श्री गजानन चरित्र दर्शन 12 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

Jan 16, 2022 | मराठी, संत गजानन महाराज

Share

श्री गजानन महाराज बंकटलाल यांच्या घरी राहत होते.. एकेदिवशी एक प्रकार घडला तो दिवस होता… वैशाख शुद्ध तृतीयेचा दिवस होता… म्हणजेच अक्षय तृतीया चा दिवस होता… म्हणजेच या दिवशी आपण पितृ पूजन करतो तो दिवस… साडेतीन मुहूर्ता पैकी एक मुहूर्त..त्या दिवशी श्री महाराजांच्या काय मनात आले कुणास ठाऊक… श्री महाराज मुलांमध्ये बैसले आणि म्हणाले आम्हाला चिलीम हवी आहे कुणीतरी भरून द्यावी… हि महाराजांची वाणी होताच सर्व मुलांनी महाराजांना चिलीम भरून दिली… परंतु ती चिलीम पेटवण्यासाठी विस्तवाची आवश्यकता होती… आता सर्वांनां प्रश्न पडला कि विस्तव कुठून आणावा… तितक्यात तिथे श्री बंकटलाल आले… बंकटलालानी मुलांना विचारले काय झाले… तेव्हा मुले म्हणाली… महाराजांना चिलीम भरुन दिली आहे परंतु ती पेटवण्यासाठी अग्नी नाही… तेव्हा बंकटलाल म्हणाले चिंता कशाला करता… आपल्या गल्लीत जानकीराम सोनार आहेत ना त्याच्या कडे जाऊन अग्नी घेऊन या… त्याच्या व्यवसायाची सुरवात अग्नी सुरु करूनच होते… ती मुले सोनाराकडे गेली… सोनाराला अग्नी मागितला… सोनार त्या मुलांना रागावला आणि म्हणाला अरे काय तुम्ही त्या महाराजांच्या नादी लागला आहात .. मी काही अग्नी वगैरे देणार नाही.. जाऊन सांग त्यांना जर आहात तुम्ही साक्षात्कारी तर मग विस्तवाची काय गरज आहे.. पेटवा तशीच चिलीम… सर्व मुले नाराज झाली… मुलांनी सर्व वृत्तांत महाराजांना व बंकटलाल यांना सांगितला… हे ऐकून महाराज हसले … बंकटलाल महाराजांना म्हणाला मी अग्नी तयार करतो… तेव्हा श्री महाराज म्हणाले… अग्नी तयार करू नकोस… नुसती काडी चिलीम जवळ धर… श्री महाराजांच्या आज्ञे नुसार बंकटलाल यांनी नुसती काडी चिलीम जवळ धरली तर चमत्कार झाला… चिलीम पेटली… काडी जशी तशी राहिली…सर्वांनी महाराजांची ती लीला पाहिली आणि एका स्वरात  सर्वांनी श्री गजानन महाराज कि जय असा जय जयकार केला.

