यत्न शिकवण – श्री समर्थ रामदास स्वामी – श्री दासबोध दशक १२ समास ९

Jan 16, 2022 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

यत्न शिकवण – श्री समर्थ रामदास स्वामी – श्री दासबोध दशक १२ समास ९
प्रत्येक संतांनी कर्माला महत्व दिले… असा कोणतेही संत नाहीत कि त्यांनी कर्म सोडून…दे रे हरी पलंगावरी… असे कोणत्याच संतांनी सांगितले नाही… कारण प्रत्येक संत हे कर्म प्रधानच होते… कर्म न करणारे मनुष्य श्री रामदास स्वामींना करंटे वाटतात…श्री रामदास स्वामी आपणस कर्म कसे असावं याची शिकवण देत आहेत… समर्थ सांगत आहेत… सर्वप्रथम आपणास आपल्या मनाला शिकवण देणे आवश्यक आहे… म्हणजेच आपल्याला आपल्या मनावर कार्य करणे आवश्यक आहे…कारण मन हे सर्व गोष्टीचे कारक असते त्यामुळे आपणस मनावर कार्य करणे आवश्यक आहे… कार्य कोणतेही असो लहान असो व मोठे असो आपणस कर्म करणे आवश्यक आहे… मग ते कर्म करत असताना काही गोष्टी आवश्यक असतात… माणसाने सदैव तत्पर असणे आवश्यक आहे… काम कोणतेही असो आपण ते सुरु केल्या पासून ते पूर्ण होई पर्यंत न थांबता प्रयत्न करत राहणे खूप महत्वाचे असे आहे..  त्या शिवाय कामात यश प्राप्त होऊ शकत नाही… आळस पूर्णपणे सोडून देणे आवश्यक आहे.. अनेकदा आपले मन निराश होते कारण आपणस यश येत नाही… तरी देखील आपणस न थांबता न थकता प्रयत्न सुरु ठेवणे आवश्यक आहे… त्यानंतर आपणस आपल्या जीवनात काही बदल करणे आवश्यक आहे… रोज सकाळी लवकर उठावे… उठल्या नंतर प्रथम भगवंताचे नामस्मरण करावे… प्रातः कर्मे प्रथम पूर्ण करावेत… रोज काही तरी नवीन पाठ करावे… नवीन शिकावे… रोज त्याची उजळणी करावी.. असे होऊ नये पुढचे पाठ मागचे सपाट… नंतर थोडासा फलाहार घ्यावा… त्यानंतर आपण जे काही नोकरी.. व्यवसाय करत असाल त्यास सुरवात करावी… महाराज सांगतात… आपले अक्षर सुंदर असावे… वाचन सुद्धा स्पष्ट असावे… शुद्ध असावे… आपणस एखाद्या विषयाची काही अडचण असेल तर त्या बाबत आपण तज्ञ् व्यक्तींना विनासंकोच विचारावे… असे नाही कि मी कसे विचारू…आपले अज्ञान लपवू नका… त्याच प्रमाणे आपल्या कडे कुणी आले तर त्याचे समाधान देखील पण करावे.. पण त्याला चुकीचे मार्गदर्शन करू नये…रोज काही तरी आध्यात्मिक ग्रंथाचे वा चांगले साहित्य वाचावे… नुसते साहित्य वाचू नये तर त्यावर स्व चिंतन करावे… स्व चिंतन करून समजले नाही तर त्यातील तज्ञ् व्यक्तींना विचारावे… शक्य असेल तर आपण आपले आध्यत्मिक ज्ञान वा चांगले ज्ञान इतरांना द्यावे परंतु ते सत्य असावे खोटे नसावे… आपले आचरण हे सत्य असावे… म्हणजेच आपण जसे बोलतो तसेच आपले कर्म असावे… म्हणजेच बोले तैसे वागे.. त्याची वंदावी पाऊले । आपले आचरण असे असावे कि ज्याचा इतरांना त्रास होऊ नये.. या सर्व गोष्टी बरोबर महाराज महत्वाची गोष्ट सांगत आहेत…आपल्या ह्रदयात जो भगवंत आहे त्याचे नेहमी ध्यान… चिंतन करण्याचा अभ्यास करावा… अश्या पद्धतीने जर आपले कर्म असेल तर नक्कीच एक दिवस आपणस यश प्राप्त होते यात कोणतीच शंका नसावी.
नक्कीच आपण श्री दासबोध ग्रंथाचा अभ्यास करावा… जय जय रघुवीर समर्थ !
चला आपण समर्थांना प्रार्थना करूया – हे समर्था आज जी आपण आम्हाला यत्नशिकवण दिलीत त्या बद्दल धन्यवाद… आज पर्यंत आम्ही दैववादी होतो… परंतु आज तुम्ही आम्हाला प्रयत्न वादाची… कर्माची शिकवण दिलीत त्याबद्दल धन्यवाद.. आमच्या मनाला सदैव हि शिकवण स्मरणात रहावी… जो पर्यंत यशाची प्राप्ती होत नाही तो पर्यंत न थांबता.. न थकता.. प्रयत्न करत राहण्याची प्रेरणा आम्हाला दे… आणि तू जो ह्रदयात स्थित आहेस… त्यावर माझे चित्त स्थिर कर… धन्यवाद समर्था… हि प्रार्थना करून घेतल्या बद्दल धन्यवाद ! जय जय रघुवीर समर्थ


Share
और पढिये !!

