श्री गणपती बाप्पा ची मूर्ती आपणस काय प्रेरणा देत आहे

Aug 31, 2022 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

श्री गणपती बाप्पा ची मूर्तीची आपण स्थापना करतो हि मूर्ती आपणस अनेक गोष्टींची प्रेरणा देते.. चला तर मग आज आपण यावर चिंतन मनन करण्याचा प्रयत्न करूया…विशाल मस्तक आपणस प्रेरणा देते ज्या प्रमाणे बाप्पा बुद्धी ची देवता आहे त्याचप्रमाणे आपण कायम नवनवीन ज्ञान प्राप्त केले पाहिजे.. म्हणजेच कायम आपण नवीन गोष्टी शिकण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे… म्हणजेच बाप्पा आपणस प्रेरणा देत आहे आहेत कि ज्ञान प्राप्त कर… सुपासारखे कान आपणस प्रेरणा देतात कि ज्या प्रमाणे सुपाने आपण धान्य साफ करतो त्याच प्रमाणे आपणस बाप्पा सांगत आहेत कि तू अश्याच गोष्टी श्रवण कर जेणेकरून तुझे कल्याण होईल.. अश्याच गोष्टींचे श्रवण कर ज्यात सर्वांचे कल्याण भाव असतील.. ज्या श्रवण केले कि आपली चेतनेची पातळी उंचावेल असेच श्रवण करण्यास बाप्पा आपणस सांगत आहेत… एकदंत म्हणजेच भगवंतास आपण एकदंत म्हणतो यातून बाप्पा आपणस सांगत आहेत कि तुझ्या जवळ काय नाही या पेक्षा तुझ्याकडे जे काही आहे त्यात आपण समाधानी असावे.. पण आपण नेमके उलटे करतो माझ्याकडे काय नाही यावर आपण रडत बसतो बाप्पा सांगतात तुझ्याकडे जे काही आहे त्याचा पुरेपूर वापर कर कारण तुला मी जे दिले आहे ते भरपूर आहे त्याचा वापर कर हि प्रेरणा आपणस बाप्पा च्या एकदंत पासून मिळते…बाप्पा चे उदर आपणस प्रेरणा देते कि इतरांच्या चुका आपण कोणत्याही कायम माफ कराव्यात.. कारण आपण इतरांच्या चुका पाहण्यापेक्षा त्यांच्यातील गुण घ्यावेत व चुका माफ कराव्यात… मोदक बाप्पा ला आवडतात यावरून बाप्पा आपणस सांगत आहेत कि ज्या प्रमाणे मोद म्हणजे आनंद, गोडवा जिव्हाळा हा मोदकात असतो त्या प्रमाणे आपण हि नेहमी आनंदी असावे आपले वर्तन सर्वांशी स्नेहपूर्ण असावे हा बोध आपणस बाप्पा देत आहेत..बाप्पा च्या हातातील परशु आपणस प्रेरणा देतो कि कोणतंही संकट आले तरी भिऊ नका तर त्याला समर्थपणे त्याचा सामना करा कारण संकट काळी आपणस विचाररूपी परशु वापरण्याचा बोध बाप्पा आपणस देत आहेत.. उंदीर हे गणपतीचे वाहन आहे… आपणस बोध देतो कि आपण सदैव आपल्या कार्यसाठी तयार असायला हवे.. म्हणजेच चांगल्या कार्याचे वाहक बनण्याचा बोध इथे आपणस प्राप्त होतो.. थोडक्यात बाप्पा ची मूर्ती आपणस आपल्या विकासासाठी प्रेरणा देत आहे… चला तर मग बाप्पा ची सेवा करत करत बाप्पा ना अपेक्षित जीवनाची अभिव्यक्ती करूया


Share
और पढिये !!

वेळ

भगवंताने सर्वांना एक गोष्ट सारखीच दिली आहे ती म्हणजे दिवसाचे २४ तास त्यामुळे आपण असे कधीच म्हणू शकत नाही कि माझ्या कडे वेळ नाही. वॉरन बफे म्हणतात - श्रीमंत लोक वेळेत गुंतवणूक करतात गरीब लोक पैशाची गुंतवणूक करतात मायकल आल्थसूलर - वेळ उडतो आपण त्याचे पायलट आहोत प्रत्येक...