बोध – श्री महाराज आम्हाला वरील लीलेतून बोध द्या… महाराजांनी वरील लीला केली तो दिवस होता… अक्षय तृतीया … खरंतर अक्षय तृतीया म्हणजे आपल्यातील चांगल्या गुणांना वाव देणे… चांगले गुण वाढवणे.. पुण्य कमवणे… साडेतीन मुहूर्ता पैकी एक मुहूर्त होय… पण तो मुहूर्त जर आपल्या जीवनात बदल घडवत नसेल तर त्या दिवसाला मुहूर्त कसे म्हणणार… श्री महाराजांची इच्छा होती कि जानकीराम सोनार यांच्या जीवनात बदल घडवावा… पुण्य वृद्धी व्हावी… या साठी श्री महाराजांनी चिलीम ओढण्याची लीला केली… महाराजांच्या इच्छे नुसार सर्व मुले जानकीराम यांच्याकडे अग्नी मागण्यासाठी गेले परंतु… श्री जानकीराम यांची पुण्याई कमी पडली त्या मुळे त्यांनी अग्नी दिला नाही उलट त्यांनी महाराजांची टीका केली… या सर्व प्रकारा मुळे मुले नाराज झाले परंतु महाराजांनी अग्नी शिवाय चिलीम प्रज्वलित करून सर्वांना अनुभूती दिली.. खरंतर वरील लीलेतील जानकीराम हे आपल्या मध्ये सुद्धा थोड्या अधिक प्रमाणात असतात पण आपण त्या कडे लक्ष देत नाही… आणि एक दिवस असा येतो कि जसे श्री जानकी राम यांना परब्रह्म कृपा करण्याचा प्रयत्न करत होते परंतु त्यांचे पूर्व संस्कार आड आले… असेच आपल्या जीवनात देखील होत असते… या ठिकाणी अग्नी म्हणजे आपल्यातील असणारी शक्ती जागृतीचे एक प्रतीक आहे.. जसा दिवा लावण्यासाठी अग्नी हवा असतो तसे आपल्या जीवनात महाराजांची कृपा होण्यासाठी आपणस आपल्यातील अवगुणांवर काम करून त्यावर मात करायची आहे… जेणेकरून श्री महाराज आपल्या जीवनात जो प्रकाश निर्माण करू इच्छितात त्या साठी मार्ग मोकळा होईल . चला आपण श्री महाराजांना प्रार्थना करूया – श्री गजानन महाराज आजच्या लीलेला माध्यम करून आपण आम्हाला खरी अक्षय तृतीया काय असते याची समज दिलीत त्या बद्दल धन्यवाद… आपण अनेकदा आमच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत असतात.. परंतु आमचे मन या मध्ये बाधा निर्माण करते…आमचे मन जानकीराम यांच्याप्रमाणे कृती करते… आम्हाला त्या मुलानं प्रमाणे बनव… जसे ती मुले तुमच्या आज्ञे प्रमाणे कृती करण्यास तयार झाली… त्या प्रमाणे आमचे मन बनव… जेणेकरून तू जे काही मला देऊ इच्छितोस त्यात माझे मन बाधा निर्माण करणार नाही.. धन्यवाद आई… हि प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद… श्री गजानन महाराज कि जय ।।


Share
और पढिये !!

श्री गजानन चरित्र दर्शन 15 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

शेगांवच्या दक्षिण दिशेला चिंचोली नावाचे गाव आहे. त्या गावात माधव नावाचे एक ब्राम्हण राहत होते. त्यांचे वय साधारण ६० पेक्षा जास्त होते. त्यांनी आपलें संपूर्ण आयुष्य हे संसार म्हणजे सर्वस्व या साठी खर्ची केले होते. आपल्या भविष्यात काय लिहून ठेवले आहे हे कुणासच माहित...

श्री गजानन चरित्र दर्शन 14 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

उन्हाळ्याचे दिवस होते... श्री गजानन महाराज अनेक भक्त मंडळी सोबत बसले होते...त्या भक्त मंडळी मध्ये श्री चंदूमुकीम नावाचा एक भक्त होता... तो भक्ती भावाने सेवा रुजू करत होता... आंब्याचे दिवस होते... त्यामुळे महाराजांसाठी श्री चंदूमुकीम आंबे आणले होते... महाराजांनी एक दोन...

श्री गजानन चरित्र दर्शन 13 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

आपण श्री गजानन चरित्र दर्शन १२ मध्ये पहिले कि श्री महाराजांनी वीणा अग्नी चिलीम प्रज्वलित केली.... खरंतर चिलीम पेटवण्यासाठी श्री जानकी राम यांच्या कडे मुले अग्नी आणण्यासाठी गेली होती... परंतु श्री जानकी राम यांनी अग्नी तर दिला नाहीच... पण उलट श्री महाराजां बद्दल...

