श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 18 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

Mar 27, 2022 | चरित्र, मराठी, संत गजानन महाराज

Share

लीला क्रमांक १७ मध्ये आपण पहिले कि महाराज पिपंळगावात आले. समाधी अवस्थे मधून महाराज बाहेर यावेत व आपल्याशी बोलावेत यासाठी गावकर्यांनी कसा प्रयत्न केला आणि त्यांच्या श्रद्धेचे फलस्वरूप महाराज समाधी अवस्थेतून बाहेर आले तो दिवस होता सोमवारचा. पुढे दुसऱ्या दिवशी मंगळवारी शेगांव चा बाजाराचा दिवस होता. त्या बाजारात अनेक पिंपळगावातील मंडळी गेली होती. त्याच बाजारात श्री बंकटलाल देखील आले होते. त्या दिवशी बाजारात अनेक लोकांच्या बोलण्यात येत होते कि आमच्या पिंपळगावात एक अवलिया आले आहेत. हा हा म्हणता हि बातमी संपूर्ण बाजारात पसरली. बंकटलाल यांच्या कानी हि गोष्ट पडताच त्यांना मनातून खात्री वाटली कि नक्कीच ते आपले श्री गजानन महाराजच असणार. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या पत्नी सहित पिंपळगाव गाठले. पाहतो तर काय साक्षात परब्रह्म श्री गजानन महाराजच होते. मग काय त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू येऊ लागले. त्यांनी महाराजांना वंदन केले. महाराज आपण आता येतो म्हणून गेलात.. आज पंधरा दिवस झाले महाराज… आमचे काही चुकले काय .. महाराज तुमच्या विना शेगांव भणभणीत दिसत आहे.. सर्व सेवेकरी आपली वाट पहात आहेत.. बैल गाडी आणली आहे.. आपणस विनंती आहे.. आपण शेगांवास चलावे… माय लेकांची ताटातूट होणे बरे नव्हें… अनेक भक्त आपली वाट पहात आहेत… आपणस विनंती आहे आपण शेगांवी चलावे… बंकटलाल यांची प्रार्थना महाराजांनी स्वीकार केली आणि ते बैलगाडीत बसले. पिंपळगावतील लोकांना अश्रू अनावर झाले. बंकटलाल यांनी सर्व गावकर्यांना म्हणाले आपणस विनंती आहे. महाराजांना भेटण्यास आपण शेगांवी येत जावे तरी आपण आम्हाला निरोप द्यावा. काही अंतर गेल्या नंतर श्री गजानन महाराज बंकटलाल यांना म्हणाले. हि सावकाराची रीत असते का ? दुसऱ्याचा माल बळजबरीने न्यावा मला तर तुझ्या घरी येण्यास भीती वाटते. महालक्ष्मी जी जगद्जननी आहे जिची सर्वत्र सत्ता तिला सुद्धा तू कोंडून ठेवले आहे. तिथें माझे काय ? म्हणून मी निघून गेलो होतो. महाराजांची हि वाणी ऐकून बंकटलाल खूपच विनय पूर्वक महाराजांना म्हणाले महाराज. महाराज माझ्या कुलुपाला ती जगन्माता भ्याली नाही तर तुमचा वास तिथे आहे म्हणून ती माझ्याकडे स्थिर ( चिरकाल ) आहे. ज्या ठिकाणी आई असते तिथेच बाळ असते. महाराज आपल्या चरण कमला पुढे माझ्या साठी काहीच मौल्यवान नाही. आता माझे असे काहीच नाही. जे काही आहे ते सर्व तुमचे आहे. माझी आपणस इतकीच विनंती आहे आपण शेगांवात रहावे. अशा रीतीने श्री गजानन महाराज पुन्हा शेगांवात आले. सर्व गावकरी खूप आनंदित झाले आणि सर्वांनी एक घोषात महाराजांचा जयजय कार केला . बोला श्री गजानन महाराज कि जय !

