श्री गजानन महाराज दर्शन लीला 6 – मराठी

Jan 16, 2022 | मराठी, संत गजानन महाराज

Share

खूप सारे लोक श्री गोविंद बुवांचे किर्तन ऐकण्यासाठी आले होते त्यामध्ये श्री गजानन महाराज पण कडू लिंबाच्या निंबाच्या झाडा जवळ बसून किर्तन ऐकत होते श्री गोविंद बुवांनी किर्तनासाठी श्री  भागवतातील एकादश स्कंध मधील हंस गीता याचा श्लोक किर्तन सेवेसाठी घेतला होता… बुवांनी किर्तनाचा पुर्वार्ध सांगितला किर्तनाचा उत्तरार्ध सांगताना त्यांना अडचण येत होती … श्री गजानन महाराजांनी किर्तनाचा उरलेला भाग सांगितला त्यांचे कीर्तन ऐकून सगळे तृप्त झाले तेव्हा श्री गोविंद बुवा तेथील उपस्थित लोकांना म्हणाले कि श्री महाराजांना येथे येण्याची विनंती करा तेव्हा बंकटलाल आणि बाकीचे लोक श्री महाराजांच्या जवळ जातात व त्याना येण्याची विनंती करतात… परंतु श्री महाराज येत नाहीत… तेव्हा श्री गोविंद बुवा स्वतः श्री महाराजांच्या जवळ जातात आणि त्यांना मंदिरात येण्याची विनंती करतात… आपण स्वतः शिव स्वरूप आहात… कृपया आपण मंदिरात चलावे… तुमच्या शिवाय मंदिर सुने सुने आहे… माझ्या पूर्व जन्माचे काही तरी पुण्य कर्म असावे त्यामुळेच मला तुमचे दर्शन झाले… आणि तुमच्या मुखातून कीर्तनाचा उत्तरार्ध ऐकण्यास मिळाला… तेव्हा श्री महाराज त्यांच्याकडे पाहून बोलतात… लोकांना सांगतात ईश्वर सर्वत्र आहे… आत बाहेर असे काहीच नाही… आणि स्वतः त्या कीर्तन कथेच्या विरुद्ध वर्तन करता… लोकांना एक गोष्ट सांगता व स्वतः त्याच्या नुसार आचरण करत नाही… इतरांसारखे व्यवहारिक कीर्तनकार बनू नका … जा कीर्तन सेवा रुजू करा… मी इथे बसून कीर्तन ऐकतो… श्री गोविंद बुवा व्यास पीठावर आले आणि त्यांनी सर्वांना सांगितले कि आपण सर्व खूप नशीबवान आहोत… आपल्या गावात प्रत्यक्ष परब्रह्म आले आहेत… त्याची सेवा करा… आपल्या सर्वांचे कल्याण होईल… सगळयांनी एका स्वरात श्री गजानन महाराजांचा जय जयकार केला .
बोला – श्री गजानन महाराजांचा जय जयकार असो .

बोध – वरील लीलेतून  बोध समजण्याची समज आमहाला द्या… वरील लीलेत श्री गोविंद बुवांनी कीर्तन सुरु केले ते खूप मोठे कीर्तनकार होते… त्यानी पूर्वार्ध तर सांगितला परुंतु उत्तरार्ध सांगताना त्यांना काय सांगावे हे सुचले नाही त्या वेळी श्री गजानन महाराजांनी कीर्तनाचा उत्तरार्ध पूर्ण केला… असेच आपल्या जीवनात सुद्धा खूप वेळेस होत असते… आपण कोणत्या तरी अडचणीत असतो आणि आपण ईश्वराला प्रार्थना करतो… त्याच वेळी कुणीतरी येऊन आपली मदत करते… त्यांना ईश्वरानेच आपल्या मदती साठी पाठवले असते आणि आपण म्हणतो देवा सारखे धावून आलात आणि माझी मदत केलीत… परंतु काही दिवसांनी ते आपण विसरून जातो… श्री गोविंद बुवा श्री महाराजांना म्हणतात कि आपण शिव स्वरूप आहात.. कृपया मंदिरात चला… तेव्हा श्री महाराज त्यांना बोलतात कि तुम्ही कीर्तनात लोकांना सांगता… कि ईश्वर सर्वत्र आहे आणि आपणच हि गोष्ट विसरलात.. आपण व्यवहारिक बनू नका… इथे श्री महाराज आपल्याला सांगतात कि मी सर्वत्र आहे… कोणत्याही ऐका ठिकाणी गेलात तरच मी भेटले असे नाही.. इथे श्री महाराज हा सुद्धा आपणस बोध देतात कि चांगल्या गोष्टी फक्त लोकांना सांगण्यासाठी नसतात तर प्रथम आपण त्याचे अनुकरण करणे गरजेचे आहे… त्यावर आपण अधिक चिंतन मनन केले तर त्याचा जास्त खोलवर बोध श्री महाराज आपणस देतील… चला आपण श्री महाराजांना प्रार्थना करूयात – श्री गजानन महाराज… तुम्ही आमच्या प्रत्येक प्रार्थनेची पूर्तता करतात… जेव्हा तुम्ही आमच्या इच्छे ची पूर्ती करता त्यावेळी आमची श्रद्धा भाव उच्चतम असतो… परंतु काही दिवसांनी ती परत कमी होते… जसे श्री गोविंद बुवा यांना समज दिलीत… तशीच समज आमहाला द्या… आमच्या मध्ये अध्यात्मिकते मध्ये जो व्यवहारिकपणा आहे ती दूर करा आणि आम्हाला चांगली समज द्या…जेणेकरून आपली प्रामाणिक भक्ती आमहाला समजेल… धन्यवाद महाराज… कोटी कोटी धन्यवाद !!


