श्री गजानन चरित्र दर्शन 15 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

Mar 13, 2022 | चरित्र, मराठी, संत गजानन महाराज

Share

शेगांवच्या दक्षिण दिशेला चिंचोली नावाचे गाव आहे. त्या गावात माधव नावाचे एक ब्राम्हण राहत होते. त्यांचे वय साधारण ६० पेक्षा जास्त होते. त्यांनी आपलें संपूर्ण आयुष्य हे संसार म्हणजे सर्वस्व या साठी खर्ची केले होते. आपल्या भविष्यात काय लिहून ठेवले आहे हे कुणासच माहित नसते. हीच स्थिती माधव यांची झाली .अचानकपणे त्याच्या आयुष्यात दुःखद घटना घडू लागल्या. अचानकपणे त्यांच्या पत्नीचे व मुलाचे निधन झाले . अचानकपणे घडलेल्या या गोष्टीमुळे त्यांच्या समोर दुःखाचा डोंगर उभा राहिला. ते पूर्णपणे एकाकी झाले. त्यांना एकदमच विरक्ती आली. आता ते देवाचा धावा करू लागले. त्यांच्या ह्रद्यातून प्रार्थना निघू लागल्या. हे परमेश्वरा हि माझी काय अवस्था झाली आहे. मी तर आयुष्यभर संसारच केला.कधी तुझे नाव घेतले नाही. आज तो संसार पूर्णपणे विस्कटला आहे. आता मला कुणीच नाही. आता माझा सांभाळ कोण करणार. हे परमेश्वरा तूच मला तारू शकतोस. अश्या प्रार्थना करता करता. कुणाच्या तरी सांगण्यावरून ते शेगांवी येतात. श्री गजानन महाराजांच्या सानिध्यात आल्या नंतर त्यांनी उपोषण सुरु केले. अन्न पाण्याचा त्याग करून त्यांनी हरी नाम सेवा सुरु केली. श्री गजानन महाराजांनी त्यांना सांगितले बाळा असे करू नकोस.अरे आज जी नाम सेवा करत आहेस ती आयुष्यभर का नाही केली ? ज्या पत्नी व मुलांसाठी तू आयुष्यभर संसार केलास ते तर तुला सोडून गेले. आता तुला परमार्थ आठवत आहे. आपण जे कर्म करतो त्याचे फळ आपणस भोगावेच लागते. महाराज त्याला म्हणाले हट्ट करू नकोस भोजन करून घे. तिथे उपस्थित लोक होते त्यांनी देखील भोजन करण्यासाठी विनंती केली परंतु त्याने कुणाचेच ऐकले नाही. अन्न त्याग करून तो तसाच समर्थांच्या सानिध्यात हरी नाम घेत बसून राहिला. आता रात्रीची वेळ झाली सर्वजण झोपले होते. माधव हि तिथेच झोपला होता. महाराजांनी यम स्वरूपात माधव यांस स्वप्नात दृष्टांत दिला. यमाचे ते महा भयंकर रूप पाहून माधव घाबरले. त्यांना धडकी भरली. छाती धडधडु लागली. त्याच्या तोंडातून शब्दच फुटेना. हे सर्व पाहून समर्थांनी सौम्य रूप धारण केले व माधवास म्हणाले अरे स्वतःला धीट म्हणतोस आणि काळाला घाबरतोस. असाच एक दिवस काळ येईल आणि तुला घेऊन जाईल. तुला त्याचे दर्शन घडवले आहे.महाराजांची हि वाणी ऐकताच.. माधव विनंती पूर्वक महाराजांना म्हणाला. यमलोक नको. तेवढी यात्रा टाळा. वैकुंठ प्राप्ती व्हावी हीच प्रार्थना. माधवाची प्रार्थना ऐकून श्री महाराज हसू लागले व म्हणाले अरे मृत्यू समोर येताच हरी नाम घेत आहेस . जर अजून तुझी जगण्याची इच्छा असेल तर आयुष्य वाढेल. तेव्हा श्री माधव म्हणाले महाराज आता आयुष्य नको इतकीच इच्छा आहे कि उर्वरित आयुष्य आपल्या चरणकमलात जावे व शेवटचा श्वास आपली सेवा करता करता व्हावा. महाराजांनी श्री माधव यांची इच्छा पूर्ण केली व महाराज तथास्तु म्हणाले. अश्या रीतीने श्री माधव यांचे देहावसन श्री महाराजांच्या सानिध्यात झाले.
बोला श्री गजानन महाराज कि जय ! 

