उत्तम लक्षणें – श्री रामदास स्वामी – संदर्भ – ग्रंथराज – दासबोध

Nov 27, 2021 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

आपल्यात कोणते उत्तम गुण असावेत याचे समर्थ श्री रामदास स्वामी यांनी दासबोध ग्रंथात वर्णन केले आहे. त्यातील काही उत्तम गुणांवर आज आपण चिंतन करूयात.

वाट पुसल्याविण जाऊ नये । फळ वोळखल्यावीण खाऊ नये । – बघा महाराज खूप सुंदर सांगत आहेत वाट पुसल्याविण जाऊ नये… म्हणजे अनेकदा आपण बाहेर गावी जाण्याचे नियोजन करतो… अनेकदा आपणस तिथली माहिती नसती… अश्या वेळेस आपण अनेकदा दिशादर्शकाचा वापर करतो… वा अनेक ऑनलाईन पर्याय वापरतो… पण यातून अनेकदा अडचणींना सामोरे जावे लागते… यांपेक्षा आपण जर जाणकार व्यक्तींना विचारले तर नक्कीच आपल्या पुढील अनेक अडचणी आपण टाळू शकतो.. यातून अनेक गोष्टी आपणस माहिती होतील… जसे कसे जाणे योग्य आहे… तिथे काय काय आपण पाहू शकतो…अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे आपणस मिळतील व आपला प्रवास सुखकारक होईल…यातून आणखीन एक मतीती अर्थ आपणस प्राप्त होते आहे… अनेकदा आपणस एखाद्य विषयाची अडचण असते.. पण अनेकदा आपण कुणास विचारत नाही नाही आणि आपणस अडचणी येतात.. जर आपण वेळीच जाणकारांचे मार्गदर्शन घेतले तर नक्कीच आपणस योग्य मार्ग मिळू शकतो… आपण काय खावे तर जे आपल्या प्रकृती ला योग्य आहे तेच पदार्थ आपण सेवन करावेत.. असे नाही कि आपल्या जिभेला आणि मनाला आवडते म्हणून आपण त्या पदार्थाचे सेवन करावे.. जे आपल्या प्रकृतीला योग्य आहे असाच आहार घ्यावा.. म्हणजेच आपण आपल्या आहारा विषयी जागृत असणे आवश्यक आहे.

अति वाद करू नये । पोटी कपट धरू नये – अनेकदा आपण अनेक विषयावर एकमेकांशी वाद घालत बसतो.. त्या वादाचा विषय मूलतः काहीच नसतो… जसे समजा एखादा खेळाचा सामना सुरु आहे… तेव्हा अनेक व्यक्ती एकमेकांशी वाद घालतात… कारण प्रत्येकजण हाच प्रयत्न करतो कि मीच योग्य आहे.. जर खोलवर विचार केला तर आपणस या वादातून त्या दोघांमध्ये कुणाचाच काहीच फायदा होणार नाही तरी देखील ते एकमेकांशी वाद घालून परस्पर संबध खराब करतात… असे वाद करून काय उपयोग आहे का? अनेकदा काय होते आपले एकमेकांशी भांडण होते… भांडण फार किरकोळ असते पण आपले मन त्याला मोठे करते आणि मग मन म्हणते मेलो तरी त्याच्याशी बोलणार नाही वा नाते ठेवणार नाही.. विचार करा आपणास एकदाच मनुष्य जन्म मिळतो.. या कोरोना तर आपणस हेच शिकवले आहे कि आपला क्षणाचा भरोसा नाही… कधी आपला श्वास बंद होईल… तरी देखील जर आपण मनात कपट ठेवत असू तर हे कितपत योग्य आहे.. यावा आपण जरूर चिंतन मनंन करावे.