Share
और पढिये !!

वेळ

भगवंताने सर्वांना एक गोष्ट सारखीच दिली आहे ती म्हणजे दिवसाचे २४ तास त्यामुळे आपण असे कधीच म्हणू शकत नाही कि माझ्या कडे वेळ नाही. वॉरन बफे म्हणतात - श्रीमंत लोक वेळेत गुंतवणूक करतात गरीब लोक पैशाची गुंतवणूक करतात मायकल आल्थसूलर - वेळ उडतो आपण त्याचे पायलट आहोत प्रत्येक...

राखी पौर्णिमा

राखी पौणिमा म्हणजे नात्याला घट्ट करण्याचा उत्सव..आपण वयाने मोठे झालो की काही कारणास्तव या नात्यात दुरावा येतो..या मागे कारण असते वडिलोपार्जित संपत्ती..जी खरं तर नात्यात दुरावा निर्माण करते..खरंतर या साठी कष्ट करणारा मरून जातो..आणि मेल्यावर विचार करतो यासाठीच केले होते...

आपण स्व आदर करतो का

आपण स्वतः ला काय समजतो - खरंतर हा प्रश्न आज पर्यंत आपण आपल्या स्वतःला विचारला आहे का ? विचारला असेल तर आपले आपल्या स्वतः बद्दल मत काय आहे? आपण स्वतः स्वतःचा आदर करता का ? याचे उत्तर काहींचे हो असेल काहींचे नाही असे असेल.. खरंतर जो पर्यंत आपण स्वतः आपला आदर करत नाही तो...

श्री दासबोध दशक १२ समास १

श्री दासबोध दशक १२ समास १ दासबोधातील दशक १२ मधील समास १ मध्ये श्री समर्थ रामदास स्वामी विमल लक्षण सांगत आहेत प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालावी हा उपदेश देत आहेत... प्रपंच करण्यात आळस करू नये.. अनेक लोक म्हणतात प्रपंच आणि परमार्थ एकत्र होऊ शकत नाही... रामदास स्वामी...

नृसिंह जयंती – नृसिंह जन्म कथा

आज नृसिंह जयंती निमित्त चला आपण नृसिंह जन्म कथा पाहूया हिरण्यकश्यपू राजा ह्यांनी भगवंताची भक्ती करून त्याला प्रसन्न करून घेतले होते व असा वर मागितला कि मला कोणत्याही माणसाकडून वा प्राण्याकडून मृत्य येऊ नये, दिवसा किंवा रात्री मृत्य येऊ नये , घरात नाही किंवा बाहेर...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 19 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज काही दिवस शेगांव मध्ये राहिले... परब्रम्ह जिथे आवश्यकता असते तिथे संचार करत असते. कुणीही त्यांना एका ठिकाणी अडकवून ठेवू शकत नाही. वऱ्हाड प्रांतात अडगाव नावाचे गाव आहे तिथे गजानन महाराज जाण्यासाठी निघाले . तो महिना होता वैशाख. वैशाख महिना...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 18 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

लीला क्रमांक १७ मध्ये आपण पहिले कि महाराज पिपंळगावात आले. समाधी अवस्थे मधून महाराज बाहेर यावेत व आपल्याशी बोलावेत यासाठी गावकर्यांनी कसा प्रयत्न केला आणि त्यांच्या श्रद्धेचे फलस्वरूप महाराज समाधी अवस्थेतून बाहेर आले तो दिवस होता सोमवारचा. पुढे दुसऱ्या दिवशी मंगळवारी...

श्री गजानन चरित्र दर्शन 17 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

श्री गजानन महाराज शेगांव मध्ये होते..महाराजांच्या लीला ची प्रचित अनेक भक्तांना येत होती..त्यामुळे दिवसेंदिवस.. भक्तांची गर्दी वाढतच होती..अचानक एक दिवस महाराजांच्या काय मनात आले माहित नाही... महाराज अचानक शेगांव सोडून... शेगांव जवळ असणाऱ्या पिंपळगाव गावात निघून...

श्री गजानन चरित्र दर्शन 16 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

ऐके दिवशी सर्व सेवेकरी मंडळी महाराजांच्या चरणी सेवा रुजू करत होते.. अचानक महाराजांनी सर्वांना बोलवले व म्हणाले... वसंत पंचमी च्या दिवशी घनपाठी ब्राम्हण बोलवा.. मंत्र जागर करूया.. तसेच सर्वांनी एक एक रुपया दक्षिणा देण्यासाठी काढावा... महाराजांची हि वाणी ऐकून सर्व...