श्री गजानन महाराज लीला दर्शन ८ – गजाजन महाराज सांगत आहेत अती सर्व वर्ज्य करा

Sep 12, 2022 | मराठी, संत गजानन महाराज

Share

श्री गजानन महाराज लीला दर्शन ८ – गजाजन महाराज सांगत आहेत अती सर्व वर्ज्य करा… ! 

आपण लीला क्रमांक ७ मध्ये पाहिले कि श्री गजानन महाराज श्री बंकटलाल यांच्या घरीच राहिले.. दुसऱ्या दिवशी श्री गजानन महाराजांची विविध प्रकारचे सुंगधी द्रव्याने स्नान घातले.. षोडश उपचारे पूजा केली.. नैवद्य अर्पण केला.. इतके भक्तिमय वातावरण होते कि सर्व सेवेकरी सेवेत तल्लीन झाले होते.. श्री बंकटलाल तर भक्तीत इतके तल्लीन झाले होते.. त्यांचे घर द्वारकापुरी सारखे झाले होते… तो दिवस सोमवारचा होता.. त्यावेळेस तिथे श्री बंकटलाल यांचे चुलत भाऊ इच्छाराम सुद्धा तिथेच होते… ते शिव भक्त होते.. त्या दिवशी त्यांचा उपवास होता.. त्यांनी श्री महाराजांना प्रार्थना केली.. महाराज आपण करुणाघन आहात.. आपण सर्वांच्या इच्छेची पूर्ती करता.. माझी आपणस विनंती आहे कि.. आपण संध्याकाळचे भोजन देखील आमच्याकडे करावे.. आपण जर जेवण केले नाही तर मी देखील भोजन करणार नाही.. आपण सर्वांची इच्छा पूर्ण करता.. माझी इतकी इच्छा पूर्ण करा.. महाराज भोजन करण्यास तयार झाले.. इच्छाराम भोजनाचे ताट घेऊन आले.. ताटात आंबेमोहर तांदळाचा भात , मोतीचूर चे लाडू , जिलेबी, अजूनही बरेच पदार्थ होते.. श्री महाराज स्वतःशीच बोलले.. “आता इतके खा कि कधीच खाण्यास मिळाले नाही.. सगळ्यांना दाखव अति खाणे काय असते.. असे म्हणून महाराज भोजन करण्यास सुरवात करतात.. त्यांनी ताटातील सर्व अन्न ग्रहण केले.. त्यांनी इतके जेवण केले कि त्यांना तिथेच जोराची उलटी झाली.. हि त्यांची लीला होती.. बोला श्री गजानन महाराज कि जय !

बोध – वरील लीलेत खूपच खोल असा संदेश दडला आहे.. वरील लीलेत इच्छा रामजी यांनी आपली इच्छा महाराजांना सांगितली व इच्छा युक्त भक्ती साठी श्री महाराजांना भोजनाचा आग्रह केला.. त्यांना माहित होते श्री महाराजांचे भोजन झाले आहे तरी आपल्या व्रताच्या पूर्ती साठी महाराजांना भोजनाचा आग्रह धरला.. श्री महारांजानी सुद्धा आपणस बोध प्राप्त व्हावा यासाठी भोजन करण्यास तयार झाले.. त्यांनी केवळ भोजनच केले नाही तर आणलेले सर्व भोजन त्यांनी ग्रहण केले आणि लगेचच उलटी केली.. इथे ते सर्व अन्न पचवू शकत होते पण जाणून बुजून त्यांनी उलटी केली कारण त्यांना सर्वांना दाखवून द्याचे होते कि कुणालाही कोणत्याच गोष्टीचा आग्रह करू नका.. ज्याला जितकी भूख आहे तो तितके अन्न ग्रहण करेल.. त्याला आग्रह करून खाऊ घालूं नका.. इथे इच्छा रामजी सारखे आपले सुद्धा होते.. कुठेही कोणती चांगली खाण्याची वस्तू दिसली कि ती खाण्याचा मोह आपण रोखू शकत नाही मग तेव्हा आपणस भूख असो व नसो आपण अतिरिक्त अन्न ग्रहण करतो.. अश्या प्रकारे आपण आपली शरीरावर अन्याय करतो… असे आपण करू नये हा बोध देण्यासाठी श्री गजानन महाराजांनी हि लीला केली असावी असा बोध मिळतो.. बोला गजानन महाराज कि जय .. !

प्रार्थना – श्री गजानन महाराज आपण तर करुणाघन आहात.. आजच्या लीलेच्या माध्यमातून आपण आम्हाला समज दिलीत कि शरीराला आवश्यक असेल तितकेच अन्न आपण ग्रहण करणे आवश्यक आहे.. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो.. आम्हाला आमच्या आहारावर नियंत्रण ठेवण्याची समज द्या.. आमच्यातील इच्छा राम वर नियंत्रित करा.. अती सर्व वर्ज्य करण्याची समज आमच्यात दृढ करा.. हि समज दिल्याबद्दल धन्यवाद.. हि प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद


Share
और पढिये !!

