श्री गजानन चरित्र दर्शन 10 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ३

Jan 2, 2022 | मराठी, संत गजानन महाराज

Share

 

श्री गजानन चरित्र दर्शन 10 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ३
भक्ती रुपी चरणतीर्थचा महिमा
श्री जानराव देशमुख हे शेगांव मध्ये राहत होते…ते शेगाव मध्ये प्रसिद्ध व्यक्ती होते… घरात संपत्तीची काहीच कमतरता नव्हती..अचानकपणे त्यांची तब्येत बिघडली… त्याची तब्येत इतकी खराब झाली कि त्यांनी अंथरुनच धरले…अनेक वैद्य त्याचे उपचार करत होते परंतु दिवसेंदिवस तब्येत आणखीनच खराब होत होती…अनके वैद्य आपले प्रयन्त करत होते परंतु कुणालाच यश येत नव्हते… शेवटी वैद्यांनी सांगितली कि आता यांच्यावर काहीच उपचार होऊ शकत नाहीत… सर्वांनीच आशा सोडून दिली.. त्यातील काही जणांनी सुचवले कि… आपण श्री गजानन महाराज त्यांच्याकडे जाऊन त्याना मार्गदर्शन मागावे… नक्कीच काही तरी मार्ग मिळेल… मग उपस्थित लोक पैकी एक जण श्री गजानन महाराजांकडे गेले.. तेव्हा श्री महाराज बंकटलाल त्यांच्या घरी होते … त्यानी श्री बंकटलाल यांना सर्व काही सांगितलं व विनंती केली कि आपण श्री महाराजांना विनंती करून त्यांचे चरण तीर्थ जानराव त्यांच्यासाठी द्यावे… बंकटलाल यांनी सांगितले कि हे काम मी करू शकत नाही… आपण माझ्या वडिलांशी बोलून पाहावे… ते श्री भवानीराम यांच्याशी बोलले… त्यांना सर्व वृत्तांत सांगितला… सर्व वृत्तांत ऐकून भवानीराम यांचे ह्रद्य द्रवित झाले… ते श्री महाराजांकडे गेले… त्यांना सर्व वृत्तांत सांगितला व विनंती केली जर आपण आपले चरण तीर्थ दिलेत तर आम्हाला विश्वास वाटतो कि श्री जानराव यांची तब्येत नक्कीच सुधारेल… श्री महाराज यांनी चरणतीर्थ देण्याची परवानगी दिली… श्री च्या चरण तीर्थाने जानराव यांची तब्येत सुधारली आणि ते पूर्णपणे बरे झाले व आठ दिवसातच ते श्री महाराजांच्या दर्शनास गेले… हे सर्व पाहून उपस्थित सर्वांनी श्री महाराजांचा जय जय कार केला . बोला श्री गजानन महाराज कि जय
बोला || अनंत कोटी ब्रम्हाण्ड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चितानंद

भक्त प्रतिपालक शेगाँव निवासी समर्थ सदगुरु श्री संत गजानन महाराज की जय ||

बोध – वरील लीलेतून आपणस खूप खोल असा संदेश प्राप्त होत आहे..
श्री जानराव देशमुख यांच्याकडे आर्थिक सुबत्ता होती…अनेक वैद्य त्याच्यावर उपचार करत होते… परंतु कोणत्याच वैद्याला यश प्राप्त होत नव्हते… सर्वांनी आशा सोडून दिली…परंतु त्यात काही लोक असे होते कि ज्यांचा विश्वास हा उच्च होता… या ठिकाणी आपणस श्रद्धा आणि भक्ती चा भाव समजवून घ्यायचा आहे… आपणस कुठेही अंधश्रद्धा ठेवून भक्ती करायची नाहीये… वरील लीला हि त्या वेळेनुसार आहे… आज जर आपण आजारी असाल तर आपणस योग्य डॉक्टरच्या सल्ल्याने औषध उपचार घ्यायचे आहेत.. वरील लीलेत बंकटलाल यांना सर्व काही सांगितले तेव्हा त्यांनी आपल्या वडिलांशी बोलण्यास सांगितले… म्हणजेच इथे आपणस त्यांची श्री महाराजांवर जी श्रद्धा होती… ती किती वरच्या पातळीवर होती… त्याना महाराजांना अश्या प्रकारे प्रश्न विचारणे चुकीचे वाटले…. भवानी राम यांनी सुद्धा श्री महाराजांना सर्व हकीकत सांगितली… व त्यांच्या परवानगी नंतर चरण तीर्थ दिले… इथे चरण तीर्थ हे… आपल्यातील विश्वासाचे प्रतीक आहे… पहा श्री जानराव देशमुख श्री महाराजांच्या चरण तीर्थाने पूर्णपणे बरे झाले… इथे चरण तीर्थ म्हणजे विश्वास..पहा आपण अनेकदा डॉक्टरांकडे जातो… डॉक्टर आपणस औषध देतात जर आपला डॉक्टरांवर विश्वास असेल तर आपणस एकाच दिवसात फरक जाणवतो… इथे औषध काम करतेच पण आपल्यातील डॉक्टरांवरील विश्वास काम करतो व आपणस बरे वाटण्यास सुरवात होते.. थोडक्यात आपला विश्वास आपणस वाढवायचा आहे.
चला आपण श्री महाराजांना प्रार्थना करूया -श्री गजानन महाराज आपली लीला म्हणजे आमच्यासाठी विश्वास रुपी औषध आहे… आमचे मन कायम प्रत्येक गोष्टीत नकारात्मक विचार करते..श्री .जानराव यांच्या जीवनात जसे सकारात्मक लोक आले तसे सकारात्मक विचारांचे लोक आमच्या जीवनात येऊ द्या…आमच्या जीवनात प्रत्येक क्षणाला थोडे थोडे विश्वास रुपी चरण तीर्थ आम्हाला मिळावे जेणेकरून प्रत्येक परिस्थिती आमच्यातील श्रद्धा विश्वासाची पातळी उच्चत्तमच असेल… धन्यवाद महाराज… हि प्रार्थना करून घेतल्या बद्दल धन्यवाद !!


