पितृपक्ष – पितृपक्ष किंवा पक्ष पंधरवाडा

Sep 9, 2022 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

पितृपक्ष – पितृपक्ष किंवा पक्ष पंधरवाडा, आपल्याकडे दरवर्षी भाद्रपद वद्य प्रतिपदा ते भाद्रपदी अमावास्या हा साधारण १५ ते १६ दिवसाची कालावधी ला आपण पितृपक्ष म्हणतो. पितृपक्ष म्हंटलं कि आपल्या कडे आपण म्हणतो कि कोणतेच धार्मिक  कार्य या महिन्यात करायची नाही हे आपण आज पर्यंत ऐकत आलो आहोत पण नेमके काय आहे ? कश्या साठी असतो? नेमके काय करणे अपेक्षित असावे आपली पूर्वजांना या कालावधीत यावर आज आपण चिंतन मनन करणार आहोत. जसे इंग्रजीत १२ महिने आहेत तसेच आपल्या संस्कृतीत १२ महिने आहेत. आपल्यकडे प्रत्येक महिण्याची काही तरी विशेष असा सण असतो जो आपणस काही तरी प्रेरणा देत असतो तसाच हा भाद्रपद महिना याच्या सुरवातीला आपण १० दिवस गणपती बाप्पा ची सेवा करतो आणि लगेचच दुसऱ्या दिवशी पितृपक्ष सुरु होतो जो कालावधी आपण आपल्या पूर्वजांच्या सेवे साठी शास्त्राने ठरवून दिला आहे. खरंतर प्रत्येक दिवसच तसा आपल्या वडीलधाऱ्या माणसांच्या सेवेसाठी असतो. ज्यावेळी एखादी व्यक्ती मृत पावते तेव्हा प्रथम वर्षी आपण वर्ष श्राद्ध करतो पण त्यानंतर आपण दरवर्षी पूर्वजांच्या सेवेसाठी देणे काळा नुसार शक्य होणार नाही हे आपली पूर्वजांनी जाणले असावे म्हणूनच त्यांनी पितृपक्ष या साठी वर्षातील १५ दिवसांचा कालावधी दिला असावा. आता नेमकी आपल्या पूर्वजांची सेवा कधी करावी हा प्रश्न आपल्या मनात निर्माण होतो. समजा एखादी व्यक्ती प्रतिपदा ला मृत झाली असेल तर तिचे पक्ष भाद्रपद प्रतिपदेला करावे.. एकादशी ला एखादी व्यक्ती मृत झाली असेल तर तिचे पक्ष भाद्रपद एकादशीला करावे थोडक्यात ज्या तिथीला व्यक्ती मृत पावते त्या नंतर वर्ष श्राद्ध झाल्या नंतर दरवर्षी भाद्रपद महिन्यांत त्या तिथीला आपल्या पूर्वजांचे पक्ष करावेत. एखादी स्त्री सवाष्ण मृत असेल तर तिचे पक्ष नवमी तिथीला करण्यात येतात. पती मृत झाल्या नंतर दोघांचे पक्ष एकाच तिथीस करण्यात येतात . ज्यांना आपल्या पूर्वजांची तिथी माहित नसेल अश्यानी अमावस्या तिथीला पक्ष करावेत. थोडक्यात हि झाली तिथी विषयी माहिती आता अनेकांच्या मनात प्रश्न असतो कि या साठी स्वयंपाक काय असावा खरंतर स्वयंपाक याला साधाच असतो. पोळी भाजी , वरण भात , कढी , खीर ,भाजणीच्या डाळीचे वडे . साधारण असा नैवद्य आपण करतो. आता हि झाली माहिती शास्त्रानुसार आता आपण यावर थोडे चिंतन मनन करूया.. खरंच हा महिना सेवा केली तरच पूर्वज तृप्त होतील का ? आपण ज्याची मृत झाल्या नंतर सेवा म्हणून पक्ष करत आहोत त्यांची जिवंतपणी तितक्याच आत्मीयतेने सेवा केली आहे का ? त्यांना काय हवं काय नको आहे हे आपण पाहिले आहे का ? त्यांच्याशी जीवंतपणी आत्मीयतेने बोललो आहोत का ? यांची उत्तरे हा असावीत जर याचे उत्तर नाही असे येत असेल तर नक्कीच आपण आधी त्यांची माफी मागितली पाहिजे कारण जो पर्यंत आपण केलेली चूकच जर आपणस समजत नसेल तर आपण पितरांची किती हि सेवा केली तरी आपणस अपेक्षित फल कसे प्राप्त होईल. हे झाले मृत व्यक्तींबद्दल खरंतर आपण सर्वांशीच आदराने वागले पाहिजे कारण मुख्य दोष निर्मिती होत असेल तर जिवंत व्यक्तींना जो त्रास देतो त्यातुन म्हणून जर आपण सर्वांशीच वागताना दोष रहित वागण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपले रोजचे जीवनच सेवा मय बनेल आणि मग जेव्हा आपण मृत व्यक्तींची सेवा करू ती तर विशेष असे फल दिल्याशिवाय राहणार नाही यात काहीच शंका नाही.

चला तर मग आजपासूनच या सेवेस सुरवात करूयात आणि आपले जीवन सुंदर असे बनवूयात. चला आज आपण आपल्या पूर्वजांना प्रार्थना करूयात..

