्याचा निर्णय या साठी घेतला होता या मागे कारण असे होते कि ती वस्तू त्यांना फार आवडत होती.. काही दिवसातच त्यांचे काम झाले.. आता व्रताची पूर्ती करण्याचा दिवस आला त्यासाठी शेगांव मध्ये आले… आल्या नंतर त्यांनी पाहिले कि श्री महाराजांच्या दर्शनासाठी तर फारच गर्दी आहे.. त्यांनी विचार केला कि इतक्या गर्दीत माझे दर्शन कसे होणार… आणि इतक्या गर्दीत दर्शन झाले तरी मी जी वस्तू अर्पण करणार आहे ती इतक्या गर्दीत कशी अर्पण करणार.. कारण हि वस्तू पाहूनच लोक मला मारण्यास देखील कमी करणार नाहीत.. त्याच्या मनात हे विचार सुरु होते… त्याच वेळी श्री महाराजांना त्याच्या मनातील विचार समजले.. श्री महाराजांनी तिथे असणाऱ्या एका भक्ताला श्री गोसावी यांना बोलवण्यास सांगितले.. श्री गोसावी नम्रता पूर्वक श्री महाराजांच्या समोर हाथ जोडून उभे राहिले.. तेव्हा श्री महाराज त्यांना म्हणतात.. तू आणलेली भेट आम्हाला दे.. जी तीन महिण्यापासून तुझ्या पिशवीत आहे.. श्री महाराजांची हि वाणी ऐकून तो अचंबित झाला… त्याच प्रमाणे श्री महाराज त्यांना म्हणाले ” जेव्हा व्रत घेतले तेव्हा विचार नाही केला.. आता व्रताच्या पूर्तीची वेळ आली तेव्हा का विचार करत आहेस… ! अश्या पद्धतीने योग्य समज देऊन श्री महाराजांनी श्री गोसावी यांच्या व्रताची पूर्ती करून घेतली.. बोला श्री गजानन महाराज कि जय … !

बोला – अनंत कोटी ब्रम्हाण्ड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चितानंद
भक्त प्रतिपालक शेगाँव निवासी समर्थ सदगुरु श्री संत गजानन महाराज की जय ||

बोध – वरील लीला तर आपल्या साठी ज्ञानाचा भंडार आहे.. श्री गोसावी यांना समस्या होती ती समस्या सुटण्यासाठी त्यांनी व्रत घेतले.. व्रत असे घेतले कि जे त्यांना आवडत होते… जेव्हा त्यांचे काम होते व व्रत पूर्ती करण्याची वेळ येते तेव्हा ते घाबरू लागेल… अशीच स्थिती आपली सुद्धा होते… आपणस देखील काही समस्या आली तर आपण सुद्धा काही तर व्रत म्हणा किंवा संकल्प घेतो परंतु तो घेताना देखील आपण आपणस आवडणारा संकल्प घेतो… यातून महाराज सांगत आहेत.. व्रत घ्यायचे असेल तर असे व्रत घ्या ज्यातून आपल्यात जीवनात बदल घडेल.. वास्तविक भगवंताला आपल्याकडून कोणतीच भौतिक वस्तू नको आहे भगवंताची इच्छा आहे कि व्रताला निमित्त करून आपण आपल्यातील वाईट सवयींचा त्याग करून आपले जीवन आनंददायी बनवावे… काही जणांना तर सवयच असते कि काहीही समस्या आली कि लगेचच काही तर व्रत घेतात म्हणजे माझे अमुक काम झाले तर अमुक एखादी वस्तू अर्पण करेल.. खरंतर भगवंत व आपल्यातील नाते हे व्यवहारिक नाते आहे का ? हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा.. जर याचे उत्तर नाही असे असेल तर भगवंताला मागायचे असेल तर भक्ती मागा… त्यासाठी कणखर पणा मागा.. त्यावर चालण्याचा संकल्प घ्या… ज्याने ब्रम्हांड निर्माण केले त्याला आपल्याकडून कोणत्याच भौतिक वस्तू नको आहेत.. तो तर म्हणत आहे उच्चतम अभिव्यक्ती कर.. किती खोल असा संदेश श्री महाराज आपणस देत आहेत… !

चला आपण श्री महाराजांना प्रार्थना करूया – श्री गजानन महाराज आम्हाला आपल्याकडे काय मागावे याची समज नाही… आजच्या लीलेतून आपण आम्हाला हि समज दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद… आम्हाला व्यवहारिक नाही तर आम्हाला तुझी प्रेमळ भक्ती दे… आम्हाला काही मागण्याची नाही तर देण्याची सवय आमच्यात दृढ कर.. आमच्यातील विकार अर्पण करण्याची शक्ती .. समज आम्हाला दे.. हि प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद .. !

 

 


Share
और पढिये !!