बोध – खरंतर आजची लीला म्हणजे आपणस भक्ती कशी असावी हे आपणस समजण्यासाठी केलेली हि लीला आहे हाच बोध आपणास मिळत आहे. पहा ना बाजारात केवळ चर्चा झाली कि कुणीतरी अवलिया पिंपळगावात आले आहेत यावरून बंकटलाल यांच्या मनात लगेचच सकारात्मक विचार आला कि नक्कीच ते श्री गजानन महाराजच असणार. किती तो विश्वास आणि श्रद्धा आणि त्याचे फलस्वरूप खरोखर ते श्री महाराजच होते. आपणासही आपली भक्ती वाढवायची आहे. श्री बंकटलाल यांनी महाराजांना विनंती केली महाराज आपण शेगांवी चलावे.. यावरून आपल्या लक्षात येते कि श्री बंकटलाल यांची महाराजांच्या चरणी जी काही श्रद्धा… भक्ती होती किती उच्च असेल. कारण परब्रम्हाला आपल्या सोबत नेणें म्हणजे तितकेच त्यांचे सुद्धा आपल्यावर प्रेम असणे आवश्यक आहे. यावरून आपणस आपले व महाराजांचे नाते कसे निर्माण झाले पाहिजे याची समज प्राप्त होते. काही अंतर गेल्या नंतर महाराज श्री बंकटलाल यांना म्हणतात मला तुझी भीती वाटते कारण तू लक्ष्मी मातेस बंदिस्त केले आहे… यावर श्री बंकटलाल म्हणतात महाराज जे कि आहे ते तुमचे आहे. तुम्ही आहात म्हणून जगद्जननी माझ्याकडे वास करत आहे. मला आपले चरण कमल सोडून काहीच नको. इथे खूप खोल असा संदेश महाराज देत आहेत. लक्ष्मी हि कमवलीच पाहिजे पण लक्ष्मी माता प्रसन्न झाल्यानंतर आपले मन लगेचच त्याच गोष्टीला सर्वस्व मानते आणि इथेच गडबड होते. असे होऊ नये यासाठी बंकटलाल यांचे वाक्य आपणस नेहमी लक्षात ठेवायचे आहे. जी काही जगद्जननी लक्ष्मी मातेची कृपा आहे ती सर्व आपल्या महाराजांची कृपा आहे. कुठेच मला अहं भाव ठेवण्याची चूक करायची नाही.पहा हा भाव आपल्या आयुष्यात भरभरून लक्ष्मी मातेचा वास असेल आणि आपल्या ह्रदयातून फक्त धन्यवाद चे भाव येतील… धन्यवाद महाराज कोटी कोटी धन्यवाद . चला आपण श्री गजानन महाराजांना प्रार्थना करूया

हे समर्था आजची तुझी लीला म्हणजे भक्तीच्या उच्च अवस्था प्राप्त करून घेण्याचा आमच्या साठी प्रसादच आहे.. हा प्रसाद आम्हाला दिलास त्या बद्दल खूप खूप धन्यवाद… जशी श्री बंकटलाल यांना भक्ती प्राप्त झाली.. अशी भक्ती आमच्या ह्रदयात जागृत कर.. कारण हे सर्व तुझ्या कृपेशिवाय शकय नाही… तुझ्याच कृपेने आमच्या जीवनातं.. जगद्जननी श्री लक्ष्मी मातेचा वास आहे.. हि समज दिलीस त्या बद्दल धन्यवाद… हि जी समज आज प्राप्त झाली आहे ती आमच्या अंतर्मनात रुजव कारण आमचे मन कायम स्व चा नारा लावते आणि इथेच मी अडकतो.. कृपा कर मला या पासून वाचवं… आणि प्राप्त लक्ष्मीचा वापर योग्य पध्द्तीने करण्याची समज मला दे.. कारण तू भरपूर देतोस.. धन्यवाद समर्था हि प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद !


Share
और पढिये !!

श्री गजानन चरित्र दर्शन 14 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

उन्हाळ्याचे दिवस होते... श्री गजानन महाराज अनेक भक्त मंडळी सोबत बसले होते...त्या भक्त मंडळी मध्ये श्री चंदूमुकीम नावाचा एक भक्त होता... तो भक्ती भावाने सेवा रुजू करत होता... आंब्याचे दिवस होते... त्यामुळे महाराजांसाठी श्री चंदूमुकीम आंबे आणले होते... महाराजांनी एक दोन...

श्री गजानन चरित्र दर्शन 13 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

आपण श्री गजानन चरित्र दर्शन १२ मध्ये पहिले कि श्री महाराजांनी वीणा अग्नी चिलीम प्रज्वलित केली.... खरंतर चिलीम पेटवण्यासाठी श्री जानकी राम यांच्या कडे मुले अग्नी आणण्यासाठी गेली होती... परंतु श्री जानकी राम यांनी अग्नी तर दिला नाहीच... पण उलट श्री महाराजां बद्दल...