श्री गजानन महाराज दर्शन लीला 6 – मराठी

खूप सारे लोक श्री गोविंद बुवांचे किर्तन ऐकण्यासाठी आले होते त्यामध्ये श्री गजानन महाराज पण कडू लिंबाच्या निंबाच्या झाडा जवळ बसून किर्तन ऐकत होते श्री गोविंद बुवांनी किर्तनासाठी श्री  भागवतातील एकादश स्कंध मधील हंस गीता याचा श्लोक किर्तन सेवेसाठी घेतला होता... बुवांनी...

यत्न शिकवण – श्री समर्थ रामदास स्वामी – श्री दासबोध दशक १२ समास ९

यत्न शिकवण - श्री समर्थ रामदास स्वामी - श्री दासबोध दशक १२ समास ९ प्रत्येक संतांनी कर्माला महत्व दिले... असा कोणतेही संत नाहीत कि त्यांनी कर्म सोडून...दे रे हरी पलंगावरी... असे कोणत्याच संतांनी सांगितले नाही... कारण प्रत्येक संत हे कर्म प्रधानच होते... कर्म न करणारे...

मी डॉक्टर सिंधुताई सपकाळ बोलतेय – एक प्रेरणा

बाळांनो... मी डॉक्टर सिंधुताई सपकाळ बोलतेय... हो तुमची माई बोलतेय... बेटा दचकू नकोस...मी तर अनंतात विलीन झाले... हि बातमी जेव्हा सोशल मीडिया मार्फत तुझ्या पर्यंत पोहोचली तेव्हा... सोशल मीडिया द्वारे तू जी श्रद्धांजली... भावांजली वाहिलीस त्या बद्दल खूप खूप धन्यवाद......

जसे कर्म तसे फळ आज नाही तर उद्या नक्की मिळतेच- श्री गजानन चरित्र दर्शन 11 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ३

जसे कर्म तसे फळ आज नाही तर उद्या नक्की मिळतेच श्री विठोबा घाटोळ यांना पूर्व पुण्याई ने श्री गजानन महाराजांच्या सेवेची संधी त्यांना मिळाली होती पण म्हणतात ना पुण्य करण्यासाठी पुण्य गाठी असावे लागते... श्री विठोबा घाटोळ यांना श्री महाराजांच्या सेवेची खूप छान अशी संधी...

श्री गजानन चरित्र दर्शन 10 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ३

https://youtu.be/56bS3EN9F-w   श्री गजानन चरित्र दर्शन 10 - संदर्भ - श्री गजानन विजय अध्याय ३ भक्ती रुपी चरणतीर्थचा महिमा श्री जानराव देशमुख हे शेगांव मध्ये राहत होते...ते शेगाव मध्ये प्रसिद्ध व्यक्ती होते... घरात संपत्तीची काहीच कमतरता नव्हती..अचानकपणे त्यांची...

नामस्मरण भक्ति – नवविधा भक्ति – श्री समर्थ रामदास स्वामी

नवविधा भक्ती चा तिसरा प्रकार नामस्मरण भक्ति या भक्ती विषयी श्रीमत दासबोध ग्रंथात सांगतात ” स्मरण देवाचे करावें | अखंड नाम जपत जावें | नामस्मरणें पावावें | समाधान | नित्य नेम प्रातः काळी | माध्यानकाळी सायंकाळी | नामस्मरण सर्वकाळी करत जावें | नामस्मरण भक्ति हि खूपच...

पादसेवन भक्ती -नवविधा भक्ति श्री समर्थ रामदास स्वामी

पादसेवन भक्ती - श्री समर्थ रामदास स्वामी या भक्ती बाबत सांगतात कि - पादसेवन ते जाणावे । कायावाचा मनोभावे । सद्गुरूंचे पाय सेवावे । सद्गती कारणे । सेवावें सद्गुरुचरण । या नाव पादसेवन । श्री समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोध ग्रंथात याचे यतार्थ वर्णन केले आहे -...