वेळ

भगवंताने सर्वांना एक गोष्ट सारखीच दिली आहे ती म्हणजे दिवसाचे २४ तास त्यामुळे आपण असे कधीच म्हणू शकत नाही कि माझ्या कडे वेळ नाही. वॉरन बफे म्हणतात - श्रीमंत लोक वेळेत गुंतवणूक करतात गरीब लोक पैशाची गुंतवणूक करतात मायकल आल्थसूलर - वेळ उडतो आपण त्याचे पायलट आहोत प्रत्येक...

राखी पौर्णिमा

राखी पौणिमा म्हणजे नात्याला घट्ट करण्याचा उत्सव..आपण वयाने मोठे झालो की काही कारणास्तव या नात्यात दुरावा येतो..या मागे कारण असते वडिलोपार्जित संपत्ती..जी खरं तर नात्यात दुरावा निर्माण करते..खरंतर या साठी कष्ट करणारा मरून जातो..आणि मेल्यावर विचार करतो यासाठीच केले होते...

आपण स्व आदर करतो का

आपण स्वतः ला काय समजतो - खरंतर हा प्रश्न आज पर्यंत आपण आपल्या स्वतःला विचारला आहे का ? विचारला असेल तर आपले आपल्या स्वतः बद्दल मत काय आहे? आपण स्वतः स्वतःचा आदर करता का ? याचे उत्तर काहींचे हो असेल काहींचे नाही असे असेल.. खरंतर जो पर्यंत आपण स्वतः आपला आदर करत नाही तो...

श्री दासबोध दशक १२ समास १

श्री दासबोध दशक १२ समास १ दासबोधातील दशक १२ मधील समास १ मध्ये श्री समर्थ रामदास स्वामी विमल लक्षण सांगत आहेत प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालावी हा उपदेश देत आहेत... प्रपंच करण्यात आळस करू नये.. अनेक लोक म्हणतात प्रपंच आणि परमार्थ एकत्र होऊ शकत नाही... रामदास स्वामी...

नृसिंह जयंती – नृसिंह जन्म कथा

आज नृसिंह जयंती निमित्त चला आपण नृसिंह जन्म कथा पाहूया हिरण्यकश्यपू राजा ह्यांनी भगवंताची भक्ती करून त्याला प्रसन्न करून घेतले होते व असा वर मागितला कि मला कोणत्याही माणसाकडून वा प्राण्याकडून मृत्य येऊ नये, दिवसा किंवा रात्री मृत्य येऊ नये , घरात नाही किंवा बाहेर...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 19 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज काही दिवस शेगांव मध्ये राहिले... परब्रम्ह जिथे आवश्यकता असते तिथे संचार करत असते. कुणीही त्यांना एका ठिकाणी अडकवून ठेवू शकत नाही. वऱ्हाड प्रांतात अडगाव नावाचे गाव आहे तिथे गजानन महाराज जाण्यासाठी निघाले . तो महिना होता वैशाख. वैशाख महिना...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 18 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

लीला क्रमांक १७ मध्ये आपण पहिले कि महाराज पिपंळगावात आले. समाधी अवस्थे मधून महाराज बाहेर यावेत व आपल्याशी बोलावेत यासाठी गावकर्यांनी कसा प्रयत्न केला आणि त्यांच्या श्रद्धेचे फलस्वरूप महाराज समाधी अवस्थेतून बाहेर आले तो दिवस होता सोमवारचा. पुढे दुसऱ्या दिवशी मंगळवारी...

श्री गजानन चरित्र दर्शन 17 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

श्री गजानन महाराज शेगांव मध्ये होते..महाराजांच्या लीला ची प्रचित अनेक भक्तांना येत होती..त्यामुळे दिवसेंदिवस.. भक्तांची गर्दी वाढतच होती..अचानक एक दिवस महाराजांच्या काय मनात आले माहित नाही... महाराज अचानक शेगांव सोडून... शेगांव जवळ असणाऱ्या पिंपळगाव गावात निघून...

श्री गजानन चरित्र दर्शन 16 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

ऐके दिवशी सर्व सेवेकरी मंडळी महाराजांच्या चरणी सेवा रुजू करत होते.. अचानक महाराजांनी सर्वांना बोलवले व म्हणाले... वसंत पंचमी च्या दिवशी घनपाठी ब्राम्हण बोलवा.. मंत्र जागर करूया.. तसेच सर्वांनी एक एक रुपया दक्षिणा देण्यासाठी काढावा... महाराजांची हि वाणी ऐकून सर्व...

श्री गजानन चरित्र दर्शन 15 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

शेगांवच्या दक्षिण दिशेला चिंचोली नावाचे गाव आहे. त्या गावात माधव नावाचे एक ब्राम्हण राहत होते. त्यांचे वय साधारण ६० पेक्षा जास्त होते. त्यांनी आपलें संपूर्ण आयुष्य हे संसार म्हणजे सर्वस्व या साठी खर्ची केले होते. आपल्या भविष्यात काय लिहून ठेवले आहे हे कुणासच माहित...