यत्न शिकवण – श्री समर्थ रामदास स्वामी – श्री दासबोध दशक १२ समास ९

Jan 16, 2022 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

यत्न शिकवण – श्री समर्थ रामदास स्वामी – श्री दासबोध दशक १२ समास ९
प्रत्येक संतांनी कर्माला महत्व दिले… असा कोणतेही संत नाहीत कि त्यांनी कर्म सोडून…दे रे हरी पलंगावरी… असे कोणत्याच संतांनी सांगितले नाही… कारण प्रत्येक संत हे कर्म प्रधानच होते… कर्म न करणारे मनुष्य श्री रामदास स्वामींना करंटे वाटतात…श्री रामदास स्वामी आपणस कर्म कसे असावं याची शिकवण देत आहेत… समर्थ सांगत आहेत… सर्वप्रथम आपणास आपल्या मनाला शिकवण देणे आवश्यक आहे… म्हणजेच आपल्याला आपल्या मनावर कार्य करणे आवश्यक आहे…कारण मन हे सर्व गोष्टीचे कारक असते त्यामुळे आपणस मनावर कार्य करणे आवश्यक आहे… कार्य कोणतेही असो लहान असो व मोठे असो आपणस कर्म करणे आवश्यक आहे… मग ते कर्म करत असताना काही गोष्टी आवश्यक असतात… माणसाने सदैव तत्पर असणे आवश्यक आहे… काम कोणतेही असो आपण ते सुरु केल्या पासून ते पूर्ण होई पर्यंत न थांबता प्रयत्न करत राहणे खूप महत्वाचे असे आहे..  त्या शिवाय कामात यश प्राप्त होऊ शकत नाही… आळस पूर्णपणे सोडून देणे आवश्यक आहे.. अनेकदा आपले मन निराश होते कारण आपणस यश येत नाही… तरी देखील आपणस न थांबता न थकता प्रयत्न सुरु ठेवणे आवश्यक आहे… त्यानंतर आपणस आपल्या जीवनात काही बदल करणे आवश्यक आहे… रोज सकाळी लवकर उठावे… उठल्या नंतर प्रथम भगवंताचे नामस्मरण करावे… प्रातः कर्मे प्रथम पूर्ण करावेत… रोज काही तरी नवीन पाठ करावे… नवीन शिकावे… रोज त्याची उजळणी करावी.. असे होऊ नये पुढचे पाठ मागचे सपाट… नंतर थोडासा फलाहार घ्यावा… त्यानंतर आपण जे काही नोकरी.. व्यवसाय करत असाल त्यास सुरवात करावी… महाराज सांगतात… आपले अक्षर सुंदर असावे… वाचन सुद्धा स्पष्ट असावे… शुद्ध असावे… आपणस एखाद्या विषयाची काही अडचण असेल तर त्या बाबत आपण तज्ञ् व्यक्तींना विनासंकोच विचारावे… असे नाही कि मी कसे विचारू…आपले अज्ञान लपवू नका… त्याच प्रमाणे आपल्या कडे कुणी आले तर त्याचे समाधान देखील पण करावे.. पण त्याला चुकीचे मार्गदर्शन करू नये…रोज काही तरी आध्यात्मिक ग्रंथाचे वा चांगले साहित्य वाचावे… नुसते साहित्य वाचू नये तर त्यावर स्व चिंतन करावे… स्व चिंतन करून समजले नाही तर त्यातील तज्ञ् व्यक्तींना विचारावे… शक्य असेल तर आपण आपले आध्यत्मिक ज्ञान वा चांगले ज्ञान इतरांना द्यावे परंतु ते सत्य असावे खोटे नसावे… आपले आचरण हे सत्य असावे… म्हणजेच आपण जसे बोलतो तसेच आपले कर्म असावे… म्हणजेच बोले तैसे वागे.. त्याची वंदावी पाऊले । आपले आचरण असे असावे कि ज्याचा इतरांना त्रास होऊ नये.. या सर्व गोष्टी बरोबर महाराज महत्वाची गोष्ट सांगत आहेत…आपल्या ह्रदयात जो भगवंत आहे त्याचे नेहमी ध्यान… चिंतन करण्याचा अभ्यास करावा… अश्या पद्धतीने जर आपले कर्म असेल तर नक्कीच एक दिवस आपणस यश प्राप्त होते यात कोणतीच शंका नसावी.
नक्कीच आपण श्री दासबोध ग्रंथाचा अभ्यास करावा… जय जय रघुवीर समर्थ !
चला आपण समर्थांना प्रार्थना करूया – हे समर्था आज जी आपण आम्हाला यत्नशिकवण दिलीत त्या बद्दल धन्यवाद… आज पर्यंत आम्ही दैववादी होतो… परंतु आज तुम्ही आम्हाला प्रयत्न वादाची… कर्माची शिकवण दिलीत त्याबद्दल धन्यवाद.. आमच्या मनाला सदैव हि शिकवण स्मरणात रहावी… जो पर्यंत यशाची प्राप्ती होत नाही तो पर्यंत न थांबता.. न थकता.. प्रयत्न करत राहण्याची प्रेरणा आम्हाला दे… आणि तू जो ह्रदयात स्थित आहेस… त्यावर माझे चित्त स्थिर कर… धन्यवाद समर्था… हि प्रार्थना करून घेतल्या बद्दल धन्यवाद ! जय जय रघुवीर समर्थ


Share
और पढिये !!