श्री गजानन महाराज दर्शन लीला 6 – मराठी

खूप सारे लोक श्री गोविंद बुवांचे किर्तन ऐकण्यासाठी आले होते त्यामध्ये श्री गजानन महाराज पण कडू लिंबाच्या निंबाच्या झाडा जवळ बसून किर्तन ऐकत होते श्री गोविंद बुवांनी किर्तनासाठी श्री  भागवतातील एकादश स्कंध मधील हंस गीता याचा श्लोक किर्तन सेवेसाठी घेतला होता... बुवांनी...

यत्न शिकवण – श्री समर्थ रामदास स्वामी – श्री दासबोध दशक १२ समास ९

यत्न शिकवण - श्री समर्थ रामदास स्वामी - श्री दासबोध दशक १२ समास ९ प्रत्येक संतांनी कर्माला महत्व दिले... असा कोणतेही संत नाहीत कि त्यांनी कर्म सोडून...दे रे हरी पलंगावरी... असे कोणत्याच संतांनी सांगितले नाही... कारण प्रत्येक संत हे कर्म प्रधानच होते... कर्म न करणारे...

श्री गजानन चरित्र दर्शन 12 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

श्री गजानन महाराज बंकटलाल यांच्या घरी राहत होते.. एकेदिवशी एक प्रकार घडला तो दिवस होता... वैशाख शुद्ध तृतीयेचा दिवस होता... म्हणजेच अक्षय तृतीया चा दिवस होता... म्हणजेच या दिवशी आपण पितृ पूजन करतो तो दिवस... साडेतीन मुहूर्ता पैकी एक मुहूर्त..त्या दिवशी श्री...

मी डॉक्टर सिंधुताई सपकाळ बोलतेय – एक प्रेरणा

बाळांनो... मी डॉक्टर सिंधुताई सपकाळ बोलतेय... हो तुमची माई बोलतेय... बेटा दचकू नकोस...मी तर अनंतात विलीन झाले... हि बातमी जेव्हा सोशल मीडिया मार्फत तुझ्या पर्यंत पोहोचली तेव्हा... सोशल मीडिया द्वारे तू जी श्रद्धांजली... भावांजली वाहिलीस त्या बद्दल खूप खूप धन्यवाद......

जसे कर्म तसे फळ आज नाही तर उद्या नक्की मिळतेच- श्री गजानन चरित्र दर्शन 11 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ३

जसे कर्म तसे फळ आज नाही तर उद्या नक्की मिळतेच श्री विठोबा घाटोळ यांना पूर्व पुण्याई ने श्री गजानन महाराजांच्या सेवेची संधी त्यांना मिळाली होती पण म्हणतात ना पुण्य करण्यासाठी पुण्य गाठी असावे लागते... श्री विठोबा घाटोळ यांना श्री महाराजांच्या सेवेची खूप छान अशी संधी...

श्री गजानन चरित्र दर्शन 10 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ३

https://youtu.be/56bS3EN9F-w   श्री गजानन चरित्र दर्शन 10 - संदर्भ - श्री गजानन विजय अध्याय ३ भक्ती रुपी चरणतीर्थचा महिमा श्री जानराव देशमुख हे शेगांव मध्ये राहत होते...ते शेगाव मध्ये प्रसिद्ध व्यक्ती होते... घरात संपत्तीची काहीच कमतरता नव्हती..अचानकपणे त्यांची...

नामस्मरण भक्ति – नवविधा भक्ति – श्री समर्थ रामदास स्वामी

नवविधा भक्ती चा तिसरा प्रकार नामस्मरण भक्ति या भक्ती विषयी श्रीमत दासबोध ग्रंथात सांगतात ” स्मरण देवाचे करावें | अखंड नाम जपत जावें | नामस्मरणें पावावें | समाधान | नित्य नेम प्रातः काळी | माध्यानकाळी सायंकाळी | नामस्मरण सर्वकाळी करत जावें | नामस्मरण भक्ति हि खूपच...

पादसेवन भक्ती -नवविधा भक्ति श्री समर्थ रामदास स्वामी

पादसेवन भक्ती - श्री समर्थ रामदास स्वामी या भक्ती बाबत सांगतात कि - पादसेवन ते जाणावे । कायावाचा मनोभावे । सद्गुरूंचे पाय सेवावे । सद्गती कारणे । सेवावें सद्गुरुचरण । या नाव पादसेवन । श्री समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोध ग्रंथात याचे यतार्थ वर्णन केले आहे -...