भगवंताच्या नाम रुपी सेवेचा महिमा

Nov 28, 2021 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

भगवंताच्या नाम रुपी सेवेचा महिमा – नामाचा महिमा अगाध आहे… खरंतर शब्दांत व्यक्त करणे शक्य नाही.. पण आपल्या मनाला शब्दांची भाषा लगेचच समजते.. चला तर मग आज आपण श्री राम सेतू च्या लीलेतून नाम रुपी महिमा समजून घेऊया.. भगवान श्री राम व वानर सेना यांना रामेश्वरम वरून श्रीलंकेत जायचे होते… जाण्यासाठी मार्ग होता समुद्र मार्ग… इतके अंतर जाण्यासाठी रस्ता आवश्यक होता..आता काय करावे हा प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण झाला… मग वानर सेनेनं समुदात दगडे टाकण्यास सुरवात केली… परंतु किती दगडे टाकली तरी ती सर्व पाण्यात जाऊन खाली बसत होती… आता काय करावे हा प्रश्न सर्वांच्या समोर उभा राहिला.. तितक्यात पवन पुत्र श्री हनुमान यांच्या ह्रद्यातून विचार आला कि आपण दगडावर “श्री राम” लिहून दगड पाण्यात टाकावा.. असा विचार करून त्यांनी दगड पाण्यात टाकला असता तो दगड पाण्यावर तरंगू लागला.. हे पाहून सर्व वानर सेनेने… “श्री राम” हा मंत्र लिहून पाण्यात दगडे टाकण्यास सुरवात केली… ती सर्व दगडे पाण्यावर तरंगू लागली.. रस्ता तयार होऊ लागला… हे सर्व पाहून प्रभू श्री रामचंद्राना देखील वाटले आपण सुद्धा श्री राम लिहून दगड पाण्यात टाकावा… त्यानी सुद्धा पाण्यात दगड टाकला.. पण तो दगड पाण्यात बुडला… हे पाहून सर्वांना आश्चर्य वाटले.. तेव्हा पवन पुत्र हनुमान म्हणाले… स्वामी आपण टाकलेले दगड नाही तरणांर कारण… आपण ज्याला धरता तो भवसागर पार होतो.. पण आपण ज्याला सोडता तो हा भावसागर तरु शकत नाही … म्हणजेच ज्याच्या मुखात नाम आहे तो या भवसागरात तरतोच… अश्या रीतीने राम नामाने श्री राम सेतूची निर्मिती झाली… तश्याच सेतू ची निर्मिती आपल्या जीवनात होईल जेव्हा आपण नाम रुपी साधना सातत्याने करू … हा आहे नाम महिमा.

चला तर मग आपण पवनसूत हनुमंतालाच प्रार्थना करूया… हे पवनसुता… आपली श्री राम नामावर इतकी श्रद्धा होती कि… आपण राम नामाचा मार्ग रुपी सेतू निर्माण केलात.. ज्या प्रमाणे आपल्या मुखात अखंड राम नाम होते… त्या प्रमाणे आमच्या मुखात भगवंताचे नाम यावे… नाम महिमा आम्हाला समजावा.. आमच्या ह्रद्यातून नामच यावे… आणि हृदयातील भगवंताची आम्हला ओळख व्हावी… हे पवन सुता हि प्रार्थना करून घेतल्या बद्दल धन्यवाद !


Share
और पढिये !!

वेळ

भगवंताने सर्वांना एक गोष्ट सारखीच दिली आहे ती म्हणजे दिवसाचे २४ तास त्यामुळे आपण असे कधीच म्हणू शकत नाही कि माझ्या कडे वेळ नाही. वॉरन बफे म्हणतात - श्रीमंत लोक वेळेत गुंतवणूक करतात गरीब लोक पैशाची गुंतवणूक करतात मायकल आल्थसूलर - वेळ उडतो आपण त्याचे पायलट आहोत प्रत्येक...

राखी पौर्णिमा

राखी पौणिमा म्हणजे नात्याला घट्ट करण्याचा उत्सव..आपण वयाने मोठे झालो की काही कारणास्तव या नात्यात दुरावा येतो..या मागे कारण असते वडिलोपार्जित संपत्ती..जी खरं तर नात्यात दुरावा निर्माण करते..खरंतर या साठी कष्ट करणारा मरून जातो..आणि मेल्यावर विचार करतो यासाठीच केले होते...