वेळ

भगवंताने सर्वांना एक गोष्ट सारखीच दिली आहे ती म्हणजे दिवसाचे २४ तास त्यामुळे आपण असे कधीच म्हणू शकत नाही कि माझ्या कडे वेळ नाही. वॉरन बफे म्हणतात - श्रीमंत लोक वेळेत गुंतवणूक करतात गरीब लोक पैशाची गुंतवणूक करतात मायकल आल्थसूलर - वेळ उडतो आपण त्याचे पायलट आहोत प्रत्येक...

राखी पौर्णिमा

राखी पौणिमा म्हणजे नात्याला घट्ट करण्याचा उत्सव..आपण वयाने मोठे झालो की काही कारणास्तव या नात्यात दुरावा येतो..या मागे कारण असते वडिलोपार्जित संपत्ती..जी खरं तर नात्यात दुरावा निर्माण करते..खरंतर या साठी कष्ट करणारा मरून जातो..आणि मेल्यावर विचार करतो यासाठीच केले होते...

आपण स्व आदर करतो का

आपण स्वतः ला काय समजतो - खरंतर हा प्रश्न आज पर्यंत आपण आपल्या स्वतःला विचारला आहे का ? विचारला असेल तर आपले आपल्या स्वतः बद्दल मत काय आहे? आपण स्वतः स्वतःचा आदर करता का ? याचे उत्तर काहींचे हो असेल काहींचे नाही असे असेल.. खरंतर जो पर्यंत आपण स्वतः आपला आदर करत नाही तो...

श्री दासबोध दशक १२ समास १

श्री दासबोध दशक १२ समास १ दासबोधातील दशक १२ मधील समास १ मध्ये श्री समर्थ रामदास स्वामी विमल लक्षण सांगत आहेत प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालावी हा उपदेश देत आहेत... प्रपंच करण्यात आळस करू नये.. अनेक लोक म्हणतात प्रपंच आणि परमार्थ एकत्र होऊ शकत नाही... रामदास स्वामी...

नृसिंह जयंती – नृसिंह जन्म कथा

आज नृसिंह जयंती निमित्त चला आपण नृसिंह जन्म कथा पाहूया हिरण्यकश्यपू राजा ह्यांनी भगवंताची भक्ती करून त्याला प्रसन्न करून घेतले होते व असा वर मागितला कि मला कोणत्याही माणसाकडून वा प्राण्याकडून मृत्य येऊ नये, दिवसा किंवा रात्री मृत्य येऊ नये , घरात नाही किंवा बाहेर...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 19 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज काही दिवस शेगांव मध्ये राहिले... परब्रम्ह जिथे आवश्यकता असते तिथे संचार करत असते. कुणीही त्यांना एका ठिकाणी अडकवून ठेवू शकत नाही. वऱ्हाड प्रांतात अडगाव नावाचे गाव आहे तिथे गजानन महाराज जाण्यासाठी निघाले . तो महिना होता वैशाख. वैशाख महिना...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 18 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

लीला क्रमांक १७ मध्ये आपण पहिले कि महाराज पिपंळगावात आले. समाधी अवस्थे मधून महाराज बाहेर यावेत व आपल्याशी बोलावेत यासाठी गावकर्यांनी कसा प्रयत्न केला आणि त्यांच्या श्रद्धेचे फलस्वरूप महाराज समाधी अवस्थेतून बाहेर आले तो दिवस होता सोमवारचा. पुढे दुसऱ्या दिवशी मंगळवारी...

श्री गजानन चरित्र दर्शन 17 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

श्री गजानन महाराज शेगांव मध्ये होते..महाराजांच्या लीला ची प्रचित अनेक भक्तांना येत होती..त्यामुळे दिवसेंदिवस.. भक्तांची गर्दी वाढतच होती..अचानक एक दिवस महाराजांच्या काय मनात आले माहित नाही... महाराज अचानक शेगांव सोडून... शेगांव जवळ असणाऱ्या पिंपळगाव गावात निघून...

श्री गजानन चरित्र दर्शन 16 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

ऐके दिवशी सर्व सेवेकरी मंडळी महाराजांच्या चरणी सेवा रुजू करत होते.. अचानक महाराजांनी सर्वांना बोलवले व म्हणाले... वसंत पंचमी च्या दिवशी घनपाठी ब्राम्हण बोलवा.. मंत्र जागर करूया.. तसेच सर्वांनी एक एक रुपया दक्षिणा देण्यासाठी काढावा... महाराजांची हि वाणी ऐकून सर्व...

श्री गजानन चरित्र दर्शन 15 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

शेगांवच्या दक्षिण दिशेला चिंचोली नावाचे गाव आहे. त्या गावात माधव नावाचे एक ब्राम्हण राहत होते. त्यांचे वय साधारण ६० पेक्षा जास्त होते. त्यांनी आपलें संपूर्ण आयुष्य हे संसार म्हणजे सर्वस्व या साठी खर्ची केले होते. आपल्या भविष्यात काय लिहून ठेवले आहे हे कुणासच माहित...