विचारेंविण बोलू नये । विवंचनेविन चालों नये। मर्यादेविन हालो नये। – अनेकदा आपण इतके बोलतो कि आपणस देखील आठवत नाही कि आपण काय बोललो… आणि नंतर आपणस आपल्या बोलण्याचा पश्चताप होतो… एकदा बंदुकीतील गोळी सुटीला कि आप तिची दिशा बदलू शकत नाही… तसेच शब्दांचे आहे… अनेकदा आपण भावनेच्या भरात काही तरी अति बोलत असतो…आपण बोलताना मागचा पुढचा काहीच विचार करत नाही… समोरची व्यक्ती एक बोलली कि आपण दोन शब्द बोलतो … पण नेमकी समोरची व्यक्ती असे का बोलत आहे… नेमकी कोणती परिस्थिती असेल म्हणून ती विचार न करता बोलत आहे.. या सर्व गोष्टीं चा आपण आधी सारासार विचार करणे आवश्यक आहे… असे नाही कि समोरच्या व्यक्तीने आपणस अपशब्द बोलला कि लगेचच आपण बोलले पाहिजे… उलट अश्या वेळेस आपण काही काळ थांबावे… शक्य असेल तर आपण त्या स्थानाचा त्याग करू शकता.. याचा अर्थ असा नाही कि आपण माघार घेत आहोत… आपण आपल्या सारासार बुद्धी चा वापर करत आहोत. .. यातून आपण काही मर्यादांचे देखील पाल करत असतो… जसे समोरील व्यक्ती आपल्या पेक्षा मोठी असेल तर एक प्रकारे तिचा तो आदरच होईल.. तसेच आपण आपल्या मर्यादा पाळल्या हे समाधान आपणास नक्कीच आनंद देऊन जाईल.

निंदा द्वेष करू नये । असत्संग धरू नये – अनेकदा आपण एकमेकाची निंदा करतो..जर आपण जर खोलवर जर विचार केला तर आपणस जाणवेल कि आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीची निंदा करतो तेव्हा जर आपण विचार केला तर आपणस जाणवेल कि आपण किती मूर्ख पण करत आहोत… आपण त्याची निंदा करतो म्हणजे एक प्रकारे आपल्या मनात नकारात्मक विचार व द्वेष आपण त्या व्यक्ती विषयी आपल्या मनात टाकून.. आपले मंच खराब करून घेतो.. त्याचा फायदा तर काहीच नाही… कारण त्याची निंदा करून आपण नक्की काय साध्य करतो तर … आपले स्वतःचे नुकसान करत असतो… कारण आपण आपल्या विचारांना चुकीचे खाद्य देतो.. त्याचा परिमाण आपल्यावरच होत असतो… त्या मुळे प्रयत्न करूया कुणाची हि निंदा करणार नाही… आता आपण कुंची निंदा करत नाही पण .. समोरील व्यक्ती आपल्या समोर इतरांची निंदा करतो हा एक प्रकारचा असत्संग आहे.. तो आपण नक्कीच टाळू शकतो… आपण तो विषय तिथेच थांबवू शकतो.

ऐक्यतेसी फोडू नये । विद्याभ्यास सोडू नये – हा खूपच खोल विचार आपणस देत आहेत एकीचे बळ आपण सर्वच जाणतो… जर आपल्यात एकी असेल तर आपले कुणीच काही बिगडवू शकत नाही.. याबाबत आपण लहानपणी गोष्ट ऐकिली आहे.. पण आपण जसे मोठे होतो हि गोष्ट विसरतो .. आपणास हि गोष्ट कायम स्मरणात ठेवायची आहे… व आपल्या जीवनात अंमलात आणायची आहे… तसेच इतरांना सुद्धा या साठी प्रेरित करायचे आहे… तसेच आपण शाळा सोडली कि अभ्यास सोडून देतो… आपण जर पाहिलीत कि जी मोठी लोक असतात ते सदैव अभ्यास करत असतात.. हा अभ्यास म्हणजे केवळ पुस्तकी वाचन का ? तर तसे नाही तर नेहमी नवीन गोष्ट शिकतात… जसे एखादा क्रिकेटर आहे तो… कायम सराव करतात त्यामुळे ते उत्कृष्टपणे खेळू शकतात… हि त्यांची खूप मोठी मेहनत म्हणजेच विद्याभ्यास आहे.

चला आज आपण इथेच थांबू या – समर्थांना प्रार्थना करूया – महाराज आज आपण आम्हाला उत्तम गुणांची जी समज दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद… आज आपण आम्हाला इतरांशी संवाद साधण्याची समज दिलीत… वाद न करण्याची समज दिलीत … मनातं कुणाविषयी कपट न ठेवण्याची समज दिलीत… वाणी वरच्या नियंत्रणाची समज दिलीत…निंदा द्वेष न करण्याची समज दिलीत… संगत कशी असावी हि समज दिलीत.. एकता व विद्याभ्यास ची समज दिलीत… या सर्व समज वर काम करण्याची आम्हाला प्रेरणा द्या… फक्त हि गोष्ट विचारात ना राहता.. आमच्या जीवनात उतरावी.. हि प्रार्थना करू घेतल्याबद्दल धन्यवाद !!

 

 


Share
और पढिये !!

