जसे कर्म तसे फळ आज नाही तर उद्या नक्की मिळतेच- श्री गजानन चरित्र दर्शन 11 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ३

Jan 4, 2022 | मराठी, संत गजानन महाराज

Share

जसे कर्म तसे फळ आज नाही तर उद्या नक्की मिळतेच

श्री विठोबा घाटोळ यांना पूर्व पुण्याई ने श्री गजानन महाराजांच्या सेवेची संधी त्यांना मिळाली होती पण म्हणतात ना पुण्य करण्यासाठी पुण्य गाठी असावे लागते… श्री विठोबा घाटोळ यांना श्री महाराजांच्या सेवेची खूप छान अशी संधी मिळाली होती… श्री विठोबा घाटोळ हे महाराजांची सेवा करत होते परंतु अंतर्मनात वेगेळेच विचार सुरु होते… मनात अहंकार… खोटी भक्ती … लालसा होती … महाराजांची सेवा थोडीच करत परुंतु दिखाऊ पण जास्त करत.. तो सर्वाना सांगत असे कि समर्थांच्या सेवेचे काम माझ्याशिवाय होत नाही… महाराज माझा शब्द कधीच टाळत नाहीत… इतर भक्तांवर तो हुकूम गाजवण्याचे काम करत असे… हे सर्व महाराजांना माहित होते परंतु महाराज त्या कडे दुर्लक्ष करत… एके दिवशी काही बाहेरगावची मंडळी श्री महाराजांच्या दर्शनासाठी आली होती… परंतु त्यावेळी महाराज आराम करत होते… महाराजांना उठवण्याची कुणाची हिम्मत नव्हती.. सर्वांना प्रश्न पडला कि महाराजांना कुणीत उठवावे… त्यावेळी अनेकांनी श्री विठोबा घाटोळ यांचे नाव सुचवले… त्या बाहेरगाव वरून आलेल्या भक्तांनी श्री विठोबा घाटोळ यांना विनंती केली…आणि त्यांची विनंती व स्तुति ऐकून ते भारावून गेले… अहंकार जागृत झाला…आणि ते श्री महाराजांकडे गेले…श्री महाराजांना सर्व हकीकत सांगितली व आपण त्या लोकांना दर्शन द्यावे अशी विंनती केली… महाराजांकडे एक काठी होती ती घेऊ ते बाहेर आले… आलेल्या भक्तांना दर्शन दिले… दर्शन घेऊन बाहेरगांव वरून आलेले भक्त निघून गेले… ते भक्त निघून जाताच श्री महाराजांनी श्री विठोबा घाटोळ यांस तिथे उपस्थित लोकांसमोर काठीने बदडून काढले… महाराजांचा मर खाल्ल्या नंतर श्री विठोबा तिथून पळून गेला तो परत काही श्री महाराजांकडे आला नाही … बोला श्री गजानन महाराज कि जय !! 

बोला || अनंत कोटी ब्रम्हाण्ड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चितानंद

भक्त प्रतिपालक शेगाँव निवासी समर्थ सदगुरु श्री संत गजानन महाराज की जय ||

बोध -खरंतर वरील लीला म्हणजे आपल्या साठी डोळ्यातील अंजन आहे म्हणावे लागेल… पहा श्री विठोबा घाटोळ यांची पूर्वपुण्याई होती म्हणूनच त्यांना श्री महाराजांचा सहवास व सेवा करण्याचे भाग्य लाभले… परंतु त्यांच्यातील अहंकार व लोभी वृत्ती मूळे त्यांना त्या सेवेचा लाभ घेता आला नाही व परब्रम्हाच्या सेवेस ते मुकले… इथे आपणस हा सुद्धा बोध होतो पहा ना श्री महाराज आराम करत होते तरीही जे भक्त त्यांच्या दर्शन साठी आले होते… त्याची श्री महाराजांवर इतकी श्रद्धा होती कि श्री महाराज त्यांना दर्शन देण्यासाठी तात्काळ आले… इथे श्री महाराजांनी श्री विठोबा घाटोळ यांना काठीने मारले… खरे तर महाराजांचा मार हा आपल्यातील चुकीच्या वृत्ती काढून टाकण्यासाठी असतो… आहे हे श्री विठोबा घाटोळ यांना समजले नाही…जसे हे त्यांना समजले नाही तसेच अनेकदा आपल्याही बाबतीत होत असते… अनेकदा आपल्याकडून जेव्हा काहीचुका होतात तेव्हा श्री महाराज इतरांना माध्यम बनवून आपल्याला मार वा समज देत असतात … कारण महाराजांना आपल्यातील चुकीच्या समजुती… आपल्यातील दिखाऊपणा घालवून आपल्यातील भक्ती वाढवायची आहे… परंतु नेमके आपण सुद्धा अनेकदा या गोष्टीला विरोध करतो आणि श्री विठोबा घाटोळ यांच्या प्रमाणे सेवा सोडून इतरत्र अडकतो… आपणस यावर स्व चिंतन… करण्याची नितांत गरज आहे… चला तर मग आपण त्या साठी श्री महाराजांना प्रार्थना करूया ..
प्रार्थना – श्री गजानन महाराज आमची देखील पुण्याई म्हणून आम्हाला आपली सेवा करण्याची संधी प्राप्त झाली आहे… अनेकदा तू माझी प्रगती व्हावी यासाठी… इतरांच्या मार्फत शब्दरुपी काठी द्वारे व अन्य मार्गाने तू आमच्यातील… ढोंगीपणा… दिखाऊपणा… जावा यासाठी मला मदत करत असतेस परंतु माझ्यातील अहंकारी मन याला विरोध करते… आई माझी इतकीच प्रार्थना आहे कि माझ्या मनाने कितीही विरोध करू दे परंतु तू मला सॊडू नकोस कारण माझे भले कश्यात आहे हे मला समजत नाही… धन्यवाद आई… कोटी कोटी धन्यवाद

 

 


Share
और पढिये !!

