पादसेवन भक्ती -नवविधा भक्ति श्री समर्थ रामदास स्वामी

Dec 12, 2021 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

पादसेवन भक्ती – श्री समर्थ रामदास स्वामी या भक्ती बाबत सांगतात कि –

पादसेवन ते जाणावे । कायावाचा मनोभावे । सद्गुरूंचे पाय सेवावे । सद्गती कारणे । सेवावें सद्गुरुचरण । या नाव पादसेवन ।
श्री समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोध ग्रंथात याचे यतार्थ वर्णन केले आहे –
भगवंताच्या प्राप्ती साठी काया, वाचा, मनाने आणि आपलेपणाने सद्गुरूंची चरण सेवा करावी. सद्गुरूंच्या चरणांची सेवा करणे म्हणजे पादसेवन भक्ती !
नवविधा भक्ती मधील चौथा प्रकार आहे पादसेवन भक्ती । पादसेवन भक्ती चे रामदास स्वामींनी खूप विस्तार पूरक वर्णन दासबोध मध्ये केले आहे… वरील श्लोकातून महाराज  सोप्या भाषेत पादसेवन भक्ती चे वर्णन करत आहेत… सद्गुरूंचे पाय सेवावे… सद्गुरू आपल्या प्रत्येकाचे वेगवेगळे सद्गुरू असणार… श्री स्वामी समर्थ महाराज , श्री गजानन महाराज, संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर माऊली वा अन्य कोणते आपले सद्गुरू असतील… त्यांची काया… वाचा… मनोभावे सद्गुरूंची पाद्य सेवा करावी… काया म्हणजे शरीराने सेवा करायची … शरीराने सेवा म्हणजे आपणस काय शरीराला त्रास द्यायचा आहे का? नाही आपणस शरीर साक्षात परमेश्वर या भावनेने आपणस सेवा करायची आहे… कारण आपले शरीर जर तंदुरुस्त असेल तरच आपण सद्गुरूंची सेवा करू शकतो… कारण शरीर जर व्यवस्थित नसेल तर आपण कशी सेवा करणार… त्यामुळे आपणस सर्वप्रथम आपले शरीर सद्गुरु सेवेसाठी निरोगी ठेवणे आवश्यक आहे.. जेणेकरून आपण सद्गुरूंची जी सेवा असेल ती करू शकू… आता या ठिकाणी आपली जी वाचा आहे तिने सद्गुरु ची सेवा करायचा उपदेश इथे समर्थ करत आहेत… पहा हि वाचा आपणस उच्च स्थान पण देऊ शकते व नीच स्थान पण देऊ शकते… आपण तिचा कसा वापर करतो यावर ते अवलंबून आहे… आता वाचेने सदगुरूंची सेवा म्हणजे आपणस जी काही ग्रंथ संपदा उपलब्ध आहे त्याचे आपणस वाचन करायचे आहे… जसे तुकाराम गाथा असेल , दासबोध असेल , ज्ञानेश्वरी असेल यांचे आपणस मनसोक्त वाचन करायचे आहे… जेणेकरून आपणस सद्गुरू आपणस जो बोध देऊ इच्छितात तो आपणस समजेल…तोच बोध आपण आपल्या वाचे द्वारे इतरांना सांगू शकता हि देखील सद्गुरूंची सेवा होणार आहे …हि सर्व सेवा झाली कि एक अवस्था अशी येईल कि आपण आपल्या मनाद्वारे… सद्गुरूची मानस पूजा करू… पण हि अवस्था येण्यासाठी आपणस खूप सेवेची भक्ती ची अवस्था प्राप्त करून घेणे आवश्यक आहे… त्या साठी आपण सदगुरूंच्या प्रत्येक आज्ञा चे पालन करणे आवश्यक आहे… त्यावर आपणस चिंतन मनन करणे आवश्यक आहे…तेव्हाच आपल्याकडून परिपूर्ण अशी पादसेवन भक्ती होईल.
चला आपण सद्गुरू श्री रामदास स्वामींनाच या साठी प्रार्थना करूया

हे समर्था… आज तु आम्हाला पादसेवन भक्ती म्हणजे काय याची ओळख करून दिलीस… खरे तर हे तुम्ही जे काही सांगितले हे वाचन करताना… आम्हाला असे वाटते कि आम्हाला हे समजले आहे… परंतु रोजच्या कर्मात आम्ही आपली हि शिकवण विसरून जातो…पादसेवन भक्ती करायची असेल… त्या भक्ती मध्ये स्थिर होण्यासाठी आपलीच कृपा आवश्यक आहे… हे आई… तुला हीच प्रार्थना आहे कि आमची भक्ती वाढव…आम्हाला आपली पादसेवन भक्ती प्राप्त व्हावी हीच प्रार्थना… धन्यवाद समर्था !!