Share
और पढिये !!

वेळ

भगवंताने सर्वांना एक गोष्ट सारखीच दिली आहे ती म्हणजे दिवसाचे २४ तास त्यामुळे आपण असे कधीच म्हणू शकत नाही कि माझ्या कडे वेळ नाही. वॉरन बफे म्हणतात - श्रीमंत लोक वेळेत गुंतवणूक करतात गरीब लोक पैशाची गुंतवणूक करतात मायकल आल्थसूलर - वेळ उडतो आपण त्याचे पायलट आहोत प्रत्येक...

राखी पौर्णिमा

राखी पौणिमा म्हणजे नात्याला घट्ट करण्याचा उत्सव..आपण वयाने मोठे झालो की काही कारणास्तव या नात्यात दुरावा येतो..या मागे कारण असते वडिलोपार्जित संपत्ती..जी खरं तर नात्यात दुरावा निर्माण करते..खरंतर या साठी कष्ट करणारा मरून जातो..आणि मेल्यावर विचार करतो यासाठीच केले होते...

आपण स्व आदर करतो का

आपण स्वतः ला काय समजतो - खरंतर हा प्रश्न आज पर्यंत आपण आपल्या स्वतःला विचारला आहे का ? विचारला असेल तर आपले आपल्या स्वतः बद्दल मत काय आहे? आपण स्वतः स्वतःचा आदर करता का ? याचे उत्तर काहींचे हो असेल काहींचे नाही असे असेल.. खरंतर जो पर्यंत आपण स्वतः आपला आदर करत नाही तो...

श्री दासबोध दशक १२ समास १

श्री दासबोध दशक १२ समास १ दासबोधातील दशक १२ मधील समास १ मध्ये श्री समर्थ रामदास स्वामी विमल लक्षण सांगत आहेत प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालावी हा उपदेश देत आहेत... प्रपंच करण्यात आळस करू नये.. अनेक लोक म्हणतात प्रपंच आणि परमार्थ एकत्र होऊ शकत नाही... रामदास स्वामी...

नृसिंह जयंती – नृसिंह जन्म कथा

आज नृसिंह जयंती निमित्त चला आपण नृसिंह जन्म कथा पाहूया हिरण्यकश्यपू राजा ह्यांनी भगवंताची भक्ती करून त्याला प्रसन्न करून घेतले होते व असा वर मागितला कि मला कोणत्याही माणसाकडून वा प्राण्याकडून मृत्य येऊ नये, दिवसा किंवा रात्री मृत्य येऊ नये , घरात नाही किंवा बाहेर...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 19 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज काही दिवस शेगांव मध्ये राहिले... परब्रम्ह जिथे आवश्यकता असते तिथे संचार करत असते. कुणीही त्यांना एका ठिकाणी अडकवून ठेवू शकत नाही. वऱ्हाड प्रांतात अडगाव नावाचे गाव आहे तिथे गजानन महाराज जाण्यासाठी निघाले . तो महिना होता वैशाख. वैशाख महिना...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 18 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

लीला क्रमांक १७ मध्ये आपण पहिले कि महाराज पिपंळगावात आले. समाधी अवस्थे मधून महाराज बाहेर यावेत व आपल्याशी बोलावेत यासाठी गावकर्यांनी कसा प्रयत्न केला आणि त्यांच्या श्रद्धेचे फलस्वरूप महाराज समाधी अवस्थेतून बाहेर आले तो दिवस होता सोमवारचा. पुढे दुसऱ्या दिवशी मंगळवारी...

श्री गजानन चरित्र दर्शन 17 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

श्री गजानन महाराज शेगांव मध्ये होते..महाराजांच्या लीला ची प्रचित अनेक भक्तांना येत होती..त्यामुळे दिवसेंदिवस.. भक्तांची गर्दी वाढतच होती..अचानक एक दिवस महाराजांच्या काय मनात आले माहित नाही... महाराज अचानक शेगांव सोडून... शेगांव जवळ असणाऱ्या पिंपळगाव गावात निघून...

श्री गजानन चरित्र दर्शन 16 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

ऐके दिवशी सर्व सेवेकरी मंडळी महाराजांच्या चरणी सेवा रुजू करत होते.. अचानक महाराजांनी सर्वांना बोलवले व म्हणाले... वसंत पंचमी च्या दिवशी घनपाठी ब्राम्हण बोलवा.. मंत्र जागर करूया.. तसेच सर्वांनी एक एक रुपया दक्षिणा देण्यासाठी काढावा... महाराजांची हि वाणी ऐकून सर्व...