वेळ

भगवंताने सर्वांना एक गोष्ट सारखीच दिली आहे ती म्हणजे दिवसाचे २४ तास त्यामुळे आपण असे कधीच म्हणू शकत नाही कि माझ्या कडे वेळ नाही. वॉरन बफे म्हणतात - श्रीमंत लोक वेळेत गुंतवणूक करतात गरीब लोक पैशाची गुंतवणूक करतात मायकल आल्थसूलर - वेळ उडतो आपण त्याचे पायलट आहोत प्रत्येक...

राखी पौर्णिमा

राखी पौणिमा म्हणजे नात्याला घट्ट करण्याचा उत्सव..आपण वयाने मोठे झालो की काही कारणास्तव या नात्यात दुरावा येतो..या मागे कारण असते वडिलोपार्जित संपत्ती..जी खरं तर नात्यात दुरावा निर्माण करते..खरंतर या साठी कष्ट करणारा मरून जातो..आणि मेल्यावर विचार करतो यासाठीच केले होते...

आपण स्व आदर करतो का

आपण स्वतः ला काय समजतो - खरंतर हा प्रश्न आज पर्यंत आपण आपल्या स्वतःला विचारला आहे का ? विचारला असेल तर आपले आपल्या स्वतः बद्दल मत काय आहे? आपण स्वतः स्वतःचा आदर करता का ? याचे उत्तर काहींचे हो असेल काहींचे नाही असे असेल.. खरंतर जो पर्यंत आपण स्वतः आपला आदर करत नाही तो...

श्री दासबोध दशक १२ समास १

श्री दासबोध दशक १२ समास १ दासबोधातील दशक १२ मधील समास १ मध्ये श्री समर्थ रामदास स्वामी विमल लक्षण सांगत आहेत प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालावी हा उपदेश देत आहेत... प्रपंच करण्यात आळस करू नये.. अनेक लोक म्हणतात प्रपंच आणि परमार्थ एकत्र होऊ शकत नाही... रामदास स्वामी...

नृसिंह जयंती – नृसिंह जन्म कथा

आज नृसिंह जयंती निमित्त चला आपण नृसिंह जन्म कथा पाहूया हिरण्यकश्यपू राजा ह्यांनी भगवंताची भक्ती करून त्याला प्रसन्न करून घेतले होते व असा वर मागितला कि मला कोणत्याही माणसाकडून वा प्राण्याकडून मृत्य येऊ नये, दिवसा किंवा रात्री मृत्य येऊ नये , घरात नाही किंवा बाहेर...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 19 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज काही दिवस शेगांव मध्ये राहिले... परब्रम्ह जिथे आवश्यकता असते तिथे संचार करत असते. कुणीही त्यांना एका ठिकाणी अडकवून ठेवू शकत नाही. वऱ्हाड प्रांतात अडगाव नावाचे गाव आहे तिथे गजानन महाराज जाण्यासाठी निघाले . तो महिना होता वैशाख. वैशाख महिना...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 18 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

लीला क्रमांक १७ मध्ये आपण पहिले कि महाराज पिपंळगावात आले. समाधी अवस्थे मधून महाराज बाहेर यावेत व आपल्याशी बोलावेत यासाठी गावकर्यांनी कसा प्रयत्न केला आणि त्यांच्या श्रद्धेचे फलस्वरूप महाराज समाधी अवस्थेतून बाहेर आले तो दिवस होता सोमवारचा. पुढे दुसऱ्या दिवशी मंगळवारी...

श्री गजानन चरित्र दर्शन 17 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

श्री गजानन महाराज शेगांव मध्ये होते..महाराजांच्या लीला ची प्रचित अनेक भक्तांना येत होती..त्यामुळे दिवसेंदिवस.. भक्तांची गर्दी वाढतच होती..अचानक एक दिवस महाराजांच्या काय मनात आले माहित नाही... महाराज अचानक शेगांव सोडून... शेगांव जवळ असणाऱ्या पिंपळगाव गावात निघून...

श्री गजानन चरित्र दर्शन 16 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

ऐके दिवशी सर्व सेवेकरी मंडळी महाराजांच्या चरणी सेवा रुजू करत होते.. अचानक महाराजांनी सर्वांना बोलवले व म्हणाले... वसंत पंचमी च्या दिवशी घनपाठी ब्राम्हण बोलवा.. मंत्र जागर करूया.. तसेच सर्वांनी एक एक रुपया दक्षिणा देण्यासाठी काढावा... महाराजांची हि वाणी ऐकून सर्व...