श्री गजानन चरित्र दर्शन 12 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

Jan 16, 2022 | मराठी, संत गजानन महाराज

Share

श्री गजानन महाराज बंकटलाल यांच्या घरी राहत होते.. एकेदिवशी एक प्रकार घडला तो दिवस होता… वैशाख शुद्ध तृतीयेचा दिवस होता… म्हणजेच अक्षय तृतीया चा दिवस होता… म्हणजेच या दिवशी आपण पितृ पूजन करतो तो दिवस… साडेतीन मुहूर्ता पैकी एक मुहूर्त..त्या दिवशी श्री महाराजांच्या काय मनात आले कुणास ठाऊक… श्री महाराज मुलांमध्ये बैसले आणि म्हणाले आम्हाला चिलीम हवी आहे कुणीतरी भरून द्यावी… हि महाराजांची वाणी होताच सर्व मुलांनी महाराजांना चिलीम भरून दिली… परंतु ती चिलीम पेटवण्यासाठी विस्तवाची आवश्यकता होती… आता सर्वांनां प्रश्न पडला कि विस्तव कुठून आणावा… तितक्यात तिथे श्री बंकटलाल आले… बंकटलालानी मुलांना विचारले काय झाले… तेव्हा मुले म्हणाली… महाराजांना चिलीम भरुन दिली आहे परंतु ती पेटवण्यासाठी अग्नी नाही… तेव्हा बंकटलाल म्हणाले चिंता कशाला करता… आपल्या गल्लीत जानकीराम सोनार आहेत ना त्याच्या कडे जाऊन अग्नी घेऊन या… त्याच्या व्यवसायाची सुरवात अग्नी सुरु करूनच होते… ती मुले सोनाराकडे गेली… सोनाराला अग्नी मागितला… सोनार त्या मुलांना रागावला आणि म्हणाला अरे काय तुम्ही त्या महाराजांच्या नादी लागला आहात .. मी काही अग्नी वगैरे देणार नाही.. जाऊन सांग त्यांना जर आहात तुम्ही साक्षात्कारी तर मग विस्तवाची काय गरज आहे.. पेटवा तशीच चिलीम… सर्व मुले नाराज झाली… मुलांनी सर्व वृत्तांत महाराजांना व बंकटलाल यांना सांगितला… हे ऐकून महाराज हसले … बंकटलाल महाराजांना म्हणाला मी अग्नी तयार करतो… तेव्हा श्री महाराज म्हणाले… अग्नी तयार करू नकोस… नुसती काडी चिलीम जवळ धर… श्री महाराजांच्या आज्ञे नुसार बंकटलाल यांनी नुसती काडी चिलीम जवळ धरली तर चमत्कार झाला… चिलीम पेटली… काडी जशी तशी राहिली…सर्वांनी महाराजांची ती लीला पाहिली आणि एका स्वरात  सर्वांनी श्री गजानन महाराज कि जय असा जय जयकार केला.

बोध – श्री महाराज आम्हाला वरील लीलेतून बोध द्या… महाराजांनी वरील लीला केली तो दिवस होता… अक्षय तृतीया … खरंतर अक्षय तृतीया म्हणजे आपल्यातील चांगल्या गुणांना वाव देणे… चांगले गुण वाढवणे.. पुण्य कमवणे… साडेतीन मुहूर्ता पैकी एक मुहूर्त होय… पण तो मुहूर्त जर आपल्या जीवनात बदल घडवत नसेल तर त्या दिवसाला मुहूर्त कसे म्हणणार… श्री महाराजांची इच्छा होती कि जानकीराम सोनार यांच्या जीवनात बदल घडवावा… पुण्य वृद्धी व्हावी… या साठी श्री महाराजांनी चिलीम ओढण्याची लीला केली… महाराजांच्या इच्छे नुसार सर्व मुले जानकीराम यांच्याकडे अग्नी मागण्यासाठी गेले परंतु… श्री जानकीराम यांची पुण्याई कमी पडली त्या मुळे त्यांनी अग्नी दिला नाही उलट त्यांनी महाराजांची टीका केली… या सर्व प्रकारा मुळे मुले नाराज झाले परंतु महाराजांनी अग्नी शिवाय चिलीम प्रज्वलित करून सर्वांना अनुभूती दिली.. खरंतर वरील लीलेतील जानकीराम हे आपल्या मध्ये सुद्धा थोड्या अधिक प्रमाणात असतात पण आपण त्या कडे लक्ष देत नाही… आणि एक दिवस असा येतो कि जसे श्री जानकी राम यांना परब्रह्म कृपा करण्याचा प्रयत्न करत होते परंतु त्यांचे पूर्व संस्कार आड आले… असेच आपल्या जीवनात देखील होत असते… या ठिकाणी अग्नी म्हणजे आपल्यातील असणारी शक्ती जागृतीचे एक प्रतीक आहे.. जसा दिवा लावण्यासाठी अग्नी हवा असतो तसे आपल्या जीवनात महाराजांची कृपा होण्यासाठी आपणस आपल्यातील अवगुणांवर काम करून त्यावर मात करायची आहे… जेणेकरून श्री महाराज आपल्या जीवनात जो प्रकाश निर्माण करू इच्छितात त्या साठी मार्ग मोकळा होईल . चला आपण श्री महाराजांना प्रार्थना करूया – श्री गजानन महाराज आजच्या लीलेला माध्यम करून आपण आम्हाला खरी अक्षय तृतीया काय असते याची समज दिलीत त्या बद्दल धन्यवाद… आपण अनेकदा आमच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत असतात.. परंतु आमचे मन या मध्ये बाधा निर्माण करते…आमचे मन जानकीराम यांच्याप्रमाणे कृती करते… आम्हाला त्या मुलानं प्रमाणे बनव… जसे ती मुले तुमच्या आज्ञे प्रमाणे कृती करण्यास तयार झाली… त्या प्रमाणे आमचे मन बनव… जेणेकरून तू जे काही मला देऊ इच्छितोस त्यात माझे मन बाधा निर्माण करणार नाही.. धन्यवाद आई… हि प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद… श्री गजानन महाराज कि जय ।।