आपण स्व आदर करतो का

आपण स्वतः ला काय समजतो - खरंतर हा प्रश्न आज पर्यंत आपण आपल्या स्वतःला विचारला आहे का ? विचारला असेल तर आपले आपल्या स्वतः बद्दल मत काय आहे? आपण स्वतः स्वतःचा आदर करता का ? याचे उत्तर काहींचे हो असेल काहींचे नाही असे असेल.. खरंतर जो पर्यंत आपण स्वतः आपला आदर करत नाही तो...

श्री दासबोध दशक १२ समास १

श्री दासबोध दशक १२ समास १ दासबोधातील दशक १२ मधील समास १ मध्ये श्री समर्थ रामदास स्वामी विमल लक्षण सांगत आहेत प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालावी हा उपदेश देत आहेत... प्रपंच करण्यात आळस करू नये.. अनेक लोक म्हणतात प्रपंच आणि परमार्थ एकत्र होऊ शकत नाही... रामदास स्वामी...

नृसिंह जयंती – नृसिंह जन्म कथा

आज नृसिंह जयंती निमित्त चला आपण नृसिंह जन्म कथा पाहूया हिरण्यकश्यपू राजा ह्यांनी भगवंताची भक्ती करून त्याला प्रसन्न करून घेतले होते व असा वर मागितला कि मला कोणत्याही माणसाकडून वा प्राण्याकडून मृत्य येऊ नये, दिवसा किंवा रात्री मृत्य येऊ नये , घरात नाही किंवा बाहेर...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 19 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज काही दिवस शेगांव मध्ये राहिले... परब्रम्ह जिथे आवश्यकता असते तिथे संचार करत असते. कुणीही त्यांना एका ठिकाणी अडकवून ठेवू शकत नाही. वऱ्हाड प्रांतात अडगाव नावाचे गाव आहे तिथे गजानन महाराज जाण्यासाठी निघाले . तो महिना होता वैशाख. वैशाख महिना...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 18 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

लीला क्रमांक १७ मध्ये आपण पहिले कि महाराज पिपंळगावात आले. समाधी अवस्थे मधून महाराज बाहेर यावेत व आपल्याशी बोलावेत यासाठी गावकर्यांनी कसा प्रयत्न केला आणि त्यांच्या श्रद्धेचे फलस्वरूप महाराज समाधी अवस्थेतून बाहेर आले तो दिवस होता सोमवारचा. पुढे दुसऱ्या दिवशी मंगळवारी...

श्री गजानन चरित्र दर्शन 17 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

श्री गजानन महाराज शेगांव मध्ये होते..महाराजांच्या लीला ची प्रचित अनेक भक्तांना येत होती..त्यामुळे दिवसेंदिवस.. भक्तांची गर्दी वाढतच होती..अचानक एक दिवस महाराजांच्या काय मनात आले माहित नाही... महाराज अचानक शेगांव सोडून... शेगांव जवळ असणाऱ्या पिंपळगाव गावात निघून...

श्री गजानन चरित्र दर्शन 16 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

ऐके दिवशी सर्व सेवेकरी मंडळी महाराजांच्या चरणी सेवा रुजू करत होते.. अचानक महाराजांनी सर्वांना बोलवले व म्हणाले... वसंत पंचमी च्या दिवशी घनपाठी ब्राम्हण बोलवा.. मंत्र जागर करूया.. तसेच सर्वांनी एक एक रुपया दक्षिणा देण्यासाठी काढावा... महाराजांची हि वाणी ऐकून सर्व...

श्री गजानन चरित्र दर्शन 15 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

शेगांवच्या दक्षिण दिशेला चिंचोली नावाचे गाव आहे. त्या गावात माधव नावाचे एक ब्राम्हण राहत होते. त्यांचे वय साधारण ६० पेक्षा जास्त होते. त्यांनी आपलें संपूर्ण आयुष्य हे संसार म्हणजे सर्वस्व या साठी खर्ची केले होते. आपल्या भविष्यात काय लिहून ठेवले आहे हे कुणासच माहित...