Share
और पढिये !!

वेळ

भगवंताने सर्वांना एक गोष्ट सारखीच दिली आहे ती म्हणजे दिवसाचे २४ तास त्यामुळे आपण असे कधीच म्हणू शकत नाही कि माझ्या कडे वेळ नाही. वॉरन बफे म्हणतात - श्रीमंत लोक वेळेत गुंतवणूक करतात गरीब लोक पैशाची गुंतवणूक करतात मायकल आल्थसूलर - वेळ उडतो आपण त्याचे पायलट आहोत प्रत्येक...

राखी पौर्णिमा

राखी पौणिमा म्हणजे नात्याला घट्ट करण्याचा उत्सव..आपण वयाने मोठे झालो की काही कारणास्तव या नात्यात दुरावा येतो..या मागे कारण असते वडिलोपार्जित संपत्ती..जी खरं तर नात्यात दुरावा निर्माण करते..खरंतर या साठी कष्ट करणारा मरून जातो..आणि मेल्यावर विचार करतो यासाठीच केले होते...

आपण स्व आदर करतो का

आपण स्वतः ला काय समजतो - खरंतर हा प्रश्न आज पर्यंत आपण आपल्या स्वतःला विचारला आहे का ? विचारला असेल तर आपले आपल्या स्वतः बद्दल मत काय आहे? आपण स्वतः स्वतःचा आदर करता का ? याचे उत्तर काहींचे हो असेल काहींचे नाही असे असेल.. खरंतर जो पर्यंत आपण स्वतः आपला आदर करत नाही तो...

श्री दासबोध दशक १२ समास १

श्री दासबोध दशक १२ समास १ दासबोधातील दशक १२ मधील समास १ मध्ये श्री समर्थ रामदास स्वामी विमल लक्षण सांगत आहेत प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालावी हा उपदेश देत आहेत... प्रपंच करण्यात आळस करू नये.. अनेक लोक म्हणतात प्रपंच आणि परमार्थ एकत्र होऊ शकत नाही... रामदास स्वामी...

नृसिंह जयंती – नृसिंह जन्म कथा

आज नृसिंह जयंती निमित्त चला आपण नृसिंह जन्म कथा पाहूया हिरण्यकश्यपू राजा ह्यांनी भगवंताची भक्ती करून त्याला प्रसन्न करून घेतले होते व असा वर मागितला कि मला कोणत्याही माणसाकडून वा प्राण्याकडून मृत्य येऊ नये, दिवसा किंवा रात्री मृत्य येऊ नये , घरात नाही किंवा बाहेर...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 19 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज काही दिवस शेगांव मध्ये राहिले... परब्रम्ह जिथे आवश्यकता असते तिथे संचार करत असते. कुणीही त्यांना एका ठिकाणी अडकवून ठेवू शकत नाही. वऱ्हाड प्रांतात अडगाव नावाचे गाव आहे तिथे गजानन महाराज जाण्यासाठी निघाले . तो महिना होता वैशाख. वैशाख महिना...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 18 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

लीला क्रमांक १७ मध्ये आपण पहिले कि महाराज पिपंळगावात आले. समाधी अवस्थे मधून महाराज बाहेर यावेत व आपल्याशी बोलावेत यासाठी गावकर्यांनी कसा प्रयत्न केला आणि त्यांच्या श्रद्धेचे फलस्वरूप महाराज समाधी अवस्थेतून बाहेर आले तो दिवस होता सोमवारचा. पुढे दुसऱ्या दिवशी मंगळवारी...

श्री गजानन चरित्र दर्शन 17 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

श्री गजानन महाराज शेगांव मध्ये होते..महाराजांच्या लीला ची प्रचित अनेक भक्तांना येत होती..त्यामुळे दिवसेंदिवस.. भक्तांची गर्दी वाढतच होती..अचानक एक दिवस महाराजांच्या काय मनात आले माहित नाही... महाराज अचानक शेगांव सोडून... शेगांव जवळ असणाऱ्या पिंपळगाव गावात निघून...

श्री गजानन चरित्र दर्शन 16 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

ऐके दिवशी सर्व सेवेकरी मंडळी महाराजांच्या चरणी सेवा रुजू करत होते.. अचानक महाराजांनी सर्वांना बोलवले व म्हणाले... वसंत पंचमी च्या दिवशी घनपाठी ब्राम्हण बोलवा.. मंत्र जागर करूया.. तसेच सर्वांनी एक एक रुपया दक्षिणा देण्यासाठी काढावा... महाराजांची हि वाणी ऐकून सर्व...