Share
और पढिये !!

वेळ

भगवंताने सर्वांना एक गोष्ट सारखीच दिली आहे ती म्हणजे दिवसाचे २४ तास त्यामुळे आपण असे कधीच म्हणू शकत नाही कि माझ्या कडे वेळ नाही. वॉरन बफे म्हणतात - श्रीमंत लोक वेळेत गुंतवणूक करतात गरीब लोक पैशाची गुंतवणूक करतात मायकल आल्थसूलर - वेळ उडतो आपण त्याचे पायलट आहोत प्रत्येक...

राखी पौर्णिमा

राखी पौणिमा म्हणजे नात्याला घट्ट करण्याचा उत्सव..आपण वयाने मोठे झालो की काही कारणास्तव या नात्यात दुरावा येतो..या मागे कारण असते वडिलोपार्जित संपत्ती..जी खरं तर नात्यात दुरावा निर्माण करते..खरंतर या साठी कष्ट करणारा मरून जातो..आणि मेल्यावर विचार करतो यासाठीच केले होते...

आपण स्व आदर करतो का

आपण स्वतः ला काय समजतो - खरंतर हा प्रश्न आज पर्यंत आपण आपल्या स्वतःला विचारला आहे का ? विचारला असेल तर आपले आपल्या स्वतः बद्दल मत काय आहे? आपण स्वतः स्वतःचा आदर करता का ? याचे उत्तर काहींचे हो असेल काहींचे नाही असे असेल.. खरंतर जो पर्यंत आपण स्वतः आपला आदर करत नाही तो...

श्री दासबोध दशक १२ समास १

श्री दासबोध दशक १२ समास १ दासबोधातील दशक १२ मधील समास १ मध्ये श्री समर्थ रामदास स्वामी विमल लक्षण सांगत आहेत प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालावी हा उपदेश देत आहेत... प्रपंच करण्यात आळस करू नये.. अनेक लोक म्हणतात प्रपंच आणि परमार्थ एकत्र होऊ शकत नाही... रामदास स्वामी...

नृसिंह जयंती – नृसिंह जन्म कथा

आज नृसिंह जयंती निमित्त चला आपण नृसिंह जन्म कथा पाहूया हिरण्यकश्यपू राजा ह्यांनी भगवंताची भक्ती करून त्याला प्रसन्न करून घेतले होते व असा वर मागितला कि मला कोणत्याही माणसाकडून वा प्राण्याकडून मृत्य येऊ नये, दिवसा किंवा रात्री मृत्य येऊ नये , घरात नाही किंवा बाहेर...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 19 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज काही दिवस शेगांव मध्ये राहिले... परब्रम्ह जिथे आवश्यकता असते तिथे संचार करत असते. कुणीही त्यांना एका ठिकाणी अडकवून ठेवू शकत नाही. वऱ्हाड प्रांतात अडगाव नावाचे गाव आहे तिथे गजानन महाराज जाण्यासाठी निघाले . तो महिना होता वैशाख. वैशाख महिना...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 18 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

लीला क्रमांक १७ मध्ये आपण पहिले कि महाराज पिपंळगावात आले. समाधी अवस्थे मधून महाराज बाहेर यावेत व आपल्याशी बोलावेत यासाठी गावकर्यांनी कसा प्रयत्न केला आणि त्यांच्या श्रद्धेचे फलस्वरूप महाराज समाधी अवस्थेतून बाहेर आले तो दिवस होता सोमवारचा. पुढे दुसऱ्या दिवशी मंगळवारी...

श्री गजानन चरित्र दर्शन 17 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

श्री गजानन महाराज शेगांव मध्ये होते..महाराजांच्या लीला ची प्रचित अनेक भक्तांना येत होती..त्यामुळे दिवसेंदिवस.. भक्तांची गर्दी वाढतच होती..अचानक एक दिवस महाराजांच्या काय मनात आले माहित नाही... महाराज अचानक शेगांव सोडून... शेगांव जवळ असणाऱ्या पिंपळगाव गावात निघून...

श्री गजानन चरित्र दर्शन 16 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

ऐके दिवशी सर्व सेवेकरी मंडळी महाराजांच्या चरणी सेवा रुजू करत होते.. अचानक महाराजांनी सर्वांना बोलवले व म्हणाले... वसंत पंचमी च्या दिवशी घनपाठी ब्राम्हण बोलवा.. मंत्र जागर करूया.. तसेच सर्वांनी एक एक रुपया दक्षिणा देण्यासाठी काढावा... महाराजांची हि वाणी ऐकून सर्व...