वेळ

भगवंताने सर्वांना एक गोष्ट सारखीच दिली आहे ती म्हणजे दिवसाचे २४ तास त्यामुळे आपण असे कधीच म्हणू शकत नाही कि माझ्या कडे वेळ नाही. वॉरन बफे म्हणतात - श्रीमंत लोक वेळेत गुंतवणूक करतात गरीब लोक पैशाची गुंतवणूक करतात मायकल आल्थसूलर - वेळ उडतो आपण त्याचे पायलट आहोत प्रत्येक...

राखी पौर्णिमा

राखी पौणिमा म्हणजे नात्याला घट्ट करण्याचा उत्सव..आपण वयाने मोठे झालो की काही कारणास्तव या नात्यात दुरावा येतो..या मागे कारण असते वडिलोपार्जित संपत्ती..जी खरं तर नात्यात दुरावा निर्माण करते..खरंतर या साठी कष्ट करणारा मरून जातो..आणि मेल्यावर विचार करतो यासाठीच केले होते...

आपण स्व आदर करतो का

आपण स्वतः ला काय समजतो - खरंतर हा प्रश्न आज पर्यंत आपण आपल्या स्वतःला विचारला आहे का ? विचारला असेल तर आपले आपल्या स्वतः बद्दल मत काय आहे? आपण स्वतः स्वतःचा आदर करता का ? याचे उत्तर काहींचे हो असेल काहींचे नाही असे असेल.. खरंतर जो पर्यंत आपण स्वतः आपला आदर करत नाही तो...

श्री दासबोध दशक १२ समास १

श्री दासबोध दशक १२ समास १ दासबोधातील दशक १२ मधील समास १ मध्ये श्री समर्थ रामदास स्वामी विमल लक्षण सांगत आहेत प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालावी हा उपदेश देत आहेत... प्रपंच करण्यात आळस करू नये.. अनेक लोक म्हणतात प्रपंच आणि परमार्थ एकत्र होऊ शकत नाही... रामदास स्वामी...

नृसिंह जयंती – नृसिंह जन्म कथा

आज नृसिंह जयंती निमित्त चला आपण नृसिंह जन्म कथा पाहूया हिरण्यकश्यपू राजा ह्यांनी भगवंताची भक्ती करून त्याला प्रसन्न करून घेतले होते व असा वर मागितला कि मला कोणत्याही माणसाकडून वा प्राण्याकडून मृत्य येऊ नये, दिवसा किंवा रात्री मृत्य येऊ नये , घरात नाही किंवा बाहेर...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 19 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज काही दिवस शेगांव मध्ये राहिले... परब्रम्ह जिथे आवश्यकता असते तिथे संचार करत असते. कुणीही त्यांना एका ठिकाणी अडकवून ठेवू शकत नाही. वऱ्हाड प्रांतात अडगाव नावाचे गाव आहे तिथे गजानन महाराज जाण्यासाठी निघाले . तो महिना होता वैशाख. वैशाख महिना...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 18 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

लीला क्रमांक १७ मध्ये आपण पहिले कि महाराज पिपंळगावात आले. समाधी अवस्थे मधून महाराज बाहेर यावेत व आपल्याशी बोलावेत यासाठी गावकर्यांनी कसा प्रयत्न केला आणि त्यांच्या श्रद्धेचे फलस्वरूप महाराज समाधी अवस्थेतून बाहेर आले तो दिवस होता सोमवारचा. पुढे दुसऱ्या दिवशी मंगळवारी...

श्री गजानन चरित्र दर्शन 17 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

श्री गजानन महाराज शेगांव मध्ये होते..महाराजांच्या लीला ची प्रचित अनेक भक्तांना येत होती..त्यामुळे दिवसेंदिवस.. भक्तांची गर्दी वाढतच होती..अचानक एक दिवस महाराजांच्या काय मनात आले माहित नाही... महाराज अचानक शेगांव सोडून... शेगांव जवळ असणाऱ्या पिंपळगाव गावात निघून...

श्री गजानन चरित्र दर्शन 16 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

ऐके दिवशी सर्व सेवेकरी मंडळी महाराजांच्या चरणी सेवा रुजू करत होते.. अचानक महाराजांनी सर्वांना बोलवले व म्हणाले... वसंत पंचमी च्या दिवशी घनपाठी ब्राम्हण बोलवा.. मंत्र जागर करूया.. तसेच सर्वांनी एक एक रुपया दक्षिणा देण्यासाठी काढावा... महाराजांची हि वाणी ऐकून सर्व...