बोध – खरंतर वरील लीला हि आपल्या सर्वांच्या डोळयातील अंजन अशी आहे. बोध वर मनन करण्यापूर्वी श्री माधवराव यांना नमन करूया कारण त्यांना माध्यम करून समर्थ आपणस बोध देत आहेत. वरील लीलेत श्री माधवराव हे आयुष्यभर संसारात गर्क होते. संसार करत असताना त्यांना केवळ संसारात लक्ष होते. त्यांच्या मुखात कधीच हरी नाम आले नाही. संसार करता करता त्याच्या वयाची ६० वर्षे गेले. अचानकपणे त्यांच्या संसारात दुःख आले त्यांची पत्नी व मुलगा यांचे निधन झाले. आकस्मिकपणे झालेल्या घटने मुळे त्यांना एकदम संसारातून विरक्ती आली आणि ते हरी नामाकडे वळाले. खरंतर आयुष्य संसारात गेले होते. अचानकपणे हरी नाम घेणे सुद्धा त्यांना जड जात होते. पण काही तरी पुण्याई असावी त्यांना श्री गजानन महाराज भेटले. महाराज भेटले तरी त्याचा अट्टाहास सुरूच होता. कारण श्री महाराजांना ओळखण्याची दृष्टी नव्हती. आपले देखील असेच होते. आपण संसार करत असताना आपल्या मुखात हरी नाम येत नाही. तसेच आपले मन देखील सबब देते कि नाम घेण्यासाठी वेळ नाही. असे करत करत आपल्या संसाराचा गाडा सुरु असतो. काही समस्या आली कि आपण तेवढ्यापुर्ती हरी नाम सेवा करतो. समस्या सुटली कि परत संसारात गर्क होतो. खरंतर आपल्या जीवनात एखादी समस्या व संकट येते ते या साठी असते आपल्याला हरी नामावर स्थिर करण्यासाठी. संकट आपल्याला घडवत असते पण आपले मन नेहमी संकटापासून दूर पळण्याचा प्रयत्न करते. श्री माधवराव यांची पुण्याई होती म्हणून त्यांना वार्धक्यात देखील हरी नाम घेता आले. आणि आपली काहीतरी पुण्याई म्हणून आपणस श्री महाराजांच्या कृपेने त्या लीलेस माध्यम करून श्री महाराज आता पासून हरी नाम घेण्यास सांगत आहेत. श्री माधवराव यांना यम स्वरूपात दर्शन देऊन त्यांच्या मनातील सर्व प्रश्नाचे उत्तर श्री महाराजांनी दिले .या यम स्वरूप दर्शनातून महाराज आपणस सांगत आहेत . बाळांनो प्रत्येक क्षणी काळ जवळ येत आहे परंतु आपणस त्याचा विसर पडला आहे. काळ कधी येईल व घेऊन जाईल हे सांगता येणार नाही. काळ येण्याआधी आपणस हरी नामात दंग व्हायचे आहे. म्हणजेच आपल्या ह्रदयातील नामावर स्थिर व्हायचे आहे. या साठी सातत्य हा गुण आवश्यक आहे . श्री माधव राव यमलोक नको तर वैकुंठ हवा आहे असे म्हणत आहेत म्हणजे काय तर प्रत्येक श्वास हा हरी नामात जावा हि प्रार्थना ते करत आहेत म्हणजेच आपणस ते समज देत आहेत कि प्रत्येक श्वास हा हरी नाममय व्हावा !
चला तर मग आपण सर्व जण श्री गजानन महाराजांना प्रार्थना करूया – हे समर्था तुझी प्रत्येक लीला तर बोधच आहे.. परंतु आमचे मन तिला फक्त लीला वा गोष्ट म्हणून घेते.. आजच्या लीलेस माध्यम करून आम्हाला संसार व अध्यात्म यांची सांगड कशी घालावी याची शिकवण दिलीत त्या बद्दल धन्यवाद… आमचे मन संकट व दुःख आले तरच तुझे नाम घेते… आमच्या वर कृपा कर व आमच्या मनाला सदैव तुझ्या नामात दंग कर… आमचा प्रत्येक श्वास हा तुझ्या नामाचा दास असावा.. नामरूपी वैकुंठात आम्हाला स्थिर कर… कारण तुझे नामच सत्य आहे.. हि समज दिल्याबद्दल धन्यवाद… कोटी कोटी धन्यवाद !!

 


Share
और पढिये !!

श्री गजानन चरित्र दर्शन 14 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

उन्हाळ्याचे दिवस होते... श्री गजानन महाराज अनेक भक्त मंडळी सोबत बसले होते...त्या भक्त मंडळी मध्ये श्री चंदूमुकीम नावाचा एक भक्त होता... तो भक्ती भावाने सेवा रुजू करत होता... आंब्याचे दिवस होते... त्यामुळे महाराजांसाठी श्री चंदूमुकीम आंबे आणले होते... महाराजांनी एक दोन...