राखी पौर्णिमा

राखी पौणिमा म्हणजे नात्याला घट्ट करण्याचा उत्सव..आपण वयाने मोठे झालो की काही कारणास्तव या नात्यात दुरावा येतो..या मागे कारण असते वडिलोपार्जित संपत्ती..जी खरं तर नात्यात दुरावा निर्माण करते..खरंतर या साठी कष्ट करणारा मरून जातो..आणि मेल्यावर विचार करतो यासाठीच केले होते...

आपण स्व आदर करतो का

आपण स्वतः ला काय समजतो - खरंतर हा प्रश्न आज पर्यंत आपण आपल्या स्वतःला विचारला आहे का ? विचारला असेल तर आपले आपल्या स्वतः बद्दल मत काय आहे? आपण स्वतः स्वतःचा आदर करता का ? याचे उत्तर काहींचे हो असेल काहींचे नाही असे असेल.. खरंतर जो पर्यंत आपण स्वतः आपला आदर करत नाही तो...

श्री दासबोध दशक १२ समास १

श्री दासबोध दशक १२ समास १ दासबोधातील दशक १२ मधील समास १ मध्ये श्री समर्थ रामदास स्वामी विमल लक्षण सांगत आहेत प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालावी हा उपदेश देत आहेत... प्रपंच करण्यात आळस करू नये.. अनेक लोक म्हणतात प्रपंच आणि परमार्थ एकत्र होऊ शकत नाही... रामदास स्वामी...

नृसिंह जयंती – नृसिंह जन्म कथा

आज नृसिंह जयंती निमित्त चला आपण नृसिंह जन्म कथा पाहूया हिरण्यकश्यपू राजा ह्यांनी भगवंताची भक्ती करून त्याला प्रसन्न करून घेतले होते व असा वर मागितला कि मला कोणत्याही माणसाकडून वा प्राण्याकडून मृत्य येऊ नये, दिवसा किंवा रात्री मृत्य येऊ नये , घरात नाही किंवा बाहेर...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 19 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज काही दिवस शेगांव मध्ये राहिले... परब्रम्ह जिथे आवश्यकता असते तिथे संचार करत असते. कुणीही त्यांना एका ठिकाणी अडकवून ठेवू शकत नाही. वऱ्हाड प्रांतात अडगाव नावाचे गाव आहे तिथे गजानन महाराज जाण्यासाठी निघाले . तो महिना होता वैशाख. वैशाख महिना...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 18 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

लीला क्रमांक १७ मध्ये आपण पहिले कि महाराज पिपंळगावात आले. समाधी अवस्थे मधून महाराज बाहेर यावेत व आपल्याशी बोलावेत यासाठी गावकर्यांनी कसा प्रयत्न केला आणि त्यांच्या श्रद्धेचे फलस्वरूप महाराज समाधी अवस्थेतून बाहेर आले तो दिवस होता सोमवारचा. पुढे दुसऱ्या दिवशी मंगळवारी...

श्री गजानन चरित्र दर्शन 17 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

श्री गजानन महाराज शेगांव मध्ये होते..महाराजांच्या लीला ची प्रचित अनेक भक्तांना येत होती..त्यामुळे दिवसेंदिवस.. भक्तांची गर्दी वाढतच होती..अचानक एक दिवस महाराजांच्या काय मनात आले माहित नाही... महाराज अचानक शेगांव सोडून... शेगांव जवळ असणाऱ्या पिंपळगाव गावात निघून...

श्री गजानन चरित्र दर्शन 16 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

ऐके दिवशी सर्व सेवेकरी मंडळी महाराजांच्या चरणी सेवा रुजू करत होते.. अचानक महाराजांनी सर्वांना बोलवले व म्हणाले... वसंत पंचमी च्या दिवशी घनपाठी ब्राम्हण बोलवा.. मंत्र जागर करूया.. तसेच सर्वांनी एक एक रुपया दक्षिणा देण्यासाठी काढावा... महाराजांची हि वाणी ऐकून सर्व...

श्री गजानन चरित्र दर्शन 15 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

शेगांवच्या दक्षिण दिशेला चिंचोली नावाचे गाव आहे. त्या गावात माधव नावाचे एक ब्राम्हण राहत होते. त्यांचे वय साधारण ६० पेक्षा जास्त होते. त्यांनी आपलें संपूर्ण आयुष्य हे संसार म्हणजे सर्वस्व या साठी खर्ची केले होते. आपल्या भविष्यात काय लिहून ठेवले आहे हे कुणासच माहित...