हे माझ्या पूर्वजांनो… मला माफ करा.. जाणते अजाणतेपणी.. आपण जिवीत असताना आपले मन माझ्याकडून दुखावले गेले त्याबद्दल मला माफ करा.. तुमच्या अनेक इच्छा अपेक्षा आम्ही पूर्ण करू शकलो नाही त्याबद्दल आम्हाला माफ करा… ज्या चुका आमच्याकडून झाल्या त्या परत होऊ नयेत या साठी आम्हाला आशीर्वाद द्या… आता तरी आम्हाला समज प्राप्त होऊ द्या.. आमचे प्रत्येक कर्म हे मनुष्य सेवा बनू द्या जेणेकरून एखादी व्यक्ती मृत झाल्यावर रडू नाही आले तरी तिच्या सेवेचा आनंद आम्हाला प्राप्त होईल.. आणि जिवंतपणीच आमच्याकडून सेवा होईल .. आम्हाला आज हि समज दिलीस त्याबद्दल धन्यवाद… आमच्याकडून हि प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद … !

www.chetnakeswar.com


Share
और पढिये !!

वेळ

भगवंताने सर्वांना एक गोष्ट सारखीच दिली आहे ती म्हणजे दिवसाचे २४ तास त्यामुळे आपण असे कधीच म्हणू शकत नाही कि माझ्या कडे वेळ नाही. वॉरन बफे म्हणतात - श्रीमंत लोक वेळेत गुंतवणूक करतात गरीब लोक पैशाची गुंतवणूक करतात मायकल आल्थसूलर - वेळ उडतो आपण त्याचे पायलट आहोत प्रत्येक...

राखी पौर्णिमा

राखी पौणिमा म्हणजे नात्याला घट्ट करण्याचा उत्सव..आपण वयाने मोठे झालो की काही कारणास्तव या नात्यात दुरावा येतो..या मागे कारण असते वडिलोपार्जित संपत्ती..जी खरं तर नात्यात दुरावा निर्माण करते..खरंतर या साठी कष्ट करणारा मरून जातो..आणि मेल्यावर विचार करतो यासाठीच केले होते...

आपण स्व आदर करतो का

आपण स्वतः ला काय समजतो - खरंतर हा प्रश्न आज पर्यंत आपण आपल्या स्वतःला विचारला आहे का ? विचारला असेल तर आपले आपल्या स्वतः बद्दल मत काय आहे? आपण स्वतः स्वतःचा आदर करता का ? याचे उत्तर काहींचे हो असेल काहींचे नाही असे असेल.. खरंतर जो पर्यंत आपण स्वतः आपला आदर करत नाही तो...

श्री दासबोध दशक १२ समास १

श्री दासबोध दशक १२ समास १ दासबोधातील दशक १२ मधील समास १ मध्ये श्री समर्थ रामदास स्वामी विमल लक्षण सांगत आहेत प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालावी हा उपदेश देत आहेत... प्रपंच करण्यात आळस करू नये.. अनेक लोक म्हणतात प्रपंच आणि परमार्थ एकत्र होऊ शकत नाही... रामदास स्वामी...

नृसिंह जयंती – नृसिंह जन्म कथा

आज नृसिंह जयंती निमित्त चला आपण नृसिंह जन्म कथा पाहूया हिरण्यकश्यपू राजा ह्यांनी भगवंताची भक्ती करून त्याला प्रसन्न करून घेतले होते व असा वर मागितला कि मला कोणत्याही माणसाकडून वा प्राण्याकडून मृत्य येऊ नये, दिवसा किंवा रात्री मृत्य येऊ नये , घरात नाही किंवा बाहेर...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 19 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज काही दिवस शेगांव मध्ये राहिले... परब्रम्ह जिथे आवश्यकता असते तिथे संचार करत असते. कुणीही त्यांना एका ठिकाणी अडकवून ठेवू शकत नाही. वऱ्हाड प्रांतात अडगाव नावाचे गाव आहे तिथे गजानन महाराज जाण्यासाठी निघाले . तो महिना होता वैशाख. वैशाख महिना...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 18 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

लीला क्रमांक १७ मध्ये आपण पहिले कि महाराज पिपंळगावात आले. समाधी अवस्थे मधून महाराज बाहेर यावेत व आपल्याशी बोलावेत यासाठी गावकर्यांनी कसा प्रयत्न केला आणि त्यांच्या श्रद्धेचे फलस्वरूप महाराज समाधी अवस्थेतून बाहेर आले तो दिवस होता सोमवारचा. पुढे दुसऱ्या दिवशी मंगळवारी...

श्री गजानन चरित्र दर्शन 17 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

श्री गजानन महाराज शेगांव मध्ये होते..महाराजांच्या लीला ची प्रचित अनेक भक्तांना येत होती..त्यामुळे दिवसेंदिवस.. भक्तांची गर्दी वाढतच होती..अचानक एक दिवस महाराजांच्या काय मनात आले माहित नाही... महाराज अचानक शेगांव सोडून... शेगांव जवळ असणाऱ्या पिंपळगाव गावात निघून...

श्री गजानन चरित्र दर्शन 16 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

ऐके दिवशी सर्व सेवेकरी मंडळी महाराजांच्या चरणी सेवा रुजू करत होते.. अचानक महाराजांनी सर्वांना बोलवले व म्हणाले... वसंत पंचमी च्या दिवशी घनपाठी ब्राम्हण बोलवा.. मंत्र जागर करूया.. तसेच सर्वांनी एक एक रुपया दक्षिणा देण्यासाठी काढावा... महाराजांची हि वाणी ऐकून सर्व...

श्री गजानन चरित्र दर्शन 15 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

शेगांवच्या दक्षिण दिशेला चिंचोली नावाचे गाव आहे. त्या गावात माधव नावाचे एक ब्राम्हण राहत होते. त्यांचे वय साधारण ६० पेक्षा जास्त होते. त्यांनी आपलें संपूर्ण आयुष्य हे संसार म्हणजे सर्वस्व या साठी खर्ची केले होते. आपल्या भविष्यात काय लिहून ठेवले आहे हे कुणासच माहित...