श्री गजानन चरित्र दर्शन 13 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

आपण श्री गजानन चरित्र दर्शन १२ मध्ये पहिले कि श्री महाराजांनी वीणा अग्नी चिलीम प्रज्वलित केली.... खरंतर चिलीम पेटवण्यासाठी श्री जानकी राम यांच्या कडे मुले अग्नी आणण्यासाठी गेली होती... परंतु श्री जानकी राम यांनी अग्नी तर दिला नाहीच... पण उलट श्री महाराजां बद्दल...

श्री गजानन महाराज दर्शन लीला 6 – मराठी

खूप सारे लोक श्री गोविंद बुवांचे किर्तन ऐकण्यासाठी आले होते त्यामध्ये श्री गजानन महाराज पण कडू लिंबाच्या निंबाच्या झाडा जवळ बसून किर्तन ऐकत होते श्री गोविंद बुवांनी किर्तनासाठी श्री  भागवतातील एकादश स्कंध मधील हंस गीता याचा श्लोक किर्तन सेवेसाठी घेतला होता... बुवांनी...

यत्न शिकवण – श्री समर्थ रामदास स्वामी – श्री दासबोध दशक १२ समास ९

यत्न शिकवण - श्री समर्थ रामदास स्वामी - श्री दासबोध दशक १२ समास ९ प्रत्येक संतांनी कर्माला महत्व दिले... असा कोणतेही संत नाहीत कि त्यांनी कर्म सोडून...दे रे हरी पलंगावरी... असे कोणत्याच संतांनी सांगितले नाही... कारण प्रत्येक संत हे कर्म प्रधानच होते... कर्म न करणारे...

श्री गजानन चरित्र दर्शन 12 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

श्री गजानन महाराज बंकटलाल यांच्या घरी राहत होते.. एकेदिवशी एक प्रकार घडला तो दिवस होता... वैशाख शुद्ध तृतीयेचा दिवस होता... म्हणजेच अक्षय तृतीया चा दिवस होता... म्हणजेच या दिवशी आपण पितृ पूजन करतो तो दिवस... साडेतीन मुहूर्ता पैकी एक मुहूर्त..त्या दिवशी श्री...

मी डॉक्टर सिंधुताई सपकाळ बोलतेय – एक प्रेरणा

बाळांनो... मी डॉक्टर सिंधुताई सपकाळ बोलतेय... हो तुमची माई बोलतेय... बेटा दचकू नकोस...मी तर अनंतात विलीन झाले... हि बातमी जेव्हा सोशल मीडिया मार्फत तुझ्या पर्यंत पोहोचली तेव्हा... सोशल मीडिया द्वारे तू जी श्रद्धांजली... भावांजली वाहिलीस त्या बद्दल खूप खूप धन्यवाद......

जसे कर्म तसे फळ आज नाही तर उद्या नक्की मिळतेच- श्री गजानन चरित्र दर्शन 11 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ३

जसे कर्म तसे फळ आज नाही तर उद्या नक्की मिळतेच श्री विठोबा घाटोळ यांना पूर्व पुण्याई ने श्री गजानन महाराजांच्या सेवेची संधी त्यांना मिळाली होती पण म्हणतात ना पुण्य करण्यासाठी पुण्य गाठी असावे लागते... श्री विठोबा घाटोळ यांना श्री महाराजांच्या सेवेची खूप छान अशी संधी...

श्री गजानन चरित्र दर्शन 10 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ३

https://youtu.be/56bS3EN9F-w   श्री गजानन चरित्र दर्शन 10 - संदर्भ - श्री गजानन विजय अध्याय ३ भक्ती रुपी चरणतीर्थचा महिमा श्री जानराव देशमुख हे शेगांव मध्ये राहत होते...ते शेगाव मध्ये प्रसिद्ध व्यक्ती होते... घरात संपत्तीची काहीच कमतरता नव्हती..अचानकपणे त्यांची...

नामस्मरण भक्ति – नवविधा भक्ति – श्री समर्थ रामदास स्वामी

नवविधा भक्ती चा तिसरा प्रकार नामस्मरण भक्ति या भक्ती विषयी श्रीमत दासबोध ग्रंथात सांगतात ” स्मरण देवाचे करावें | अखंड नाम जपत जावें | नामस्मरणें पावावें | समाधान | नित्य नेम प्रातः काळी | माध्यानकाळी सायंकाळी | नामस्मरण सर्वकाळी करत जावें | नामस्मरण भक्ति हि खूपच...

पादसेवन भक्ती -नवविधा भक्ति श्री समर्थ रामदास स्वामी

पादसेवन भक्ती - श्री समर्थ रामदास स्वामी या भक्ती बाबत सांगतात कि - पादसेवन ते जाणावे । कायावाचा मनोभावे । सद्गुरूंचे पाय सेवावे । सद्गती कारणे । सेवावें सद्गुरुचरण । या नाव पादसेवन । श्री समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोध ग्रंथात याचे यतार्थ वर्णन केले आहे -...