वेळ

भगवंताने सर्वांना एक गोष्ट सारखीच दिली आहे ती म्हणजे दिवसाचे २४ तास त्यामुळे आपण असे कधीच म्हणू शकत नाही कि माझ्या कडे वेळ नाही. वॉरन बफे म्हणतात - श्रीमंत लोक वेळेत गुंतवणूक करतात गरीब लोक पैशाची गुंतवणूक करतात मायकल आल्थसूलर - वेळ उडतो आपण त्याचे पायलट आहोत प्रत्येक...

राखी पौर्णिमा

राखी पौणिमा म्हणजे नात्याला घट्ट करण्याचा उत्सव..आपण वयाने मोठे झालो की काही कारणास्तव या नात्यात दुरावा येतो..या मागे कारण असते वडिलोपार्जित संपत्ती..जी खरं तर नात्यात दुरावा निर्माण करते..खरंतर या साठी कष्ट करणारा मरून जातो..आणि मेल्यावर विचार करतो यासाठीच केले होते...

आपण स्व आदर करतो का

आपण स्वतः ला काय समजतो - खरंतर हा प्रश्न आज पर्यंत आपण आपल्या स्वतःला विचारला आहे का ? विचारला असेल तर आपले आपल्या स्वतः बद्दल मत काय आहे? आपण स्वतः स्वतःचा आदर करता का ? याचे उत्तर काहींचे हो असेल काहींचे नाही असे असेल.. खरंतर जो पर्यंत आपण स्वतः आपला आदर करत नाही तो...

श्री दासबोध दशक १२ समास १

श्री दासबोध दशक १२ समास १ दासबोधातील दशक १२ मधील समास १ मध्ये श्री समर्थ रामदास स्वामी विमल लक्षण सांगत आहेत प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालावी हा उपदेश देत आहेत... प्रपंच करण्यात आळस करू नये.. अनेक लोक म्हणतात प्रपंच आणि परमार्थ एकत्र होऊ शकत नाही... रामदास स्वामी...

नृसिंह जयंती – नृसिंह जन्म कथा

आज नृसिंह जयंती निमित्त चला आपण नृसिंह जन्म कथा पाहूया हिरण्यकश्यपू राजा ह्यांनी भगवंताची भक्ती करून त्याला प्रसन्न करून घेतले होते व असा वर मागितला कि मला कोणत्याही माणसाकडून वा प्राण्याकडून मृत्य येऊ नये, दिवसा किंवा रात्री मृत्य येऊ नये , घरात नाही किंवा बाहेर...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 19 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज काही दिवस शेगांव मध्ये राहिले... परब्रम्ह जिथे आवश्यकता असते तिथे संचार करत असते. कुणीही त्यांना एका ठिकाणी अडकवून ठेवू शकत नाही. वऱ्हाड प्रांतात अडगाव नावाचे गाव आहे तिथे गजानन महाराज जाण्यासाठी निघाले . तो महिना होता वैशाख. वैशाख महिना...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 18 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

लीला क्रमांक १७ मध्ये आपण पहिले कि महाराज पिपंळगावात आले. समाधी अवस्थे मधून महाराज बाहेर यावेत व आपल्याशी बोलावेत यासाठी गावकर्यांनी कसा प्रयत्न केला आणि त्यांच्या श्रद्धेचे फलस्वरूप महाराज समाधी अवस्थेतून बाहेर आले तो दिवस होता सोमवारचा. पुढे दुसऱ्या दिवशी मंगळवारी...

श्री गजानन चरित्र दर्शन 17 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

श्री गजानन महाराज शेगांव मध्ये होते..महाराजांच्या लीला ची प्रचित अनेक भक्तांना येत होती..त्यामुळे दिवसेंदिवस.. भक्तांची गर्दी वाढतच होती..अचानक एक दिवस महाराजांच्या काय मनात आले माहित नाही... महाराज अचानक शेगांव सोडून... शेगांव जवळ असणाऱ्या पिंपळगाव गावात निघून...

श्री गजानन चरित्र दर्शन 16 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

ऐके दिवशी सर्व सेवेकरी मंडळी महाराजांच्या चरणी सेवा रुजू करत होते.. अचानक महाराजांनी सर्वांना बोलवले व म्हणाले... वसंत पंचमी च्या दिवशी घनपाठी ब्राम्हण बोलवा.. मंत्र जागर करूया.. तसेच सर्वांनी एक एक रुपया दक्षिणा देण्यासाठी काढावा... महाराजांची हि वाणी ऐकून सर्व...