ईश्वर हमको जब कोई समस्या देता है वह चाहता है की हमारी प्रगति हो

ईश्वर हमको जब कोई समस्या देता है वह चाहता है की हमारी प्रगति हो.. लेकिन हमारा मन समस्या आने के डर से या विचारों के कारण हम यह सब भूल जाते है.. चलो आज हम स्वामी वाणी के माध्यम से इसको समझते है.. श्री स्वामी समर्थ महाराज के भक्त बसप्पा नाम के भक्त थे.. उनकी स्वामी चरणों...

शिव लिंग पूजन के लिए कैसा शिव लिंग हो

  सर्वप्रथम महादेवजी के लिंग का पूजन श्री ब्रम्हदेव और विष्णु देव इन्होने किया वह दिन महाशिवरात्रि का दिन था.. इनकी पूजा से महादेव जी प्रसन्न हुवे और उन्होंने यह वर दिया की इस दिन जो भी कोई शिव पूजन करेंगे उन्हें पुरे साल सेवा करने का फल प्राप्त होगा..शिव पुराण...

शिव पुराण कथा 6

शिव भक्तहो.. शिव पुराण कथा सांगते.. महादेवाची पूजा श्रवण, कीर्तन आणि मनन याने करावी आता काही जण म्हणतील आम्हाला हे शक्य नाही..तर मग आम्ही काय करावे..श्री शिव पुराण कथा सांगते..लिंग अथवा शिव मूर्तीचे पूजन करावे...आता इथे आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो की शिव लिंग...

शिव पुराण कथा 5

विधवेश्वर संहिता १०.हजार श्लोक, रुद्र संहिता ,विनायक संहिता,उमासंहिता,मातृसंहिता यात प्रत्येकी 8 .हजार श्लोक एकादशरुद्रसंहिता 13 .हजार श्लोक ,कैलाससंहिता 6 हजार श्लोक,कोटी रुद्र संहिता 9.हजार श्लोक, सहस्त्र-कोटी रुद्र संहिता ११ हजार श्लोक,वायवीयसंहिता 4 .हजार श्लोक,...

शिव पुराण कथा ४

शिव पुराण कथा 4 शिव पुराण कथा श्रवण किंवा वाचन करताना कोणते नियम पाळावेत याचे वर्णन श्री शिव महापुराण मध्ये येते.. सर्वप्रथम आपले आप्तेष्ट घरातील मंडळी यांच्याशी आपण चर्चा करावी कि आपणस श्री शिव महा पुराण कथा करणार आहोत तर कधी करावी.. त्यात प्रत्येकाचे मत विचारात...

शिव पुराण कथा ३

शिव पुराण कथा 3 आपण शिव पुराण च्या दुसऱ्या कथेत पाहिले की चंचुला हिला।शिव लोक प्राप्ती झाली..म्हणजेच ती मुक्त झाली..मुक्त झाल्यानंतर सुद्धा तिची शिव भक्ती सुरूच होती..ती शिव पार्वती यांच्या समोर विनम्र भावनेने उभी राहिली..तिच्या डोळ्यात आनंद अश्रू येत होते...पार्वती...

शिव पुराण कथा २

  समुद्राच्या जवळ एक बाष्कळ नावाचे गाव होते...तिथे धर्माचे आचरण सोडून वागणारे दोघेजण राहत होते....ते खूपच वाईट होते...त्यांचे मन दूषित होते...कायम विषयासक्त होते..ईश्वरावर त्यांचा विश्वास नव्हता..तिथे राहणारे लोक सुद्धा तसेच होते...त्या गावात एक बिंदुग नावाचा...

शिव पुराण कथा १

शिव पुराण हे भगवान शिव यांचे सर्वस्व आहे.. शिव पुराण  श्रवण किंवा पठण केले तर चारी पुरुषार्थ प्राप्त होतो.. चित्त शुद्धी साठी शिव महापुराण चे चिंतन मनन करावे.. देवराज नावाचा एक गृहस्थ होता .. तो सर्व आचरण हे चुकीचे होते.. ज्ञान नव्हते पण दाखवत होता खूप ज्ञानी आहे.....

प्रार्थना कोणती पूर्ण होते

प्रार्थना - आपण लहान पणा पासून ऐकतो प्रार्थना करत आलो आहोत.. आपण हि आपल्या मुलांना हि प्रार्थना करण्यास सांगतो.. पण प्रार्थना म्हणजे असते तरी काय.. हृदयातून निघालेला आवाज जो सर्वांचा हित दायक असतो त्यास आपण प्रार्थना म्हणू शकतो आता याची अशी एकच व्याख्या करणे अवघड...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २८ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ८

अरे या अध्यात्म विद्येला पोट भरण्याची विद्या बनवू नका खंडू पाटीलांनी श्री महाराजांना विनंती करून आपल्या घरी राहण्यास नेले..एकेदिवशी खंडू पाटील यांच्या घरी काही कर्मठ ब्राह्मण आले.. त्यांना पैशाचा लोभ होता.. त्यावेळी श्री महाराज आराम करत होते.. हे कर्मठ ब्राम्हण मोठं...